Skip to main content

बायको ही सायको असते..डरकाळ्या आणि म्यांव..म्यांव

लेखक कानडाऊ योगेशु यांनी रविवार, 25/10/2009 13:38 या दिवशी प्रकाशित केले.
डरकाळ्या : - बायको ही बायको असते.. एरवी नॉर्मल असली तरी..तुमच्यासाठी सायको असते.. :T साडीचोळी साठी तिची सारखि धावाधाव असते.. तुमच्या तुंटपुंज्या बॅंकबॅलन्समधला.. बायको शिरकाव असते.. ~X( घरामध्ये नववधुसारखी.. ओलांडुनी ती माप येते.. आयुष्यभर पुढे मग.. तुमचेच माप काढत बसते..
काव्यरस

सुगरणीचा खोपा

लेखक सुनील यांनी रविवार, 25/10/2009 07:09 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या महिन्यात काही मित्रांबरोबर वाईला गेलो होतो. तिथे फिरताना झाडावर टांगलेली सुगरणीची घरटी पाहिली. मित्राने त्याचे काही फोटोदेखिल काढले. आज, मिपाच्या मुखपृष्ठावरील "खोपा" पाहून त्याची आठवण आली. स्थळ - वाई दिनांक - ५ सप्टेंबर २००९ आभार - (मिपाकर नसलेला) मित्र, सलील अवांतर - तात्यांनी दिलेल्या गाण्यातील दुव्यात बहिणाबाई चौधरींचा उल्लेख संत बहिणाबाई असा आला आहे, ते चूक आहे.

गार्गी अजून जिवंत आहे...

लेखक ऋषिकेश यांनी रविवार, 25/10/2009 01:23 या दिवशी प्रकाशित केले.
आज अचानक मंगला आठलेकर यांचं "गार्गी अजून जिवंत आहे" हे पुस्तक हातात पडलं. जन्मतारीख वगैरे नसणार्‍या काळात साधारण १९१४-१५ च्या सुमारास उत्तरप्रदेशात इलाहाबादला जन्मलेल्या गुलाबबाईची ही कहाणी. सातव्या वर्षी लग्न होऊन दहाव्या वर्षी मुलाला जन्म दिलेल्या ह्या गुलाबबाईने इतक्या जुन्या काळात इलाहाबाद-प्रयागसारख्या कट्टर धार्मिक परंपरा असलेल्या शहरात अंत्यसंस्काराच्या कामाला वयाच्या अकराव्या वर्षी सुरवात करून तिने "स्त्रियांनी स्मशानपौरोहित्य का करू नये?" असा प्रश्न तत्कालीन धर्ममार्तंडांना केला होता. ह्या स्त्रीबाबत लेखिका एक दोन पानी लेख वाचते आणि त्या स्त्रीला भेटायचंच या विचाराने तिचा शोध घेते.

नव्या `इतिहासा'ची `नांदी'?

लेखक दिनेश५७ यांनी शनिवार, 24/10/2009 22:20 या दिवशी प्रकाशित केले.
हाराष्ट्रासमोर असंख्य समस्या आ वासून उभ्या असताना त्या मुद्‌द्‌यांवर प्रचाराची राळ उठविण्याऐवजी राज ठाकरे यांना "टार्गेट' करून विधानसभा निवडणुका जिंकण्याचा शिवसेनेचा प्रयत्न बूमरॅंगसारखा उलटल्याने "युती'ची वाताहात झाली आहे. लोकसभेच्या निवडणुकीत पहिला ठोसा लगावून शिवसेनेला घायाळ करणाऱ्या "मनसे'चा "दुसरा ठोसा' विधानसभेच्या निवडणुकीत बसल्याने शिवसेना-भाजप युती जायबंदी झाली आहे.

