Skip to main content

शिवसेना - युद्धात हरले आणि तहातही हरले

लेखक श्रीगुरुजी यांनी बुधवार, 12/11/2014 या दिवशी प्रकाशित केले.
सुरूवातीपासून शेवटपर्यंत उद्धव ठाकर्‍यांनी व पर्यायाने शिवसेनेने अत्यंत चुकीची पावले टाकली आणि त्यातूनच आज शिवसेनेची अवस्था 'युद्धात हरले आणि तहातही हरले' अशी केविलवाणी झाली आहे. १५ वर्षे सत्तेपासून लांब राहिल्यावर सत्ता अगदी हातातोंडाशी येऊनही आपल्याच चुकीमुळे घास तोंडात जाताजाता हातातून पडून मातीत मिळावा आणि पुन्हा एकदा उपाशी रहावे लागण्याची वेळ शिवसेनेवर आली आहे. आणि ही वेळ शिवसेनेनेच स्वतःवर ओढवून घेतली आहे. लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर लगेचच भाजपने जागावाटपाचा फॉर्म्युला बदलण्याची मागणी करायला सुरूवात केली होती. 'महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री मीच असणार' असे त्यावेळी कै.

पवारावलंबी

लेखक गणेशा यांनी बुधवार, 12/11/2014 या दिवशी प्रकाशित केले.
सामान्य काक (कार्यकर्ता, कावळा नाही) : केंद्रात नरेंद्र .. महाराष्ट्रात देवेंद्र , आठवले का काही . राम (अयोध्याचा नाही, आठवलेंचा) : आणि दूरुन स्मित हसतोय शरदचंद्र .. जमलेना मस्त ? काक : जमले आहे, पण उठा बाबा आता ? राम : का हो उठू ? काक : अहो उ. ठा. आणि बाबा यांचे काय ? असे बोललो. राम : थांबा मोदी नी त्या बद्दल काय बोलायचे सांगितले आहे ते पाहतो आणि मग बोलतो .. दादा : विसरू नका , आम्ही सर्व घड्याळामध्ये पाहून आणि तारखेनुसार काम करतो . काक : .ऑ ? दादा : आज तारीख १२. त्यात ११/१२/२०१४ बेरीज बघा बरोबर १२.

महाराष्ट्र - विश्वासदर्शक ठराव

लेखक धर्मराजमुटके यांनी बुधवार, 12/11/2014 या दिवशी प्रकाशित केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारनं विधानसभेत ‘आवाजी शक्ती’ दाखवून देत ‘विश्वास’ जिंकण्याची किमया साधली आहे. मात्र शिवसेना आणि कॉंग्रेसने हा प्रकार नियमबाह्य असल्याचे म्हटले असून शिवसेनेने मतदान पुन्हा घ्यावे तर काँग्रेसने अल्पमतातलं हे सरकार घटनाविरोधी असून या सरकारच्या बरखास्तीच्या मागणीसाठी राज्यपालांकडे जाण्याचा निर्णय घेतला आहे असे विविध बातम्या वाचून कळते. १. आवाजी मतदान काय आहे ? २. मतविभागणी कशी मोजतात ? ३. तसेच लोकसत्ताच्या एका बातमीनुसार हा मुद्दा तांत्रिक आहे की नैतिक एवढाच मुद्दा आहे त्यात कायदेप्रक्रियेचा संबंध येत नाही असे म्ह्टले आहे. ४.

आनंद - कार्लसन, सोची २०१४ - डाव ४

लेखक चतुरंग यांनी बुधवार, 12/11/2014 या दिवशी प्रकाशित केले.
पहिल्या तीन डावातच दोन डाव निकाली निघालेत यापेक्षा जास्त उत्सुकता ताणणारे अजून काय असू शकते? आज चौथा डाव मॅग्नुस पांढर्‍या मोहोर्‍यांनी खेळणार. कोणती सुरुवात असेल ई४ का अजून काही? डाव सुरु व्हायला जेम्तेम एक मिनिट आहे चला बघूयात !

