आता नावे पुसली गेली असतील
किनाऱ्यावरची ...........
आता उनेही सहन होत असतील
डोंगरावरची ...........
आता पावसात पक्षीही भिजत असतील
झाडावरचे ..............
पण .......असो....... खुशाली कळवत राहा ........
किनारे हे भांडण्यासाठी असायचे
आणि समजवण्यासाठी .....
डोंगर हे फिरण्यासाठी असायचे
आणि छेडण्यासाठी .....
झाडे हि सावलीसाठी असायची
आणि भिजण्यासाठी ......
पण .........असो........ खुशाली कळवत राहा ........
शंख अन शिंपले देणे घेणे व्हायचे...
डोळ्यातील आसवांचे येणे जाणे असायचे...
उन सावलीचा खेळ खेळायचा ...
हातातला हात न कधी सोडायचा ...
भिजताना पाहायचे एकमेकांना ..
आणि चिंब बरसणाऱ्या पावसाला .....
पण .........असो........ खुशाली कळवत राहा ........
आता आठवणी या अशाच दाटायाच्या,
काहीतरी विसरण्यासाठी.....
जीवन हे असेच चालायचे ,
कुठेतरी थांबण्यासाठी ...
पत्र हे असेच लिहायचे ,
कधी न धाडण्यासाठी ....
पण .........असो........ खुशाली कळवत राहा ........
| लेखनविषय: |
|---|
वाचन संख्या
3154
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त
व्वा व्वा ... आवडली
छान
पण ...... असो ...... जिलब्या
In reply to छान by मूकवाचक
... !!!
In reply to छान by मूकवाचक
पण ...... असो ...... जिलब्या
In reply to छान by मूकवाचक
=)) =)) =))
In reply to पण ...... असो ...... जिलब्या by प्रचेतस
अरे वा!
छान!
खुपच मस्तं कविता... अगदी
मस्त!!!
कविता आवडली
छान कविता
सुरेख कविता !
कविता सुरेख...
कविता लाजवाब
कविता आवडली.