मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

तुम्ही आत्तापर्यंत कितीवेळा मराठी साहित्य संमेलनाला गेला आहात?

ॐकार · · कौल

वाचने 1003 वाचनखूण प्रतिक्रिया 9

ध्रुव 26/06/2008 - 09:06
तुम्ही आत्तापर्यंत कितीवेळा मराठी साहित्य संमेलनाला गेला आहात? या कौलाचा आणि साहित्य संमेलन पल्याडला भरणार याचा काही संबंध आहे का? हा कौल घेण्यामागचे कारण नाही कळले. तुम्ही 'उगाच च' किंवा 'मला वाटलं म्हणून' या कारणांसाठी कौल घेणार नाहीत असे वाटते. अवांतरः कौल देणार्‍यांनी कारण माहित करुन घेणे गरजेचे वाटते. -- ध्रुव

In reply to by ध्रुव

ॐकार 26/06/2008 - 21:51
इथे चाललेल्या चर्चा पाहून वाटले की खरंच किती लोक साहित्य संमेलनाला गेले आहेत ते पाहू. थोडक्यात साहित्य संमेलनावरून कुणाचे काही अडते का? आणि अडले तर कुठे असा मोठा गहन प्रश्न पडला आहे. त्याचे उत्तर मिळतेय का पाहतो आहे ;)

एकदाही नाही... जायची मनापासून इच्छाही झाली नाही...( एकदा वाटले होते पुण्यात संमेलन होते तेव्हा) पण तेही काही विशेष नाही... अगम्य परिसंवाद / चर्चा मला आवडत नाहीत.... पुस्तकांसाठी गेले पाहिजे , हे खरे असले तरी सुदैवाने मला हवी ती पुस्तक विविध पुस्तकप्रदर्शनात मिळतात , त्यामुळे मी काही साहित्यसंमेलनाला जात नाही... साहित्यिक किंवा कवी मंडळींना पाहून मला स्वतःला लेखन / वाचनासाठी प्रेरणा वगैरे मिळत नाही, त्यांचं लेखन / काव्य हीच प्रेरणा पुरेशी आहे... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by भडकमकर मास्तर

इनोबा म्हणे 27/06/2008 - 02:17
हेच म्हणतो... अगम्य परिसंवाद / चर्चा मला आवडत नाहीत.... आपलं पण हेच आहे...एकतर यातुन साध्य काहीच होत नाही...टाईमपास होतो तो फक्त वाद घालणार्‍यांचा... कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

मी अमेरिकेत राहतो म्हणून नाही पण मला हा विषय कौल घेण्यासाठी योग्य वाटला. 'खोक्याबाहेरचा विचार' केल्याबद्दल अभिनंदन ॐकार :)

एक 27/06/2008 - 02:21
एका चर्चेत विचारला होता... अर्थात मी कधीही सा. सं ला गेलो नाही आणि सा. सं ने नक्की काय साध्य होतं ते अजूनही क्लीयर झालेलं नाही.

अवांतर : या निमित्ताने आठवले की औरंगाबादला साहित्य संमेलन झालेले होते तेव्हा ई टीव्हीने तिथल्या आलेल्या लोकांसाठी प्रश्नमंजुषा घेतली, सर्व सामान्य लोकांसाठी... आणि ती प्रक्षेपितही केली... त्यात सर्व मंडळींनी अमाप तारे तोडले...( त्यात सगळे आपण टीव्हीवर दिसणार या उत्साहातली अगदीच पोरेसोरेही जास्त) कुसुमाग्रज म्हणजे पु.ल. देशपांडे केशवसुत म्हणजे व.पु.काळे असल्या टाईपची उत्तरे तिथे हसतमुखाने खूप जणांनी दिली त्यानंतर मला काही काळ खूप विनोदी वाटले आणि हसलो वगैरे मग मात्र सारेच कारुण्यपूर्ण आणि दु:खदायक झाले...पुन्हा कोणत्या चॅनलने हा प्रकार केला नाही बहुतेक... अर्थात त्या निमित्ताने त्या पोरांच्या कानावर काही साहित्यिक नावे पडली, हे ही नसे थोडके...कदाचित यासाठीच साहित्य संमेलन घेत असावेत... यातून कोणताही ठाम निष्कर्ष काढायची इच्छा नाही... एक अनुभव म्हणून नोंदवावेसे वाटले, इतकेच.. ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/