Skip to main content

राग राजस्थानी

लेखक अद्द्या यांनी गुरुवार, 24/09/2015 16:58 या दिवशी प्रकाशित केले.
लोक किती काही म्हणोत . कि बाहेर राहून आल्यावर फक्त घरचंच जेवण चांगलं लागतं किंवा आईच्या हातचा वरण भात किंवा बाबांच्या हातचा तिखट जाळ झुणका. या सगळ्याची किंमत जरी बाहेर राहिल्यावर समजते . तरीही , घर सोडून दुसऱ्या गावात राहायला गेलं कि एक कला आपल्याआपण शिकतो . ती म्हणजे चांगली खायची ठिकाणे शोधणे. मग तो साधा भेळपुरी वाला असो कि भवानी मंडपातला तोंडाला पाणी सुटेल असा तांबडा पांढरा रस्सा असो . किंवा भल्या सकाळी ७ वाजता कटाकिर्र मध्ये जाऊन हाणलेली मिसळ असो . किंवा रात्रीच्या शांत वातावरणात पद्मा गेस्ट हाउस सामोरील "चाचा" ची गरमागरम चाय असो .

दिवस दुसरा -अमृतसर, मनाली, लेह,कारगिल,श्रीनगर, जम्मू.

लेखक सतिश पाटील यांनी गुरुवार, 24/09/2015 15:33 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वतयारी आणि दिवस पहिला - अमृतसर,मनाली,लेह,कारगिल,श्रीनगर,जम्मू. सकाळी सकाळी शिव्यांच्या आवाजानेच जाग आली, खूप मुश्किलीने डोळे उघडले आणि मनगटाच्या घड्याळात पहिले तर सकाळचे ७-१५ वाजले होते, खालच्या बर्थवरचे बाबा आणि जुली दोघे गायब. कुठेले तरी स्टेशन आले होते आणि तो फेरीवाला बोंबलत होता " ले वडे ले वडे गरम गरम वडे लो वडे आलू के वडे लो वडे". कोण कोणाला शिव्या घालत होते याचा उलगडा झाला. वरच्या बर्थवरून खाली टून्नकण उडी मारली आणि खिडकीतून बाहेर पाहू लागलो तर ते दोघेही बाहेर स्टेशनवर फोटो काढत बसले होते.

विखुरलेलं चांदणं

लेखक रातराणी यांनी गुरुवार, 24/09/2015 13:23 या दिवशी प्रकाशित केले.
हल्ली कमीच झालंय तस तुझी आठवण येणं, ओसरत आहे हळू हळू हळव्या समुद्राच उधाण हल्ली कमीच झालंय तस रात्र रात्र तळमळणं, मला बघून अंधारानेही कमी केलंय उसासे सोडणं. हल्ली कमीच झालंय आता मला मोग-याने खुणावणं, त्यालाही झालंय सवयीचं झुरत झुरत गळून जाणं. हल्ली कमीच झालंय स्वप्नांनी डोळ्यात गर्दी करणं, मलाच कसं नाही जमलं असं वेळीच शहाणं होणं. हल्ली कमीच केलंय मी माझ्याच मनाच ऐकणं, तुझ्याकडे तरी आलंय का रे माझं टिपूर चांदणं? (नाव सुचलंच नाही कवितेला.)
काव्यरस

काहीतरी करण्याची जिद्द

लेखक वेल्लाभट यांनी गुरुवार, 24/09/2015 11:39 या दिवशी प्रकाशित केले.
जिद्द, आत्मविश्वास या गोष्टी शोधायच्या असतील तर थोरांची आत्मचरित्रच वाचावी लागतात, त्यांचे शब्द ऐकावे लागतात असं नाही. अगदी साध्या सोप्या माणसांशी केलेल्या संवादातूनही अशा मूल्यांची ओळख होते. असाच एक माणूस मला भेटला. हा माणूस म्हणजे आमच्या कँटीन स्टाफ मधला एक जण. अगदी ४-५ महिनेच झाले असतील त्याला कँटीन मधे लागून. इथे एका केटरर चं कंत्राट आहे, ज्याच्याकडे हा कामावर आहे. तसेही कँटीनमधले चेहरे नियमितपणे बदलत असतात त्यामुळे सुरुवातीला 'आणखी एक नवीन चेहरा' म्हणून त्याच्याकडे फार लक्ष दिलं नाही कुणी आणि मीही.

