Skip to main content

मंतरलेली रात्र

लेखक सुमित_सौन्देकर यांनी मंगळवार, 24/03/2015 03:00 या दिवशी प्रकाशित केले.
तूज भेटिची ती रात्र, उशीरानेच जरा उगवली आेढीच्या आतूरतेप्रमाणेच, लवकर मावळलीही युगां प्रमाणे जाणवला, वाट बघण्याचा काळ तो त्यातील गंमत काही औरच, असहाय्य तरीही सुखद तो ठरली वेळ, ठरला काळ, ठरले बाकी सारे काही पण ठरतच न्हवते बोलायचे कोणी आणि काय ते माहीत नाही लाटांच्या सानिध्यात, सुरुवात काहीशी अंधुक झाली संगीतमय त्या प्रसंगी मज पूनवेची भरती आली शर्करेसम तूझे ते आेठ, प्रश्नार्थक गुरफटलेले अन नाजूक तूझ्या त्या देही, जणू चंदन पांघरलेले बोलक्या डोळ्यांस तूझ्या पाहूनी, मी मुका बापूडा मुकलो शब्दसखे सोडूनी गेले, अन मी एकटा पडलो तूझ्या चेहरयावरचे, भाव टिपण्यास मी तत्पर जणू चातक मी आकाशी, पावसाच्या
काव्यरस

या गावाचं काही खरं नाही!

लेखक सर्वसाक्षी यांनी सोमवार, 23/03/2015 22:35 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळी ली क्वान युंचे देहावसान झाल्याचे वृत्त कानी आले. बंड्याला त्याच्या वॉसप वर लिहिलं, 'शनिवार रविवार उंडारुन झालं, आज पुन्हा सोमवारी सुटी!' बंड्याचा दोन मिनिटांनी थंड प्रतिसाद. 'कसली सुट्टी?' अरे! एवढा मोठा नेता गेला आणि सुट्टी नाही? हां, बरोबर; अंतिम संस्कार उद्या असतील, सुट्टी उद्या देतील. पाच मिनिटांनी उत्तर आलं, 'मला काम आहे. तुलाही असावं अशी माफक अपेक्षा आहे. संध्याकाळी बोलु आरामात'. अरे देवा! काय हा माणुस की काय? सुट्टी नसल्याचं काहीच सोयर सुतक नाही? साधा माझ्यापाशी खाजगीत निषेधही नाही? असो. संध्याकाळी बघु. सोमवार असूनही रस्त्याला गर्दी बेताची होती, अवघ्या एका तासात घरी आलो.

वाट चुकल्यामुळे घडलेला ट्रेक.........

लेखक मॅक यांनी सोमवार, 23/03/2015 15:47 या दिवशी प्रकाशित केले.
------- ऑफिसमध्ये संध्याकाळी वेळ संपल्यानंतर एक-एक मेंबर गोळा झाले गप्पा मध्ये पावसाळी पिकनिकचा विषय निघाला ....... अचानक बेत ठरला .....माथेरानला जायच ठरल .....कुणालाच काही माहीती नव्हतं......पनवेलवरून जाता येत इतकच माहीती होतं...सुट्टीच्या दिवशी खुप गर्दी असते म्हणून ....रजा टाकून कामाच्या दिवशी जायचं ठरलं....दिवस ठरला शुक्रवार दि.२९.०६.२०१२ पनवेलला एका मित्राच्या घरी जमायचं ठरलं होतं..त्याप्रमाणे सकाळी ८:३० ला जमलो त्याच्या घरी नाष्टा केला...नेरळ पर्यंत गाडी करून जायच होत...तिथून पुढे चालत जायचं ..गाडी ठरवून निघालो.

निसर्ग नियम आणि मानवी जीवन..!!

लेखक निमिष सोनार यांनी सोमवार, 23/03/2015 13:54 या दिवशी प्रकाशित केले.
हे जग निसर्गनियमानुसार चालते. म्हणजे जे पेरले ते उगवते. तसेच पुन्हा पुन्हा पेरले की पुन्हा पुन्हा उगवते. त्या नियमानुसार कोणतीही गोष्ट करण्यासाठी कधीही वेळ "निघून गेलेली" नसते. वेळ/काळ परत परत येत राहतो. जीवन आपल्याला पुन्हा पुन्हा संधी देत असते. ती आपल्याला फक्त दिसली पाहिजे. जीवनाकडे सकारात्मक दृष्ट्या पाहिल्यास काहीही अशक्य नसते. प्रयत्न करीत राहावे आणि फळ निसर्गावर सोडून द्यावे. चांगल्या गोष्टी पेरत जाव्या. निसर्ग नियमानुसार फळ मिळतेच. चांगल्या कर्माचे फळ चांगले मिळते आणि वाईट कर्माचे फळ वाईट मिळते. चांगले कर्म करा आणि चांगल्या फळाची अपेक्षा जरूर करा.

