चावडीवरच्या गप्पा - 'टोल'वाटोलवी
“अरे वा!, सामान्यांची, आम जनतेची काळजी घेणारे आहे कुणीतरी”, खणखणीत आणि अनुनासिक आवाजात बोलत घारूअण्णांनी चावडीवर हजेरी लावली.
“काय झाले?”, कोणीतरी विचारले.
“काय? आजकाल पेपर वाचायचा सोडून सकाळी सकाळी नातवासाठीच वापरता की काय?” घारूअण्णा एंट्रीलाच नाट लागल्यामुळे खवळले. “अरे त्या राजने, म्हणजे आजच्या तरुणाईच्या भाषेतल्या राजसाहेबांनी टोलवसूली विरूद्ध आवाज उठवला आहे, टोल भरू नका असा आदेश दिला आहे जनतेला”. घारूअण्णांचा तांबडा चेहेरा आनंदाने फुलून गेला होता.
“चला!
राज ठाकरे यांची 'टोळधाड'
सध्या लिहायला फारसे काही सुचत नाही आहे. पण काहीतरी खरडायचे आहे.
काय करावे ?
म्हणून आता दिसेल ती नवी बातमी मिपावर चिकटवावी असे ठरवले आहे.
कुणाचा वाढदिवस, कुणाचे परीक्षेतील यश, कुणाचे लग्न, कुणाचा जन्म हेही मिपावर चिकटवणार आहोत.
याही पलिकडील बातमी असेल तर सोन्याहून पिवळे...
टोल बाबत सत्य काय ते जनतेसमोर मांडण्याची घोषणा काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी केली होती.
त्याप्रमाणे त्यांच्या कार्यकर्त्यांनी पाहणी केल्यानंतर लक्षात आले की मूळ खर्चापेक्षा काहीपट टोल वसूल होत आहे.
महाराष्ट्रात सर्वत्र टोल हा गंभीर प्रश्न बनला होता.
(काऽऽय रेऽऽ देवाऽऽ)
(कवि संदीप खरे यांची क्षमा मागून...)
आता पुन्हा उपोषण होणार
मग देश ढवळून निघणार
मग बेदींना कंठ फुटणार
मग मध्येच मोदी बोलणार
मग जुनाच खेळ चालू होणार...
काऽऽय रेऽऽ देवाऽऽ...
मग जुन्या खेळात जुने खेळाडू पुन्हा एन्ट्री घेणार...
मग सारीपाट मांडणार...
मग मांडलेला सारीपाट काहींना पसंत नसणार...
मग ते कुणीतरी ओरडणार
मग अण्णा-मित्र असतील तर रडणार
रामदेव बाबा असतील तर चिडणार
मग नसतोच खेळलो तर बरं असं वाटणार
आणि या सगळ्याशी आता प्रणवदांना
काहीच घेण-देणं नसणार...
काय रेऽऽ देऽऽवा
मग त्याचवेळी लोकपाल विधेयकावर चर्चा चालू असणार...
मग त्यात बेदी, केजरीवाल नि काँग्रेसचं कुणी असणार...
मग त्याला अण्णांनी आप
काव्यरस
निशाण
२५ जुलै - कारगिलच्या विजयी वीरांना आदरपूर्वक ...
हिमगिरीच्या धवल शिखरावर
फडफडणारे तिरंगी निशाण ...
त्याच्या वाटेवर शिंपले आहेत
रक्ताचे सडे ..
उधळले गेले आहे
सुवासिनींचे कुंकु ...
त्याचा लालस केशरी रंग
जाणवतो अजून नजरेला
मरणाची भिती , शिकवलीच नाही कुणी
बर्फाच्छादित वाटांवरुन चालताना
आठवले नाहीत कधीच आपले संसार
मातृभूमिच्या काळजात
खुपसलेल्या खंजिराची कळ
उठते आहे मस्तकात
तळपत्या तेगीचा निर्धार
रुतला आहे मनामनात
कुठुन, कधी आणि किती येतील ते
आणि पडेल काळाचे जाळे
सांगता येत नाही काहीच
समोरुन येतील ,
कि पाठीवर करतील वार
हे ही ठाऊक नाही
अंतरी आहे फक्त एकच जाणीव
जपायचे आहे ह
वांग मराठवाडी... एक (इन प्रोग्रेस) सत्याग्रह!
आपण सकाळी झोपेतून उठतो तेव्हा आजचा दिवस कसा जाणार आहे किंवा आत्ता इथे आहोत, दिवस संपताना कुठे असणार आहोत वगैरे काहीच आपल्याला माहित नसतं. याचं अगदी शब्दशः प्रत्यंतर मला आलं, परवा, २२ जुलैला. दिवस सुरू झाला पुण्यात आणि अगदी अनपेक्षितपणे संपला मेंढ गावात, जितूच्या घरी.
