Skip to main content

भटकंती इर्शाळगडची

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी मंगळवार, 25/10/2016 00:34 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी एक्सप्रेस हायवेवरून पुण्याहून मुंबईला जाताना अनेक गडकिल्ले दिसत राहतात. पहिला टोलनाका पार केला कि डावीकडे धीर गंभीर लोहगड विसापूर उभे असतात तर जरा दूरवर तुंग मान उंचावून बघत असतो.उजवीकडे राजमाचीच्या तुंगारली धरणाजवळचे टॉवर दिसतात. खण्डाळ्याला नागफणी हात हलवून दाखवतो.

पधारो म्हारे देस : मुंबई – उदयपूर – जयपूर – मुंबई - 3

लेखक ज्याक ऑफ ऑल यांनी सोमवार, 24/10/2016 23:22 या दिवशी प्रकाशित केले.
पधारो म्हारे देस : मुंबई – उदयपूर – जयपूर – मुंबई - 1 पधारो म्हारे देस : मुंबई – उदयपूर – जयपूर – मुंबई - 2
इथून पुढे आमचा प्रवास होणार होता तो राजस्थानच्या एका अत्यंत तेजस्वी इतिहासाच्या दिशेने. रक्त तलाई – हलदीघाटी – आणि चेतक स्मारक
आणि आम्ही आता हलदीघाटी च्या दिशेने जात होतो. मनात खूप खळबळ , बेचैनी दाटून आली होती. कसा होता तो वीर पुत्र , वीर पिता , वीर लढवैया कसा होता एक राणा – “महाराणा”. खरंच ...

प्रिती

लेखक सोहम कामत यांनी सोमवार, 24/10/2016 15:30 या दिवशी प्रकाशित केले.
अंधार्या राती, तुझा हात हाती, निर्मळ ही प्रिती, तुजवरी.. फुलासंगे फुलशी, वार्यासंगे झुलशी, कळीसंगे खुलशी, स्वप्नपरी.. माझा प्रत्येक श्वास, धरुनी तुझाच ध्यास, करितो हृदयी प्रवास, घेउनी गती.. तुच माझी दिशा, माझी वेडी आशा, माझ्या प्रेमाची भाषा, माझी प्रिती....

पातळ पोह्यांचा चिवडा

लेखक इशा१२३ यांनी सोमवार, 24/10/2016 11:53 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य: पातळ पोहे १/२ किलो शेंगदाणे भाजलेल (हवे तेवढे) पंढरपुरी डाळ :एक वाटी खोबरे काप :आवडीनुसार (वाटीभर पुरे) काजु पाकळ्या :आवडीनुसार कढिपत्ता :एक वाटी मिरचीचे तुकडे :चविनुसार तिळ :चार चमचे मीठ, पिठीसाखर फोडणीसाठी तेल,मोहरी,जिरे,हिंग,हळद Sahity कृती: पातळ पोह्यांचा चिवडा तसा सोपा पण बरेचदा करताना पोहे आकसतात आणि चिवड्याच रुप बिघडत.यासाठी पातळ पोहे शक्यतो चाळून,उन्हात ठेऊन कुरकुरीत करुन घ्यावे.

मक्केतील उठाव ६

लेखक हुप्प्या यांनी सोमवार, 24/10/2016 09:10 या दिवशी प्रकाशित केले.
आधीचा भाग ५ जॉर्डनचा राजा हुसेन सौदी राजाला भेटायला आला. त्याला आपले सैनिक पाठवून मक्केतील बंडखोरांचा निकाल लावण्याची खूप इच्छा होती. सौदी राजाने आदरातिथ्य, आगतस्वागत व्यवस्थित केले. पण जेव्हा मक्केचा विषय आला तेव्हा स्पष्ट सांगितले की तुमची मदत घेणे आम्हाला परवडणार नाही. किंग हुसेनचा आजोबा हा मक्केचा सेनापती (शेरीफ ) होता. तो हाशमी टोळीचा. ऑटोमन साम्राज्य अरेबियावर राज्य करत असताना त्यांच्याकडे त्या भागाची जबाबदारी होती. नंतर सौदी सैन्याने त्यांचा १९२४ साली पराभव करून त्यांना जॉर्डनला हाकलले.

