गोष्ट------तेव्हांच्या गणेशोत्सवाची!
गोष्ट ४०-४५ वर्षांमागची.ठाणे गावाची.गाव तसे मध्यमवस्तीचे.शहर आणि गाव यांच्या सीमारेषेवर असलेले.बहुतेक माणसे एकमेकांच्या ओळखीची.अश्या त्या गावातल्या तेव्हांच्या गणेशोत्स्वाच्या आठवणी.
आम्ही शाळकरी मुले गणपतिची सुट्टी लागण्यापूर्वीच आपापसात पैज मारीत असू,'यंदा आपण २१,११,५१ गणपतिंचे दर्शन घेणार !'आणि खरोखरच गणेशचतुर्थीला मोदकांच्या भरपेट जेवणानंतर आमच्यासारखी अनेक शाळकरी मुले आपापल्या मित्र-मैत्रिणींसह गटागटाने गणपतिदर्शनाला बाहेर पडत.घर ओळखीचे असो की नसो,डोकावून पहायचे,गणपति दिसला की बेधडक त्या घरांत घुसायचे,'गणपति बाप्पा मोरया'अशी आरोळी ठोकायची.
कामाने भरपूर थकलेल्या त्या घरातील बायकांपैकी एखादी माऊली उठून प्रत्येकाच्या हातावर २-४ साखरफुटाणे ठेवायची की वानरसेना पुढील घराकडे मार्गस्थ !संध्याकाळपर्यंत हा कार्यक्रम उरकला की रात्रीची आरत्यांची बोलावणी सुरू.जोरजोरात आरत्या आणि मंत्रपुष्पांजलि म्हणून घसा बसत असे.पण उत्साहापुढे त्याचे बिचार्याचे काय चालणार ?शाळेचा,घरचा,शेजार्यांचा गणपति आणायला आणि पोचवायला तोच उत्साह!भजन म्हणून म्हणून आणि मासुंदा तलावापर्यंत फेर्या मारून रात्री झोप केव्हां लागत असे ते कळतही नसे.'बाळपणीचा काळ सुखाचा 'म्हणतात ते खोटे नाही हेच खरे.
पुढे कॉलेजजीवनात प्रवेश केल्यावर लहानपणी उत्साहात केलेल्या ह्याच गोष्टी बावळटपणाच्या वाटू लागल्या.पण गणेशोत्स्वाचे वेड मनातून गेले नाहीच,फक्त त्याचे स्वरुप बदलले.आता वेड होते रात्री सार्वजनिक गणेशोत्स्वात होणार्या कार्यक्रमांना हजेरी लावण्याचे.श्री कौपिनेश्वर मंदिर,आर्य क्रीडा मंडळ,चेंदणी,घंटाळी इ.अनेक ठिकाणी पाहिलेले कार्यक्रम तेव्हां इतके चांगले असत की आता तो सुखाचा ठेवा वाटतो.त्याच काळात श्री.रामदास कामत,माणिक वर्मा,जितेंद्र अभिषेकी,इ.गुणी गायकांचे गाणे ऐकायची संधी मिळाली.अभिरुप न्यायालयसारखा तेव्हांचा गाजलेला कार्यक्रम पहायला मिळाला.श्री.वसंत बापट,विंदा करंदीकर,मंगेश पाडगांवकर ह्या तीन कविवरांचे काव्यवाचनाचे कार्यक्रम दरवर्षी कोणत्या ना कोणत्या गणेशोत्स्वात होत असतच.श्री.शाम फडके,बबन प्रभु ह्यांचे फार्सही तरुण हौशी कलाकार सादर करीत्.त्या काळी जणू गणेशमंडळांच्या चांगले चांगले कार्यक्रम आणण्यासाठी स्पर्धा चालत आणि आमच्या त्यांना हजेरी लावण्याच्या !निरनिराळ्या वयोगटांसाठी गीतास्पर्धा आयोजित केल्या जात आणि त्यामध्ये शेकडो स्पर्धक भाग घेत्.अश्याप्रकारे त्यावेळच्या गणेशोत्स्वांनी आमचे सांस्कृतिक,साहित्यिक जीवन संगीतमय,सुमधुर करण्यास मदत केली.आजचे गणेशोत्स्वाचे स्वरुप पाहून मनात येते,'ते हि नो दिवसो गता:'
याद्या
3230
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
वा!!!
होय-----
In reply to वा!!! by बिपिन कार्यकर्ते
छान आठवणी
धन्यवाद-----
छान लेख
अवश्य--
In reply to छान लेख by सहज
हल्लीची
In reply to छान लेख by सहज
जुन्या आठवणी..
आठवणी
अहो,
In reply to आठवणी by सचीन जी
नवरात्र----
In reply to आठवणी by सचीन जी
माझी
छान आठवणी.
माझ्या
वा वा गणेशोत्सव म्हणजे मजाच मजा!