Skip to main content

“आॅपरेशन स्मिअर” आणि “निद्रिस्त भारत”

लेखक गब्रिएल यांनी रविवार, 22/04/2018 09:54 या दिवशी प्रकाशित केले.
व्हॉसपवर एक म्येसेज फिर्तो आहे. आमाला लई इचार करनारा वाट्ला. फकस्त आप्ल्या फायद्याकडं नजर आसलेल्या बुद्दीमान लोकांला जरा तरी बुद्दी यावी या कारनाने या टिकानी द्येत हाहे. ================================================= “आॅपरेशन स्मिअर” आणि “निद्रिस्त भारत” ©कल्पेश गजानन जोशी देशातली आजची एकंदरीत परिस्थिती पाहता ब्रिगेडीअर हेमंत महाजन (निवृत्त) यांचा एक सत्य भाकित वर्तविणारा लेख आठवतोय. गेल्या वर्षी डोकलाम प्रश्नी मा. महाजन सरांचा “आॅपरेशन स्मिअर आणि भारत” हा लेख दैनिक पुढारीला वाचण्यात आला होता. त्यात त्यांनी स्वत:च्या सैनिकी पेशाला शोभेल असे एक गुढ सत्य मांडले होते.

दोन भिकारी भीक मागती, पुलाखाली करिती वस्ती

लेखक खिलजि यांनी शनिवार, 21/04/2018 19:27 या दिवशी प्रकाशित केले.
दोन भिकारी भीक मागती पुलाखाली करिती वस्ती नेहेमी नेहेमी करुन याचना भुलवी फसवी पांथस्थांना एके दिवशी सांज वेळी अशीच होती रीती झोळी कोसुनी त्या चंद्रमौळी करिती याचना भरण्या झोळी धूर प्रकटला, डोळे दिपले शिवशंभोने दर्शन दिधले दोघांसी तीन अंडे दिले इच्छा धरुनी फोड तयासी इप्सित मिळेल त्वरित तुम्हांसी दोघेही ते खुश जाहले परतीच्या प्रवासा निघाले दोघांच्याही दोन वेगळ्या वाटा जाण्यापूर्वी गळाभेटा वर्षानंतर भेटू पुन्हा आपण देऊ यथेच्छ एकमेका आलिंगन काळ लोटला एक वर्षाचा शोधत शोधत पहिला आला त्याच जागेवर दुसरा नव्हता पुलाखाली तो उभा सापडला तीच याचना तीच झोळी तोच भि

शीर्षक नाही

लेखक मूखदूर्बळ यांनी शनिवार, 21/04/2018 17:31 या दिवशी प्रकाशित केले.
कृष्णा करु आता काय लागे अबलांची हाय शील प्राण आता जाय नका करु आता गय दुर्जनांचे पुन्हा कौरव मातले कृष्णे करीतसे धावा देवा आता तरी पावा ज्योतिलाही तेल आता आसवांचे पुन्हा देवा घे अवतार कर पुन्हा चमत्कार तूच देशी न्याय भार आण तुला आता आहे रगताचे

एस्टी कार्यशाळा भेट-चित्रफित

लेखक आलमगिर यांनी शनिवार, 21/04/2018 17:24 या दिवशी प्रकाशित केले.
एस्टी कार्यशाळेच्या भेटीची व्हिडियोलिंक https://m.youtube.com/watch?v=VS4z2KLqPf0 लेखाची लिंक http://www.misalpav.com/node/42039 अल्प ओळीच्या धाग्यासाठी क्षमस्व आलमगिर (प्रणव जोशी)

आत्मताडनाची कविता.....

लेखक शिव कन्या यांनी शनिवार, 21/04/2018 16:26 या दिवशी प्रकाशित केले.
आत्मताडनाची कविता लिहू नये... यात होते असे, कि आत्मा सोडून बाकी सगळे दुखावतात यात काय हशील आहे, सांग! काय कामाची असली कविता? माणूस जोडत नाही, ती कविता नाही ही घे चिकन बिर्याणी, तुला सांगतो, कविता म्हणजे बिर्याणी मसालेदार, स्वादिष्ट! बोन प्लेट तयार ठेवायची होय, होय... तसेच होते.. आत्मताडनाच्या कविता शेवटी बोनप्लेट मध्येच पडतात... मी म्हणतो, मुळात कशाला करून घ्यायचे आत्मताडन? कशाला? तुझे आज काय, तर स्वतःच स्वतःचे अपहरण उद्या काय तर स्वतः च स्वतः चा तुरुंग बांधायचा... कशासाठी म्हणतो मी?

"शिळा"लेख....

