अंगाई गीत
लेखनविषय:
काव्यरस
लोपून तेज जाता हलकेच पश्चिमेला
बघ चोरपावलांनी चालून रात्र येई
निजले नभात तारे ,निजली उभी धरा ही
परि तान्हुल्यास माझ्या का नीज येत नाही?
इवली पहा झळाळे नाजूक सोनकाया
इवलाच देह भासे इवला हिरण्यगोल
तेजाळल्या कळ्यांची कानात कुंडले ही
तेजावली झळाळे डोळ्यातुनी अबोल
तू तेजगोल बाळा, मी गालबोट काळे
रे सोनुल्या तुला मी सोडून दूर जाते
घोंगावुनी कधीचा अंधार वाहणार्या
मी सावळ्या नदीला हा तेजपुत्र देते
तव दिव्य स्पर्श होता उजळेल विश्व सारे
मागे उरेल वेडी असहाय्य माउली ही
निजली अबोल माया ह्या बंद पेटिकेत
परि तान्हुल्यास माझ्या का नीज येत नाही ?
© अदिती जोशी
किस्सा - ए - गुलबकावली
लेखनविषय:
* प्रेरणास्त्रोत - http://misalpav.com/node/27931
तर किस्सा आहे कॉलेजच्या जमान्यातील. कॉलेजचे आमच्या नाव घेत नाही. पण तुमच्या आमच्या, चारचौंघांसारखेच, कट्टा असलेले. ज्यावर वॅलेण्टाईन डे, चॉकोलेट डे, रोज डे, डे बाय डे गुण्यागोविंदाने साजरे होणारे.
तर तो ‘रोज डे’ होता की ‘फ्रॅंण्डशिप डे’, हे आता नक्की आठवत नाहीये. कदाचित फ्रॅंण्डशिप डे चे औचित्य साधून वृक्षप्रेमींकडून गुलाबं खपवली जात होती. लाल गुलाब प्रेमाचे प्रतीक तर पिवळा गुलाब मैत्रीचे प्रतीक. रुपयांत किंमत दोघांचीही सारखीच.
गजरा
लेखनविषय:
माधव राव हृदय धक्क्याने गेले..अन सुमतीचे भाव विश्व बदलले.
रिटायर्ड झाले अन ६ महिन्याच्या आतच माधव राव गेले..
सुमती एकटी पडली..
एकुलता एक मुलगा परदेशात स्थायिक झाला होता..
मुलगा तिकडेच बोलावत होता पण सुमती बाई म्हणाल्या मला जरा वेळ दे विचार करायला...
खरं तर त्यांना भारत व नातेवाईक सोडून जाववत नव्हते..
माधव व सुमतीचे एक मेकावर जिवापाड प्रेम होते..तस ठरवून च लग्न झाले होते पण मस्त जमले होते सुर दोघांचे.
सुमतीला मोग~याचा गजरा खुपा आवडायचा व माधव तिला नेमाने आणून देत असे..
तसंच कधी छोटं मोठं भांडण झालं व सुमती नाराज झाली की गजरा हे एकमेव त्यावर औषध असे...
दुपारचे जेवण झाले..खरं तर सुमतीला हल्ली फार
बेबी 2
लेखनविषय:
लेखनप्रकार
बेबी लिफ्ट जवळ येऊन थांबली, वरुन कोणीतरी खाली येत आहे हे त्या लिफ्टच्या बाणावरुन समजले, ती वेंटीग आवस्थेत थांबली.
तीच्या आजु बाजुला कोणी नव्हते, तरी ही ती कोणीतरी येतील का ते पाहत होती.
पण कदापीही नाही,पण तीली भीती वाटत होती ती पाँवर आँफ होण्याची, बर्याच वेळा ती आपार्टमेटमध्ये आसताना लाईट गेली होती, ती कधी कधी प्रर्थना करीत की 'प्लिज पाँवर जाऊ नये,'
आचानक लिफ्टचे दार उघडते,
व त्या मधुन दोन जोडपी बाहेर येतात, ते दोघे पुरुष एकमेकाच्या कानात बेबी कडे पाहुन बोलतात, तर त्याच्याबरोबरीच्या मुली बेबीकडे पाहुन हासत ते लिफ्टच्या बाहेर येतात.
बेबी त्याच्याकडे बघुन खाली मान घालते, व ती लिफ्टमध्ये जाते,त
तीर्थजननी नर्मदामैय्या आणि मी.
खुपजण विचारतात नर्मदापरिक्रमा केल्याने काय वाटले, काय मिळाले. उत्तर आहे आत्मिक समाधान. जनतेत असलेली नर्मदेवरची श्रद्धा, असलेली सेवाभावी वृत्ती, माणुसकीचे दिव्यदर्शन, नर्मदाकिनारी असलेले अप्रतिम निसर्गसौन्दर्य, सुन्दर पक्षी, सायन्काळी प्रवाहात दिवे सोडल्यावर दिसणारे मैय्याचे काळी चन्द्रकळा सोनेरी किनारीची नेसलेले सुन्दर मनमोहक रुपडे.
प्रतिकुलता असतानाही माणसाने कसे आनन्दी रहावे, अडचणीन्वर मात करुन कसे जगावे, हे शिकायला मिळाले.
सदू भारतीय क्रिकेट टीम मध्ये?
लेखनविषय:
लेखनप्रकार
श्रीयुत सदानंद सुखात्मे उर्फ सदू, खरा मुंबईकर. सचिवालयात कार्यरत. मुंबईत सध्या अच्छे दिन आल्या नसल्याने, सदूची सुखाची नौकरी सुरु आहे. सकाळी ९ वाजता सदू घर सोडतो आणि सांयकाळी ५.३० वाजता पुन्हा घरात. अशी ८ तासाची सुख-चैनीची सरकारी नौकरी. खरोखरंच सदू नावाप्रमाणे सुखात्मे अर्थात सुखी आहे. सचिवालयातल्या इतर बाबूंप्रमाणे सदूला ही क्रिकेटचा भयंकर शौक. क्रिकेट वर ‘एक्स्पर्ट कॉमेन्ट’ देण्यात सदू स्वत:ला पटाईत समजत होता. कुठल्या खेडाळूने कसे खेळले पाहिजे त्याचे विशद वर्णन तो करत असे. इंग्लंड सिरीजमध्ये भारतीय टीमची दुर्दशा पाहून इतरांप्रमाणे तो ही दुखी होता.
मिसळपाव
