Skip to main content

गोळाबेरीज

लेखक बाळ सप्रे यांनी गुरुवार, 16/02/2012 14:15 या दिवशी प्रकाशित केले.
गोळाबेरीज पु लं च्या जीवनावर /व्यक्तिरेखांवर आधारीत काहीतरी कलाकॄती (नाट्य/चित्रपट) बनवण्याचा आणखी एक फसलेला प्रयत्न. पु लं चे शब्द इतके चपखल आहेत की एकाही शब्दाला इकडचे तिकडे करता येण शक्य नसत. आणि पटकथेसाठी असं थोडसं करावं लागलं की ऐकताना खटकतं. आणि त्याहून कठिण म्हणजे त्याच्यासारखा आवाज काढणे. अलूरकर/ दूरदर्शन यांच्यामुळे पु. लं चा आवाज इतका डोक्यात बसालाय की दुसर् या कुणाच्याही तोंडून तो ऐकवत नाही. अगदी दिलीप प्रभावळकर सारख्या दिग्ग्जालाही अन्तु बर्व्याच्या जवळपासदेखिल फिरकता आलं नाही.

वकिली सल्ला हवा आहे..

लेखक कॉमन मॅन यांनी गुरुवार, 16/02/2012 11:45 या दिवशी प्रकाशित केले.
लोकहो नमस्कार, येथे मिपावर कुणी सभासद वकील वा कायदेविषयक जाणकार असल्यास आम्हाला खालील गोष्टीकरता ते काही सल्ला देऊ शकतील, वा त्या बाबत येथे समग्र चर्चा करू शकतील अशी अपेक्षा आहे. तशी ही जुनी गोष्ट आहे, परंतु आमच्या अलिकडेच लक्षात आली म्हणून हा चर्चाप्रस्ताव... चित्रपट अभिनेते युसुफ खान, ऊर्फ दिलीपकुमार यांना १९९७ साली पाकिस्तानातील सर्वोच्च नागरी पुरस्कार - 'निशान ए इम्तियाज' हा दिला गेला असे समजते. परंतु आमच्या माहितीप्रमाणे दिलीपकुमार हे भारतीय नागरीक आहेत व त्यांनी भारतीय राज्यघटनेच्या कलम १८(२) चा भंग केला आहे.

एकल घाट

लेखक अज्ञातकुल यांनी गुरुवार, 16/02/2012 09:24 या दिवशी प्रकाशित केले.
चालते आठवण उतरुन एकल घाट क्षण; विसरुन थांबे उसंत घेइ रहाट जन्मांच्या वेठी भावुकल्या भातुकल्या भेटी येती चंद्रासह उजवे उगवे रमण पहाट बागडे चांदणे; रास खेळती राती कांही न उरे तळहाती सरल्या अंती बहु शंख शिंपले आदळती ओघात कातरला अवघा लाट झेलुनी काठ पलकांतिल गाठी रमल फुलांची माला शमवी हृदयातिल विरही दारुण ज्वाला साकडे घालतो रोज नव्या स्वप्नांसाठी तुम्हि येत रहा नित करुन वाकडी वाट ............................अज्ञात
काव्यरस

पोथ्यांचा अमूल्य खजिना

लेखक निनाद यांनी गुरुवार, 16/02/2012 06:09 या दिवशी प्रकाशित केले.
पोथ्यांचा अमूल्य खजिना एचपीटी कॉलेजमधील भाऊसाहेब वर्तक ग्रंथालयात असा जतन केले आहे हे वाचून अतिशय आनंद झाला. आंतरजालावर शोध घेतांना मला हा दुवा आढळला. ही माहिती इतरांनाही व्हावी म्हणून दुवा आणि लेख येथे देत आहे. अभ्यासकांना त्याची मदत होईल अशी आशा आहे. लेखाच्या शेवटी लेखिकेचा संपर्कही आहे. (श्री शरद यांनी मागे काजळाची शाई वापरून पाण्यातही अभंग सुरक्षित ठेवण्याचा प्रयोग केला होता. त्या प्रयोगाशी हे सुसंगत असल्याने यांना हा दुवा पाठवला होता. त्यांनी तो सर्वांनाच उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले म्हणून देत आहे.

रवी चतुर्वेदी आता पद्मश्री !

