(किराणा घराण्याचा अति संक्षिप्त इतिहास...)
किराण्या घराण्याची सुरुवात देहूकर बुवांनी साधारणतः सतराव्या शतकात पुणे प्रांती केली. परंतु हे घराणे फार काळ टिकाव धरू शकले नाही. त्यांच्या विरोधी घराण्यांनी बुवांच्या हिशोबाच्या चोपड्या इंद्रायणी नदीत बुडवल्या. त्यातील काही चोपड्या नंतर बाहेर काढण्यात आल्या असल्या तरी हे घराणे नामशेषच होत गेले.
बुवांपश्चात त्यांच्या घराण्याची खासियत शेजारील गुर्जर प्रांतातील शा घराण्याने उचलली. त्यानंतर जवळपास तीन शतके ह्या शा घराण्याने आपला दबदबा ह्या प्रांती कायम राखला. अगदी परवा परवा पर्यंत त्यांचा प्रभाव खेडोपाडच्या लोकांवर होता.
आजही ह्या शा घराण्याचे नाव असले, तरी ह्या घराण्याची पताकामात्र हळूहळू गोयल, अंबानी, टाटा आदि मंडळींच्या हाती जात असल्याचे स्प्ष्ट दिसत आहे.
याद्या
1486
प्रतिक्रिया
2
मिसळपाव
इतिहास
छान