Skip to main content

विमान ,रेल्वे ,बस इत्यादीने प्रवास

लेखक कंजूस यांनी बुधवार, 04/06/2014 18:08 या दिवशी प्रकाशित केले.
विमान ,रेल्वे ,बस ,टैक्सी यासंबंधी बरे वाईट अनुभव आठवणी आणि बातम्यांसाठी वेगवेगळा अथवा एकत्रित धागा आहे का ?तो असावा असं मला वाटतं . रेल्वे :- या आठवड्यात रेल्वेने त्यांचे जे अधिकृत तिकीट एजंट (RTSA)होते त्यांचे लायसन्स अचानक रद्द केले .देशभरांत जवळपास असे पंधराशे जण होते .त्यांची नावे आणि पत्ते टाईमटेबलमध्ये छापलेले असतात . एकतर यांचा धंदा बुडालाच शिवाय जे लोक रेजर्वेशन सेंटर्सपासून दूर राहतात ,ज्याना येथे वेळेत येता येत नाही ,अथवा असमर्थ आहेत त्यांची पण एक सोय गेली .

कै. व्यंकटेश माडगुळकारांना साहित्यिक आदरांजली. भाग 1

लेखक शशिकांत ओक यांनी बुधवार, 04/06/2014 17:48 या दिवशी प्रकाशित केले.

28 ऑगस्ट या कै. व्यंकटेश माडगुळकारांच्या पुण्यतिथीच्या दिवशी त्यांना साहित्यिक आदरांजली.

लोणी गावातील सांप्रत (ऑगस्ट २००९ मधील) परिस्थितीचा वृतांत (पुनर्संपादित 27 मे 2014)भाग 1

संकलक - विंग कमांडर शशिकांत ओक

काही काळापुर्वी माझ्या हाती 'चित्रे आणि चरित्रे' या नावाचे कै. व्यंकटेश माडगुळकरांचे पुस्तक हाती आले. (उत्कर्ष प्रकाशन पुणे.

रस्त्यांवरील अपघात आणि वाहन संस्कृती

लेखक माहितगार यांनी बुधवार, 04/06/2014 10:25 या दिवशी प्रकाशित केले.
गोपिनाथ मुंडे यांचे काल सकाळी रस्यावरील अपघातात दुख्खःद निधन झाले. भारतभरात रोज दररोज शेकडो अपघात होतात. गोपिनाथ मुंडेंसारखा जाणता नेता काळा आड होतो तेव्हा देशाची मह्त्वपूर्ण हानी होते तेव्हा आपण हळहळतो आणि आपापल्या दिनक्रमास लागतो. गोपिनाथ मुंडे यांच्या अपघातात दोन पैकी एक किंवा दोन्ही वाहनचालकांची त्रुटी (अथवा चूक) असू शकते त्या बद्दल दिल्ली पोलीस तपास करेलच. पण या निमीत्ताने तरी सर्वच भारतीयांनी आपली वाहन चालवण्याची संस्कृती तपासून पहावयास हवी असे वाटते. बर्‍याच जणांना स्वतःच्या भरधाव आणि बेदरकार वाहनचालवण्याचे मोठे कौतुक असते त्यांच्या लेखी सांभाळून वाहनचालवणारे वेडे असतात.

महाराष्ट्राला पडलेलं एक कोडं !

लेखक आशु जोग यांनी मंगळवार, 03/06/2014 20:16 या दिवशी प्रकाशित केले.
राजसाहेब ठाकरे हे महाराष्ट्राला पडलेलं एक कोडं आहे ! राजसाहेब ठाकरे यांचे राजकारणात उतरण्याचे ध्येय काय ! त्यांना खरच महाराष्ट्रातील वजनदार नेत्याचा आशीर्वाद आहे का... राज यांच्या नवनिर्माणाच्या नेमक्या कल्पना काय आहेत. शिवसेनेपेक्षा काही वेगळेपण मनसेमधे आहे का ! माझ्या शिवाय सरकार बनू शकणार नाही असे ते का म्हणतात. ज्या महानगरपालिका, नगरपालिकेमधे त्यांची सत्ता आहे तिथे कारभार कसा चालतो... गुंडाना, खंडणीस्वारांना किंवा त्यांच्या पत्नीला ते उमेदवारी देतात का ? तशी दिल्यास सुशासन आणण्यावर त्यांचा विश्वास आहे असे मानायचे का....

