Skip to main content

दु:ख

लेखक सुवर्णमयी यांनी मंगळवार, 03/11/2009 20:45 या दिवशी प्रकाशित केले.
दु:ख स्वतःला वेदना होऊ नये म्हणून प्रयत्न करतात रक्त वाहू नये म्हणून पट्टी बांधतात दु:ख दिसले की त्यावर इलाज करतात सज्जन माणसे! पण लोकांना दु:ख दिसत नाही अथवा बंद डोळ्यामागे जागे असते दु:ख!- इथेच सगळी गोची आहे रक्ताने माखलेले सैनिक आक्रोश करणारी लहान मुले भूकबळी, हुंडाबळी, आत्महत्या करणारा शेतकरी खाटिकाकडे बांधलेली मुकी जनावरे सगळे जेव्हा लोकांसमोर येते तेव्हा शांत झालेले असते सजलेले, सजवलेले , फोटोच्या चौकटीत असते मोहवणारे असते खर आहे- लोक वाईट नसतात, दु:ख चलाख असते!

आठवतात का ते क्षण तुला?

लेखक झंडुबाम यांनी मंगळवार, 03/11/2009 20:05 या दिवशी प्रकाशित केले.
आठवतात का ते क्षण तुला? किती सहज विचारले होतेस आवडते का मी तुला? खूप विश्वासाने दिला होता होकार तुला..... कारण वाटले नव्ह्ते कधी सोडुन जाशील मधेच मला. आठवतात का ते क्षण तुला? किनार्‍यावर वाळूत खेळताना,वाळूत आपली नावे लिहिताना, आलेल्या लाटेने फक्त माझेच नाव पुसल्याचे जाणवले होते मला. वाटले नव्ह्ते कधी सोडुन जाशील मधेच मला आठवतात का ते क्षण तुला? एकत्र प्रेमाच्या आणाभाका खाताना ,शेवट पर्यंत साथ देण्याचं वचन देताना का कुणास ठावूक पण आभाळ भरुन आल्याचं आठवय मला. वाटले नव्ह्ते कधी सोडुन जाशील मधेच मला आठवतात का ते क्षण तुला? किती अवघडली होतीस लग्नात माझी ओळख करुन देताना, पण तेव्हा मात्र धुसर
काव्यरस

मराठी अभिमान गीत कोरस ध्वनीमुद्रण

लेखक अजय भागवत यांनी मंगळवार, 03/11/2009 16:48 या दिवशी प्रकाशित केले.
कौशल इनामदार ह्यांच्या पुढाकाराने खालील एकमेवाद्वितीय कार्यक्रमाचे आयोजन त्यांच्या "मराठी अस्मिता" ह्या संस्थेने केले आहे. त्याबद्दल माहिती मिपाकरांना द्यावी ह्या उद्देशाने, त्यांच्या संस्थळावरील माहिती खाली दिली आहे- "मराठी अभिमान गीताचं काम आता पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. या गाण्याच्या ध्वनिमुद्रणाचा शेवटचा टप्पा म्हणजे एकत्र २०० गायक-गायिकांचं एका वेळी ध्वनिमुद्रण. आपल्यापैकी ज्यांना एका पट्टीमध्ये, बऱ्यापैकी सुरात गाता येतं त्यांनी या ध्वनिमुद्रणात अवश्य सहभागी व्हावं. हा कार्यक्रम नाही, ध्वनिमुद्रण आहे. त्यामुळे आलं की गावं लागेल हे लक्षात ठेवावं!!!

यम धर्म

लेखक विनायक प्रभू यांनी मंगळवार, 03/11/2009 14:19 या दिवशी प्रकाशित केले.
काळा मिट्ट अंधार. अजुनही दहा मिनिटे होती तासिका संपायला. (आजकाल तास म्हणत नाहीत) विज कधी येणार ते माहीत नव्हते. मुले अंधारात कशी काय अभ्यास करतात कुणास ठाउक.? समोर बसलेला मास्तर तरणा होता. चेहेरा तरारलेला. मास्तरकीची चमक स्पष्ट दिसत होती. नेहेमीच्या विझलेल्या डोळ्यानी यंत्रवत काम करणार्‍या शिक्षकापेक्षा वेगळा. शाळा गोलमेज परिषदेच्या काळातली. अजुनही तशीच. १२ फुटावर छत. पत्र्याचे मोडके पंखे तुटकी बाके. माझ्या खुर्चीतल्या ढेकणाची चंगळ चालली होती. शाळेच्या कंपाउंड ला लागुन १७ माळ्याची टॉलेजंग इमारत दिसत होती. ही कुठली आपटे बुद्रुक गावातली शाळा नव्हती. अगदी मुंबईच्या १२००० स्क्वेअर फुट दराच्या उपन