भावसरगम- गाणी

लेखक नानबा यांनी शनिवार, 24/10/2009 21:27 या दिवशी प्रकाशित केले.
पंडित ह्रदयनाथ मंगेशकरांची "भावसरगम" या कार्यक्रमात त्यांनी सादर केलेली त्यांचीच गाणी कुणाकडे आहेत का?? कोणी Live Recording केले असेल तर मला मिळू शकतील का?? pratham.phadnis@gmail.com वर ई मेल करू शकाल का?? प्रथम फडणीस

गोष्ट छोटी डोंगरा एवढी

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी शनिवार, 24/10/2009 13:14 या दिवशी प्रकाशित केले.
"अहो मरणार्‍या शेतकर्‍याला एक लाख देता, त्यापेक्षा शेतकर्‍याला जगण्यासाठी पंधरा - विस हजार द्या". कसे वाटले वाक्य ? खरेतर हा आहे संवाद (डायलॉग) तो पण निळु फुलेंच्या तोंडी. चित्रपटाचे नाव 'गोष्ट छोटी डोंगरा एवढी'. ह्या आणी अशा अनेक शेतकर्‍याची सत्य परिस्थीती विशद करुन सांगणार्‍या संवादांनी आणी प्रसंगांनी भरलेला हा चित्रपट. शेतकर्‍याच्या खर्‍या अडचणी काय आहेत ? शेतकर्‍यावर आत्महत्या करायची वेळ का येते ?

का करावा जिवाचा आटापिटा? -- सामना २४ ऑक्टोबर २००९

लेखक सुहास यांनी शनिवार, 24/10/2009 12:46 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, कालच्या सामना च्या अग्रलेखाविषयी एक नवा धागा सुरू केलेला पाहिला आणि सामना संकेतस्थळावर फेरफटका मारायचे ठरविले.. पाहतो तर आजचा अग्रलेख ज्यात काल तरूणाईच्या नावाने "गजर" होता, तर आज चक्क निरवानिरवीची भाषा आहे.. एखाद्या माणसाचा लढाईत पराभव झाला आहे आणि तो हताश होऊन "याच साठी केला होता का अट्टाहास?" असे विचारतो अशा ए़कंदर आविर्भावाचा हा अग्रलेख आहे.. मला वाटतं या वर चर्चा व्हावी कारण "मराठी माणसाने पाठीत खंजीर खुपसला" असे हा अग्रलेख म्हणतो..

... देवाचं घर !

लेखक दशानन यांनी शनिवार, 24/10/2009 11:49 या दिवशी प्रकाशित केले.
माझा व देवाचा संबध तसा लहानपणापासून. माझी आई सांगते की मी लहान असताना देवघरातील गणपतीची छोटीशी सोन्याची मूर्तीच मला खेळायला हवी असे. उठता बसता माझ्याजवळ तीच मूर्ती. कोल्हापुरातील नागराज गल्लीमधला पीरबाबा असो की गावच्या दर्ग्याचा उरुस असो. मी तेथे हजर असे. कोल्हापुरातलं महालक्ष्मीचं मंदिर म्हणजे तर कोल्हापुरचं हृदय. माझं जवळजवळ सर्व लहानपण मंदिराच्या आजुबाजूलाच गेलं...बालवाडीपण मंदिराजवळच, पहिली ते सहावीपर्यंतची शाळापण जवळच. मंडळाचा गणपती असो किंवा पंचगंगेचा दीपोत्सव त्यांचा त्यांचा आनंद वेगळा होता. पण सगळंच त्या मंदिरापाशी एकवटलेलं होतं.

समृद्धीची रास, घरोघरी...

लेखक दिनेश५७ यांनी शनिवार, 24/10/2009 11:13 या दिवशी प्रकाशित केले.
धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज असे ऐन दिवाळीतले १२ ते १९ ऑक्टोबर दरम्यानचे आठ दिवस देशात `सोनियाचे दिन' होते... दिवाळीच्या दिवसांना सोन्याची झळाळी आली आणि मंदीचे सावट त्यात पुरते झाकोळून गेले. गेल्या वर्षीपर्यंत,दिवाळीच्या दिवसांची चाहूल लागताच, कामगारांच्या `बोनस'च्या बातम्यांनी वृत्तपत्रांचे रकाने भरून जायचे. यंदा त्या बातम्या दिसल्याच नाहीत... त्या बातम्यांची जागा नव्या बातम्यांनी घेतली. दिवस खरंच बदललेत काय? दिवाळीचे दिवस यंदा सोन्याच्या विक्रीच्या दृष्टीने खासच लक्षणीय राहिले. यंदा या दिवसात लोकांनी तब्बल ५६ टन सोने खरेदी केले.