लेखक चैतन्य गौरान्गप्रभु यांनी बुधवार, 15/02/2012 23:37 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळी चार वाजता उठून भारत आणि ऑस्ट्रेलीयाची कसोटी पाहणा-या क्रिकेट चाहत्यांचा या वेळी चांगलाच हेटा झाला. वाईटातल्या वाईट पद्धतीने कसं हरावं याचा नमुनाच भारताच्या संघाने यंदा सादर केला. मात्र ऑस्ट्रेलीयामधील पहाटे उठून पाहिलेले सामने असोत किंवा वेस्ट ईंडिजमधले रात्री जागुन पाहिलेले क्रिकेट असो, ती मजा, ते थ्रील काहीतरी वेगळंच असतं. पुर्वी भारताबाहेरील सामन्यांसाठी रेडिओवर अवलंबुन रहावं लागायचं. "धूप खिली हुई और दर्शकोंमें उत्साह" या वाक्यापाठोपाठ येणारा हजारो प्रेक्षकांचा आवाज असो, किंवा "... अगली गेंद...ऑफइस्टंप के काफी बाहर..

भारत "IT" मध्ये प्रगत आहे म्हणजे नक्की काय आहे?

लेखक चेतनकुलकर्णी_85 यांनी बुधवार, 15/02/2012 22:29 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रानो, मी एका सरकारी संधोधन आणि विकास प्रबोधानीत काम करतो..माझ्या कामा निमित्त गेल्या आठवड्यात एका अमेरिकन स्थित बेंगलोर मधील "software" विकसित करणाऱ्या कंपनी बरोबर संबंध आला ...आम्हाला त्यांच्या कडून एक "software" घ्यायचे होते जे अभियांत्रिकी शी निगडीत होते.परंतु त्यांनी हजार सबबी सांगून (अमेरिकन कायद्याचा हवाला देत... व "end use certificate" वर सही करणे आवश्यक आहे जे अर्थातच शक्य नव्हते ...) आमची ऑफर नाकारली. ह्या घटने वरून असा प्रश्न पडतो कि आपण रोज वाचतो कि भारतीय "IT" कंपन्यांनी इतकी प्रगती केली वगैरे वगैरे..

अ हेरिटेज वॉक..

लेखक मस्त कलंदर यांनी बुधवार, 15/02/2012 20:29 या दिवशी प्रकाशित केले.
खूप दिवसांपासून ठरत होतं, पण योग यायचा होता. तो या शनिवारी आला. काळ्या घोड्याचंही एक निमित्त होतंच. फोनाफोनी करत, मोडकांना ट्रेनची सफर(ही हिंदी/मराठी बरं का, इंग्रजीमधली नव्हे) घडवत फोर्टात पोचलो. एलआयसीच्या दर वळणानजिक दिसणार्‍या शाखेबरोबरोबर रामदासांची ब्रांच ही तर नव्हे अशा शंका मनी बाळगत एकदाचे त्यांच्या हापिसात पोचलो. इकडच्या तिकडच्या गप्पा चालू असतानाच रामदासांनी टेबलाखालून एक मोठं बाड बाहेर काढलं, '१९४५ ते बहुधा १९५६ पर्यंतचे टाईम मासिकाचे अंक' होते ते. खजिनाच तो, दुसरा शब्दच नाही!! हापिसातून उतरून खाली आलो, आणि अलीबाबाच्या पोतडीतून एक एक गोष्ट बाहेर येऊ लागली.

जय जय रघुवीर समर्थ...!

लेखक प्यारे१ यांनी बुधवार, 15/02/2012 17:47 या दिवशी प्रकाशित केले.
फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच तरुण तडफदार उमेदवार मा. श्री. स्पा राजे डोंबिवलीकर (ठाकुर्लीकर--- > चो... बस्स) यांचा मी हापिसात काम करीत असताना (ल्ह्यायचं आस्तंय ;) ) फोन आला. डोक्यात ऑफिस नि कानात स्पाचा आवाज! काही कळेना म्हणून थांब मीच तुला फोन करतो म्हणून फोन ठेवला. नंतर नेहमीप्रमाणे खरडाखरडीतच नक्की काय विषय होता असे विचारले असता स्पाने ऐतिहासिक शैलीत 'समर्थांनी बोलावलंय, शिवथरघळीत जायचंय' म्हणून खरडवलं. शोधाशोध करतो म्हणून सांगून कामाला लागलो. ११, १२ फेब्रुवारी शनिवार, रविवार ठरलं. स्पा, सूड नी किसन हे त्रिदेव नेहमीप्रमाणे पाठीवर बॅग्ज घेऊन डोळ्यासमोर होतेच.