Skip to main content

वृद्धाश्रमातील ते खिन्न डोळे !!

प्रकाश१११ यांनी या दिवशी प्रकाशित केले.
लेखनविषय:
काव्यरस
[कोठल्याशा वृद्धाश्रमात गेलो. नि करून दृश्य बघून त्यांच्या डोळ्यातील खिन्नपणा बघून मन उदास उदास झाले. तेच शब्दात.....] वृद्धाआश्रामातील कितीतरी डोळे लागलेले असतात रविवारी संध्याकाळी मुलांच्या भेटीसाठी आतुर झालेले असतात किती कासावीस होतात ही म्हातारी माणसे ?? घशाला कोरड पडते देव पाण्यात ठेवतात [मनातल्या मनात ...] प्रार्थना करतात ....! त्यांनी यावे म्हणून कुठे चळकण आवाज झाला तर उत्तेजित होतात त्यांची मने .... आले असतील..?

संसदेचे कामकाज गेले पंधरा दिवस ठप्प होण्याला जबाबदार कोण?

गांधीवादी यांनी या दिवशी प्रकाशित केले.
अवलिया

भ्रष्टाचार करणार्‍या खासदार, मंत्र्यांना निवडून देणारे आपण
06/12/2010 - 16:01 Permalink
तर्री

In reply to by अवलिया

संसदिय कार्यालय मंत्री प्रमुख जबब्दार मग लोक्सभा अध्यक्ष मग प्रधानमंत्री मग राष्त्रपती. विरोधकाची जे.पी.सी ची मागणी अ-वाजवी वाटावी अशी नाही.
06/12/2010 - 17:30 Permalink
मदनबाण

In reply to by तर्री

देशातील नेत्यांना कामकाजाची किती काळजी आहे हे यावरुन दिसुन येते. ;) बाकी पैसे जनतेच्या खिशातुन जात आहेन ना !!! मग या नेता मंडळींना कसला फरक पडणार आहे ? हेच पैसे यांच्या पगारातुन गेले असतेना तर बरोबर कामकाज चालवले गेले असते आणि कोणी गैरहजर राहण्याचा प्रयत्न देखील केला नसता... असो आपल्या देशातला पैसा हा फुकट घालवण्यासाठी किंवा स्वीस बॅंकेत जमा करुन ठेवण्यासाठीच असतो असे म्हणायचे आणि गप्प बसायचे... दुसरं आपण करु तरी काय शकतो ? :(
06/12/2010 - 21:18 Permalink
अविनाशकुलकर्णी

In reply to by मदनबाण

१५ दिवस संसद चालु राहिली असति तर नेमके काय झाले असते?... जे १५ दिवस बंद झाल्या मुळे झाले आहे?
07/12/2010 - 15:25 Permalink
गांधीवादी

