मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आतला आवाज

श्रीकृष्ण सामंत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
"मला वाटतं,आपल्या आतल्या आवाजाची जी शक्ति आहे ती आपल्याला आपल्या कठीण प्रसंगात मदतीला येते.मला वाटतं,लोक सुखासुखी कुठचीच गोष्ट जावू देत नाहीत.काही किंमत पडली तरी ते दुसऱ्याला पण मदत करतात.

चकोल्या (वरणफळं )

श्रीयुत संतोष जोशी ·
साहित्य : तयार साधं वरण ; चिंच,गुळ,गोडामसाला,मीठ,लाल तिखट, कणिक , ओवा , कोथिंबीर , तेल , साजुक तूप , लसुण कृति : कणिक भिजवताना त्यात थोडं मीठ,लाल तिखट ,ओवा , कोथिंबीर घालणे. थोडं जाडसर लाटून त्याचे शंकरपाळे करणे. तयार वरण उकळायला ठेवून त्यात चिंच ,गुळ,गोडामसाला,मीठ,लाल तिखट घालणे. वरणाला साजुक तूपाची लसणाची फोडणी देणे आणि ते शंकरपाळे कच्चेच त्या उकळत्या वरणात सोडणे. शंकरपाळे वरणात नीट शिजल्यानंतर उतरवून भाताबरोबर किंवा नुसतं खायला सुद्धा खूप छान लागतं यात चिंच आणि गुळ जरा जास्तंच घालावे.

एक खटकलेली बातमी ...

भडकमकर मास्तर ·
गेल्याच महिन्यात वर्तमानपत्रात एक बातमी वाचली... मथळा होता " लग्नाचे आमीष दाखवून बलात्कार" ......... असल्या बातम्या सतत वाचनात येतात... ही सुद्धा वाचली , त्यात नेहमीप्रमाणेच ..." एक गावाकडची मुलगी होती, कॉलेजात जाणारी , सज्ञान ..तिथे हा एक ओळखीचा मुलगा / बाप्या आला...तिला तो आवडला, प्रेम निर्माण झालं ... घरच्यांची परवानगी मिळणार नाही म्हणून मग त्याने तिला शहरात (पळवून !!! )आणलं... ते दोघे सहा महिने वेगवेगळ्या लॉजवर राहिले, वेगवेगळ्या शहरात राहिले, फिरले...

तो आणि त्याचा 'मी'

काळा_पहाड ·
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
देवाजवळ जाताना 'मी'पणा सोडावा म्हणतात तसाच गेलोही. पण ! मला भेटला मुर्तिमंत अहंकार मुर्तिजवळ असण्याचा. मोठ्या कष्टाने मन सावरले प्रकटणाय्रा 'मी'पणाला आवरले मनोमन खात्री पटली तीव्रतर खंतही वाटली त्या गाभाय्रात देवच नव्हता ! होता फक्त एक -- अहंकार आध्यात्मिकतेचा बुरखा पांघरलेला देवालाही आपल्या प्रदर्शनीय पुजेत डांबणारा आपल्याच श्रेष्ठत्वात रमणारा तो आणि त्याचा 'मी'!!!!!!!
काळा पहाड

धमुचे केळवण (जेव्हा पुरी नि भाजी - )

अमोल केळकर ·
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
मनस्वी ताईंनी 'धमाल मुलासाठी 'केलेला केळवणाचा बेत पाहुन तोंडाला पाणी सुटले आणी हे काव्य ही स्फुरले चालः जेव्हा तिची नि माझी चोरून भेट झाली ,झाली फुले कळ्यांची, झाडे भरास आली !! गीत - मंगेश पाडगावकर संगीत - यशवंत देव स्वर - अरुण दाते ' ------------------------------------------------------------------------ जेव्हा पुरी नि भाजी ताटात ही पडाली !

सस्नेह निमंत्रण.