श्रीगणेश लेखमाला ७ : अनुभवांची शिदोरी

लेखक पिशी अबोली यांनी गुरुवार, 24/09/2015 00:09 या दिवशी प्रकाशित केले.
'अ गुड फील्डवर्कर विल मॅरी इंटू द कम्यूनिटी ही/शी इज वर्किंग विथ, दॅट्स द ऑन्ली वे टु मेक देम ट्रस्ट यू' फील्डवर्कवरच्या व्याख्यानात अंदमानी भाषांवर परिश्रमपूर्वक काम केलेल्या बाईंनी मिश्कीलपणे म्हटलं आणि आमच्या हॉलमध्ये खसखस पिकली. पण फील्डवर्करमध्ये आपल्या कॉलेबरेटर समाजाबद्दल किती आत्मीयता असली पाहिजे, हा मॅडमनी त्यांच्या एकूणच व्याख्यानात सांगितलेला मुद्दा, तो मात्र मनात पक्का ठसला. फील्डवर्क म्हणजे काय, याची काही व्याख्या करण्याइतका माझा अजिबातच अनुभव नाही. प्रत्येक क्षेत्राची काम करण्याची पद्धत वेगळी, त्यामुळे ही व्याख्या क्षेत्रानुसार बदलत असावी.

लोकमान्य, पत्र लिहणेस, कारण कि,

लेखक शीतल जोशी यांनी बुधवार, 23/09/2015 22:40 या दिवशी प्रकाशित केले.
आदरणीय लोकमान्य, खूप दिवस तुमच्याशी बोलावे असे मनात होते. सद्य परिस्तिथी तुम्हाला ठावूक असणे खरच निकडीचे आहे. तुमच्या सारख्या प्रज्ञावंत, दूरदृष्टी असणाऱ्या, खंबीर आणि लोकमान्यता असणाऱ्या नेतृत्वाची आम्हाला गरज आहे. तुम्ही म्हणाल कि, मग तुमच्यात असा कुणी नाही का? असतील हि, पण कोशात गुरफटून बसले असतील, प्रत्येकलाच दुसऱ्यांनी कुणीतरी हि जबाबदारी घ्यावी असे वाटतय. असो. पण आता तुम्हाला आठवण्याचे कारण म्हणजे गणेशोत्सव. तुम्हीच सुरु केला न हो हा गणेशोत्सव. घरातला उत्सव, सार्वजनिक केल्याचे श्रेय तुम्हाला आहेच. पण दुर्दैवाने आज केवळ उत्सवच उरला आहे, तुम्हाला आम्ही विसरलोच आहोत.

नेता

लेखक विवेकपटाईत यांनी बुधवार, 23/09/2015 21:54 या दिवशी प्रकाशित केले.
बिहारच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्याच्या एका हातात खंजीर आहे दुसर्या हातात नागाचा विषारी दंश आहे एका क्षणी शिव्या देतो दुसर्या क्षणी मधाळ बोलतो. धृतराष्ट्री पुतळा तो नेहमीच समोर ठेवतो. तो मित्र आहे कि शत्रू काहीच कळत नाही. एक मात्र खरं तो सीजर नक्कीच नाही ब्रुटस असू शकतो कदाचित् किंवा नेताहि असू शकतो.

तुकारामा-

लेखक शशीभूषण_देशपाण्डे यांनी बुधवार, 23/09/2015 21:15 या दिवशी प्रकाशित केले.
तुकारामा, तुझ्यावाचून जगाचे काय अडले होते? -तरी इंद्रायणी काठी प्राण तुझे भिडले होते? नसतास तरी सुखेनैव आम्ही गजर केला असता तुझ्यावाचून विठूराया बेवारस मेला नसता कशासाठी आकांताचा एवढा धरला होता सोस? पंढरीचा वाडा काही अगदीच पडला नव्हता ओस टाळ वाजत होते, पखवाज नित्य दंगा करीत होता.. कशासाठी वाळवंटात तूच उर भरत होता? माहित नाही? ज्ञानोबाला आळंदीत गाडले होते! नामा फिरून आला देश, तरी पायरीत चिणले होते! चोखोबाच्या अंगावरती वेस पडली, हाडे उरली... एका जनार्दनी काया गोदावरीत होती बुडली... कुणी परागंदा झाले अंगावरती विजा झेलून खरे वाटले?.....