स्वाक्षरीसंदेशगाथा

लेखक आनंद घारे यांनी मंगळवार, 03/11/2009 12:35 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या सखाराम गटण्याच्या खिशात नेहमी एक लहानशी वही असायची. त्याच्या शाळेत कोणताही साहित्यिक पाहुणा आला की त्याला गांठून आणि त्यांच्याकडून एक संदेश आणि स्वाक्षरी मिळवून तो आपल्या संग्रहात भर टाकत असे. एकदा भाईकाकांनी दिलेल्या एका संदेशामुळे त्याच्या जीवनाचे वारू थोडे भरकटले होते आणि त्यांनीच त्याला छानशी पुस्ती जोडल्यावर ते मार्गी लागले याची चित्तरकथा सगळ्या मिसळपाव प्रेमींना माहीत (कदाचित तोंडपाठसुध्दा) असेल. पुढे सखारामाच्या पोराबाळांच्या संसारात ती वही गहाळ झाल्याचे ऐकले आणि आपण अशी एक वही बाळगावी अशी मनातली सुप्त इच्छा उफाळून वर आली.

भाववाढीच्या विरोधात मनसे काय कार्यवाही करेल ?

लेखक माझी दुनिया यांनी मंगळवार, 03/11/2009 10:34 या दिवशी प्रकाशित केले.
भाववाढीच्या विरोधात मनसे काही करू शकेल का ? की मराठीच्या मुद्दयावरच भांडत बसणार ? मनसेच्या संकेतस्थळावर 'सूचना करा' या सदरात मी भाववाढीच्या विरोधात मला 'मनसे'कडून काय अपेक्षित आहे त्याची सूचना म्हणून ही सूचना पाठवली आहे. पाहूया मनसे काही हातपाय हलवते का ते जनतेसाठी.

वाट पाहतोय

लेखक फ्रॅक्चर बंड्या यांनी मंगळवार, 03/11/2009 10:14 या दिवशी प्रकाशित केले.
तु नाही म्हणालीस, ह्या वादळात आणि अश्रुंच्या पुरात, माझ्या मनाने बांधलेले तुझे-माझे आपलं इवलसं घर उध्वस्त झाले पण परसातली रातरानी तशीच आहे, ती वाट पाहतेय, कोणाची ते माहीत नाही अंगनातली बाग वाहुन गेली पण मोगरा तसाच आहे, त्याच्यातली कुठ्ली ही जिद्द माहीत नाही, त्याला कोणाच्या केसांत माळायचे आहे, माहीत नाही अंगणातली तुळस ती पण तग धरुन आहे , का कोणासाठी ते माहीत नाही आणि त्या माझ्या मनातल्या उध्वस्त घराजवळ, आभाळाएवढ माझं वेडं मन इवलसे होउन बसलय, घराकडे येणार्‍या हिरव्या पाऊलवाटेकडे डोळे लावुन, का कोणास ठाउक ...

लक्ष्मण यादव अहिरे: एक सायकलपटू समाजसेवक

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 03/11/2009 06:10 या दिवशी प्रकाशित केले.
लक्ष्मण यादव अहिरे: एक सायकलपटू समाजसेवक आज आपण एका सायकलपटू असलेल्या सामाजसेवकाला भेटणार आहोत. नाव आहे लक्ष्मण यादव अहिरे. त्यांनी सायकलवर भारतभ्रमण केले आहे. ते वयाच्या ७१ व्या वर्षी अजूनही सायकलवरून नशिक उजैन अशी स्वारी करू शकतात. आजही पुढील महीन्यात आपला ७२ वा वाढदिवस साजरा केल्यानंतर सायकलवरून 'इंधन बचाओ' हा संदेश घेवून भ्रमण करण्यास ते निघणार आहेत.

त्रिपुरी पोर्णिमा

लेखक अश्विनीका यांनी मंगळवार, 03/11/2009 02:34 या दिवशी प्रकाशित केले.
कार्तिक महिन्यातील पोर्णिमा म्हणजेच त्रिपुरी पोर्णिमा. या दिवशी भगवान शंकराने त्रिपुरासुराचा वध केला. त्रिपुरासुराच्या अनिर्बंध वागण्याने त्रस्त झालेले देव त्रिपुरासुराचा अंत झालेला पाहून हर्षित झाले आणि त्यांनी हा विजय दिवे प्रज्वलित करून व आतषबाजी करून साजरा केला. म्हणून ह्या दिवसाला देवदिवाळी असेही म्हणतात. तिथी एकच असते , तोच पुर्णाकृती चंद्र आसमंतात असतो तरी प्रत्येक पोर्णिमा वेगळी भासते.