Skip to main content

चल कही दूर निकल जाये ....(अंतिम)

लेखक विजुभाऊ यांनी रविवार, 16/08/2026 18:52 या दिवशी प्रकाशित केले.

माझे ही उत्तर तेच. विसरेन कशी. सुहास डोळा मिचकावत म्हणते. दॅट वॉज द टर्निंग पॉईंट.

म्हणजे?

सांगते. पण अगोदर तू सांग तू काय केलेस त्या नंतर  सांगते . 

मागील दुवा चल कही दूर निकल जाये ....(५) | मिसळपाव

चल कही दूर निकल जाये ....(५)

लेखक विजुभाऊ यांनी रविवार, 16/08/2026 18:47 या दिवशी प्रकाशित केले.

कोणीतरी मला हातावर थापटी मारतंय. मी भानावर येतो.

ए... काय झाले..... कुठे हरवलास? सुहास मला विचारतेय.

 

मागील दुवा चल कही दूर निकल जाये.....(४) | मिसळपाव

मॉडेलचा झगा

लेखक मनस्विता यांनी शनिवार, 15/08/2026 21:59 या दिवशी प्रकाशित केले.

मागच्या रविवारी आमच्या Art Kitty चे एक वर्कशॉप होते. Art  kitty नावाप्रमाणेच गप्पा-गोष्टी, खाणं-पिणं आणि कला असं सगळं एकत्र असतं. तर तेव्हा काही तरी विषय निघाला आणि आमच्या मॅम म्हणाल्या की त्या पुण्यातील चित्रकारांच्या ग्रुपमध्ये आहेत आणि शुक्रवारी त्यांना पोर्ट्रेट drawing साठी एक मॉडेल हवा/हवी आहे. मी म्हटलं की तुम्हाला तर जरा सुरकुतलेला चेहरा असलेले लागतात ना? जेवढे जास्त बारकावे टिपायला तेवढे तुमच्यासाठी आव्हानात्मक. तर म्हणाल्या 'नाही, नाही असं काही नाही'. आणि मला विचारलं की तुम्ही येता का मॉडेल म्हणून? मी पण बिनधास्त लगेच हो म्हणाले. 

भारताला स्वातंत्र्य मिळालं म्हणजे नेमकं काय ?

लेखक गामा पैलवान यांनी शनिवार, 15/08/2026 02:56 या दिवशी प्रकाशित केले.

लोकहो,

भारताला दिनांक १५ ऑगस्ट १९४७ इंग्रजांच्या शासनापासून स्वातंत्र्य मिळालं. तर हे स्वातंत्र्य म्हणजे नेमकं काय, याविषयी माझ्या मनांत थोडाबहुत संभ्रम आहे. या विषयावर चर्चा व्हावी म्हणून हा लेख लिहितो आहे. स्वातंत्र्यासोबत फाळणीही झाली. त्यामुळे तिचा विचारही आपोआप होणार. तर मुद्द्याला हात घालूया.

सोमालीलँड - भारतासाठी धोरणात्मक संधी

लेखक साहना यांनी शुक्रवार, 14/08/2026 13:21 या दिवशी प्रकाशित केले.

तुम्ही केरळ मधून बोटीने पश्चिम दिशेने सरळ जाल तर कुठल्या देशांत पोचाल ? उत्तर आहे सोमालिया. जगांतील सर्वांत गरीब, मागासलेले, गृहयुद्ध आणि इतर गोष्टींनी वाट लागलेले पण, नैसर्गिक दृष्टिकोनातून सर्व काही असलेले महत्वाचे राष्ट्र. सोमालीयात पेट्रोल पासून सर्व काही आहे पण तेथील हिंसेमुळे काहीही करणे अशक्य आहे.

मी कोकणाचो डॉक्टर : डॉ मिलिंद कुलकर्णी

लेखक मंदार कात्रे यांनी गुरुवार, 13/08/2026 18:24 या दिवशी प्रकाशित केले.

 

या पुस्तकातलं प्रत्येक प्रकरण म्हणजे डॉक्टरांच्या इतक्या वर्षांच्या "अनुभवाचा अर्क" आहे . रात्री अपरात्री मदतीला "पुलं"च्या नारायण सारखे धावून येणारे रिक्षावाले , मुंबईत गेलेले आणि मे महिन्यात गावच्या ओढीने गावात येणारे चाकरमानी , डॉक्टरांसोबत गजाल्या करताना मध्येच त्यांची टोपी उडवणारे इरसाल पेशंट , डॉक्टरांची लाडकी बच्चेकंपनी हे सगळं इतकं चित्रमय पद्धतीनं मांडलंय की ते वाचता वाचता आपण त्या दवाखान्यात बसून हे सगळं अनुभवतोय असा भास होतो .

हरिद्वार – कटरा – जैसलमेर – जोधपूर : वैष्णोदेवी यात्रा

लेखक नयना माबदी यांनी बुधवार, 12/08/2026 22:30 या दिवशी प्रकाशित केले.

२४ जानेवारी – शुक्रवार
वैष्णोदेवी यात्रा – आयुष्यातील एक अविस्मरणीय दिवस

आजचा दिवस आमच्या संपूर्ण सहलीतील सर्वात खास, भावनिक आणि आध्यात्मिक अनुभव देणारा दिवस ठरला. कारण आज होता माता वैष्णोदेवीच्या दर्शनाचा दिवस. वर्षभर आम्ही या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतो. अशी श्रद्धा आहे की, “माता ज्यांना आपल्या दरबारात बोलावते, त्यांनाच या यात्रेचा योग येतो.” त्यामुळे प्रत्येक वेळी या यात्रेला येताना मनात एक वेगळीच कृतज्ञतेची भावना असते.

गोंड चित्रकलेचा माझा प्रयत्न

लेखक मनस्विता यांनी मंगळवार, 11/08/2026 08:29 या दिवशी प्रकाशित केले.

 आपल्या देशात अनेक आदिवायी आणि त्यांनी जोपासलेल्या कला आहेत. त्यांच्या कलाकृतींमधून निसर्गाशी जोडलेली घट्ट नाळ दिसून येते. त्याचबरोबरीने त्यांच्या समूहाचा एकत्रित अनुभव, आठवणी यांचं चित्रण असते.

मी काढलेले हे चित्र असेच एक उदाहरण आहे. एक आर्ट वर्कशॉप अशी सुरु झालेली सामूहिक क्रिया, मैत्रीण, घरची मंडळी अशा सर्वांच्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभागाची ही एक गोष्ट आहे.