Skip to main content

कताई शास्त्र ५

लेखक बापू मामा यांनी शनिवार, 15/09/2012 22:16 या दिवशी प्रकाशित केले.
वस्त्रनिर्मितीच्या क्षेत्रात आपला भारत प्राचिन काळापासून अग्रेसर आहे. कोंकणातील बंदरे इसवीसन पुर्व व इसवीसनोत्तर प्राचिन काळात कापडाच्या मध्य पुर्व तसेच युरोपीय देशाशी व्यापारामुळे संपन्न झाली होती. मध्य युगात भारतीय कापडाच्या आयातीसाठी युरोपीय देशांनी इस्ट ईंडिया कंपन्यांसारख्या संस्था ही काढल्या होत्या. औद्योगिक क्रांती नंतर मात्र चित्र बदलले. भारतातून मँचेस्टरसाठी कच्चा माल (कापूस) निर्यात होवू लागला. तयार कापडास भारतासारखी हुकुमी बाजारपेठ मिळाली. मँचेस्टर संपन्न झाले,व एतद्देशीय कारागिर बेकार ,निर्धन झाले.कपाशीच्या लागवडीस प्रोत्साहन दिले गेले.

कवितांचे प्रकार

लेखक नाना चेंगट यांनी शनिवार, 15/09/2012 18:37 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी आम्ही नुकतेच आमची समज वाढवण्याच्या प्रयत्नात काही काव्य प्रकार समजून घेतले. त्यातले काही आम्ही प्रसवून सुद्धा पाहिले. आमचा हा प्रयत्न गोड मानावा. काही चुका असल्यास माफ कराव्यात. सुधारणेस वाव असतो असे आमचे मत आहे. त्यामुळे एक ना एक दिवस आम्ही नक्की साहित्यिक या पदवीला लायक होऊ असा आमचा विश्वास आहे.

को. ऑप. गणेशोत्सव

लेखक चेतन माने यांनी शनिवार, 15/09/2012 13:01 या दिवशी प्रकाशित केले.
१५ ऑगस्ट ची दुपार झाली होती. सगळे सोसायटीच्या आवारातून ऑफीस कडे चालले होते. "चला रे बसुया " च्या पाच सहा हाका आल्या आणि सगळे निघाले. "काय रे साला नुसती फालतुगिरी आहे ही दरवर्षीची मीटिंग म्हणजे" , मी. "अरे यार जाऊन बसुया तर सही" रमेश. सार्वजनिक गणेशोत्सव म्हटला आणि आणखी तो सोसायटीचा असला तर मीटिंग नावाची औपचारिकता झालीच पाहिजे . बरेच जण न जाणे का पण मीटिंग साठी खूपच उत्साही असतात . हि असली मंडळी फक्त मीटिंग साठीच उत्सुक असतात कामासाठी नाही! आणि अश्याच बर्याच जणांच्या एकापेक्षा एक फालतू आयडिया ऐकणे म्हणजे मीटिंग!! माझी आपली नकार घंटा सुरूच होती पण मित्रांबरोबर जाऊन बसावच लागलं.

वैसी

लेखक रेशा यांनी शनिवार, 15/09/2012 11:12 या दिवशी प्रकाशित केले.
घोडा घास से दोस्ती करेगा तो खायेगा क्या?? तू क्यो ऐसे कर राही है?? सोच मत ज्यादा कोर्टसे निकले तो just cut U r self off from the matter and person !! why you getting senty ????, remember that, u need to react from brain n not at all by heart hope you getting me...." else m sure U'll surely confused and spoil u r personal as well as professional life" तो म्हणत होता ते सगळं सगळं खंर होतं. त्याचा शब्द न शब्द खरा होता, पटत होता. पण ती मुलगी ते remand application आणि तिच्या बहिणीचा आक्रोश काही डोळ्यांसमोरून हालत नव्हतं.

'गोड' बर्फी

लेखक आनन्दा यांनी शुक्रवार, 14/09/2012 23:42 या दिवशी प्रकाशित केले.
जाणकार परीक्षण टाकतीलच, पण.. योगायोगाने आज अचानक मनात विचार आला की बरेच दिवसात चित्रपट पाहिला नाही, तर आज एखादा टाकावा. रोज दूरचित्रवाणीवर पाहिल्या जाणार्‍या प्रोमो'झ मुळे बर्फीबद्दल मनात उत्सुकता होतीच, म्हणून गेलो. पिक्चर छान जमला आहे.. अंजाना अंजानी च्या अनुभवामुळे मनात थोडी धाकधूक होती, आणि ते आला बर्फी गाणे पाहताना अस वाटायलाही लागले होते.. पण नन्तर हलकेफुलके विनोद, मध्येच काही बोलके प्रसंग यातून मध्यंतर कधी झाले ते कळलेच नाही.

