Skip to main content

हिंदी व मराठी सुगम संगीतात तालांचे वैविध्य

लेखक प्रदीप यांनी रविवार, 22/07/2012 12:13 या दिवशी प्रकाशित केले.
'आर. डी. मल्हार' ह्या लेखात धागाप्रवर्तकाने ".....असा संगम कोणालाही जमला नाही , जमणार नाही" असे एक धाडसी व विषयावरील पुरेशी माहिती न घेताच विधान केले. त्यावर प्रतिक्रिया देतांना चौकटराजांनी लिहीले .."[आर. डीं]. नीकिती वाद्ये , किती ताल वापरले याला गणतीच नाही". माझ्या माहितीप्रमाणे आर. डी. ने नेहमीचे केहेरवा, दादरा, खेमटा वगैरे तीन चार तालच वापरले आहेत, 'घर आजा, घिर आये' ह्या त्याच्या पहिल्याच गाण्यात रूपकचा सुंदर वापर आहे. तेव्हा अगणित ताल त्याने वापरलेले नाहीत.

परिक्रमा!

लेखक संजय क्षीरसागर यांनी रविवार, 22/07/2012 01:51 या दिवशी प्रकाशित केले.
परिक्रमा ही एक थोर अध्यात्मिक साधना आहे याची बालंबाल खात्री झाल्यानं नवग्रह ती करायला निघाले. आत्मझिरो हा `परिक्रमाकिंग' खरं तर लीडर होणार होता पण त्याची आता अशी परिस्थिती झाली होती की `आपण प्रदक्षिणा करतोय का दोन परिक्रमांच्यामधे कुठे तरी थांबलोय' हेच त्याला कळायचं नाही, त्यात तो एकटा मधेच सटकून भलत्याच मार्गानं जाण्याची शक्यता होती. पुन्हा बर्‍याचदा त्याला काय म्हणायचय ते कुणालाच नक्की समजायचं नाही, तर असा लिडार काय कामाचा? त्यामुळे त्याचा पत्ता कट झाला आणि मतदान घेणं क्रमप्राप्त झालं.

दिसतं तसं नसतं

लेखक आशु जोग यांनी शनिवार, 21/07/2012 20:08 या दिवशी प्रकाशित केले.
देशातील एका थोर नेत्याने राजीनामा दिला आहे आणि दिल्ली धास्तावली आहे. पण राजीनाम्यासाठी दिलेली कारणे वरकरणी असून आतमधे वेगळीच मागणी असण्याची शक्यता वाटते. कुणीतरी भलत्याच गैरसोयीच्या प्रकरणाला हात घालण्याचा प्रयत्न केलेला दिसतोय. दिल्लीची ही जुनी सवय आहे. कुणी शिर्जोर बनू लागला की त्याची प्रकरणे बाहेर काढ किंवा त्याचा व्हिडीयो प्रसारीत कर. असे चालू असते. मग तो पक्षप्रवक्ता असो की राज्यपाल सर्वांना समान न्याय. हे सारे आम्हास माहीत असल्याने राजीनामा ही आमच्यासाठी फार मोठी बातमी नसून पडद्यामागे काय शिजतय याबाबत खरी उत्सुकता आहे.

अनपेक्षीत

लेखक चाफा यांनी शनिवार, 21/07/2012 16:59 या दिवशी प्रकाशित केले.
तशी ती रात्र काही खास वगैरे नव्हतीच रामजी हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज असलेल्या त्या इमारतीत तरी नक्कीच नाही. तेच रोजचेच थकलेले, कण्हणारे पेशंट, जनरल वॉर्डची जी दशा सर्वसामान्य हॉस्पिटलमध्ये दिसते तशीच. नेहमीच्या प्रघाताप्रमाणे निवासी डॉक्टर राणेंसोबत चार इंटर्न्स , शिकाऊ डॉक्टर्स आजच्या रात्री उपस्थित होते. काम तसं काहीही नव्हतंच, निवासी डॉक्टर राणे नुकतेच त्यांचा राउंड संपवून परत गेले होते.

दुर्योधन आणी दु:शासन

लेखक अन्तु बर्वा यांनी शनिवार, 21/07/2012 12:42 या दिवशी प्रकाशित केले.
१०० कौरवान्पैकी सगळ्यात फेमस कौरव म्हणजे दुर्योधन आणी दु:शासन. बाकी ९८ म्हणजे उपेक्शितच. मला नेहमी प्रश्न पडतो की ध्रुतराश्ट्र आणी गान्धरी जोडप्याने आपल्या पोटच्या मुलान्ची नावे दुर्योधन आणी दु:शासन कशी काय ठेवली? कोणते आई-बाप आपल्या मुलान्ची नावे 'दु' या अक्शराने सुरु होणरी ठेवतील? ह्या दोघान्च्या नावामागे मला वाटते की खालील पैकी १ कारण असावे १) ध्रुतराश्ट्र आणी गान्धरी यन्ना आपल्या या सुपुत्रान्चे पाय पाळन्यात दिसले असतील म्हणुन ही नावे ठेवली. २) ह्या दोघान्ची मुळ नावे सुर्योधन आणी सु:शासन ही असावीत पण त्यानी पुढे लावलेल्या दिव्यान्मुळे ती बदलुन दुर्योधन आणी दु:शासन झाली असावीत.

