Skip to main content

नातं तुझं माझं

लेखक नेहमी आनंदी यांनी सोमवार, 26/10/2009 13:24 या दिवशी प्रकाशित केले.
नातं तुझं माझं आठवणींच्या पलिकडलं मनात वसलेलं डॊळ्यात साठलेलं हृदयात साठवलेलं नातं तुझं माझं पाण्यासारखं नितळ गहिरं जस कातळं खोल जस तळं हिरव गार जस मळं नुसत्या नावात न अडकणारं नुसत्या रेषांमधे न सामावणारं नुसत्या आभाळात न मावणारं नुसत्या देहात न राहणारं नातं तुझं माझं प्रसन्ना जीके.
काव्यरस

(हव्यास तू)

लेखक कौतुक शिरोडकर यांनी सोमवार, 26/10/2009 12:14 या दिवशी प्रकाशित केले.
(प्राजू यांना अपेक्षित असलेल्या प्रियकराची सद्यस्थिती) घरात अपुल्या भरून उरल्या मद्यराणीचा सुवास तू वेगवेगळ्या गचाळ गंधाची उभी ठाकलेली रास तू क्षणैक जागेवरी न थांबे लडखडणारा त्रास तू मित्रांच्या कुबड्या करुनी तरंगणारा भकास तू अखंड रिचवणारा... झरझर घोट संस्कृतीचा दास तू चाखण्यावरती पोसलेली तुंदीलतनू आरास तू डोळे मिटूनी तुला पहावे.. ग्लास तू ..... ग्लासात तू तुझ्याविना ते कसे जगावे मद्यकर्त्याचा श्वास तू पेगवेड्या त्या जनांना लागलेला ध्यास तू.. बाटलीतील उत्कटतेचा झिंगला उल्हास तू सदा सदाच पीत रहावे न संपणारा प्रवास तू काल बेवडा... आज बेवडा हवाहवासा हव्यास तू..
काव्यरस

खाणावळ

लेखक कौतुक शिरोडकर यांनी सोमवार, 26/10/2009 12:08 या दिवशी प्रकाशित केले.
शेवटी कुमारच्या हट्टापुढे प्रियाचं काहीच चाललं नाही. ती मुकाट गाडीत बसली. त्याने हसून चावी फिरवली व तिच्याकडे पाहीलं. तिचा मुळचा गव्हाळ रंग आता त्याला लालेलाल भासु लागला. "काय झाल ?" माहीत असुनही त्याने तिला खिजवलं. "काही गरज आहे एवढ्या रात्री निघायची ? सकाळी निघालो असतं तर चाललं नसतं ? पण नाही... मी म्हणतो तेच खरं. कोणाचं ऐकशील तर शपथ." एकदाची त्याला बडबडून ती मोकळी झाली. थोडक्यात का होईना पण मनातलं सगळं कचकचून बाहेर आलं आणि तिचं तिलाच बरं वाटलं. "गोड दिसतेस गं चिडलीस की." त्याने तिची ती चिडचिड मनावर घेतलीच नाही. तिने त्याच रंगात त्याच्याकडे पाहीलं आणि तो गोडसा हसला. तशी ती विरघळली.

(किराणा घराण्याचा अति संक्षिप्त इतिहास...)

लेखक सुनील यांनी सोमवार, 26/10/2009 11:03 या दिवशी प्रकाशित केले.
किराण्या घराण्याची सुरुवात देहूकर बुवांनी साधारणतः सतराव्या शतकात पुणे प्रांती केली. परंतु हे घराणे फार काळ टिकाव धरू शकले नाही. त्यांच्या विरोधी घराण्यांनी बुवांच्या हिशोबाच्या चोपड्या इंद्रायणी नदीत बुडवल्या. त्यातील काही चोपड्या नंतर बाहेर काढण्यात आल्या असल्या तरी हे घराणे नामशेषच होत गेले. बुवांपश्चात त्यांच्या घराण्याची खासियत शेजारील गुर्जर प्रांतातील शा घराण्याने उचलली. त्यानंतर जवळपास तीन शतके ह्या शा घराण्याने आपला दबदबा ह्या प्रांती कायम राखला. अगदी परवा परवा पर्यंत त्यांचा प्रभाव खेडोपाडच्या लोकांवर होता.