कताई शास्त्र ४

लेखक बापू मामा यांनी शुक्रवार, 14/09/2012 20:45 या दिवशी प्रकाशित केले.
जिनिंग मध्ये कापसाच्या बोंडातील सरकी तंतुंपासून विलग केली जाते. साधारणपणे १०० किलो कपाशी मध्ये ६६ किलो सरकी व ३३ किलो रुई मिळते. १ टक्का घट असते. सरकीचा वापर तेल व पशुखाद्य निर्मितीसाठी होतो. . भारतात नाईफ रोलर जीन जास्त प्रचलित आहे. यामध्ये कापसाच्या तंतूंची खराबी ( fibre rupture) कमी होते. कापसाला घनता कमी असल्याने त्याचे आकारमान जास्त असते.

घनघन

लेखक अज्ञातकुल यांनी शुक्रवार, 14/09/2012 18:43 या दिवशी प्रकाशित केले.
घन मंदावले मन धुंदावले जळ वाकून वाकून ओघळले झाकलेल्या कळा आत ओढाळल्या रंग हिरव्यात दाटल्या ऊन सावल्या झाडपानात सण पळ श्रावण श्रावण अंग अंगणात चाहुली पागोळल्या लवे भरून डोळा कणकण हळवेला एक एकटाच जीव होई खुळा बावळा पापणीची स्थिती आळवावी किती ओठ शब्दांसवे चहु ओर नाचती नागमोडलेली वाट चिंब ओला घळघाट नव्या नवरीचा थाट जणू हीच पावती .........................अज्ञात
काव्यरस

कताई शास्त्र ३

लेखक बापू मामा यांनी शुक्रवार, 14/09/2012 14:40 या दिवशी प्रकाशित केले.
जेव्हा आपण कपडे वापरतो तेव्हा आपल्याला माहिती देखिल नसते की त्याला बनवताना किती जणांचे हात लागले आहेत. सर्व प्रथम मान जातो तो बळीराजाला.महाराष्ट्रात कापसाचे पीक विदर्भ, मराठवाडा, खानदेश व माणदेशात मोठ्या प्रमाणात घेतले जाते. कापूस हे खरीपाचे पीक असून त्याची पेरणी जून -जुलै मध्ये केली जाते. साधारण ९० दिवसात पहिली वेचणी होवून, पुढे ३-४ महिने क्रमाक्रमाने वेचण्या होतात. परदेशात यंत्रांच्या साहाय्याने वेचणी केली जाते. परंतु यंत्रवेचणी पेक्षा हातवेचणीचा कापूस जास्त स्वच्छ असतो, यांत्रिक वेचणीच्या कापसातजास्तट्रॅश(कचरा)असतो.

कताई शास्त्र २

लेखक बापू मामा यांनी शुक्रवार, 14/09/2012 13:20 या दिवशी प्रकाशित केले.
सुताचे परत ढोबळमानाने दोन प्रकार आहेत. १) तंतूंना पीळ देऊन केलेले सूत ( स्पन यार्न) , २) सलग तंतू ( फिलॅमेंट यार्न) यातील स्पन यार्न जास्त प्रचलित आहे, कारण छोट्या छोट्या तंतूंना दिलेल्या पिळात हवेच्या पोकळ्या असतात त्यामुळे परिधान करणाऱ्यास सुखद वाटते. कापसापासून निर्मित वस्त्रे देशात तसेच विदेशात जास्त लोकप्रिय आहेत कारण कापसाप्रमाणे गुणधर्म असलेला कोणताही तंतू किंवा कापसाला अद्याप पर्याय मिळालेला नाही. त्यामुळेच कापसाला वस्त्रांचा राजा (King of Textiles) असे संबोधले जाते. आपण मुख्यत्वे कापसाच्या कताईची माहिती घेऊ. सूत निर्मितीत कापसाच्या प्रतीचा सिंहाचा म्हणजे जवळजवळ ८०% वाटा असतो.