धमाल मुलगा ·
लेखनविषय:
प्रति, समस्त मिसळपाव.कॉम कुटुंबीय. सप्रेम नमस्कार वि.वि. मंडळी, येत्या जुलै महिन्याच्या ८ तारखेस (आषाढ शु.६, शके १९२९) तुमचा मित्र "धमाल मुलगा" विवाहबध्द होत आहे. वैयक्तिकरित्या सर्वांनाच व्यक्तिशः भेटून निमंत्रण पत्रिका देणे केवळ अशक्य असल्याकारणे, सोबत पत्रिकेचे स्कॅन केलेले चित्र इथे चढवत आहे. कृपया हेच आग्रहाचे निमंत्रण समजुन ह्या विवाहसोहळ्यास उपस्थित राहून आम्हांस आपले शुभाशिर्वाद द्यावेत ही नम्र विनंती. आपलाच, धमाल उर्फ कैवल्य. विवाहस्थळ : आनंद मंगल कार्यालय, नेहरु स्टेडियम समोर्,सारसबागेपाशी, पुणे. मुहुर्तः ८-जुलै-२००८, वेळः स. ११वा.

तुम्ही आत्तापर्यंत कितीवेळा मराठी साहित्य संमेलनाला गेला आहात?

ॐकार ·

ध्रुव 26/06/2008 - 09:06
तुम्ही आत्तापर्यंत कितीवेळा मराठी साहित्य संमेलनाला गेला आहात? या कौलाचा आणि साहित्य संमेलन पल्याडला भरणार याचा काही संबंध आहे का? हा कौल घेण्यामागचे कारण नाही कळले. तुम्ही 'उगाच च' किंवा 'मला वाटलं म्हणून' या कारणांसाठी कौल घेणार नाहीत असे वाटते. अवांतरः कौल देणार्‍यांनी कारण माहित करुन घेणे गरजेचे वाटते. -- ध्रुव

In reply to by ध्रुव

ॐकार 26/06/2008 - 21:51
इथे चाललेल्या चर्चा पाहून वाटले की खरंच किती लोक साहित्य संमेलनाला गेले आहेत ते पाहू. थोडक्यात साहित्य संमेलनावरून कुणाचे काही अडते का? आणि अडले तर कुठे असा मोठा गहन प्रश्न पडला आहे. त्याचे उत्तर मिळतेय का पाहतो आहे ;)

आनंदयात्री 26/06/2008 - 09:27
सकाळी सकाळी कौलाचा हा विषय वाचुन हसु फुटले :) मस्त ओंकारराव !

भडकमकर मास्तर 26/06/2008 - 14:06
एकदाही नाही... जायची मनापासून इच्छाही झाली नाही...( एकदा वाटले होते पुण्यात संमेलन होते तेव्हा) पण तेही काही विशेष नाही... अगम्य परिसंवाद / चर्चा मला आवडत नाहीत.... पुस्तकांसाठी गेले पाहिजे , हे खरे असले तरी सुदैवाने मला हवी ती पुस्तक विविध पुस्तकप्रदर्शनात मिळतात , त्यामुळे मी काही साहित्यसंमेलनाला जात नाही... साहित्यिक किंवा कवी मंडळींना पाहून मला स्वतःला लेखन / वाचनासाठी प्रेरणा वगैरे मिळत नाही, त्यांचं लेखन / काव्य हीच प्रेरणा पुरेशी आहे... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by भडकमकर मास्तर

इनोबा म्हणे 27/06/2008 - 02:17
हेच म्हणतो... अगम्य परिसंवाद / चर्चा मला आवडत नाहीत.... आपलं पण हेच आहे...एकतर यातुन साध्य काहीच होत नाही...टाईमपास होतो तो फक्त वाद घालणार्‍यांचा... कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

संदीप चित्रे 27/06/2008 - 01:16
मी अमेरिकेत राहतो म्हणून नाही पण मला हा विषय कौल घेण्यासाठी योग्य वाटला. 'खोक्याबाहेरचा विचार' केल्याबद्दल अभिनंदन ॐकार :)

पिवळा डांबिस 27/06/2008 - 01:47
नाय बुवा!! नाय म्हंजे तसा परसंगच आला न्हायी कधी!! पिवळा डांबिस

एक 27/06/2008 - 02:21
एका चर्चेत विचारला होता... अर्थात मी कधीही सा. सं ला गेलो नाही आणि सा. सं ने नक्की काय साध्य होतं ते अजूनही क्लीयर झालेलं नाही.

