लोकशाही कडून राजेशाही
उत्तर प्रदेशात मायावती, मुलायम, बिहार मध्ये लालू, रबडी, गुजराथ मध्ये मोदी, आंध्र प्रदेशात नायडू, रेड्डी, कर्नाटकात येदुइरपपा, तमिलनाडूत करुणानिधी, जयललिता आणि महाराष्ट्रात 'जाणता राजा' आणि इतर.
गेल्या काही वर्षात या मंडळींचं त्या त्या राज्यात वर्चस्व आहे. त्यांनी (काही अपवाद सोडून) जणू काही राजेशाहीच चालवली आहे असे दिसते. लोकशाही पासून आपण दूर जात आहोत का?
यातील कित्येकांनी आपल्या "मनगटाच्या" जोरावर आपआपला प्रांत आपलाच (आपल्याच बापाच राज्य) असल्यासारखा चालवलेला दिसतो. सत्ता राबवण्यासाठी पैसा आणि पैशासाठी सत्ता. असं भयानक चित्र आपल्याला दिसतं.