Skip to main content

शनिवारचा ऊतारा.. अजुन एक दुविधा

लेखक हर्षद आनंदी यांनी शनिवार, 12/12/2009 03:44 या दिवशी प्रकाशित केले.
हे असं का? ते तसं का? या द्विधा मनस्थितीत, एक कोणीतरी जगत असतो कधी नाक मुरडत, कधी शिव्या घालत, कधी तोडफोड करत, माजोरड्यांविरुद्ध लढत राहतो, उंबर्याची बंधने झुगारुन, समाजाची चौकट ओलांडुन, नवे नवे पायंडे पाडत राहतो कारण.... हाडांच्या काड्या करुन, आयुष्याचे मातेरे करुन लाखोंच्या जगण्याचे मोल चुकविण्यासाठी टाकीचे घाव सोसणं सटवाईने कोरलेलं असत.........
काव्यरस

शनिवारचा उतारा - दुविधा

लेखक ३_१४ विक्षिप्त अदिती यांनी शनिवार, 12/12/2009 03:18 या दिवशी प्रकाशित केले.
एक फुलपाखरू दुविधेत टाकून गेलं... हे असं का? ते तसं का? या द्विधा मनस्थितीत, प्रत्येकालाच लिहावं लागतं कधी कंपूबाजांसारखं, कधी मालकाविरुद्ध धुडगूस करत, विडंबन पाडत रहावं लागतं कंपूविरुद्ध लिहीताना, आणिबाणीची बंधनं झुगारून, शुद्धलेखनाची चौकट ओलांडून पुढची लाईन पाडावीच लागते, कारण.... कवड्यांच्या दमड्या होऊन भरघोस मानधन मिळण्यासाठी आंतरजालातून बाहेर पडावंच लागतं............
काव्यरस

उपसंहार

लेखक दमनक यांनी शुक्रवार, 11/12/2009 19:37 या दिवशी प्रकाशित केले.
दोन बातम्या. काल बजाज स्कूटरच्या निधनाची आणि आज दिपुंच्या. एका युगाचा अंत झाला अनेक अर्थांनी. बजाज स्कूटरीला भारतीय मध्यमवर्गीयांचे प्रतीक मानले गेले, तसे दिपु हे भारतीय मध्यमवर्गीयांचे प्रतीक असे म्हटले तर अनेकांच्या भुवया उंचावतील. रूढार्थाने दिपु हे 'एनिथिंग बट मिडलक्लास'. विश्वभान, कालभान आणि या सर्वांच्या साक्षीने आत्मभान असलेला साहित्यिक. विसाव्या शतकातला 'फार महत्त्वाचा कवी'. या माणसाला मध्यमवर्गीय विचारसरणीत बसवणे शक्यच नाही. विचारसरणी ही मोठी मजेशीर गोष्ट आहे, नाही का ? जर एक विचारसरणी 'पुढे' गेली काय किंवा 'मागे' आली काय...

ऑनलाईन स्नेहसंमेलन

लेखक अमृतांजन यांनी शुक्रवार, 11/12/2009 15:50 या दिवशी प्रकाशित केले.
थंडीचे दिवस आले की, शाळांमधे स्नेहसंमेलन होतात. त्यावरुन असा प्रस्ताव मांडावासा वाटला की, आपणही एक स्नेहसंमेलन घ्यावे पण ते ऑनलाईन असणे ही त्याची प्रमुख अट. असा प्रकार मराठी संस्थळाच्या इतिहासात प्रथमच होणार असल्यामुळे त्यास एक वेगळेच महत्व प्राप्त होईल. हे संमेलन मिपावरच व्हायला हवे असे नाही- एखादा नवा ब्लॉगस्पॉट करुनही शक्य आहे- जर येथे परवानगी नसेल तर. अशा ऑनलाईन स्नेहसंमेलनाचे स्वरुप कसे असावे ह्याबद्दल आपले काय मत आहे?

