Skip to main content

स्मारक बांधून काय होतं ?

लेखक चिनार यांनी गुरुवार, 19/03/2015 11:06 या दिवशी प्रकाशित केले.
कालच्या महाराष्ट्र विधानसभेच्या अर्थसंकल्पात छत्रपती श्री शिवाजी महाराज, स्व. श्री बाळासाहेब ठाकरे ,स्व. श्री बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावे स्मारक बांधण्यासाठी ४००-५०० कोटींची तरतूद करण्यात आली. गुजरात मध्ये सुद्धा स्व. श्री वल्लभभाई पटेल याचं स्मारक बांधण्यात येणार आहे. खर्च जवळपास ४००० कोटी. या स्माराकांद्वारे काय साध्य होते ? जनतेच्या पैशांनी स्मारक बांधणे या महापुरुषांना तरी आवडेल का ? याद्वारे पर्यटनाला थोडीफार मदत होते हे मान्य ! पण पण हेच पैसे योग्य ठिकाणी वापरून पर्यटन आणी अन्य व्यवसाय जास्त वृद्धिंगत करता येणार नाही का ?

एका जत्रेची सत्यकथा ! (ज्यांच्या धार्मिक भावना वगैरे पटकन दुखावल्या जातात त्यांनी हा लेख वाचू नये . )

लेखक प्राची अश्विनी यांनी गुरुवार, 19/03/2015 10:15 या दिवशी प्रकाशित केले.
ही एका देवळा मागची गोष्ट . एका छोट्या गावातले हे देऊळ. दरवर्षी इथे जत्रा भरते. तिथे लाखो लोक येतात. सरकारतर्फे त्यासाठी ज्यादा गाड्या सोडल्या जातात, लोकप्रतिनिधी प्रचंड निधी देतात. दरवर्षी भाविकांची संख्या फुगतच चालली आहे .त्यात आजकाल अनेक वीवीआयपी भाविक असतात . त्या देवळाची तुलना आता थेट पंढरपूराशी केली जाते . तर या देवळाची किंवा जत्रेची ही सत्यकथा . सुमारे १८५० नंतरचा काळ. (नक्की साल माहित नाही ). ब्रिटीश राजवटीत अनेक छोटेमोठे संस्थानिक होते . त्यातील एका छोट्याश्या संस्थानिकाच्या पदरी एक सरदार होता . आजूबाजूच्या गावातील सारा वसुलीचे काम त्याच्याकडे होते.

मोरूचा मिपासंन्यास...!

लेखक खेडूत यांनी गुरुवार, 19/03/2015 09:03 या दिवशी प्रकाशित केले.
गुढीपाडवा आला. सकाळ झाली . पूर्वी मोरूचा बाप मोरूला म्हणे - ''अरे मोरू, उठ ! आज गुढीपाडवा आहे. आटपून तयार हो लवकर. वगैरे '' लहानपणापासून मोरूला सवयच तशी होती. मोरूची हालचाल झाली पण डोळे मुळीच उघडेनात. बाबांनी उठवल्याशिवाय मोरूला मुळीच जाग येत नसे- गजराने तर नाहीच नाही . पण आताचा हा आवाज वेगळाच अन नाजूक होता , ''अरे मोरू, उठ ना ! चहा घे -गार होईल …'' '' हे काय भलतंच ! बाबा चहा घेऊन आले कि काय? अन त्यांचा आवाज असा बायकी का झालाय? '' थांबा जरा '' म्हणून कुशीवर वळला , तेव्हढ्यात ''अरे आता उs s ठ ना ! '' असा दीर्घ पुकारा झाल्यावर उठून बसणं भाग होतं.

आग्रऱ्याहून सुटका भाग 3

लेखक शशिकांत ओक यांनी बुधवार, 18/03/2015 22:58 या दिवशी प्रकाशित केले.

आग्रऱ्याहून सुटका भाग 3

शिवाजीमहाराज कसे निसटले ?
नव्या प्रमेयाप्रमाणे नजरकैदेतून सुटकेच्या दृष्टीने जून 1666च्या अखेरीपर्यंत बऱ्याच गोष्टी घडवून आणण्यात शिवाजी राजे यशस्वी झाले होते. 1. राजांनी स्वतःच्या माणसांना परत जाण्याची परवानगी देऊन दूर केले होते. परवान्या अभावी राजांची ही माणसे रामसिंहाच्या डेऱ्याजवळ राहात होती. 2. रामसिंहाने दिलेला शिवाजी महाराजांबद्दलचा ‘जामीनकतबा’ औरंगजेबाने रद्द केला होता. त्यामुळे राजे रामसिंहाला दिलेल्या वचनातून मुक्त झाले होते.