मला आवडलेली पुस्तके:विनोदी साहित्य

लेखक पुस्तकमित्र यांनी बुधवार, 12/11/2014 या दिवशी प्रकाशित केले.
रामराम मंडळी! अात्मचरित्रांच्या धाग्याला तुम्ही दिलेल्या उस्फुर्त प्रतिसादाबद्दल धन्यवाद!या भागात अापल्या अावडत्या विनोदी पुस्तकांबद्दल बोलुया. जगण्याची मजा घ्यायची असेल,ताणतणाव विसरायचे असतील तर विनोदी साहित्य वाचण्यासारखा इलाज नाही.सूचक,मार्मिक विनोद,रोजच्या जगण्यातल्या विसंगतींवर बोट ठेवुन स्मितहास्य निर्माण करणा-या विनोदापासुन पोट धरुन हसायला लावणारे विनोद अशा सर्व प्रकारचं विनोदी साहित्य विविध पुस्तकांतुन अापण वाचलं असेल.त्याबद्दल इथे लिहुया!

.....रिप रिप रिप ! !

लेखक फिझा यांनी बुधवार, 12/11/2014 या दिवशी प्रकाशित केले.
रिप रिप रिप........ मोड़कळिला आलेले घर त्या गल्लीतले शेवटचेच, अजुनही चातक बनुन चिवटपणे उभे असलेले , कालच्या पावसाने पुन्हा एकदा झोड़पले पाऊस नेहमी सारखाच.... ..........रिप रिप रिप खिड़कीची धूसर झालेली काच आधीच तडकलेली.. आता नि:शब्द! पावसाच्या एक एक थेंबाला रस्ता दाखवत ती चिर .....कृतार्थ ! जुनाट चौकट भिजलेली... सगळंच ... ..........रिप रिप रिप पाउस आणि अंधार सोबतीला एकटी....

सल्ला हवाय

लेखक बार्नी यांनी बुधवार, 12/11/2014 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, मी गेल्या वर्षी सी ओ ई पी महाविद्यालयातून बी टेक पूर्ण केले असून , सध्या एका मेक कंपनी मधे काम करत आहे. पुढे एम बी ए (mostly IIMs) करुन फायनान्स मधे नोकरी करण्याचा विचार आहे. परंतु मी बारावीत असताना मला स्किझोफ्रेनिया असल्याचे निदान झाले होते. mba करुन खाजगी नोकरी करण्याएवजी सरकारी नोकरी (low stress environment ) करावी असे माझ्या डॉक्टर चे म्हणणे आहे. पण सरकारी नोकरी मधे मला रस वाटत नाही. टेक्निकल फिल्ड मधे जास्त आवड नसल्याने लेक्चरर होण्यातही रस नाही. मानसिक आजार असून खाजगी नोकरी करणे शक्य आहे का ?

पाठलाग..

लेखक बोबो यांनी बुधवार, 12/11/2014 या दिवशी प्रकाशित केले.
पाठलाग.. ***************************************************** बराच वेळ आम्हा दोघांपैकी कुणीही एकसुद्धा शब्द बोललं नाही. दोघेही शांत,चिडीचूप. पण मग मलाच राहवेना. विचारू की नको असा विचार मी करत होतो. कारण निर्णय मनाविरुद्ध गेला तर मी ते कसं पचवणार याची भीती वाटत होती. या आधीचा माझा एक अनुभव अतिशय वाईट होता. त्या अनुभवानंतर आलेल्या डिप्रेशनमधून मोठ्या मुश्किलीने मी स्वतःला सावरलं होतं. आणि आता पुन्हा एकदा विषाची परीक्षा घ्यायची वेळ आली होती. मनाशी देवाचा धावा केला. म्हटलं,"देवा महाराजा, या वेळेस सुद्धा जर निर्णय माझ्या मनासारखा लागला नाही तर ते सहन करण्याची शक्ती मला दे.

घालीन लोटांगण

लेखक शिरीष फडके यांनी बुधवार, 12/11/2014 या दिवशी प्रकाशित केले.
कलमनामा – ३१/०८/२०१४ – लेख १ - घालीन लोटांगण घालीन लोटांगण वंदीनं चरण, डोळ्यांनी पाहिन रूप तुझे, प्रेमे आलिंगन आनंदे पूजन, भावे ओवाळीन म्हणे नामा ही आरती गणपतीच्या दिवसात नेहमीच ऐकली जाते, म्हटली जाते किंवा गायली जाते. ही आरती बर्याच जणांची आवडती आरती आहे. त्याची कारणं वेगवेगळी आहेत. इतर आरत्यांपेक्षा ही आरती जरा वेगळी आहे म्हणून काहींना आवडते तर काहींना या आरतीची चाल गतिमान आहे म्हणूनदेखील ही आरती आवडते. (तसंच या आरतीला वाजवल्या जाणार्या टाळ्यांमध्येदेखील एक विशिष्ट गती आहे).