भडकमकर मास्तर 27/06/2008 - 10:10
अवांतर : या निमित्ताने आठवले की औरंगाबादला साहित्य संमेलन झालेले होते तेव्हा ई टीव्हीने तिथल्या आलेल्या लोकांसाठी प्रश्नमंजुषा घेतली, सर्व सामान्य लोकांसाठी... आणि ती प्रक्षेपितही केली... त्यात सर्व मंडळींनी अमाप तारे तोडले...( त्यात सगळे आपण टीव्हीवर दिसणार या उत्साहातली अगदीच पोरेसोरेही जास्त) कुसुमाग्रज म्हणजे पु.ल. देशपांडे केशवसुत म्हणजे व.पु.काळे असल्या टाईपची उत्तरे तिथे हसतमुखाने खूप जणांनी दिली त्यानंतर मला काही काळ खूप विनोदी वाटले आणि हसलो वगैरे मग मात्र सारेच कारुण्यपूर्ण आणि दु:खदायक झाले...पुन्हा कोणत्या चॅनलने हा प्रकार केला नाही बहुतेक... अर्थात त्या निमित्ताने त्या पोरांच्या कानावर काही साहित्यिक नावे पडली, हे ही नसे थोडके...कदाचित यासाठीच साहित्य संमेलन घेत असावेत... यातून कोणताही ठाम निष्कर्ष काढायची इच्छा नाही... एक अनुभव म्हणून नोंदवावेसे वाटले, इतकेच.. ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

लग्नाआधी नि लग्नानंतर !

संदीप चित्रे ·
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
राम राम मंडळी --'शादी से पहले और शादी के बाद' ह्या माझ्या हिंदी कवितेचा मराठी अनुवाद :) ------------------------------- लग्नाआधी हाती हात शब्दांमधे मधुर मिठास फोनवर बोलणं तासनतास भेटल्यावरही रोजचं खास ..१ आकाशीचा रंग निळा वा असो घनघोर वर्षा कप कॉफीचा, एक छोटासा दोन जीवांना हो पुरेसा ..२ लग्न होता सारे संपले तिचे 'ना' केवळ नाव बदले संध्याकाळी येतो घरी मी घेऊनिया भाजीचे ओझे ..३ तसे एकांती बोलतो अजूनि वेळेचा ना हिशोब ठेवूनि घरखर्च नि 'फी' पोरांची जमा संपते चुटकीसरशी ..४ मात्र आटलं प्रेम नाही पण सांगाया वेळ नाही करता संवाद नजरेतूनी शब्दांचा फुका खेळ नाही ..५ -------------------------- w

जालावरील संक्षिप्त शब्द

विद्याधर३१ ·
सध्या आपण आंतरजालावर खूप शब्दांची संक्षिप्त रूपे वापरतो. जसे १) व्य. नि. / विरोप = व्यक्तिगत निरोप. २) ह. ह. पु. वा. = हसून हसून पुरे वाट ३) पु. ले. शु. = पुढील लेखनाला/स शुभेच्छा. यातील काही शब्दांचे पूर्णार्थ माहीत नसल्यास बरेच वेळा प्रतिसादांचा अर्थे समजत नाही. तरी आपण वापरत असलेले संक्षेप येथे नोंदवावे यासाठी हा धागा सुरु करत आहे. प्र क टा आ म्हणजे काय?

थोडक्यात, न विचारलेली गम्मत

श्रीकृष्ण सामंत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
“सुख जवापाडे दुःख पर्वता एव्ह्डे” यालाच, ”जीवन ऐसे नांव ” असं म्हणतात. जीवनात, ”कधी खुषी कधी गम” असतं, बालपण,तरूणपण आणि म्हातारपण हे शेवट पर्यंत जगल्यावर आयुष्यातल्या ह्या अनुभवायच्या पायऱ्या आहेत असं वाटतं. वसंत,ग्रीष्म वगैरे आयुष्यात ऋतु येतच राहणार. “नाचरे मोरा आंब्याच्या वनांत “ असं म्हणता,म्हणता “कां नाही हंसला नुसते मी नाही म्हटले नसते” असं म्हणे पर्यंत, ”मोहूनीया तुज संगे नयन खेळले जुगार” असं म्हणताना “जीवनात ही घडी अशीच राहूदे” असं म्हणावसं वाटत नाही असं मुळीच नाही. आणि,नंतर “थकले रे नंदलाला” असं म्हणायला काहिही वाटत नाही. ”जन पळभर म्हणतील हाय,हाय “ म्हणण्याची वेळ केव्हां येऊन