लाडकी लेक

लेखक वेदश्री यांनी सोमवार, 26/10/2009 10:51 या दिवशी प्रकाशित केले.
"अहो, ऐकलंत का? फीचे पैसे कधी मिळणार तुमचे? तुमच्या लाडक्या लेकीला एकही धडका ड्रेस नाही.. तो घ्यायचाय आणि जरा भाजीही आणायची होती." "आली होती पण खर्च झाली. आईला एमटी केलेत पैसे." "खर्च झाली???!!! आईंना आत्ता गेल्याच महिन्यात तर एमटी केलेलीत ना तुम्ही मग आता परत?" "भाऊला लागत होते हातऊसने.." "बास्स.. त्यांच्या उधळपट्टीला ठिगळे लावायला पैसे आहेत पण पोरांना कपडे घ्यायला नाहीत पैसे.. इतक्या दिवसांनी आलेली ती मेली फी, तीही टाकलीत देऊन आणि परत म्हणा मीच कर्कशा म्हणून.." "माझ्याकडे नाहीयेत आत्ता अजिबात पैसे. कडधान्यं कर काही दिवस." "बाबा, आईला का त्रास देता तुम्ही?

किराणा घराण्याचा संक्षिप्त इतिहास...

लेखक वाटाड्या... यांनी सोमवार, 26/10/2009 04:41 या दिवशी प्रकाशित केले.
सप्रेम नमस्कार मंडळी.. आज आपण किराणा घराण्याचा थोडक्यात आढावा घेऊयात.. किराणा घराण्याचा इतिहास हा थोडासा विचित्र आणि थोडासा वादातीत आहे तरीही ते घराणं सर्वात जास्त लोकप्रिय आहे. असं सर्वसाधारण समज आहे की किराणा घराणं उस्ताद अब्दुल करीम खाँ साहेबांपासून सुरु होतं.पण ते काही खरं नव्हे. तर, अमिर खुस्त्रोचा शिष्य 'गोपाल नायक' किराणा घराण्याचा खरा आद्य पिता आहे. त्याच्यापासुन किराणा घराणं सुरु झालं. पुर्वी तो दुताई नावाच्या यमुनातीरी असलेल्या गावी रहात असे. पण त्याने यमुनेच्या पुरामुळे आपला मुक्काम मुझफ्फरनगर जिल्ह्यातील 'किराणा' ह्या गावी हलवला.

मनसेचे भवितव्य

लेखक अक्षय पुर्णपात्रे यांनी रविवार, 25/10/2009 21:49 या दिवशी प्रकाशित केले.
विधानसभेच्या निवडणु्कीचे निकाल प्रसिद्ध झाल्यानंतर मतदारांनी दिलेला कौल स्थैर्याच्या दिशेने आहे असे काही विश्लेषक म्हणतात तर काही विश्लेषक विरोधकांकडे नसलेल्या पर्यायी कार्यक्रमाला दोष देतात. मात्र मनसेचा प्रभाव वाढला असल्याविषयी दुमत आढळत नाही. मनसेला मिळालेल्या जागा मुख्यतः (खडकवासला आणि कन्नडचा अपवाद सोडल्यास) मुंबईत आणि नाशिकमध्ये आहेत. या शहरांमध्ये आणि काही प्रमाणात पुण्यात मनसेने मांडलेले मुद्दे लोकांना पटत आहेत असे आढळते. पण मनसे हा एक समर्थ पादेशिक पक्ष म्हणून भविष्यात उभा राहू शकेल असे आपल्याला वाटते का? ग्रामीण महाराष्ट्रात मनसेला पाय रोवता येतील का?

संघटनापालट-2

लेखक अन्वय यांनी रविवार, 25/10/2009 20:53 या दिवशी प्रकाशित केले.
राज आणि काका बरेच दिवसांनी भेटत होते. बोलत होते. त्यामुळे बराचवेळ दोघे एकमेकांना डोळे भरून पाहात होते. नि:शब्द निरव शांतता त्या भव्य दिवाणखान्यात दाटून राहिली होती. मदतनीस आत निघून गेला होता. "काय म्हणतेय तब्येत?'' त्या शांततेत राजचा स्वर घुमला. "अजून ठणठणीत आहे. तू बघतोच आहेस.'' काका उपरोधाने बोलले. कधीकाळी आपल्या आवाजानं भल्याभल्यांची भंबेरी उडवणाऱ्या काकांचा आवाज थकल्याचं राजला स्पष्टपणे जाणवत होतं. त्यांना बोलताना मधेमधे धापही लागत होती.

आली माझ्या घरी ही दिवाळी

लेखक प्रभो यांनी रविवार, 25/10/2009 15:23 या दिवशी प्रकाशित केले.
दिवाळीला घरी गेलो होतो.त्याची काही छायाचित्रे मिपाकर कुटुंबियांसोबत शेअर करावी वाटली म्हणून इथे देत आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी काढलेली रांगोळी. ही रांगोळी आईने काढली.