Skip to main content

ती सध्या काय करते

लेखक अनाहूत यांनी शुक्रवार, 04/08/2017 08:41 या दिवशी प्रकाशित केले.
संद्याकाळी मनाला अनामिक हुरहूर लागून राहिली होती आणि मन भूतकाळाच्या रेशमी पडद्यामागं पोहोचल होत. का कुणास ठाऊक पण कधी नाही ती तिची आठवण येत होती . म्हणजे अगदी प्रेमबिम नव्हतं..... का होत ? माहित नाही पण एक हुरहूर होती तिच्या बद्दल . आज राहून राहून तिची आठवण येत होती, खरंच कशी असेल ती ? आणि काय करत असेल.. कुठे असेल .. ती सध्या काय करते ? ********************************************************************************* आज तिला पाहिलं कशी दिसतेय हि चेह-यावर सूज आहे कि काय , किती बेढब झालीय हि आता . ती तेव्हा कशी दिसत होती आणि आता कशी दिसतेय .

जेथे जातो तेथे....

लेखक चामुंडराय यांनी शुक्रवार, 04/08/2017 07:37 या दिवशी प्रकाशित केले.
जेथे जातो तेथे तो माझा सांगाती चालतो तयाला हाती धरुनिया गेलो कोठेही तरी देतो आधार दाखवितो मार्ग सदैव मजला सगळे ते नम्बरं ठेवी ध्यानी नीट कनेक्टेड रात्रंदिन केलो देवा तयासी मी सदा खेळतो कौतूके नेट वरी सुखे संचार अंतर्बाही बॅटरी होता डाऊन जीव कासावीस धाव घेतो सत्वर चार्जर कडे इंग्रजी, मराठी टाईपतो वेगे त्यानेची अंगठे बहाद्दर केलो देवा जगात नेटवर्क्स विविध अनेक ड्युएल सिमकार्ड वापरी प्रसंगी बॅलन्स तो संपतो असा भरभर रि-फिलचे बळ अंगी देई देवा रात्री साथ देई माझिया उशाशी प्रभाते आन्हिकाआधी दर्शन तयाचे फोन अलार्म संगीत प्रसंगी वाटाड्या नानाविध रिंग-टोन भुलवी मजला फोटो, चलतचित्रे ठेवीतो
काव्यरस

हॅना आरेण्ट आणि हुकुमाची ताबेदारी (Obedience To Authority)

लेखक आदित्य कोरडे यांनी गुरुवार, 03/08/2017 21:50 या दिवशी प्रकाशित केले.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire एखाद्या चित्रपटाचे परीक्षण लिहिताना आपण दोन प्रकारे ते काम करू शकतो १. त्या चित्रपटाची कथा, त्यातली कला, दिग्दर्शन, त्यातल्या नटांचे अभिनय इ. ह्यांचे विश्लेषण, रसग्रहण किंवा अगदी चिरफाडही आणि २. त्या चित्रपटात आलेल्या विषय वस्तूचे, मांडलेल्या विचार, तत्वज्ञानाचे - ऐतिहासिक, सामाजिक. धार्मिक किंवा तदनुषंगिक इतर प्रकारे विश्लेषण.

.. .अक्षय अविरत निर्मळ

लेखक विटेकर यांनी गुरुवार, 03/08/2017 20:28 या दिवशी प्रकाशित केले.
या भल्या पहाटे थोडे मी तुझेच गाणे गावे अन गात्रा मधले कोडे अलगद सुटून जावे ती वीण मखमली मनाची अन श्वास समर्पित व्हावा त्या जगनियंत्यासाठी हा देहच निमित्त व्हावा विरघळून जावे अलगद मी पण माझे नुरावे त्या अक्षय सुखामध्ये मी अवचित भान हरावे ते नकोच लौकिक जगणे अन श्वासही संकोचावा तू माझा अन मी तुझाच हा भोगच अक्षय व्हावा मी भरून पावलो अवघा ही तुझीच मिठी अवखळ मी विरून हलका होतो अक्षय अविरत निर्मळ - बंगलोर , १ ऑगस्ट २०१७, ०६.३६ वाजता

पैठणी दिवस भाग-१

लेखक गुल्लू दादा यांनी गुरुवार, 03/08/2017 19:48 या दिवशी प्रकाशित केले.
झाली! सगळी तयारी झाली. दंतमंजन, पांघरूण, कपडे, साबण, इ. बारीकसारीक सामान भरून झाले. " प्रवासाला जाताना जितके कमी सामान न्याल तेवढे हाल कमी होतात." या जगमान्य सल्ल्याला अनुसरूनच बॅग भरणे सुरू होते. पण एक महिन्याच्या थांबा असल्यामुळे नाही म्हणता म्हणता 2 बॅग्स गच्च भरल्या होत्या. अरे हो! पण तुम्हाला सांगायचेच राहिले आम्ही कुठे निघालो ते. त्याच अस आहे की , माझे शिक्षण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय औरंगाबाद येथे सुरू होते. त्या वेळी मी आंतरवासिता (इंटर्नशिप) करत होतो. एका वर्षांच्या प्रशिक्षणात एका महिन्यासाठी ग्रामीण रुग्णालयात सेवा देणे अनिवार्य असते.