In reply to by अविनाशकुलकर्णी

http://72.78.249.124/esakal/20101203/4774364087680602051.htm पंधरा दिवसांपैकी केवळ एक दिवस कामकाज. 23 नवी विधेयके प्रलंबित, 32 विधेयकांची मंजुरी लटकलेली. केवळ एक विधेयक सादर. केंद्रीय अर्थ खात्याच्या 45 हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या गोंधळात व विनाचर्चा मंजूर; रेल्वेच्या पुरवणी मागण्यांनाही गोंधळातच मान्यता. कामकाज न झाल्याने काही कोटी रुपयांचे नुकसान.. सरकारने या अधिवेशनात 23 विधेयके मांडण्याचे निश्‍चित केले होते. त्यातील काहीच विधेयकांचा संदर्भ देणे उचित ठरेल. सहकारी सोसायटीविषयक दुरुस्ती विधेयक, जैवतंत्रज्ञान नियामक प्राधिकरण उभारण्यासंबंधीचे विधेयक, ग्राहक संरक्षणात वाढ करण्यासंबंधीचे दुरुस्ती विधेयक, उच्चशिक्षण व संशोधनविषयक राष्ट्रीय परिषद स्थापन करण्याविषयीचे विधेयक, नवीन शोध लावण्याच्या संदर्भात स्वतंत्र विद्यापीठे (युनिव्हर्सिटीज फॉर इनोव्हेशन) स्थापन करण्याबाबतचे विधेयक, सार्वजनिक जागा बळकावून बसलेल्या हुसकावून लावण्यासंबंधीचे दुरुस्ती विधेयक आणि कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक शोषणाला आळा घालण्यासंबंधीचे विधेयक ही त्यातील काही वानगीदाखल उदाहरणे! न्यायालयांनाही शिस्तीची गरज आहे. त्या संदर्भातील मापदंड व निकष, तसेच न्यायालयांनाही उत्तरदायी करण्यासंबंधीचे विधेयक संसदेत मांडून ते मंजूर करण्याची सरकारची इच्छा होती. विरोधी पक्षांनी अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा मागितलेल्या होत्या. भारताच्या सीमाभागात चीनच्या वाढत्या हालचाली, अंतर्गत सुरक्षाविषयक प्रश्‍न, अवकाळी पावसामुळे ठिकठिकाणी झालेले नुकसान, काश्‍मीरमधील वाढती गंभीर परिस्थिती अशा अनेक विषयांवर चर्चेच्या सूचना विरोधी पक्षांतर्फे देण्यात आल्या होत्या. परंतु, गोंधळामुळे हे विषय चर्चेला येऊ शकले नाहीत. संसदीय कामकाज मंत्रालयाच्या माहितीनुसार, सुमारे 23 महत्त्वपूर्ण विषयांवर विरोधकांनी चर्चा मागितलेली होती. टीप : येथे मतदान करणे अपेक्षित आहे. चर्चा जरूर करावी पण त्यासाठी 'कर नाही, त्यालाच डर नाही ! ' एक स्वतंत्र धागा चालू केलेला आहे. मान्यवर दखल घेतील अशी अपेक्षा आहे.
08/12/2010 - 07:54 Permalink
नगरीनिरंजन

संसदभवनातले उपाहारगृह चालू आहे का? ते बंद केल्यास तात्काळ संसद चालू होईल असे वाटते. बाकी लोकशाहीत सगळ्याला लोकच जबाबदार असतात म्हणून अवलियांशी सहमत.
07/12/2010 - 15:36 Permalink

सौंदर्याचा `अर्थ'

आपला अभिजित यांनी या दिवशी प्रकाशित केले.
लेखनविषय:
लेखनप्रकार
"छ्या! यंदाच्या "मिस अर्थ'मध्ये काहीच अर्थ नाही! कुठल्याही ब्यूटी कॉंटेस्टमध्ये पहिल्या आलेल्या मुली कशा एसटीत बसून पोटात ढवळल्यावर उलटी दाबल्यासारखे हात तोंडावर ठेवतात....तसे हिनं का नाही ठेवले?'' चि. कुरकुरे सक्काळी सक्काळी टीव्ही बघताना चेष्टेच्या मूडमध्ये होता. ""ईईईई...काय काहितरी घाणेरडं बोलतोस रे?'' कु. किरकिरेनं त्याच्या डोक्‍यात एक टप्पल मारली. ""घाणेरडं काय? दर वेळी तसेच नाही का फोटो येत? पण ही निकोल का कोण, तिनं चक्क संपूर्ण चेहरा दाखवणारे फोटो दिलेत, म्हणून जरा शंका आली, एवढंच!'' ""बरं. कळली हा तुमची अक्कल! आता गप्प बसा.'' कु.

महाराष्ट्र दर्शन - भाग ५/ "अजिंठा"

स्पा यांनी या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ - http://www.misalpav.com/node/15474 भाग २ - http://www.misalpav.com/node/15500 भाग ३ - http://www.misalpav.com/node/15529 भाग ४ - http://www.misalpav.com/node/15586 आज औरंगाबाद मधला शेवटचा दिवस , सुट्टीचे ४,५ दिवस कसे गेले समजलेच नाही..... भरभरून पाहून घेतलं, महाराष्ट्रात इतकं सौंदर्य असताना लोक लाखो रुपये खर्च करून परदेशात कशाला झंक मारायला जातात देव जाणे, आधी आपलं राज्य बघा , देश बघा, आणि नंतर सुद्धा वेळ मिळाला तर बाहेर जा , असो हे बुवा माझं मत ...

