Skip to main content

(....पुन्हा पुन्हा!)

लेखक चतुरंग यांनी गुरुवार, 11/03/2010 17:45 या दिवशी प्रकाशित केले.
कधी कधी प्रेरणा एखादीच कविता असते पण काहीवेळा कवितेसोबतच इतरही धाग्यांचा दंगा एवढा भरपूर असतो की समजत नाही नेमकी प्रेरणा कोणती...जाऊ दे प्रेरणेची काळजी 'मंगेशाला'!
काव्यरस

चंद्रगड आणि ऑर्थरसीट

लेखक बज्जु यांनी गुरुवार, 11/03/2010 17:22 या दिवशी प्रकाशित केले.
चंद्रगड आणि ऑर्थरसीट चंद्रगड आणि ऑर्थरसीटचा ट्रेक म्हणजे महाबळेश्वर आणि जावळी खोर्‍यांमध्ला एक नितांत सुंदर ट्रेक. सदाहरित जंगलाचा हा प्रदेश. तर अशा या ऐतिहासिक वारसा लाभलेल्या, आणि निर्सगरम्य परिसरातून ट्रेक करणं म्हणजे एक अविस्मरणिय अनुभवच. थोडक्यात इतिहासः- जावळी खोर्‍यावर वर्चस्व असलेले सूर्यराव/चंद्रराव मोरे सहजासह्जी स्वराज्यात सामील होत नाहीत हे पाहून महाराजांनी त्यांच्याकडे असलेला रायरीचा किल्ला म्हणजे रायगड स्वारी करुन स्वराज्यात सामील करुन घेतला. जिवाच्या भितीने मोरे जावळीखोर्‍यात असलेल्या चंद्र्गडावर लपून राहिला.

रस्त्यात मामा आडवा येतो जेंव्हा...

लेखक Navigator यांनी गुरुवार, 11/03/2010 16:12 या दिवशी प्रकाशित केले.
प्रस्तावना: आपण सकाळी सकाळी जेंव्हा घाई घाई मध्ये कामासाठी चाललो असताना, आपण ट्राफिक सिग्नल तोडतो आणि मग पोलीसवाला मामा आपल्याला थांबवतो आणि मग आपल्याकडून पैसे लुटतो..
काव्यरस

गुलाबाचा महिमा

लेखक राजेश घासकडवी यांनी गुरुवार, 11/03/2010 13:44 या दिवशी प्रकाशित केले.
गुलाब हा फुलांचा राजा. याच्या शेकडो जाती असतात, व दरवर्षी नव्या निघत असतात. म्हणजे नाव एकच पण प्रत्यक्ष फुलं अनेक. (आता तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे, आम्हाला आयडी अनेक पण व्यक्ती एक हा प्रकार माहीत आहे. तर त्यावर आधीच उत्तर म्हणूनच तात्यांनी आयडी एकच (जवळपास) आणि व्यक्ती अनेक (जवळपास) हे उदाहरण दाखवलं असावं.) हा नावावरनं गुलाबी रंगाचा असतो असं वाटेल, पण तसं झालं तर तुम्ही कोत्या चक्रीय व्याख्येला बळी पडलात असंच म्हणावं लागेल. हा अनेक रंगात, अनेक वासांत व अनेक प्रकारे उगवतो - झु़डूप, कलम, वेल इत्यादी.

जातो म्हणतोस.....

लेखक Dhananjay Borgaonkar यांनी गुरुवार, 11/03/2010 13:08 या दिवशी प्रकाशित केले.
जातो म्हणतोस..हरकत नाही एक पेग पेऊन जा चपला घालतोस..हरकत नाही एक जोडा खाऊन जा नियम मोडतोस..हरकत नाही एक फटका खाऊन जा रडतो आहेस..हरकत नाही एक रुमाल घेऊन जा पुन्हा येतोस..हरकत नाही एक डायपर घेऊन ये पुन्हा लिहितोस??..हरकत नाही कोणी मारल्यावर रडु नकोस मिसळचाट पाहिजे..हरकत नाही खायला घातल्यावर ओकु नकोस काय्..लाल झाली..हरकत नाही पुन्हा मी काय करतोस विचारु नकोस एक चोरलेली कविता.
काव्यरस

शिवसेनेचा गुन्हा काय?