खांब-१

लेखक विनायक प्रभू यांनी शुक्रवार, 11/12/2009 09:36 या दिवशी प्रकाशित केले.
"उद्या संध्याकाळी येशील का जरा"? साखरपुडा का? "जरा घोळ झालाय. माझ्या कक्षेबाहेरचे आहे. तुच श्रुती कडे बोल. मी 'जांबुवंत जमान्यातला'. दे फोन तीला. "काका, बाबांच्या आकांड्तांडवाकडे तुम्ही लक्ष देउ नका. माझी काहीही चुक नाहीये. तुम्ही उद्या या. सविस्तर बोलु. फोनवर नको" दिपक म्हणजे अगदी पाणी सुद्धा फुंकुन पिणार्‍या पैकी. आणि श्रुती सुपर फास्ट एक्स्प्रेस. दोघांचाही नाइलाज. असे वाद कायमचे होत असत. घरी पोचल्यावर श्रुती सोडुन सर्वांचे चेहेरे सुतकी. गेल्याच आठवड्यात श्रुतीचे लग्न ठरले होते. फक्त साखरपुडा आणि लग्नाची तारीख ठरायची होती. श्रुतीची जनरल प्रॅक्टिस नुकतीच सुरु झाली होती.

उदय प्रकाश

लेखक मुक्तसुनीत यांनी शुक्रवार, 11/12/2009 08:06 या दिवशी प्रकाशित केले.
आज श्री. दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांच्या निधनानिमित्त अनेक लोकांनी त्यांना वाहिलेली श्रद्धांजली वाहिली , चित्र्यांच्या व्यक्तीत्वाच्या आणि लिखाणाच्या आठवणी काढल्या. यात हिंदी लेखक श्री. उदय प्रकाश यांचाही समावेश आहे. (उदय प्रकाश यांनी वाहिलेली श्रद्धांजली. : http://uday-prakash.blogspot.com/2009/12/blog-post.html ) या निमित्ताने उदय प्रकाश यांच्या लिखाणाच्या आठवणी निघाल्या. हिंदीतला उत्तम दर्जाचा हा लेखक मी वाचला मात्र मराठीमधे.

दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांचे निधन

लेखक अक्षय पुर्णपात्रे यांनी शुक्रवार, 11/12/2009 03:13 या दिवशी प्रकाशित केले.
ज्येष्ठ कवी आणि साहित्यिक दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांचे निधन झाल्याची बातमी नुकतीच वाचली. आदरपूर्वक श्रद्धांजली.

२ रुपये? छे हे तर तत्त्वासाठी....

लेखक स्वानन्द यांनी शुक्रवार, 11/12/2009 00:57 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मित्रहो, आपण डोंबिवली फास्ट पाहिला आहे का हो? अर्थात, आवर्जून मराठी संकेत्स्थळावर येणा-या, मनसोक्त लेखन करणार्‍या आणि तेवढीच उत्साहाने प्रतिक्रियांचा पाऑस पाडणार्‍या बहुतेक मिपाकरांनी पाहिला असावा असं ग्रुहीत धरतो. तर वरील प्रश्न विचारायचे कारण म्हणजे, त्यात दाखवलेला थंड पेयाच्या किमतीवरून झालेला प्रसंग माझ्या बाबतीत कालच घडला. हपिसात एका कठीण समस्येवर काम करत होतो. बराच वेळ डोकं घुसवून सुद्धा काही उत्तर मिळत नव्हतं. म्हणून मग जरा ताजतवानं व्हावं या विचाराने एकटाच बाहेर पडलो. कंपनीच्या गेट च्या बाहेर पडलो. जवळच दोन तीन टपर्‍या आहेत. एका टपरीतून वडापाव घेतला.

चौसष्ठ घरातला आनंद!

लेखक चतुरंग यांनी शुक्रवार, 11/12/2009 00:21 या दिवशी प्रकाशित केले.
२००८ साली जागतिक विजेता बनून भारतीय बुद्धीबळाचे नाव इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवून ठेवणारा आनंद विश्वनाथन हा ११ डिसेंबर ला वयाची ४० वर्षे पूर्ण करत आहे! आनंद एक असामान्य खेळाडू तर आहेच पण अतिशय नम्र, विनयशील आणि साधा माणूस आहे. आपल्या यशाचे श्रेय तो आई-वडील आणि पत्नी अरुणा ह्यांना देतो. २०१० साली होणार्‍या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत रशियन खेळाडू वेसेलिन टोपालोव हा त्याचा आव्हानवीर आहे. विजेतेपदाचा मुकुट टिकवण्याची तयारी आनंद करतोय. त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याचे खास अभिनंदन आणि पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा!!