Skip to main content

ढेकणांचा अड्डा

लेखक अमित करकरे यांनी शनिवार, 29/01/2011 04:33 या दिवशी प्रकाशित केले.
ढब्बूनानांच्या बिछान्यातले, एकूण एक ढेकूण भरल्या पोटी, जरा पहुडले, सतरंजीला टेकून पडल्या पडल्या ढेकूण करती, सुखदु:खाच्या गप्पा फारच वाईट रात्री आल्या, आपल्यावरती यंदा झोपत नाहीत पूर्वीसारखे, ढब्बूनाना सध्या अर्ध्या-सोंडी उठती ढेकूण, भलताच झाला वांदा आधीच घोरणे, ऎकुन त्यांचे, दडपून जाई छाती त्यातून हर्बल पेस्ट-कंट्रोलची, सदैव राही भीती तरिही नाना बरे, कितीही आली संकटे जरी दिवसागणती त्यांची वाढे, जाडी-ढब्बी ढेरी भरल्या वजनी कुशी बदलणे, नाही राहिले सोपे नानांना मुळी कळतच नाही, आम्ही चावलो कोठे पुरेत गप्पा, झोपा आता, ढेकणोबा भरती रागे गोंधळ तुमचा ऎकून नाना, खाडकन झाले जागे
काव्यरस

डासाचे गाणे

लेखक अमित करकरे यांनी शनिवार, 29/01/2011 04:31 या दिवशी प्रकाशित केले.
डासाची आई काळजीने विचारी, का रे माझ्या बाळा? माणसांच्या कानाशी गुणगुणण्याचा, तुला का बरं कंटाळा? डास म्हणाला, मी जेव्हा-जेव्हा, कानाशी गुणगुणतो जो-तो फटके मारुन मला लांब लांब घालवतो फुकट असूनही ऎकत नाही कोणीच माझं गाणं लागेल ना अशाने माझ्या करियरला कायमचंच टाळं ठरलं आता, डायरेक्ट गाठायचा सारेगमप चा सेट सादर करायचं गाणं घेऊन मान्यवरांची भेट भेट वगैरे ठीक आहे, पण जपायला सांगे आई पल्लवीमुळे प्रेक्षक वाजवती सदानकदा टाळी
काव्यरस

प्रशंसा ---> अहंकार

लेखक शुचि यांनी शनिवार, 29/01/2011 04:22 या दिवशी प्रकाशित केले.
आज १ विचार वाचनात आला- तो हा की "प्रशंसा का पहेला भोग भगवान को लगाये." ज्याप्रमाणे अन्नग्रहण करण्यापूर्वी देवाला प्रसाद दाखवतो त्याप्रमाणे कोणीही आपली स्तुती केली तर तिचा मनोमन त्याग करून ती प्रथम ईश्वराला समर्पित करा. "त्वदीयम वस्तु गोविन्दम तुभ्यमेव समर्पयेत" स्तुतीपासून कटाक्षाने दूर रहा. यामुळे तुमच्या मनात अहंकाराचे बीज रोवले जाणार नाही. गर्वाने तुम्ही आंधळे होणार नाही. तुम्हाला अनाठायी(?) अभिमान वाटणार नाही इ.इ. मग माझ्या मनात काही प्रश्न निर्माण झाले ते असे की "हेल्दी" अहंकार अशी काही गोष्ट असते की नसते?

डबल चॉकलेट चॉकलेट चिप मफिन्स

लेखक खादाड अमिता यांनी शुक्रवार, 28/01/2011 21:05 या दिवशी प्रकाशित केले.
एवढे केक चे प्रकार बघून मला पण नाही राहवलं. म्हणून ... सामग्री: २ अंडी १ १/२ कप गव्हाचे पीठ (किंवा मैदा) १०० ग्राम बटर १ कप साखर (डायेट शुगर पण वापरू शकता) १/४ कप चॉकलेट चिप १/४ कप कोको १/४ कप दूध १ चमचा बेकिंग पावडर १ चमचा सोडा १ चमचा व्हेनीला इसेन्स मफिन्स आणि केक मधला मोठा फरक म्हणजे त्याला बनवण्याची पद्धत. केक किंवा कप केक बनवताना आधी लोणी आणि साखर क्रीम करून मग त्यात एक एक अंड घालून सगळ्यात शेवटी मैदा घालतात. मफिन्स करताना क्विक ब्रेड मेथड वापरतात.

असहकार यांच्या मुलीसाठी गुजराती केक. हान्डवो ( कडधान्य केक )

लेखक विजुभाऊ यांनी शुक्रवार, 28/01/2011 18:26 या दिवशी प्रकाशित केले.
हा खरे तर गोड केक नाहिय्ये. पण केक सदृष आहे हान्डवो याला आपण तिखट /खारा केक म्हणूया हा सम्मिश्र कडधान्यांपासून करतात तांदूल १ वाटी तूर दाळ १ वाटी काळे उडीद १/४ वाटी मूगाची डाळ १/४ वाटी चणे डाळ 1१/४ वाटी आंबट दही १ वाटी दुधी भोपळा कीस अडीच वाटी गोडे तेल चार चमचे लिंबाचा रस १/२ चमचा 1खान्याचा सोडा १ चमचा साखर २ चमचे लाल तिखट ३ चमचे हिरवी मिर्ची लसुण पेस्ट ३ चमचे हळदी १/२ चमचे चवीपुरते मीठ फोडणी साठी राई ( मोहरी ) २ चमचे पांढरे तीळ २ चमचे ओवा २ चमचे हिंग १/२ चमचे फोडणी साठी तेल चार चमचे कृती तांदूळ आणि डाळी पाण्यात ४ ते पाच तास भिजत घालाव्यात.

फाळणीला सावरकर जबाबदार?

लेखक अवलिया यांनी शुक्रवार, 28/01/2011 18:24 या दिवशी प्रकाशित केले.
'द्विराष्ट्र संकल्पना सर्वप्रथम सावरकर यांनी मांडली होती. त्यानंतर महम्मद अली जीना यांनी ती उचलून धरली आणि त्यामुळेच पुढे भारताची फाळणी झाली'
असे वक्तव्य नुकतेच जेष्ट कॉग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी केले आहे. अधिक माहीती- इथे वाचा मिपावर अनेक इतिहास तज्ज्ञ मंडळी आहेत त्यांनी याबाबत नक्की काय ते सांगावे. फाळणीचा गुन्हेगार नक्की कोण ?

भारतातील विद्यार्थ्यांची रोजगार-योग्यता?

लेखक साधा_सरळ यांनी शुक्रवार, 28/01/2011 16:35 या दिवशी प्रकाशित केले.
भारतातील विद्यार्थ्यांची employability (रोजगार-योग्यता ?) - खरं तर आतापर्यंत हा विषय बरेचदा वाचला होता आणि ह्याविषयी छापल्या गेलेल्या टक्केवारीबद्दल व्यक्तीशः साशंकच होतो. पण सध्या आमच्या छोट्या कंपनीसाठी निवड-चाचणी आणि मुलाखती घेताना येत असलेल्या अनुभवावरून हा प्रश्न अधिकच गंभीर आणि मोठा असल्याचं जाणवलं. पण हे चित्र सार्वत्रिक आहे की मी अनुभवलेला अपवाद आहे, ह्याची खात्री करण्यासाठी हा काथ्याकूट. माहितगार लोकांनी अधिक प्रकाश टाकावा, ही विनंती! काही अंदाजांनुसार, भारतातील अभियान्त्रिकीच्या विद्यार्थ्यांची employability २५% पेक्षाही कमी असल्याचे वाचनात आले होते.