निर्मुलनवाल्यांचे निर्मुलन
हॅहॅहॅ! अंनिस लई ट्याव ट्याव करती आहे काय? गेली कैक वर्षे साधा जादुटोणा विरोधी कायदा अजुन संमत होत नाही.त्याला अनेक पैलु आहेत. राजकीय, आर्थिक,सामाजिक,वैचारिक हितसंबंध त्यात गुंतलेले आहेत. असो शेवटी ती लोकशाही प्रक्रिया आहे. समाजात अंधश्रद्धा राहाव्यात अस कुणाही सुज्ञास वाटत नाही.या विचाराला चार्वाकापासुन परंपरा आहे.संतांनी देखील आपापल्या परीने मोठे योगदान कले आहे. तरी पण अंनिस हा नेहमी टीकेचा/चर्चेचा विषय असतो. तो असायलाही हवा. नाहीतर समाजमनाची स्पंदने कशी कळणार? वैचारिक उवांनी आमचे डोके नेहमीच खाजते. ते खाजवत खाजवत आम्ही वैचारिक रद्दी चाळत होतो.
मिसळपाव