तिचे अभंग…।

लेखक वटवट यांनी मंगळवार, 03/06/2014 15:05 या दिवशी प्रकाशित केले.
तिचे अभंग…। आयुष्याची जेंव्हा, होते उजळणी, तिच्या आठवणी, खंडीभर..! तीच तीच असे, निळ्या ह्या आकाशी, स्पंदने उराशी, तिचीच रे..! कसे तिचे असे, मधाळ बोलणे, मिठाने चोळणे, जखमांना..! उगाच एवढी, केली उठाठेव, तिच्या डोळी देव, दिसायचा..! काय काय सांगू, काय रे व्हायचे, मोर नाचायचे, ग्रीष्मातही..! ऋतुन्नी केवढा, मांडला गोंधळ, पदरात जाळ, श्रावणाच्या..! इवल्याश्या देही, किती उलाढाल, तिच्या लेखी झालं, काही नाही..! ह्याचीही तक्रार, कधी मी ना केली, झोळी हि भरली, आठवांनी..! अशात नेहमी, हवे ते ना घडे, अश्रुंचेच सडे, जागोजागी..! नको ते घडले, इथेही नेमके, चांदण-चटके, काळजाला..! शेवटची भेट, काळजाला पेट,

येक ब्येणं…. गण्या…।

लेखक वटवट यांनी मंगळवार, 03/06/2014 10:36 या दिवशी प्रकाशित केले.
वेडीच माणसं इतिहास घडवतात… इतिहास घडतो तो वेड्याच माणसांकडून.…. इतिहास जर घडवायचा असेल तर कुठलं ना कुठलं वेड हे रक्तात मुरवून घ्यावंच लागतं.… वगैरे वगैरे विधानं वक्तृत्व स्पर्धेतून हमखास उच्चारली जातात. अगदी तारस्वरात जर ही विधानं केली गेली तर हमखास टाळ्या पण मिळतात. आणि कदाचित बक्षीसं पण मिळतं. पण दैनंदिन जीवन जगताना आपण जी वेडी माणसं बघतो, ती सगळीच काही इतिहास घडवत नाहीत. हां… तसं पहायला गेलं तर प्रत्येकच माणूस इतिहास घडवत असतो पण त्याची दखल इतरांनी घ्यावी अशी व्यक्तिमत्वं थोडीच. मुळात इतिहास बितिहास गेला खड्ड्यात मला जसं जगायचंय तसंच मी जगणार.… अशीच काही मंडळी असतात, त्यापैकी आमचा गण्या.

गोपिनाथ मुंडे

लेखक विकास यांनी मंगळवार, 03/06/2014 09:12 या दिवशी प्रकाशित केले.
Munde भाजपाचे महाराष्ट्रातले वरीष्ठ नेते गोपिनाथ मुंडे यांचे अचानक अपघाती निधन झाले. स्वतःच्या मतदारसंघात विजय साजरा करायला ते दिल्लीहून जाणार होते. स्वतः मंत्री असले तरी ही खासदार म्हणून भेट असल्याने त्यांनी मंत्रीपदासाठी असलेला संरक्षणाचा ताफा बरोबर घेतला नव्हता. त्याच वेळेस हा अपघात घडला आहे. अर्थात यासंदर्भात चौकशीनंतरच कोणी बोलणे उचीत होईल... त्यांच्या आत्म्यास शांती लाभोत तसेच हा धक्का सहन करण्याची ताकद त्यांच्या कुटूंबियांना लाभोत ही देवाकडे प्रार्थना...

मँगो मुस

लेखक दिपक.कुवेत यांनी सोमवार, 02/06/2014 19:27 या दिवशी प्रकाशित केले.
जल्ला ह्या उन्हाच्या काहिलीवर अजुन एक A1 उतारा.... dish 1 साहित्यः १. हापुस आंबे - ४ (ईसीली नाहिच मिळाले तर टिन मधला रस वापरा) २. व्हिपिंग क्रिम - २५० मिली ३. मँगो जेली १ पाकिट ४. साखर आंब्याच्या गोडिनुसार कमी/जास्त ५. सजावटि साठि (टिप नं २ बघा) कॄती: १. आंब्यांचा रस मिक्सर मधुन काढा.

आंधळी कोशिंबीर - एक धमाल करमणूक

लेखक श्रीगुरुजी यांनी शनिवार, 31/05/2014 14:56 या दिवशी प्रकाशित केले.
बापू सदावर्ते (अशोक सराफ) एक निवृत्त विधुर. एका मोठ्या बंगल्यात तो आपल्या रंगा (अनिकेत विश्वासराव) नावाच्या तरूण अविवाहीत मुलाबरोबर राहतो. बापू स्वतः अत्यंत काटकसरी व प्रचंड भांडकुदळ. भांडणात कोणालाही हार जात नाही. शांती चिटणीस (वंदना गुप्ते) आपल्या वयात आलेल्या पण अत्यंत पोरकट असलेल्या राधिका (मृण्मयी देशपांडे) नावाच्या मुलीबरोबर एकटीच राहणारी विधवा. ती सुद्धा प्रचंड भांडकुदळ. राधिका जराशी पोरकट, काहीशी अर्धवट. तिच्या शेजारी दुष्यंत मारणे (आनंद इंगळे) हा अविवाहीत वकील आहे. त्याचा शांतीवर क्रश आहे.