अनोळखी

लेखक रवि बदलापूरेकर यांनी गुरुवार, 03/08/2017 19:35 या दिवशी प्रकाशित केले.
अनोळखी पलटून तुला पाहताना मज अनोळखी तू वाटे, ती नजर तुझ्या डोळ्यातील का आपली ना भासे क्षितिजातल्या धुक्यात हरवून गेली वाट, वाटे रिक्त जग सारे सुनसान ही पायवाट ते स्वप्न आपले विरले कसे नि कुठे, का वाढला हा अबोला विश्वास का न उरला चुकलो कुठे ग आपण राहिली प्रीत का अधुरी, स्वप्नातले ते सारे भंगले कसे मनोरे वळणावर मी तु़झ्या त्या पाहे वाट अजूनी तुझी, नि तू सोडुनी गेली अशी जशी नव्हतीच कधी माझी - रवि बदलापुरेकर
काव्यरस

'उषःकाल होता होता' : एक शंका

लेखक हेमंतकुमार यांनी गुरुवार, 03/08/2017 19:12 या दिवशी प्रकाशित केले.
'उषःकाल होता होता' हे सुरेश भटांचे गीत मी 'आठवणीतली गाणी' या संस्थळावर वाचले व ऐकले. मूळ गाण्यात ६ कडवी आहेत पण, त्याच्यारेडिओवरील ध्वनीमुद्रिकेत मात्र ४ च कडवी आहेत. गाळलेली २ कडवीही सुंदर आहेत हे लक्षात आले. तसेच हे गाणे 'सिंहासन' चित्रपटात असल्याचे तेथे लिहीले आहे. माझी शंका अशी आहे की हे गीत या चित्रपटाच्या खूप पूर्वीच लिहीले होते का व नंतर या चित्रपटासाठी घेण्यात आले? म्हणून ती २ कडवी वगळली आहेत का ?

चारोळी

लेखक Swapnaa यांनी गुरुवार, 03/08/2017 17:07 या दिवशी प्रकाशित केले.
जन्म दात्यांविना आयुष्य एकदम आहे व्यर्थ खरंच ह्या संघर्षाला किती आहे अर्थ, कवी-स्वप्ना..
काव्यरस

चॅलेंज भाग 2

लेखक aanandinee यांनी गुरुवार, 03/08/2017 12:03 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ पुन्हा महिन्याचा शेवटचा शनिवार. सहाला अजून पाच मिनिटं होती. पण शौनक आणि दिगंत वेळेआधीच पोहोचले होते. “कधी वेळेवर येणार रे या मुली?” शौनकने म्हटलं. “अजून सहा वाजायचे आहेत. त्या बघ त्या दोघी रिक्षातून उतरतायत.” दिगंतने कॅफेच्या मोठ्या काचेच्या खिडकीकडे हात करत शौनकला दाखवलं. अवनी आणि मीरा रस्त्याच्या दुसर्या बाजूला रिक्षातून उतरत होत्या. बोलत बोलत रस्ता ओलांडून दोघी कॅफेच्या दिशेने चालत होत्या. त्यांचे चेहरे बघून त्या काहीतरी महत्त्वाचं बोलतायत असं वाटत होतं. मीराचा चेहरा तर फारच ओढलेला दिसत होता. त्या दोघी कॅफेच्या आत शिरल्या.

श्रावणातल्या कहाण्या

लेखक ज्योति अळवणी यांनी बुधवार, 02/08/2017 19:59 या दिवशी प्रकाशित केले.
लहानपणी श्रावणामध्ये दर रविवारी घरच्या देवांची पूजा झाल्यानंतर आजी आदित्यराणूबाईची कहाणी वाचायची. ही कहाणी ऐकायला  घरात असणाऱ्या सर्वांनी बसलच पाहिजे तिचा हा नियम होता. मी, भाऊ, बाबा, आई एवढेच नाही तर अगदी आमचे माळी मामा, ड्रायवर दुबेजी, घरी कामाला येणाऱ्या लक्ष्मीबाई सर्वांना हातावर तांदळाचे तीन दाणे घेऊन देवासमोर बसावे लागायचे. त्यावेळी काहीतरी वेगळं करतो आहोत म्हणून मस्त वाटायचं आम्हाला. मी आणि माझा भाऊ जसजसे मोठे झालो तसे ही कहाणी आम्ही आवडीने वाचायला लागलो होतो. ही कहाणी म्हणजे मुळात सुर्यनारायणाची उपासना आहे.