घाटवाटांवरची सायकल राईड - (भाग २- समाप्त)

लेखक मोदक यांनी बुधवार, 18/03/2015 21:29 या दिवशी प्रकाशित केले.
...सकाळपासून १८० किमी सायकल चालवली होती... कात्रज, खंबाटकी, पसरणी व आंबेनळी हे चार घाट पार केले होते. एक झकास दिवस चविष्ट भोजनासमवेत संपत होता... दुसर्‍या दिवशी संपूर्ण चढ उतारांचा वरंधा घाट आणि भोर ते पुणे हे फारसा चढ नसलेले तुलनेने अगदीच सवयीचे असणारे अंतर पार करावयाचे असल्याने दोघेही निवांत होतो.

ह्या कॅन्सरवर इलाज आहे का?

लेखक मार्मिक गोडसे यांनी बुधवार, 18/03/2015 18:43 या दिवशी प्रकाशित केले.
शाळेत असताना उन्हाळ्याच्या सुट्टीत आजोळी महिनाभर राहून मनसोक्त हुंदडायचे,मामेभाऊ व त्याच्या मित्रांबरोबर खेळायचे , टिंगलटवाळ्या करायच्या व सुट्टी संपली की ही आठवणींची शिदोरी घेवून आपल्या घरी परतायचे हा माझा दरवर्षीचा कार्यक्रम असे. अकरावीची वार्षिक परिक्षा संपल्यावर दरवर्षीप्रमाणे आजोळी गेलो. दुपारची वेळ असूनही घरात आजी आजोबांव्यतिरिक्त कोणीच नव्हते. मामेभाऊ-बहीण कोणीही घरात नव्ह्ते, प्रत्येकाने स्वतःला अभ्यासापासून ते पोहण्यापर्यंतच्या क्लासेसमध्ये गुंतवून घेतले होते. हातपाय धूवून फ्रेश होवून आजी-आजोंबांबरोबर थोडावेळ गप्पा मारल्या व बाहेर सटकलो.

आमच्या विवाहाची कहाणी - ३

लेखक सुबोध खरे यांनी बुधवार, 18/03/2015 13:24 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या विवाहाची कहाणी १ - http://www.misalpav.com/node/30588 आमच्या विवाहाची कहाणी - २- http://www.misalpav.com/node/30631 सर्व जण जाईपर्यंत साडे सहा वाजलेले होते. घरचे पाच जण आता थोडा वेळ आहे म्हणून शांत बसलो होतो. मला रात्री नउच्या चेन्नई एक्स्प्रेसने पुण्याला जायचे होते. पहिल्यांदा वडिलांनी विचारले कि मग आता काय विचार आहे. मी पहिल्यांदा मत देण्यास का कू करत होतो पण वडिलांनी सांगितले प्रथम तुझे मत हवे आहे त्यानंतर आम्ही आमची मते सांगू.

गोरखगड

लेखक बज्जु यांनी बुधवार, 18/03/2015 11:06 या दिवशी प्रकाशित केले.
जवळ जवळ १६-१७ वर्ष झाली असावीत गोरखगडाला भेट देऊन. या रविवारी काही झाल तरी गोरखगडला जायचच अस ठरवुन सुध्दा दोन रविवार जमल न्हवतच. मात्र येत्या रविवारी सर्व प्रकारचे योग जुळून आले आणि सकाळी सहा वाजता आम्ही निघालो. मी, सुजीत, मंदार आणि मन्यामामा. त्यापैकी मंदार पार्ल्याहुन तर मन्यामामा डोंबिवलीहुन येणार होते. मंदारनी त्याच्या गाडीतून मला आणि सुजीतला नितीन कंपनी फ्लायओव्ह्रर जवळ ऊचलले आणि आम्ही कल्याणच्या दिशेने निघालो. मन्यामामा अर्ध्या तासात कल्याणला पोहोचतो बोलला.

एनआरआयची भारतभेट..

लेखक गवि यांनी बुधवार, 18/03/2015 11:04 या दिवशी प्रकाशित केले.
मिलिंद बोकिलांचं झेन गार्डन बर्‍याच काळाने पुन्हा उघडलं आणि पायर्‍या ही गोष्ट वाचली. सिंगापूरमधे कष्टाने सेटल झालेला बिझनेसमन श्रीपाद बर्‍याच वर्षांनी भारतात आपल्या एका मैत्रिणीला, जयाला आणि तिच्या फॅमिलीला फाईव्ह स्टार हॉटेलात भेटतो. जयाचा नवरा अशोकसुद्धा पूर्वी चळवळीतच असतो. तेव्हाचे त्यांचे संदर्भ, तरुण वयात चळवळीत असणारे हे तिघे आणि त्यांच्या इतर मित्रांचे संदर्भ.. आणि आताची वागणूक.

नक्षीची दुसरी बाजू..

लेखक सूड यांनी बुधवार, 18/03/2015 11:03 या दिवशी प्रकाशित केले.
नक्षीची दुसरी बाजू. महिला दिन विशेषांकातली नक्षी ही सर्वात आवडलेली कथा!! पण कुठेतरी एकांगी वाटली. बाई दिवसभर राबत असते मान्य, पण पुरुषही हातावर हात ठेवून बसलेले नसतात. त्यांनीही स्वत:च्या आवडीनिवडी मागे टाकलेल्या असतात.