Skip to main content

तात्यांना गाण्याच्या रसग्रहणाची विनंती

लेखक शुचि यांनी रविवार, 29/01/2012 20:52 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय तात्या, परवा यु ट्युबवर शोध घेत असताना पुढील नितांता श्रवणीय गीत सापडले. कितीही ऐकले तरी मन काही केल्या भरतच नाही असे. या गीताखाली काही प्रतिसादांमध्ये असे वाचनात आले की गैरफिल्मी असे गीता दत्त या ज्येष्ठ गायिकेने गायले असून "बंगाली" पद्धतीचे हे गीत आहे. माझ्या विनंतीस मान देऊन, आपण या गाण्याचे रसग्रहण कराल काय? सुरवातीला उडत्या चालीचे हे गाणे नंतर मध्येच "विरह व्याकुळ" आलाप लेऊन सामोरे येते. विशेषतः - "बिरही गगन रोये" या ओळींपासून. येथे राग बदलला आहे का? हे गाणे मनावर इतकी जादू करते त्याचे कारण गीता दत्त यांचा स्वर्गीय आवाज केवळ की विविध (कदाचित) रागांची मनोहारी गुंफण?

एक बहारदार जुने गाणे

लेखक प्रदीप यांनी रविवार, 29/01/2012 20:41 या दिवशी प्रकाशित केले.
कधीकधी पूर्वी ऐकलेले एखादे गाणे मनात पुन्हा अचानक उतरते. मग ते काही दिवस मनात घर करून बसते. तसे मला अलिकडे मालती पांडेंच्या 'कशी रे तुला भेटू' ने वेढले आहे. http://www.aathavanitli-gani.com/Song/Kashi_Re_Tula_Bhetu सुमारे १९४५ नंतर मराठीत भावगीतांचा नवा जमाना आला. ह्याची सुरूवात गजानराव वाटवे ब बबनराव नावाडीकर ह्यांनी केली. नंतर इतर अनेक कवि/ कवयित्रींच्या रचना घेऊन, अनेक नवनव्या गायिकांसह इतर संगीतकार त्यात उतरले. त्या गायिकांतील एक अग्रगण्या नाव म्हणजे मालती पांडे.

संसर्गजन्य जिवाणू

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 29/01/2012 19:56 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळी एका माणसाच्या शरीरात नाकावाटे शिरलो. म्हटले याला चांगला मोठा संसर्गजन्य रोग लावावा. कारण आम्ही जातीने जीव-जंतू जिवाणू विषाणू.

तुम्हाला हवा तसा पापलेट तंदुर / ग्रिल्ड पापलेट / पापलेट फ्राय

लेखक jaypal यांनी रविवार, 29/01/2012 18:52 या दिवशी प्रकाशित केले.
वर नावातच आहे "तुम्हाला हवा तसा" तर नानव्हेज मंडली साठी तुम्हाला आवडेल ते उदा. पापलेट्,सुरमई,हालवा,रावस,चिकन मटन ई. व्हेज मंडली साठी तुम्हाला आवडेल ते उदा. बटाटा, पनिर, रताळे, बेबीकॉर्न ई. मी पापलेट घेतला आहे. पापलेट आख्खा घ्या किंवा फोडी करुन घ्या.

निसर्गाच्या कुंचल्यातून...

लेखक मर्द मराठा यांनी रविवार, 29/01/2012 12:26 या दिवशी प्रकाशित केले.
की वेस्ट, फ्लोरीडा ... अमेरिकेमधील दक्षिण टोकावरील एक प्रसिद्ध किनारा पर्यटन स्थळ. थोडेफार आपल्या गोव्यासारखे छोटेखानी... सागरी क्रिडा प्रकार, पब्स, महागडी रीसॉर्ट्स, किनार्‍यावरील सुर्यस्नान, दिवसभर गळ टाकून मासेमारी असे अगदी अमेरिकन माणसाच्या सुट्टी उपभोगाची सगळी परीमाणे जिथे जुळतात असे टूमदार गाव... गेल्या डिसेम्बर मधे इकडे ३ दिवसांसाठी गेलो होतो. जाण्याअगोदर सवयीनुसार गूगल आणि बीन्गच्या 'भिंगातून ' प्रेक्षणीय स्थळांची यादी तयार केली..

सावधान जगबुडी येत आहे.

लेखक भिकापाटील यांनी रविवार, 29/01/2012 10:56 या दिवशी प्रकाशित केले.
हाय फ्रेंडस् कसे आहात. जगातील एका प्राचीन माया संस्कृतीने सन २०१२ ला जगबुडी होणार आहे असे भाकीत वर्तवले आहे. तारीख आहे २१ डिसेंबर २०१२. माया संस्कृतीचे कॅलेंडरच मुळी २०१२ ला संपते. त्यामुळे जगबुडी निश्चित होणार असे म्ह्टले आहे. मला तरी वाटते. ह्या विश्वाचा अंत जव:ळ आला आहे. आता खाउन्पिउन घ्या. मजा करा. जास्त तंगीत जिवन भार वाहू नका. ओन्ली ऐष. कसें. दररोज तुळशीचे दरशन घ्या. विष्णूचा जप घ्यान करा. शक्यतो पिंपळाच्या झाडाजवळ रहा. प्रलयकाळात पटकन झाडावर चंगून बसा मग तुम्ही वाचलेच म्हणुन समजा. आता टेंशन विसरुन जा.