एक प्रश्न

शिल्पा ब यांनी या दिवशी प्रकाशित केले.
बाबासाहेबांच्या धाग्यावरून एक आठवले अन प्रश्न पडला... असे म्हणतात कि आंबेडकरांनी फक्त दहा वर्ष आरक्षण सांगितले होते पण नंतरच्या नेत्यांनी मत मिळवण्याच्या आशेने आत्तापर्यंत तेच चालू ठेवले आहे. आरक्षण म्हणजे आपल्यात काही कमी असेल तर मुख्य प्रवाहामध्ये कमी त्रास व्हावा म्हणून मागितले जाते ते अशी माझी समजूत...उदा. अपंगासाठी वेगळी पार्किंग वगैरे. मग आरक्षणाच्या ऐवजी दलित समान संधीच का मागत नाहीत?

श्रीखंडाचा फन्ना

हुप्प्या यांनी या दिवशी प्रकाशित केले.
हल्ली मला मूळचे फारसी आणि आता मराठीत रुळलेले शब्द शोधायचा छंद लगला आहे. काही शब्द अगदी बेमालूमपणे (बेमालूम शब्दाप्रमाणेच) मराठी भाषेत सामील (हाही तसाच) झाले आहेत. दोन शब्दांविषयी शंका आहे. श्रीखंड हे अगदी संस्कृतजन्य वाटणारे नाव आहे. पण फारशीत कंद म्हणजे साखर. जसे गुलकंद, कलाकंद वगैरे. आणि शीर म्हणजे दूध (जसे शीरपेडा, शीरकुर्मा). तर श्रीखंड हा शब्द हा शीर+ कंद चा अपभ्रंश आणि मुळात फारसी आहे का? संस्कृतमधे (माझ्या मर्यादित ज्ञानानुसार) श्रीखंडचा तसा काही अर्थ लागत नाही. दुसरा शब्द फन्ना. उदा. फराळाचा फन्ना उडवला/केला. काही वर्षापूर्वी आमिरखानचा फना हा सिनेमा आला होता.

पायर्‍यांची विहीर

विजुभाऊ यांनी या दिवशी प्रकाशित केले.
लेखनविषय:
लेखनप्रकार
विहीरीला पायर्‍या असतात. मी लहानपणी पाहिलेली विहीर म्हणजे काळ्यारामाच्या देवळातली. तीला पायर्‍या होत्या .त्याना पायर्‍या का म्हनायचे हा प्रश्नच होता. भिन्तीतून पुढे आलेल्या दगडाच्या टोकाला पायरी म्हणायचे. त्यातून तोल साम्भाळत आम्ही विहीरीत पडलेला चेंडु घ्यायला जायचो. आणि बहुतेक वेळेस ट्रस्टीकाकांच्या शिव्या खायचो. काल इथे अहमदाबादपासून पासून १८ किमी वर असलेल्या अडालज गावात असलेली हीपायर्‍यांची विहीर बघायला गेलो.

डबल क्रंच खर्डी खाखरा..!!

गवि यांनी या दिवशी प्रकाशित केले.
कोथिंबीर, मिरची, कढीपत्ता आणि लसूण ..लसूण इथे जरी गड्डाभर दाखवली असली तरी इतकी जास्त नको, नाहीतर झोंबरा व्ह्यायचा पदार्थ. मिरच्यांची संख्या दुस-या दिवशी सुट्टी आहे की हापिसला जायचे आहे त्यावर आणि आपापल्या भौगोलिक पार्श्वभूमीनुसार ठरवून घ्यावी. (सांगली, कोल्हापूर, कोकण, मुंबई, अमेरिका वगैरे लक्षात घेऊन..) शिवाय आपण विकत घेतलेला मिरचीचा प्रकार कोणता (ब्याडगी, लवंगी, भूत झोलकीया..!!) यावरही ही संख्या अवलंबून ठेवावी. "कॉनसीक्वेन्शियल" ड्यामेजेसना प्रस्तुत लेखक जबाबदार नाही.