लेखक नील_गंधार यांनी गुरुवार, 11/03/2010 12:36 या दिवशी प्रकाशित केले.
सर्वप्रथम मी येथे हे नमुद करु इच्छितो कि मी शिवसेना ह्या पक्षाचा समर्थक/सदस्य वगैरे नाहि. गेले काहि दिवस हवतर काहि महिनेच म्हणा,शिवसेनेवर चहुबाजुने हल्ले होताना दिसतात. प्रसारमाध्यमे त्यातहि हिंदि/इंग्रजी माध्यमे,इतर राजकीय पक्ष,काहि मराठी वृत्तपत्रे,आयबीन नेटवर्कच्या सर्व वृत्तवाहिन्या वगैरे मंडळि शिवसेनेच्या हात धुवुन पाठिशी लागल्याचे चित्र दिसतेय. मुद्दा महाराष्ट्राच्या विकासाचा असो,मुंबईतील मराठी माणसाचा असो,हिंदुत्वाचा असो वा मराठीचा असो ह्या सर्वाच्या अधोगतीला शिवसेनाच जबाबदार आहे असा सुर ही मंडळि लावत असतात. निखिल वागळे,हेमंत देसाई,राजदीप सरदेसाई,प्रताब आसबे,राजीव खांडेकर,राजु परुळेक

..... पुन्हा पुन्हा !

लेखक जयवी यांनी गुरुवार, 11/03/2010 12:16 या दिवशी प्रकाशित केले.
दाव तोच जीवना लावतो पुन्हा पुन्हा मृत्युला जगायला शिकवतो पुन्हा पुन्हा चांदणी कधी कुण्या अंबरास भार ना चंद्र मग उगाच का हरवतो पुन्हा पुन्हा आसवे न ढाळली मी कधीच पांगळी का तिच्यापुढेच मी भेकतो पुन्हा पुन्हा माज ही जुनाच शिरजोर आज ती पुन्हा आग तीच मी परी पोळतो पुन्हा पुन्हा हां...कबूल दुश्मनी जन्मजात लाभली बांध घालुनी दुवा सांधतो पुन्हा पुन्हा हात जोडुनी उभे सौख्य मजपुढे सदा व्यर्थ दशदिशात मी शोधतो पुन्हा पुन्हा जयश्री

पहिला पाउस

लेखक नाद्खुळा यांनी गुरुवार, 11/03/2010 11:14 या दिवशी प्रकाशित केले.
पहिला पाउस .. शीघ्र कविता' रिमझिम धून ...आभाळ भरुनं (मूळ कवीची माफी मागून ) आला गार वारा सरताना फाल्गुन अशा एका सांजवेळी सरी ओसर ओसर पावसाच्या थेम्बालाही मग फुटतो पाझर थेंब थेंबाला मिळतो ,मग वारा मंद होतो क्षणापुर्वीचा पाउस क्षणामध्ये बंद होतो... कधी अक्राळ गर्जना कधी धरा चिंब चिंब रस्त्यामध्ये मधोमध एक भिजणारा खांब उना वारयासंगे मग पुन्हा प्रकाश प्रकाश फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश (मूळ कवीची माफी मागून ) -के गा

महदाश्चर्यम्!

लेखक सुधीर काळे यांनी गुरुवार, 11/03/2010 10:41 या दिवशी प्रकाशित केले.
महदाश्चर्यम्! मी या व इतर फोरम्सवर नेहमीच लिहीत आलोय् कीं लोकशाहीमध्ये आपण श्रेष्ठींना त्यांच्या धोरणांबद्दल व निर्णयांबद्दल आपला संतोष, राग-संताप त्यांच्यापर्यंत पोचवला पाहिजे व मी हे काम करत असतो, अगदी मनमोहन सिंग-जी, प्रतिभाताई, बराकसाहेब यांच्यापर्यंत!

MISALPAV CHAT

लेखक मंगेशपावसकर यांनी गुरुवार, 11/03/2010 10:04 या दिवशी प्रकाशित केले.
मागील काही दिवस मला लेखकांशी व्यक्तिगत बोलायचे आहे असे त्यांचा प्रतिक्रियेमध्ये दर्शवले असता, चुकीचा समज करून घेण्यात आला. मला वाटत मिपा वरही ऑर्कुट प्रमाणे गप्पा करण्याची सोय असावी. कारण त्यामुळे लेखकाच्या लेखनाबद्दल आणखी जाणून घेता येते. त्याचा व्यक्तिमत्वाचा कानोसा घेता येतो. त्याची विचारसरणी कळते. आणि सर्वात महत्वाची गोष्ट तो लेख त्याच व्यक्ती ने लिहिला आहे कि नाही याची देखील प्रचीती येते, ह्याने नवोदित लेखकांना मदतच होईल असे मला तरी वाटते. जर वाचक सहमत असतील तर नक्कीच प्रतिक्रिया द्याव्यात.