Skip to main content

अरूणाचल प्रदेश

लेखक विकास यांनी रविवार, 07/03/2010 10:13 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ताच टाईम्स ऑफ इंडीया आणि इकॉनॉमिक टाईम्स मधे वाचलेल्या बातमीप्रमाणे आपल्या तत्पर परराष्ट्रमंत्रालयाने जागतिक बँकेस अरूणाचल प्रदेशसाठी निधी मागणार नाही अशी ग्वाही दिली आहे आणि चीनने हे परराष्ट्रमंत्र्यांचे विधान अधिकृत करण्याची मागणी बँकेकडे केली आहे. श्री.

सूर्याची सावली...

लेखक दिनेश५७ यांनी रविवार, 07/03/2010 09:51 या दिवशी प्रकाशित केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक समर्पित प्रचारक, धुरंधर राजकारणी आणि ज्येष्ठ समाजसेवक नानाजी देशमुख यांचे वयाच्या ९४ व्या वर्षी चित्रकूट येथे निधन झाले. अखेरच्या श्वासापर्यंत समाजासाठी आयुष्य वेचणार्‍या या महान आणि दुर्मिळ जीवनव्रतीचा कौटुंबिक जिव्हाळ्यातून उतरलेला एक सुंदर लेख 'लोकमत' मध्ये प्रसिद्ध झालाय. तो हा लेख : सूर्याची सावली गाढ झोपेत असतानाच अचानक फोन वाजला, आणि झोप चाळवली. इतक्या पहाटे किंवा रात्रीबेरात्री वाजणारे फोन घेणं अलीकडे मी टाळतो. पण त्या दिवशी फोन वाजताच मला जाग आली, आणि मी फोन कानाला लावला. पलीकडे मुंबईहून माझा भाऊ होता... 'रमेश, नानाजी गेले'...

वसई पेटली......

लेखक विकि यांनी रविवार, 07/03/2010 01:01 या दिवशी प्रकाशित केले.
नैसर्गिक दृष्ट्या समृध्द असणार्‍या ,अतिशय सुरेख अश्या वसई-विरार महानगरपालीकेतून ५३ गावे वगळावी यासाठी तेथील आमदार विवेक पंडित यांनी बेमुदत उपोषण केले.त्यांचे उपोषण मोडून काढण्यासाठी ५ मार्चला पोलीसांनी ज्या पध्द्तीने बळाचा वापर केला.स्रिया,वृध्द,लहान मुले,तरुण मुले ,मुली यांवर घरात घुसून बघाणार्‍यालाही चीड यावी असा अमानुषपणे लाठीमार केला,त्याचा निषेध करायलाच हवा.दुरचित्रवाणी वाहिन्यांवरून लाठीमाराचे दृष्य पाहताना इतिहासात वाचलेल्या इंग्रज सरकारच्या जुलुमाची आठवण झाली.एखादे आंदोलन चिरडण्यासाठी पोलीस ज्या पध्द्तीने वागतात ते लोकशाहीला धरून आहे का?असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.महाराष

नंदाच्याई

लेखक आपला अभिजित यांनी शनिवार, 06/03/2010 19:36 या दिवशी प्रकाशित केले.
नंदाच्याई... आम्ही लहानपणापासून त्यांना "नंदाच्याई'च म्हणत आलो. त्यांच्या मुलीचं नाव "नंदा', म्हणून त्यांना "नंदाच्या आई' असं नाव पडलं, हे आम्हाला खूप उशीरा कळलं. आमच्या शेजारीच राहायच्या त्या. अगदी घरासमोरच. आमच्या आवाराच्या मालकांनी दोन खोल्यांची जागा या आखाडे कुटुंबाला राहायला दिली होती. नंदाचे बाबा- म्हणजे नंदाच्याईंचे पती- हमाली करायचे. त्यांची स्वतःची हातगाडी होती. (हातगाडी म्हणजे दोन चाकांची, एका बाजूने ओढायची लांबलचक लाकडी गाडी. त्यावर माल ठेवून ओढून नेतात.

स्वारी गोरखगडावर

लेखक योगेश२४ यांनी शनिवार, 06/03/2010 16:19 या दिवशी प्रकाशित केले.
"अरे ह्या महिन्यात तरी गोरखगडला जायचे का?" कंटाळुन शेवटी मेल माझ्याकडुन सर्व मित्रांना गेला. त्याला कारण असे होते की बर्‍याच दिवसांपासुन गोरखगडचा ट्रेक करायचा विचार होता. पण मुहूर्त काही सापडत नव्हता. या ना त्या कारणांमुळे हा बेत पुढेच ढकलला जात होता. पण हा ट्रेक करायचाच हा बेत मनात पक्का होता. त्यातच गडावरचा सचित्र लेख वाचनात आला आणि बस्स्स ठरविले कि ह्याच महिन्यात गोरखगड सर करायचा.

भारतीय महिलांविषयीचे विनोद

लेखक चिंतातुर जंतू यांनी शनिवार, 06/03/2010 11:50 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या परिचयातील एक समाजशास्त्रज्ञ विदुषी भारतीय महिलांविषयीच्या विनोदांचे संकलन करीत आहेत. आपल्या ऐकिवात आलेल्या अथवा आपल्या प्रतिभेतून स्रवलेल्या अशा विनोदांस कॄपया या धाग्यावर प्रसिध्दी द्यावी. ते करताना खालील मुद्दे लक्षात घ्यावेत.
  • आपल्या मते विनोद चांगला असावा.
  • विनोदातील विनोदनिर्मितीचे मूळ भारतीय महिलांचे 'भारतीय' असणे आणि 'महिला' असणे याच्याशी संबंधित असावे.
  • विशुध्द ज्ञानार्जनात श्लील/अश्लील असे काही नसते. त्यामुळे उपरोल्लेखित विदुषी स्वतः एक स्त्री असूनही त्यांना कोणत्याही प्रकारच्या विनोदाचे वावडे नाही.

ज्या वेळी तुम्हि एकटे असता

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी शनिवार, 06/03/2010 11:30 या दिवशी प्रकाशित केले.
ज्या वेळी तुम्हि एकटे असता.. त्या वेळी काय करता? फावला वेळ कसा घालवता? मी पुस्तक वाचतो.. वा आवडति गाणी ऎकतो

दहशत वादाला धर्म नसेल पण जिहादला धर्म असतोच

लेखक सागरलहरी यांनी शनिवार, 06/03/2010 11:14 या दिवशी प्रकाशित केले.
दहशत वादाला धर्म नसेल पण जिहादला धर्म असतोच , तसे नसते तर जगातला कुठलाही मुस्लिम तरुण अफगाणिस्तान , इराक वा काश्मीर - पॅलेस्टाईन ही कारणे दाखवून घातपातास का पुढे सरसावतो ? सुशिक्षित उच्चभृ मुस्लिम तरुण ( संगणक अभियंता - १ लाख रुपये महिना पगार ) जिहादी हिंसाचाराकडे का आकर्षित होतात ? उल्फा , नक्षल, लिट्टे इ. आंदोलने बव्हंशी त्या त्या भागातील समस्यांपुरती त्यांच्या सीमित होती.