***
गेल्या काही दिवसांपासून, किंवा महिन्यांपासून म्हणा हवं तर, वांग मराठवाडी हे नाव सतत कानावर येत होतं. मधून मधून मेल्स येत असत. त्या सगळ्यावरून झालेलं आकलन एवढंच होतं की सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात वांग नदीवर मराठवाडी इथे एक धरण बांधलं जात आहे. शासकिय भाषेत बोलायचं तर 'वांग मध्यम प्रकल्प'.
पुणेरी मल्टीस्पाईस कट्टा..
मुंबईचा कट्ट्याचा वृतांत आणि फोटो पाहून.. पुणेकरांना कसे गप्प बसवेल?
रविवारी सकाळी ११.३० वाजता Multispice कर्वे रोड येथे फॅमिली कट्टा आयोजित केला आहे.
११.३० यासाठी की नुसते जेवलो आणि निघालो असे व्हायला नको..आणि हो याचा उल्लेख जरी फॅमिली कट्टा असा असला तरी सगळे सुखी लोकही ( लग्न न झालेले.. ) सहभागी होऊ शकतात याची नोंद घ्यावी..:)
भेटूया मग रविवारी...
जे येणार आहेत त्यांनी या बद्दल मला, ५० फक्त आणि मोदक यांना व्यनी करावा किंवा खरड करावी.
पत्ता:
Multi Spice Restaurant
020 25458086, +91 8898738535
46/2, Near Mhatre Bridge, Opposite, Siddhi Gardens, Karve Nagar, Pune
प्रवाह....
कधी कधी आयुष्य,
साचून राहिल्यासरखं वाटतं!
सगळे मु़ख्य प्रश्न
एकाच पदावर जाऊन बसलेले,
अनुत्तराच्या!
वेळेने तरी किती कळ सोसावी?
शेवटी,
आपल्याच इच्छाशक्तीची कुदळ,
आपलेच दोन घाव आणि
साचलेल्या आयुष्याला नवी वाट,
नवा प्रवाह!!
मोकळ्या झालेल्या त्याच खळग्यात,
सार्या किचकट प्रश्नांना टाकून, मुठमाती दिलेली,
कायमसाठी!
आता, नव्या प्रवाहाचा उन्माद, त्याचा खळाळ,
सुगंधी.... वेडावणारा!
-वेणू
लाईफ हिस्टोग्राम
लाईफ हिस्टोग्राम
" how much land does a man need “ . प्रसिद्ध रशियन विचारवंत लिओ टोलस्टोय याची एक कथा आहे . कथा सूत्र काहीसे असे आहे की एका माणसाला हे बक्षीस मिळते की तो पहाटेपासून संध्याकाळ पर्यंत जेव्हडे अंतर पायी काटू शकेल तेव्हढी जमीन त्याला मिळेल . तो माणूस भल्या पहाटे चालायला सुरुवात करतो , काही वेळानंतर त्याला आपला वेग कमी वाटू लागतो म्हणून तो पळू लागतो खूप धाप लागते तरी हावऱ्या सारखा पळतच राहतो . खूप पळाल्यावर त्याला प्रचंड धाप लागून खोकल येतो रक्ताची उलटी होवून तो मरण पावतो .
रिंद जन्नत मे जा चुके
एक शेर आठवला. कधी ऐकला ते ठाउक नाही. बहुधा नववीच्या धड्यात होता
कोणाचा आहे ठौक नाही
"रिंद जन्नत मे जा चुके
वाअजे मोहतरम रह गये"
अर्थः चांगले लोक स्वर्गात गेले आहेत इथे जे काही राहिले आहेत ते सर्वसामान्य लोक आहेत.
चांगले लोक लवकर जातात, काहीच न करता केवळ प्रेक्षक असणारे सर्वसामान्य मात्र उगाचच बरेच जगतात.
ज्या शायराला हा शेर सुचला असेल त्याने विमनस्क मनस्थितीत हे शब्द लिहीले असतील
पण बर्याचदा असे दिसते की सुस्वभावी, हसतमुख नेहमी दुसर्याच्या मदतीला धावणारे,आयुश्यीतील
मिळालेला प्रत्येक क्षण भरभरून जगणारे मित्र /आप्त हे अल्पायुशी असतात्.ते अचानक आजाराने/अपघाताने मृत्यू पावतात.
मिसळपाव