लेखकसावकार स्वप्निलयांनी शनिवार, 27/10/2012 02:47 या दिवशी प्रकाशित केले.
मनात खुप सारं आहे, कुठेतरी लिहावेसे वाटते.
शब्दांची ती पुरणपोळी, साजूक तुपाबरोबर भरवाविशी वाटते.
नितळ हातांच्या स्पर्शाचे, गहिवरलेल्या मनांचे.
भरलेल्या भावनांचे, शब्द हे आठवलेल्या क्षणांचे.
लेखकशुचियांनी शुक्रवार, 26/10/2012 19:07 या दिवशी प्रकाशित केले.
खूप जवळच्या आणि मला अति अति प्रिय अशा २ व्यक्तींच्या कुंडलीमध्ये कर्केचा राहू (अर्थात मकरेचा केतू) सापडला. त्यामुळे माझ्या स्वभावानुसार पाठपुरावा करुन, मी या कुंडलीवैशिष्ठ्याचे स्पष्टीकरण शोधून काढले. अत्यंत रोचक असे मला तरी ते वाटले. तेव्हा जी काही माहीती मिळाली ती जालसंदर्भासहीत आपल्यापुढे मांडण्याकरता हा लेखप्रपंच.
लेखकमाम्लेदारचा पन्खायांनी शुक्रवार, 26/10/2012 16:48 या दिवशी प्रकाशित केले.
तुझी माझी भेट झालेलं प्रत्येक ठिकाण
परत परत जाऊन पाहिलंय मी........
पण निरव आणि निशब्द शांततेशिवाय
आता तिथे काहीच उरलेलं नाही......
तू माझ्याशी तिथे बोललेले मोजकेच शब्दही
त्याच शांततेत कुठेतरी विरून गेले आहेत..
पण विरता विरता माझ्या मनात कायमचे घर करून गेले आहेत..
तिथल्या प्रत्येक गोष्टीकडे तुझे माझे
हरवलेले क्षण मी सतत मागतो....
तुझ्या आठवणीची प्रत्येक रात्र मी
तळमळत एकटाच जागतो..........
आता फक्त एकच मागणे आहे...एकदा तरी तिथेच परत ये.....
हरवलेले माझे क्षण माझ्यापुरते तरी परत दे.......!
लेखकमाम्लेदारचा पन्खायांनी शुक्रवार, 26/10/2012 16:22 या दिवशी प्रकाशित केले.
आपण सगळेजण नेहमी म्हणत असतो की खूप काही करायचं आहे पण वेळ नाही....कधीतरी विस्कटलेला कप्पा आवरायचाय पण वेळ नाही.....खूप दिवस कुणा मित्राला अथवा नातेवाईकाला फोन करायचाय पण वेळ नाही.........जर आपल्याकडे कशालाच वेळ नाही तर मग आपल्या आयुष्यातला वेळ नक्की जातो तरी कुठे? कधीतरी मी या गोष्टीचा विचार करतो....अगदी मनापासून वाटतंय की मला अजूनही याचे उत्तर सापडलेले नाही.......
वेळ नसणे म्हणजे नक्की काय? खरच आपल्याकडे सवड नसते की आपणच एखादी गोष्ट न करण्यासाठी शोधलेली ती एक लंगडी सबब आहे? समजा आपण खरच आपल्याला वेळ नाही असे मानू पण मग आपल्याला हव्या असलेल्या गोष्टी करण्यासाठी आपल्याकडे वेळ असतोच ना?
लेखकसारथीयांनी शुक्रवार, 26/10/2012 16:06 या दिवशी प्रकाशित केले.
“पुणे ते पानिपत” भाग १-शनिवारवाडा–अहमदनगर–घृष्णेश्वर: http://www.misalpav.com/node/22952
“ पुणे ते पानिपत ” भाग २ : सिंदखेड राजा - बऱ्हाणपूर - शाही किल्ला - http://www.misalpav.com/node/22967
स्वाग्या........ किल्ला ...................
“चल वर जाऊया” आम्ही दोघांनी एकदमच म्हटले
लागलीच गाडी उजवीकडे वळवून आम्ही किल्ल्याकडे निघालो. वाटेतच आम्हाला आमचे भविष्यातले साथीदार संग्राम आणि रोहन भेटले ते दोघे पण किल्ला बघण्याकरिता वरती निघाले होते.