सवाल...

लेखक राजेंद्र देवी यांनी सोमवार, 24/10/2016 08:58 या दिवशी प्रकाशित केले.
सवाल लालचुटुक ओठ तिचे मऊसूत गाल पापण्यांआड दडलेले डोळे तिचे कमाल नजरेत तिच्या तलवार अन नजरेतच ढाल तिरपा एक कटाक्ष होतो मी हलाल गाली गुलाब फुलतो उधळीत सुगंधी गुलाल कुरळ्या केसात फिरतो कर करी शांतता बहाल रोज झोपतो मी हि ओढून स्वप्नाची शाल सत्यात कधी उतरेल हाच नशिबाला सवाल राजेंद्र देवी

तीर्थरुपांच्या काही आठवणी!

लेखक आदित्य कोरडे यांनी रविवार, 23/10/2016 21:35 या दिवशी प्रकाशित केले.
आमचे देशपांडे बोलायला फार खडूस होते. खरं तर आई जास्त तिरकस बोलायची पण देशपांडे कधी हि भीड न ठेवता समोरच्याला काय वाटेल याचा विचार न करता बोलत , आई तस करत नसे आणि कधी बोललीच तर ज्याला उद्देशून ती बोलली आहे त्याला हि त्यातली खोच पटकन लक्षात येत नसे आणि त्याला लगेच प्रत्युत्तर देणे तर अजिबात जमत नसे. पण दोघाही समोरच्याचा किमान शब्दात कमाल पाणउतारा करत. माझ्या आत्याशी देशपांड्यांच अजिबात जमत नसे. मला आठवत कि एकदा ती घरी आलेली असताना पुरणाच्या पोळ्या केल्या होत्या आणि मला आवडायच म्हणून नुसत वाटलेलं पुरण वेगळ काढून ठेवलं होतं. मी ते अगदी पुरवून पुरवून २-३ दिवस खात असे.

उंबरठा!

लेखक आदित्य कोरडे यांनी रविवार, 23/10/2016 21:32 या दिवशी प्रकाशित केले.
उंबरठा! गंजल्या ओठांस माझ्या, धार वज्राची मिळूदे आंधळ्या आत्म्यात माझ्या सूर्य सत्याचा जळू दे ... चांगला सिनेमा कोणता ? मनोरंजन हाच एक निकष मानला तर कुठलाही तद्दन गल्लाभरू सिनेमा चांगला असू शकतो. तसा तो खिडकीवर मोठा गल्ला जमा करून सिद्ध करत असतोच आणि याच कारणावरून बहुसंख्य सिने-निर्माते अशाच प्रकारचे सिनेमे बनवत असतात . पण म्हणून अशा सिनेमांना आपण हिट सिनेमे म्हणतो, चांगले म्हणतोच असे नाही. चांगला सिनेमा हिट असो नसो एक गोष्ट खरी कि त्याने उत्तम मनोरंजन केलेच पाहिजे. पण मला असं वाटतं कि तेवढेच पुरेसे नाही.

शिक्षण: धोरण, उद्दिष्ट आणि गफलती! भाग २

लेखक आदित्य कोरडे यांनी रविवार, 23/10/2016 21:29 या दिवशी प्रकाशित केले.
२. समाजाभिमुखता (सामाजिक उद्दिष्ट ) माणूस हा समुहात रमणारा प्राणी असल्यामुळे लहानपणापासून त्याचे सामाजिक शिक्षण सुरु झालेलेच असते. सामाजिक शिक्षण घेण्याचा सगळ्यात सोपा आणि प्रभावी उपाय म्हणजे समाजात मिसळणे, अधिकाधिक लोकांच्या संपर्कात येणे आणि लहान वयात हे शाळेत सगळ्यात उत्तम तऱ्हेने होते. शाळेतल्या वर्गात काय शिकवतात! हा वादाचा मुद्दा असू शकतो पण तिथे ४०-५० मुलांमध्ये, सदासर्वकाळ आपल्या पाठीशी असणाऱ्या आई वडिलांच्या छत्रछायेशिवाय स्वतःच्या हिम्मतीवर एखादे मूल इतर मुलांशी कसे वागायचे, बोलायचे हे स्वत: ठरवते, शिकते..