लेखक ss_sameer यांनी शुक्रवार, 20/04/2018 22:43 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या कडे कधीच शिळ उरत नाही. कारण ज्या दिवशी जेवण मला आवडतं ते अन्न तिला आवडत नाही, आणि तिला आवडलेलं मी पोटभर खाऊ शकत नाही. आठवड्यातले तीन दिवस कोणीतरी एक पोटापेक्षा जास्त खाऊन तृप्त असतो तर उरलेले तीन दिवस दुसरा, कारण स्वयंपाक सरासरी एक दिवसाआड चांगला बनवला जातो. अर्थात माझ्या दृष्टीने उत्तम म्हणजे तिच्या दृष्टीने बेचव ह्या व्याख्येप्रमाणे. आठवड्याचे उरलेले तीन दिवस मी कमी जेवतो याची दोन कारणे, एक म्हणजे आमची अन्नपूर्णा इतकी देखील वाईट स्वयंपाकिण नाही की पूर्ण उपाशी राहावे लागेल.

तिच्या कपाळावरचा घामाचा थेम्ब , ओघळून हळुवार हनुवटीपर्यंत आला

लेखक खिलजि यांनी शुक्रवार, 20/04/2018 16:24 या दिवशी प्रकाशित केले.
तिच्या कपाळावरचा घामाचा थेम्ब ओघळून हळुवार हनुवटीपर्यंत आला आधीच फिल्डिंग लागली होती पण कॅच मी केला कित्येकांनी हाय खाल्ली बऱ्याच जणांनी माघार घेतली सर्वांदेखत चाटून पार फस्त केला गड्या , मी पहिला टप्पा पार केला ॥ दुसऱ्या टप्प्यात दाखल झालो मैत्रिणींच्या कळपात आलो दोन फारच जिवलग होत्या, तिच्या नकळत त्यांचा लाडका भाऊराया झालो बघता बघता सेमीला गेलो ॥ सेमीत गाठ होती तिच्या क्रूर भावांशी नीट खेळलो नाही तर जाणार होतो जीवानिशी एकुलती एक बहीण होती त्यांची शोधत होते शालीन अन संस्कारी मेव्हणा सुटाबुटात अस्साकाही सामोरा गेलो जणू आलाय बाहेरगावचा पाव्हणा अन अंतिम फेरीत

मिणमिणता दिवा.

लेखक Jayant Naik यांनी शुक्रवार, 20/04/2018 10:21 या दिवशी प्रकाशित केले.
मिणमिणता दिवा .. मरगळलेल्या मनाला आशेची चाहूल लागली . कंटाळलेल्या वर्तमानाला भविष्याची पालवी फुटली. असाच कोणीतरी देवदूत पहाटे पहाटे समोर आला…. “तुला काही प्रश्न असतील तर उत्तरे मनात फुलवीन” म्हणाला . जीवनाचे रहस्य काय ?संघर्षाचे बीज काय ? आनंदाचे आणि वेदनेचे प्रयोजन काय ? श्री कृष्ण ,मोहम्मद आणि येशूचे साध्य काय ? त्यांना काय करायचे होते ? ते पूर्ण झाले काय ?
काव्यरस

रामानुजम आणि रेमन झीटा

लेखक साहना यांनी शुक्रवार, 20/04/2018 10:07 या दिवशी प्रकाशित केले.
१ + २ + ३ + ४ + ५ + ६ ....... = -१/१२ समजा वरील समीकरण कुणी तुम्हाला दाखवले तर तुम्हाला काय वाटेल ? कि ह्या माणसाला गणित अजिबात येत नाही. सर्व पॉसिटीव्ह अंकाची बेरीज निगेटिव्ह कशी असू शकते ? पण गणिताचे मूलभूत सिद्धांत ज्यांना चांगले समजतात त्यांनी जर वरील समीकरणाला पहिले तर कदाचित त्यांना त्यांत थोडे तथ्य दिसू शकते. रामानुजम ह्यांनी हार्डीना जे पात्र पाठविले त्यात हे समीकरण होते. हार्डी ह्यांनी रामानुजमची प्रतिभा ओळखून त्यांना लंडन ला बोलावले. भारताच्या गुलामगिरीच्या काळांत जे काही थोडे चांगले साहेब होते त्यांत हार्डीचा नंबर फार वरचा आहे.

प्रदूषण (२7)- एक मुलाकात धुळीच्या आंधी सोबत

लेखक विवेकपटाईत यांनी गुरुवार, 19/04/2018 19:25 या दिवशी प्रकाशित केले.
अप्रैल महिन्याच्या दुसर्या पंधरवड्यात दिल्लीत उन्हाची प्रखरता जाणवू लागते. दिवसाचे तापमान ४० अंशाच्या वर जाते. त्या सोबत दक्षिण पश्चिम दिशेहून येणारे उष्ण वारे हि दिल्लीत येऊन धडकतात. उष्ण वार्यांसोबत राजस्थानची रेत हि दिल्लीत पोहचते. पूर्वी हि धूळ लाल-पिवळी दिसायची. पण आता काळपट दिसते. दिल्लीत लाखो वाहने आणि फैक्ट्र्या रोज आकाशात धूर सोडतात. धुरावाटे नायट्रोजन, सल्फर, कार्बन यांसह घातक रासायनिक पदार्थ हवेत मिसळतात. प्रदूषित पदार्थांचे हि बारीक कण हि या धुरासोबत आकाशात पोहचतात. धुळीच्या आंधी सोबत हे सर्व प्रदूषण घरा-घरात पोहचते.