Skip to main content

भारतिय लोकं अन व्यवसाय

लेखक शिल्पा ब यांनी शुक्रवार, 16/01/2015 07:52 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या सगळीकडे व्यवसाय सुरु करण्यासाठी चांगले वातावरण आहे. इंटरनेट मुळे जग जवळ आले आहे अन त्यामुळे लोकांपर्यंत पोहोचणे सुकर आहे. नवीन विचार, नवीन technology, बऱ्याच व्यवसायांमध्ये disruptive model आलेले आहे. मी इथे कॅलिफोर्निया पाहते आहे किती लोकं किती वेगवेगळ्या दिशेने जग नेत आहेत. लोकं एकमेकांना reference, सल्ला इ. मदत करून प्रचंड प्रमाणात पुढे जात आहेत. यात भारतीय लोक इतर भारतीयांना फारसे मदत करणार्यातले नाहीत हे अगदी लगेच लक्षात आल.

पोरगीपटाव शास्त्राचे नियम

लेखक प्रसाद गोडबोले यांनी शुक्रवार, 16/01/2015 02:31 या दिवशी प्रकाशित केले.
डिस्क्लेमर - १)A - फक्त प्रौढांसाठी ! यत्ता दुश्ली तुकदी ब च्या विद्यार्थी विद्यार्थीनींनी ताबडतोब ही टॅब बंद करावी आणि पुढील लेख वाचणे टाळावे . शॉव्हिनिझम शॉव्हिनिझम म्हणुन दांभिक दंगा करणार्‍यांना दुर्लक्षित करण्यात येईल. २) स्टॅच्युटरी वार्निंग - पोरगी पटवणे हे येर्‍या गबाळ्याचे काम नव्हे तेव्हा खालील लेखातील गोणत्याही गोष्टींची अंमलबजावणी स्वतच्या रिक्स वरच करावी . ३) माणणीय स्पांडुजींनी लाल रंगाचा डबा संपवला असला तरी मी थोडाफार उरल्या सुरल्या लाल रंगाचा वापर करुन धागा लिहिण्याचा प्रयत्न करीत आहे . तेव्हा राग लोभ मानु नये .

जागतिकीकरणात देश ही संकल्पना सुसंगत?

लेखक Sanjay Kokare यांनी शुक्रवार, 16/01/2015 01:17 या दिवशी प्रकाशित केले.
जागतिकरण म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेचे जगाच्या अर्थव्यवस्थेसोबत एकीकरण करणे होय. किंवा जागतिकीकरण म्हणजे एकाचवेळी सर्व जगाचा किंवा जगातील सर्व लोकांचा विचार करणे. जागतिकरणामुळे देशांच्या सिमा फिकट होउन जग हे एक राष्ट्र असल्याचा अनुभव येत आहे. जागतिकीकरण मुळे उत्पादन करण्यास अनुकुल असणार्या क्षेत्रामध्ये रोजगाराची संधी वाढत आहे. परंतु काहींच्या मते जागतिकीकरणामुळे देशातील गृह उद्योग लोप पावत असुन देशी वस्तुंची जागा ही विदेशी वस्तुंनी घेतली आहे म्हणजेच लोक विदेशी वस्तु खरेदी करत आहे. परंतु माझ्या लोक ही वस्तु ही देशी आहे की विदेशी हे न बघता त्या वस्तुची उपयोगिता व किंमत बघुन विकत घेतात. जर आप

मुसाफीर

लेखक यमन यांनी गुरुवार, 15/01/2015 23:53 या दिवशी प्रकाशित केले.
शेवटी "मुसाफीर "वाचायला मिळालं . परत एकदा गोडबोले सरांची "range "बघून अवाकलो . त्यांचं प्रत्येक पुस्तक मराठी माणसाला घडवतंय . त्यांना आणि त्यांच्या व्यासंगाला आपला कुर्निसात . किमयागार , अर्थात ,बोर्डरूम ,मनात, मुसाफिर हि पुस्तकं प्रत्येक मराठी घरातल्या कुंकवाच्या करंड्या इतकीच महत्वाची आहेत . आधी "बालकांड" आणि आता "मुसाफीर "एकूणच "मनुवादी "(म्हणजे आडनावाने "मनुवादी"… विचारांनी नाही म्हणत मी)आत्माचारीत्रांना बरे दिवस आलेत असं दिसतंय . एवढ्या सगळ्या गोष्टी शिकताना ,अनुभवताना वेळ कसा मिळतो ? हे मला खरोखरच इंजिनीरिंग च्या कित्येक विषयान सारखं अनाकलनीय आहे .

तुकडाबंदी व गुंठा जमीन

लेखक hitesh यांनी गुरुवार, 15/01/2015 22:52 या दिवशी प्रकाशित केले.
नॉन एन ए प्लॉट गुंठेवारीवर विकले जातात. तेंव्हा आपण आपल्या कुवतीनुसार एक दोन गुंठा जमीन घेतो. पण आज एक नवी माहिती मिळाली की शेतकी जमिनीचे प्लॉट विकताना तुकडाबंदी कायदा पाळला जातो. म्हणजे त्या एरियात १६ गुंटे , २१ गुंटे असाच तुकडा विकावा / घ्यावा लागतो. बिल्डर बोलला की हो असा कायदा आहे. त्यामुळे खरेदीखत हे अनेक लोकांचे मिळुन केले जाते. यातुन अडचणी येउ शकतील का ? भविष्यात असा प्लॉट डेवलप करताना वा विकताना काय त्रास होऊ शकेल ? अशा एक गुंट्यासाठी कर्ज मंजुर होऊ शकते का ? अशा जमिनीवर फ्लॅट घेताना अडचणी येणार नाहीत. कारण बिल्डर मोठा तुकडा घेऊन त्यावर बिल्डिंग बांधत असतो.

