भूतभगिनी
भूतभगिनी
भूतभगिनी
गेल्या वीकेंडला सहजच इंस्टाग्राम चाळत असताना एक रील पाहण्यात आली. एक रिक्षाचालक काका होते, हिंदी भाषिक असावे बहुतेक. त्यांनी आपल्या रिक्षामध्ये एक कागद चिकटवला होता, ज्यावर रोजच्या व्यवहारातील हिंदी वाक्यांना मराठीत कसं बोलायचं हे लिहून ठेवलं होतं. स्वतःच्या पोटापाण्यासाठी, महाराष्ट्रात राहून चार पैसे कमावण्यासाठी ते प्रामाणिकपणे इथली भाषा शिकण्याचा प्रयत्न करत होते. पण त्या रीलचं कॅप्शन होतं, "After all he has a family to raise as well..."
रविवार......
आज "रवी ",सुद्धा सुट्टीवर होता....
पावसाळी हवा,झाकोळल आकाश...
"आकाश पांघरून, घर शांत झोपलेले'
दबक्या आवाजात भ्रभ्रमणध्वनीवर गाणे लावून...
आजोबा मात्र,डोलणार्या खुर्चीत बसून "पुणे मिरर"चे डोके खात होते.
घरातले रविवार "मोड", वर होते...संथ,
मोबाईल प्रत्येक खोलीत कंठशोष करत होता.
पण कुणालाच ढिम्म फरक पडत नव्हता.
गरीब बिचारा.... कोण? 🤫
आहो मोबाईल.
२०२६ चा गणेशोत्सव अगदी जवळ येऊन ठेपला आहे. मंडळांनी नेहमीप्रमाणे उत्साहात गणपती बसवण्याची तयारी केली आहे, ते तिथेच आहेत. पण गेल्या काही वर्षांपासून नागरिकांचा मात्र या उत्सवाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. पूर्वी जसे वर्षभरात गणपती आल्यावर मनोरंजनाचा, प्रबोधनाचा खजिना असायचा त्याची आता गरज उरली नाही. हवे ते मनोरंजन बोटाच्या एका क्लिक वर उपलब्ध आहे. मंडळ व त्यांचे कार्यकर्ते मात्र अजूनही आपण हे करून जनतेला काहीतरी देतोय. देवाचं, पुण्याचं काम करतोय अशा समजूतीतून उत्सव अधिकाधिक भव्य, खर्चिक, अतिक्रमण करणारा व दणदणाटी करत चालले आहेत.
विषयांची व्याप्ती मोठी असल्याने आणि क्लिष्टता वाढत जाण्याचा धोका असल्याने सर्व लेखन थोडे dumb down केले आहे. ज्यांना ह्या क्षेत्राची माहिती नाही त्यांना सोप्या भाषेत माहिती व्हावी म्हणून हा लेखन प्रपंच पण ज्यांना गती आहे ती मंडळी AI वापरून जास्त खोलांत जाऊन विषय समजू शकतील.
नमस्कार मिपाखरांनो 🙏
१४ सप्टेंबरला गणेश चतुर्थी आहे त्याचबरोबर मिसळपावचा वर्धापनदिनसुदधा आहे! गणेशोत्सव व मिसळपाव वर्धापन दिन शुभेच्छा!
पावसाच्या बाबतीत जुलै ऑगस्ट महिने किमान मराठवाडा व विदर्भात निराशा जनक ठरले आहेत. सप्टेंबर महिन्यात पावसाची तूट काही प्रमाणात तरी भरून निघेल अशी अपेक्षा आहेत. देशभरात ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला असून सप्टेंबरमध्ये पाऊस सरासरीतरी गाठेल का हे पहावे लागेल.
नमस्कार. बुद्धीबळ हा खेळ मुलांच्या बुद्धीमत्तेला चालना देण्यासाठी ओळखला जातो. कल्पनाशक्ती, विचार शक्ती, संयम, दृढता ह्या गुणांसाठी तो उपयोगी ठरतो. अदू- माझ्या मुलीसोबत माझे आजवर शेकडो बुद्धीबळाचे डाव झाले आहेत. खूप छोटी होती तेव्हा हरल्यावर रडून माझ्या राजावर हवाई हल्ला करण्यापासून ते आता मला अधून मधून हरवण्यापर्यंत! किमान ३०० डाव आम्ही खेळलो असू. काही डाव खूप गाजले! एक डाव तर टायसुद्धा झाला. नियमित खेळायला लागल्यावर तिला हळु हळु गोष्टी कळत गेल्या. आता इथून पुढे मला तिच्याविरुद्ध जिंकणं कठीण आहे. एक मात्र खूप वेगळा रंगलेला डाव आठवतो. अगदी मी हरलोच होतो तो डाव. त्याची गोष्ट अशी.
गाभा :
वोडाफोन आणि नंतर वोडाफोन आइडिया यांच्याकडे भारत सरकारचे AGR नावाचे थकित टॅक्सचे हजारो कोटी रुपये होते ते देऊ न शकल्याने त्यांनी या बदल्यात ४९%भांडवल सरकारच्या नावे करून टाकले.
नवी बातमी: वोडाफोन आइडिया ( VI)आणि बीएसएनएल कंपन्यांनी एक करार केला की बीएसएनएलचे(BSNL) टॉवरचे नेटवर्क जाळे VI चे ग्राहक वापरू शकणार तर VI चे 4G स्पेक्ट्रम अधिकार BSNLचे ग्राहक वापरू शकणार. [ BSNL ही भारत सरकारचाच व्यवसाय आहे पण BSNLचे भाग भांडवल VI मध्ये नाही.]असो.
सांगू सखे तू काय हो
पसरवी किरणे रवीची
असा शीतल चंद्र हो
सोसूनी थकल्या घराचा
निखळ तो आनंद हो
माझिया माता पित्यांचे
सद्गुणी अपत्य हो
ना ढासळे कधीही असा
माझा दृढ विश्वास हो
साथ ना सुटते जयाची
असा माझा श्वास हो
- अक्षरदास