Veer Garjana | वीरगर्जना @ Gudhi Padwa 2015

लेखक वेल्लाभट यांनी सोमवार, 23/03/2015 07:37 या दिवशी प्रकाशित केले.
वीरगर्जना ढोल ताशे आणि ध्वज पथक, ठाणे याचा एक सदस्य अशी ओळख सांगताना मला नेहमीच अभिमान वाटतो. जरी वैयक्तिक आणि कामाच्या जबाबदा-यांतून सरावाला वेळ मिळत नसला आणि त्यामुळे सध्या वादनात सहभाग घेता येत नसला, तरीही ती ओळख तशीच आहे असं मी मानतो. गुढीपाडव्याच्या आधी व्हॉट्सॅप्प वर फेसबुकवर नववर्ष स्वागत यात्रेतील वीरगर्जनेच्या वादनाचा संदेश फॉरवर्ड करताना मला खूप आनंद होत होता. आणि तो आनंद वीरगर्जना पथकाचं ढोल ताशे वादन ऐकताना कैक पटीने मोठा झाला. दिवसेंदिवस बहरत गेलेला हा तालाचा उत्सव ऐकताना कान, मन धुंद होतं.

मगरीचा वावर

लेखक अत्रन्गि पाउस यांनी सोमवार, 23/03/2015 07:29 या दिवशी प्रकाशित केले.
हि बातमी वाचल्यावर विशेषत: त्यातील खालील परिच्छेद वाचून मी स्तंभित झालोय आतापर्यंत या मगरीने कोणत्याही माणसावर किंवा प्राण्यांवर हल्ला केलेला नाही.

हनी केक - मसाला मारके (Gewürzter Honig Kuchen)

लेखक मधुरा देशपांडे यांनी रविवार, 22/03/2015 22:53 या दिवशी प्रकाशित केले.
बेकिंग आणि केक्सच्या पाककृतींचे एक पुस्तक बरेच दिवसांपासून कपाटात आहे असा साक्षात्कार शनिवारी रात्री अचानक झाला. मग बघुयात काही करता येतंय का म्हणून चाळायला सुरुवात केली आणि Gewürzter Honig Kuchen (Honey Cake) ची पाकृ वाचताना लक्षात आले की बहुतांशी सगळे साहित्य हे आपल्या भारतीय स्वयंपाकातील मुलभूत मसाले दिसताहेत. शिवाय करायला सोपी कृती. मग लगेच रविवारी हा प्रयोग करायचा हे पक्के झाले. त्यात काही बदल करता येतील का यावर विचार करून सकाळी सकाळी तयारीला सुरुवात केली. आता प्रयोग आहे, तोही बेकिंगचा म्हणजे तो अपयशी होण्याची शक्यता नाकारणे हे अतीच झाले.

माणूस ..... खलील जिब्रान

लेखक शिव कन्या यांनी रविवार, 22/03/2015 22:13 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या भटकंतीत मी एका बेटावर पोहचलो. तिथे मला एक राक्षस दिसला. त्याचे शरीर अवाढव्य होते. पायाला लोखंडी खूर होते. परंतु, त्याचे डोके मात्र माणसाचेच होते. तो, पृथ्वीवरील घनदाट जंगले, उंच उंच पर्वतं, विस्तीर्ण पठारे, समृद्ध खाणी अधाशीपणे खायचा. त्याचा तो अधाशीपणा मी बराचवेळ पहात राहिलो. शेवटी त्याला विचारले, ‘ इतके सारे खाऊन पिऊनही , तुझी तहानभूक शमतच नाही का?’ त्यावर राक्षस म्हणाला, ‘मित्रा, तसे तर माझे पोट कधीच भरले आहे! एवढेच नव्हे, तर मला या खाण्यापिण्याचाही अतोनात कंटाळा आलाय . पण, माझ्या मनात सारखी एकच भीती असते – उद्या खाण्यासाठी पृथ्वी राहणार नाही, आणि पिण्यासाठी समुद्र राहणार नाही.

भृगु संहिता फल आदेशाच्या शोधात... भटकंती?

लेखक शशिकांत ओक यांनी रविवार, 22/03/2015 11:52 या दिवशी प्रकाशित केले.
भृगु संहिता फल पत्रांच्या शोधात... मित्रांनो, आज या नववर्षाच्या सुरवातीला नाडी ग्रंथ भविष्य विषयावर पुढे शोध कार्य चालू ठेवण्याच्या निमित्ताने भृगु संहिता फल आदेश नेपाळमधे संग्रहित केले असल्याचे ऐकून होतो त्या वर अभ्यास दौरा करायला मी व जळगावच्या विवेक चौधरींनी काठमांडूची यात्रा करायला गोवा एक्सप्रेस ने जात आहोत. त्यानंतर मेरठ, सहारनपूर, गुरू वालिया, प्रताप गढ, लखनौ येथील भृगु संहिता केंद्रात जाऊन भेट वार्ता, फलादेश मिळवायचा प्रयत्न करणार आहोत.