लडाख ........एक उनाड आठवडा

लेखक किल्लेदार यांनी गुरुवार, 15/01/2015 22:18 या दिवशी प्रकाशित केले.
लेह च्या ट्रीप मधले मला आवडलेले फोटोज डकवतो आहे. कलादालनात यासाठी की भटकंती मध्ये इतिवृतांत दिलाच आहे.

बॅक टु द फ्युचर

लेखक पगला गजोधर यांनी गुरुवार, 15/01/2015 19:36 या दिवशी प्रकाशित केले.
युनिव्हर्सल पिक्चर्स स्टुडियोचे 'बॅक टू द फ्युचर' सेरिजचे भन्नाट चित्रपट मध्य ८० च्या दशकात आले होते. कि ज्याची संकल्पना काळाची/चौथी-मितीवर बेतलेली होती. मोटाररुपी टाइम मशीनमध्ये चित्रपट आपल्याला थेट भविष्याचा वेध घेत काळाच्या पुढे घेवून धावायचा. भविष्यामधील जग कसे असेल? याची चुणूक पाहत असतानाच कथा पुन्हा एकदा त्यावेळच्या 'चालू वर्तमानात' यायची. प्रेक्षकांना मनात माहिती असायचं की, हे सारे खोटे आहे,पण ते सारे इतक्या परिणामकारक रीतीने चित्रपटात समोर यायचंकी ते नुसते पाहत न राहता त्याचाच एक भाग बनून अनुभवायचे. हे आज आठवण्याचं कारण कि त्या चित्रपटातील भविष्यकाळ, आज आपल्यासाठी वर्तमान आहे.

" महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाचे महत्व कमी करण्याचा प्रयत्न होतोय?..."

लेखक Sanjay Kokare यांनी गुरुवार, 15/01/2015 18:45 या दिवशी प्रकाशित केले.
" महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाचे महत्व कमी करण्याचा प्रयत्न होतोय ?...." "महाराष्ट्र" हे अनेक महान संताच्या चरनांच्या धुळीने, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माने पावन झालेले मराठी माणसांचे एकमहान राज्य. पण आज महाराष्ट्राकडे बघितले की महाराष्ट्र हे खरीच मराठी माणसाच राज्य आहे का? हा एकमोठा प्रश्न निर्मान होतो.

" आईले विचारल म्या "

लेखक Sanjay Kokare यांनी गुरुवार, 15/01/2015 17:34 या दिवशी प्रकाशित केले.
आईले विचारल म्या आपलीपरिस्थिती एवढी गरीब कौन असते?, आईन सांगितल मलेआपनशेतकर्याच्या एथ जन्मलो म्हणुन हे भोगाव लागते !!! आईले विचारल म्या लोक तं आपल्याले जगाचा पोशिंदा म्हणते, आईनं सांगितले कारण त्याईच्या ईथची पोई आपल्या ईथचपिकते !!! आईलाविचारल म्या त्या नेत्याच्या अंगावरले कपडेएवढे पांढरे कसेकाय असते, आईने सांगितले कारण त्यांईच्या कपडाचा कापुस पणआपल्याच मिळते!!! आईले विचारल म्या मग माया अंगावरचे कपडे कौन मयकलेअसते, आईन सांगितले कारण तुया कपडाले कापुस कमी न् घामच जास्त असते!! आईले विचारल म्या मलेशाळेमधुन मास्तर कौन हाकलुन लावते, आईने सांगितल कारण आपल्याजवळ शाळेच्या फी न् कपड्याची सोय नसते!!! आईल
काव्यरस

" नवी क्रांती घडवायची आम्हाला "

लेखक Sanjay Kokare यांनी गुरुवार, 15/01/2015 17:27 या दिवशी प्रकाशित केले.
———————————————— हवी आमच्या हक्काची भाकर, नकोय तुमची भिक आम्हाला !! हवय आमच्या मेहनतीच मोल, नकोय लाखोचे दान आम्हाला !! हवय शेतीला चांगल बी बियाणे, नकोय तुमची आश्वासने आम्हाला !! हवाय पिकाला योग्य हमीभाव, नको नावापुरत पॅकेजआम्हाला !! भरायच पोट आम्हा जगातील प्रत्येकाच, कारण जगाची काळजी आहे आम्हाला !! करायच भारताच नाव मोठ, नका करुडिवचण्याचा प्रयत्न आम्हाला !! आम्ही नाही करणार आत्महत्या, कारण मुलाबाळासाठी जगायच आम्हाला !! आमचीनका करुकाळजी तुम्ही, कारण नवी क्रांती घडवायची आम्हाला !! ————————————————— ————————————————— @@ कवी @@ संजयरा. कोकरे अमरावती मो. नं.