प्रिय तात्या,
परवा यु ट्युबवर शोध घेत असताना पुढील नितांता श्रवणीय गीत सापडले. कितीही ऐकले तरी मन काही केल्या भरतच नाही असे. या गीताखाली काही प्रतिसादांमध्ये असे वाचनात आले की गैरफिल्मी असे गीता दत्त या ज्येष्ठ गायिकेने गायले असून "बंगाली" पद्धतीचे हे गीत आहे.
माझ्या विनंतीस मान देऊन, आपण या गाण्याचे रसग्रहण कराल काय? सुरवातीला उडत्या चालीचे हे गाणे नंतर मध्येच "विरह व्याकुळ" आलाप लेऊन सामोरे येते. विशेषतः - "बिरही गगन रोये" या ओळींपासून. येथे राग बदलला आहे का?
हे गाणे मनावर इतकी जादू करते त्याचे कारण गीता दत्त यांचा स्वर्गीय आवाज केवळ की विविध (कदाचित) रागांची मनोहारी गुंफण?
माझी आपणांस विनंती आहे की आपण जरूर या गाण्याचे आपल्या नेहेमीच्या शैलीत रसग्रहण करावे. गाणे खाली "एम्बेड" करीत आहे.-
अन्य मिपाकरांनी या गाण्याचा जरूर आस्वाद घ्यावा.
सस्नेह.
शुचि
वाचने
2181
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
व्यनीचा चुकुन धागा झाला की
हाहाहा....
In reply to व्यनीचा चुकुन धागा झाला की by गणपा
नाही. हे गाणे मिपाकरांबरोबर
In reply to व्यनीचा चुकुन धागा झाला की by गणपा
इतक्या दिवस कोठे होत्या
हेच म्हणतो
In reply to इतक्या दिवस कोठे होत्या by पाषाणभेद
+१
In reply to हेच म्हणतो by हंस
रसग्रहण...