"साहेब" आता निवृत्त होणार काय???

लेखक चेतनकुलकर्णी_85 यांनी रविवार, 29/01/2012 09:51 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ताच सकाळी सकळी चहा पिताना हि बातमी वाचली .... http://esakal.com/eSakal/20120129/5355751858605295094.htm पवार साहेब म्हणे आगामी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत म्हणे.. तसेच राज्यसभेवर जाऊन जनतेचे पैसे पण वाया घालवणार नाहीयेत... आपल्याला काय वाटते? बोलल्या शब्दाला जागतील कि जसे वेगळ पक्ष काढून पण सोनिया चे पाय धरले तसे करतील?? अवांतर : मला तर असे वाटते कि स्विस बँकेने आता जास्त काळा पैसा जमा करण्यावर असमर्थता व्यक्त केली असेल......

पहेले 'मार' का पहेला गम!

लेखक मराठे यांनी रविवार, 29/01/2012 07:51 या दिवशी प्रकाशित केले.
'शाळा' नुकतंच वाचून संपवलं. तसंच त्यावरचा चित्रपटही नुकताच प्रदर्शीत झालाय. सगळीकडे चित्रपटाची आणि पुस्तकाची चर्चा चालू आहे. पेपरांमधे आणि आंजावर रिव्यू येत आहेत. एकूण सगळं वातावरण शाळामय झालंय. अशात कित्येकांना आपल्या शाळेची, शिक्षकांची, शाळेतल्या मित्रांची (काही भाग्यवंतांना मैत्रीणींची), खोड्यांची आणि विशेषतः शाळेत खाल्लेल्या माराची आठवण झाली नाही तरच नवल. तर या वाहत्या गंगेत हात धूउन घ्यावेत ह्याच एकमेव हेतुने हा धागा काढतोय. जे सत्तर ऐंशीच्या दशकात शाळेत होते त्यांच्यासाठी शाळेत मार खाणं (शिक्षकांकडून.. इतर पोरांकडून नव्हे) हा अगदी सर्वसाधारण मामला होता. (नंतरचं मला माहित नाही.

शेलू !!

लेखक शरभ यांनी रविवार, 29/01/2012 03:07 या दिवशी प्रकाशित केले.
कॉलेजचे दिवस होते. घरी चाललो होतो. नेहेमीप्रमाणे थाण्यावरुन कर्जत पकडली, २:२८ ची. ही डबल फास्ट लोकल डोंबिवली, कल्याण करत, कल्याणनंतर सर्व स्टेशनवर थांबते. बरोबर मित्रदेखील होता. तो डोंबिवलीचा होता. अशाच गप्पा मारता मारता मित्र म्हणाला- काय रे, हे शेलू कुठे आहे ? मी म्हणालो - तुला बदलापूर माहिती आहे. त्यापुढे वांगणी आणि मग शेलू. आणि मग नेरळ... जिथून माथेरानला जाता येतं...का रे ? तो म्हणाला - अरे सहजचं. आणि डोंबिवली आल्यावर तो उतरून गेला. मी विचार केला- थोडा वेळ आहे तर एक छोटी नॅप मारुन घेऊ. तशी असली नॅप म्हणजे नेहेमीचीच असायची. थोड्यावेळाने डोळे उघडले आणि हात ताणून आळस दिला.

बालूशाही

लेखक सूड यांनी रविवार, 29/01/2012 01:01 या दिवशी प्रकाशित केले.
बरेच दिवस काही लिहीलं नाही, म्हणलं चला एखादी पाकृ टाकूया. भले मग कोणी झैरातीचा धागा का म्हणेना !! भारतीय संविधानातला अभिव्यक्तिस्वातंत्र्य वैगरे कसलासा अधिकार घेऊन म्हटलं लिहायला काही हरकत नाही. ;) तर काय म्हणत होतो...हां, पाकृ आहे बालूशाहीची. गोष्टी आयत्या खाण्यापेक्षा त्या करुन पाहायची खुमखुमी भारी. त्यामुळे या पाकृच्या दोन तीन रेशिप्या डोळ्याखालून घालून झाल्या. त्यातल्या सगळ्यातलं मनाला जे पटलं ते उचलून ही पाकृ केलेली आहे, कारण काही रेशिप्यांमध्ये मैद्याच्या निम्मं तूप घालायला सांगितलं होतं. तसा प्रकार केला असता तर बालूशाही नक्की कढईत विरघळली असती.