आयला ,,,, आपल्यासारखे पण आहेत कि ...
लेखकअनघा आपटेयांनी शुक्रवार, 26/10/2012 12:02 या दिवशी प्रकाशित केले.
चालताना तू थोडा थबकलास
नुसताच थबकलास का
दूरवर सोबत करण्याचा
विचार तुझा बदललास?
हाक मारताना तू अडखळलास
नुसताच अडखळलास की
ओठात माझेच नाव असण्याचा
तुझा रिवाज तू बदललास?
बोलताना तू जरासा थांबलास
नुसताच थांबलास की
माझ्यापाशीच मन मोकळे करण्याचा
तुझा हक्कच तू विसरलास?
निरोपाच्या क्षणी तू आवंढा गिळलास
नुसताच आवंढा गिळलास की
आयुष्यातून मला वजा करताना
स्वत:लाच भागून मोकळा झालास?
खरं सांग, सारे काही विसरलास? सारे काही संपले?
खरच संपलय कि
आजही प्रीतीचे नाव घेता
तुझे जग सारे माझ्याशीच येऊन थांबलंय
लेखकneetaयांनी शुक्रवार, 26/10/2012 09:01 या दिवशी प्रकाशित केले.
मक्याचे आप्पे
१ वाटी कच्चे मक्याचे दाणे, एक उकडलेला बटाटा, चार पाच ब्रेड स्लाईस, आल लसूण मिरची पेस्ट, लिंबू रस एक चमचा, गरम मसाला अर्धा चमचा, कोथींबीर
मक्याचे दाणे मिक्सरवर वाटून घेऊन त्यामध्ये , वरील सर्व साहित्य घालून, आप्पे पात्रात घालावे, मिश्रण पातळ नको व एकदम जाडे पण नकोए, हाताने आप्पे पात्रात घालता येईल एवढे ठेवावे. टोमेटो सोस बरोबर द्यावे, किंवा नारळाच्या चटणी बरोबर द्यावे.
लेखकPearlयांनी शुक्रवार, 26/10/2012 00:37 या दिवशी प्रकाशित केले.
कुकीज बनवायचे खूप दिवसापासून मनात होते. आणि मला मैदा वापरायचा नव्हता. कणकेची बिकिटं बनवायची होती. म्हणजे केव्हाही खाता येतील, कितीही खाता येतील अशी हेल्दी आणि टेस्टी बिस्कीटं बनवायची होती :-)
जनरली खाण्याच्या पदार्थात ‘हेल्दी आणि टेस्टी’ यापैकी कोणतीतरी एकच गूण असतो :-) मागे एकदा नेटवरून रेसिपी पाहून एक रेसिपी बनवली. ती बिस्किटं हेल्दी होती पण टेस्टी नव्हती. मग थोड्या अजून रेसिपी पाहून त्यात मला हवा असलेला बदल करून बनवलेली बिस्किटं खूप मस्त, टेस्टी आणि Crunchy झाली. तीच रेसिपी इथे देत आहे.
लेखकहुप्प्यायांनी गुरुवार, 25/10/2012 21:31 या दिवशी प्रकाशित केले.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/16950096.cms
मुंबई पोलिस आयुक्त मोठ्या गमजा करीत होते की पोलिसांवर हल्ले करणार्यांना आयुष्यातून उठवले जाईल वगैरे. पण जिथे हे प्रकार अमाप प्रमाणात झाले त्या आझाद मैदानातील दंगलीबद्दल संतापजनक बोटचेपेपणा दाखवत आहेत. सत्कार करण्याच्या निमित्ताने ह्या पोलादी पोलीस धुरंधरावर मुस्लिम नेत्यांनी दबाव आणला आणि त्याला हा माणूस बळी पडला असे वृत्त आहे. तेव्हा असा इस्लाम खतरेमे अशा आरोळ्या ठोकत प्रक्षोभक हिंसाचार करणार्या लोकांवर कुठलीही कारवाई होणार नाही असेच दिसते आहे.