Skip to main content

नमस्कार ई मासिक

लेखक विनायक पाचलग यांनी गुरुवार, 02/02/2012 17:20 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार !!! ..बर्‍याच दिवसानी आवतरतोय आज .. अर्थातच एका नव्या उपक्रमाच्या निमित्ताने ..गेले काही दिवस सगळ ध्यान तिकडेच होते ..तेच आज तुमच्यापुढे सविनय सादर करत आहे .."नमस्कार" ई -मासिक.. नमस्कार मागची माझी भुमिका तर गेली जवळपास ३-३.५ वर्षे या नेट च्या विश्वात मी वावरत आहे ...पडलो ,धडपडलो ,पुढे गेलो ...सगळी काही झाले .. हे सगळ करताना मित्र परीवारही वाढत गेला . काही खुप छान संधी मिळाल्या. अशाच बर्‍याच ठिकाणी चर्चा,गप्पांमध्ये मराठीतील नेट विश्वाबाबत चर्चा सुरु असायची..आणि त्यातुन एक मुद्दा पुढे यायचा की . हे इ-जग अधीक छान करण्यासाठी काय काय करता येईल ?

निजाम फोर्ट अहमदनगर अर्थात अहमदनगर भुइकोट किल्ला

लेखक पियुशा यांनी गुरुवार, 02/02/2012 16:16 या दिवशी प्रकाशित केले.
निजाम फोर्ट अहमदनगर अर्थात अहमदनगर भुइकोट किल्ला थोड्क्यात ओळ्ख /इतिहास :- १५ व्या शतकाच्या शेवटी, इ.स. १४८६ मध्ये तत्कालीन बहामनी राज्याचे पाच तुकडे झाले. त्यामधून विभक्त झालेल्या मलिक अहमदशहा बहिरी या निजामशहाने मे, इ.स. १४९० मध्ये सीना नदीकाठी पूर्वीच्या भिंगार शहराजवळ नवीन शहर वसवण्यास सुरुवात केली. याच्या नावावरूनच या शहराला अहमदनगर असे नाव पडले. १४९४ मध्ये शहर रचना पूर्ण होऊन अहमदनगर निजामशहाची राजधानी बनले. या शहराची तुलना त्या काळी कैरो, बगदाद या समृद्ध शहरांशी केली जात असे.

ऐकव ना रे तुझी जुनी ती कविता...

लेखक चैतन्य दीक्षित यांनी गुरुवार, 02/02/2012 11:07 या दिवशी प्रकाशित केले.
''ऐकव ना रे तुझी जुनी ती कविता'' म्हणते सखी मला, अन् हळूच हसते । तळहातांवर चेहरा घेउन, उत्सुकतेने समोर बसते । समजत नाही काय करावे, जुनीच कविता मांडावी? की स्वस्थ बसावे- -समोरची वाचावी कविता? वाचू देते खुशाल तीही, केवळ माझ्या कवितेकरता । क्षणाक्षणाला अधिरा होतो रंग तिचा, मी बुडू लागतो तिच्यात, तेव्हा पुनश्च हसते, अन् उंचावुन भुवया म्हणते, विसरलास का रे कविता ती? उत्तर देण्याइतके नसते भान मला, मी तिलाच केवळ पाहत बसतो, बऱ्याचशा माझ्या कवितांचा जन्माचा क्षण असाच असतो !! - चैतन्य

भारत चीन : अमेरिकेचा आगाऊपणा

लेखक सुधीर मुतालीक यांनी गुरुवार, 02/02/2012 10:39 या दिवशी प्रकाशित केले.
अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर खात्याचे संचालक जेम्स क्लीपर यांनी भारताची चीन शी लढण्याची तयारी असल्याची बातमी करून विनाकारण खळबळ माजवली आहे. आमच्या घरात आम्ही कसली तयारी करतो आहे आणि काय करतो आहे हे आमच्या परवानगी शिवाय जगभर बोंबलून सांगण्याची यांना काय आवश्यकता आहे ? भारतचे धोरण स्पष्ट आहे. सामंजस्याचे आहे. कुठल्याच शेजाऱ्याशी कुरापत काढून देशवासियांना विनाकारण युद्धाच्या खाईत लोटण्याचा भारताचा इतिहास नाही. कुणी कुरापत काढली तर संरक्षण करण्याचे सामर्थ्य ठेवणे या पलीकडे आम्हाला काही करायचे नाही. आपले अन्य प्रश्न देशाला महत्वाचे वाटतात हे स्पष्ट दिसते आहे.

!!! हाफ कटींग !!! .....

लेखक सन्दीप१२३३० यांनी गुरुवार, 02/02/2012 00:37 या दिवशी प्रकाशित केले.
बस्सsss , हवा टपरी वरचा हाफ कटींग सोबत दोस्तांची 'un -Scheduled' Meeting .. कॉलेजचे 'Boring Lecture' करू आम्ही 'Bunk' Canteen मधले खाऊ ते फास्ट -फ़ूड 'Junk' बस्सsss , हवा टपरी वरचा हाफ कटींग सोबत दोस्तांची 'un -Scheduled' Meeting .. ओफिसमधे Over-Time करू आम्ही काम बॉस ची खिटपीट पण ऐकू , सुबह -शाम.. बस्सsss , हवा टपरी वरचा हाफ कटींग सोबत दोस्तांची 'un -Scheduled' Meeting .. पंजाबी ढाब्यावर करू "Result Party"....३५ Percent ची आणि महागड्या हॉटेल मध्ये करू पार्टी 'Increment' ची बस्सsss , हवा टपरी वरचा हाफ कटींग सोबत दोस्तांची 'un -Scheduled' Meeting .. Corporate मध्ये होऊ मोठ्या पदावर अधिका
काव्यरस

अनिल मोहिले यांचे निधन

लेखक मराठी_माणूस यांनी बुधवार, 01/02/2012 22:56 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ताच टीव्ही वर दुखःद बातमी पाहीली. ज्येष्ठ संगीतकार्/संगीतसंयोजक अनिल मोहीले यांचे निधन. ते अत्यंत ज्येष्ठ दर्जाचे संगीतसंयोजक होते. स्टाफ नोटेशन वर त्यांचे प्रभुत्व होते त्याच बरोबर ते अप्रतीम व्हायोलीनही वाजवायचे. मनःपुर्वक श्रध्दांजली.