आर. डी. मल्हार !

लेखक मनोज श्रीनिवास जोशी यांनी शनिवार, 21/07/2012 10:07 या दिवशी प्रकाशित केले.
एकंदर संगीताचा विचार केल्यास गाणे गाण्यापेक्षा संगीत रचना करायला अधिक “प्रतिभा” लागते असे मला नेहमी वाटते. गायक हा कवी व संगीतकार यांच्या मधला रसिक श्रोत्यांपर्यंत भावना पोहोचवणारा शेवटचा दुवा आहे. पण अनेक वेळा श्रेय नामावली मध्ये गायकाला विशेष स्थान असते आणि कवी व संगीतकार उपेक्षित राहतात. कवीला संगीताची ज्ञान असणे सक्तीचे नाही पण संगीतकारला काव्याची जाण असणे अनिवार्य आहे. तसेच गायकाला संगीताचे ज्ञान असणे हे अनिवार्य असले तरी काव्याची समज आवश्यक नाही. म्हणून चांगले गीत / काव्य “चांगले गाणे “ म्हणून रसिकांसमोर आणण्यात संगीतकार हा महत्वाचा दुवा आहे. तर संगीतकार आ.डी.

ये कैसी चाल ???

लेखक अर्धवटराव यांनी शनिवार, 21/07/2012 02:47 या दिवशी प्रकाशित केले.
चौसष्ट घरांच्या समरांगणी वजीर सर्वात उपद्व्यापी. तो सरळ, तिरका, कसाही चालेल. पण त्याला देखील मर्यादा आहेत. घोड्याप्रमाणे तो अडीच घरं चालु शकत नाहि. आमचे बारामतीकर काका या वजीराचे देखील बाप म्हणावे लागतील. सगळं काहि सुरळीत असताना शेवटच्या बॉलवर अच्यानक गुगली टाकावी आणि फलंदाज काहि कळायच्या आत बाद व्हावा असल्या भयंकर चाली आमचा राजा खेळतो. गेल्या दोन दिवसांपासुन राष्ट्रवादी काँग्रेस सरकारमधुन बाहेर पडण्याच्या बातम्या येत होत्या. आजतर "सकाळ" वर राजीनाम्याची बातमी अधिकृतरित्या पब्लीश झाली. निमीत्त होतं मंत्रीमंडळातील दुसर्‍या स्थानाच्या वादाचं.

अरविंद गुप्ता टोयज.कॉम

लेखक सुकामेवा यांनी शनिवार, 21/07/2012 02:35 या दिवशी प्रकाशित केले.
असाच एकदा फिरत असताना एका पुस्तकाच्या प्रदर्शनात गेलो होतो , तिथे माझ्या मुली करता करून पहा हे अरविंद गुप्तांचे पुस्तक घेतले , घरी आल्यावर पुस्तका बरोबर आलेली CD बघत आसताना त्यात त्यांच्या arvindguptatoys .com याचा ऊल्लेख दिसला म्हंटले पाहावे तरी जाऊन आजून काही मजेशीर खेळणी किंवा टाकाउतून टिकाऊ करण्याकरिता काही कल्पना मिळता आहेत का ते. तर पहिल्याच पानावर मराठी हिंदी व इंग्लिश पुस्तकांचा दुवा दिसला म्हणून जाऊन बघतो तर काय ही मोठी यादी होती.

इन्व्हेस्टमेन्ट बँका नक्की काय करतात?

लेखक क्लिंटन यांनी शुक्रवार, 20/07/2012 22:06 या दिवशी प्रकाशित केले.
श्री. मोदक यांच्या आर्सेलर-मित्तल वरील धाग्यात दोन्ही बाजूंच्या दिमतीला इन्व्हेस्टमेन्ट बँकर्सचा फौजफाटा होता असे म्हटले आहे. आता या इन्व्हेस्टमेन्ट बँका म्हणजे नक्की काय आणि त्या काय करतात, साध्या बँकांपेक्षा त्या कशा वेगळ्या असतात या प्रश्नांची उत्तरे या लेखातून द्यायचा प्रयत्न आहे. कोणत्याही उद्योगाला आपला उद्योग चालवायला पैसे लागतातच. उद्योग चालवायला मालक स्वतःचे पैसे वापरू शकतात किंवा बँकेकडून किंवा अन्य कोणाकडून पैसे उधार घेऊ शकतात. यापैकी मालकांनी स्वतः उद्योगात गुंतवलेल्या पैशाला इक्विटी (equity) म्हणतात तर इतरांकडून उधार घेतलेल्या पैशांना "डेट" (debt) म्हणतात.