Skip to main content

[ज्योतिष] आयुष्यातील उत्कर्ष आणि मध्यबिंदू ज्योतिष

लेखक युयुत्सु यांनी सोमवार, 31/01/2011 12:31 या दिवशी प्रकाशित केले.
भारतीय ज्योतिषात योग ही एक गुंतागुंतीची कल्पना आहे. त्यात राजयोगाला विशेष स्थान आहे. राजयोगाची फले अनेक असू शकतात पण सहसा एका सामाजिक स्तरातून दूसर्‍या वरच्या सामाजिक स्तरात जाणा-या प्रयत्नवादी, धडपडणा-या व्यक्तींच्या पत्रिकेत राजयोग किंवा इतर शुभ योग कार्यरत असल्याचे मानाले जाते. पण इथे एक गोची आहे, ती अशी की भारतीय ज्योतिषात शुभ योग सतराशे साठ आहेत, शिवाय ते बाबा आदम च्या काळातले आहेत. राजयोगाना निष्फ़ल करणारे योग सतराशे साठ गुणिले दोन (कदाचित जास्तच) आहेत. त्यामुळे भारतीय ज्योतिष वस्तुनिष्टपणे अभ्यासणा-यांची भंबेरी उडते. पाश्चात्य जोतिषात इतकी गुंतागुंत दिसून येत नाही.

राख होऊन मेला : नागपुरी तडका

लेखक गंगाधर मुटे यांनी सोमवार, 31/01/2011 08:03 या दिवशी प्रकाशित केले.
राख होऊन मेला : नागपुरी तडका हप्ता थकला म्हूनशान, वसुलीले गेला हप्ता गेला भाडमंधी, राख होऊन मेला ....॥१॥ पंचीस पेट्या महिनेवारी, सेटींग जमून व्हते तारखेवार भेटेस्तोवर, काईबी प्राब्लेम नोते कायच्यातबी काईबी मिसळा, देल्ली व्हती हमी साधेसिधे समिकरन; अर्धे तुमी, अर्धे आमी हप्त्यापायी जीव जाईन, माहित नोयतं त्येला ....॥२॥ महिना उलटून गेला बैन, हप्ता नाई आला मंग जीव सायबाचा, कालवाकालव झाला सायेब म्हने श्याम्या तुह्या, मनात बद्दी आली? हप्ता नाय तं धंदा नाय, कायढीन तुह्या साली हप्त्यासाठी सांग तुनं, उशीर काहून केला?

ही मुस्कटदाबी का?

लेखक सन्जोप राव यांनी सोमवार, 31/01/2011 03:54 या दिवशी प्रकाशित केले.
हिंदुहृदयसम्राटांच्या वाढदिवसानिमित्त प्रकाशित झालेला हा धागा धागाकर्त्याच्या विनंतिनुसार हा धागा वाचनमात्र करण्यात येत आहे. या तळटीपेसकट आता बंद झाला आहे. याचा अर्थ धागाकर्त्याने या धाग्यात काहीही लिहावे आणि त्याला प्रत्युत्तर देण्याची सोय बाकी असू नये अशी योजना संपादक मंडळाने करुन दिली आहे असे दिसते. या धाग्यात धागाकर्त्याने काही मौलिक वाक्ये लिहीली आहेत.

साईबाबा आरती- सुधारणा सुचवा

लेखक चिरोटा यांनी रविवार, 30/01/2011 23:50 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, महाराष्ट्राबाहेर काही साईबाबांची मंदिरे आहेत तेथे अनेक प्रकारच्या आरत्या म्हंटल्या जातात. बेंगळूरमध्ये काही मंदिरांत साईबाबांची आरती मराठीतच म्हंटली जाते. आरती मराठीत असली तरी लिहिली असते कन्नड लिपीमध्ये.

पुढार्‍या,तू मंञी होणार !

लेखक विदेश यांनी रविवार, 30/01/2011 20:25 या दिवशी प्रकाशित केले.
(चाल: विठ्ठला, तू वेडा कुंभार -) ‘भ्रष्टाचारा ’वरती करसी भाषणबाजी फार पुढार्‍या,तू मंञी होणार ! माती,वाळू,सिमेंट,चूना तूच पुरवसी खडी विटांना इमारती त्या उभारतांना तुझ्या ’आदर्शां ’च्या गणतीला नसे अंत ना पार ! सभासभांचे रूप आगळे प्रत्येकीचे जथे वेगळे तुझ्याविना ते काढती गळे हाती कुणाच्या दिसती नोटा कुणी पिऊन हुश्शार ! तूच भेसळीतून जोडसी घोटाळ्यांतुन एकी तोडसी कुरघोडयांतुन पक्ष फोडसी देसी पेटया- लाच पुरवसी पक्ष पुढे बेजार !!

गांधी पुण्यतिथीनिमित्ताने...

लेखक विकास यांनी रविवार, 30/01/2011 19:52 या दिवशी प्रकाशित केले.
आज महात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्त गांधीजींच्या स्मृतीस अभिवादन. गांधीजी, अहींसा आणि त्याला अनुलक्षून स्वातंत्र्य म्हणल्यावर निघणारे वाद (आणि तेच इतर देशभक्त, स्वातंत्र्य सैनीक/सेनानींच्या बाबतीत) चावून चावून चोथा झालेले आहेत. त्यामुळे कृपया करून या धाग्याचा उपयोग त्यासाठी करू नये ही विनंती. वास्तवीक "गंगेमधे गगन वितळले" हे अंबरीश मिश्र यांचे गांधीजींवरील पुस्तक वाचून अनेक वर्षे झाली. (त्या संदर्भात शोधताना माझी आणि भोचक यांचा येथील हा संवाद देखील मिळाला...) मात्र त्या पुस्तकातील एक मुद्दा माझ्या कायम डोक्यात घोळत राहीला.

होम मेड होल व्हीट पिझ्झा

लेखक खादाड अमिता यांनी रविवार, 30/01/2011 16:08 या दिवशी प्रकाशित केले.
हि रेसिपी स्पेशल आहे. कारण ह्यात पिझ्झा बेस पण घरी आपल्या रोजच्या वापरातल्या गव्हाच्या पिठातून (होल व्हीट फ्लॉर) बनवला आहे. पिझ्झा बेस साठी : ३ कप गव्हाचे पीठ १ १/२ मोठे चमचे ड्राय यीस्ट १ चमचा मीठ १ चमचा साखर १ कप कोमट पाणी १ चमचा तेल - यीस्ट आणि साखर कोमट पाण्यात विरघळवून त्याला १५ - २० मि बाजूला ठेवा थोडा फेस येईपर्यंत. - गव्हाच्या पिठात मीठ, तेल आणि यीस्ट चे मिश्रण घालून त्याची सैल कणिक भिजवा. वाटल्यास थोडं अजून पाणी घाला.

हा मराठी माणसा बद्दल आकस का ?

लेखक मराठी_माणूस यांनी रविवार, 30/01/2011 13:50 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळि खालील लेख वाचनात आला. हे एका पुस्तकाचे परीक्षण आहे . त्यात बासू चटर्जींनी त्यांचे काही अनुभव सांगीतले आहेत. http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/7386077.cms त्यात बासुदानी चीत्रपटात राजा परंजपे ना घेतल्या बद्दल , ताराचंद बडजात्यानी खालील हीणकस शेरा मारला आहे ' आप किसको लाये है ये मराठी से?' कोणतीही गुणात्मक टीका नसुन फक्त मराठी म्हणुन ईतकी टोकाची भुमीका ? तीही मराठीतील इतक्या गुणी अभीनेता आणि दिग्दर्शका बद्दल ?