Skip to main content

लग्न करणां-याना तज्ञ माणसाचे मार्गदर्शन अर्थात पुन्हा एकदा अभीनंदन

Published on शनीवार, 22/01/2011 प्रकाशित मुखपृष्ठ
लग्न करणां-याना तज्ञ माणसाचे मार्गदर्शन अर्थात पुन्हा एकदा अभीनंदन आजच्या सामनात पुन्हा एकदा आपले आघाडीचे सभासद प.रा उर्फ प्रसाद ताम्हणकर याचा एक लेख प्रसीध्द झाला आहे. विषय आहे. "लग्न डॉट कॉम" लग्नाळुंना प.रा.ने मार्गदर्शन केले आहे. प्रथमतः त्याचे पुन्हा एकदाअभीनंदन. सामनात फुलोरावर क्लिक करा आणि इच्छुकांनी मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा. (इतरांनी काय करायचे हे मी सांगायला नको) http://www.saamana.com/

याद्या 5716

वनराणी ..३

Published on शनीवार, 22/01/2011 प्रकाशित मुखपृष्ठ
वनराणी २ "शबरी...! चल! माझ्यासोबत चल. माझ्या आश्रमात चल. उठ बालिके. जे व्रत घेतलं आहेस ते पुर्ण कर. " अतिशय गंभीर आणि निर्णायक आवाजात हे काय ऐकतेय मी!! आनंदाने डोळे भरून आलेत... "मुनीवर.. मुनीवर.. मी आपली..." अरे!! हे काय!! मुनीवर... मुनीवर... !! मुनीवर अरण्याकडे चालू लागले!! मलाही जायला हवं. ....मलाही जायला हवं.... "थांबा मुनीवर! मुनीवर थांबा.. मी येतेय.. थांबा मुनीवर..
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 2345

डांबीस डोंब्या

Published on शनीवार, 22/01/2011 प्रकाशित मुखपृष्ठ
डांबीस डोंब्या - - - - - - - -
पहाट झाली आणि पाण्याच्या चकचक चकाकीमुळे डोंब्या डोमकावळ्याची झोप मोडली. "आईने न्याहारीसाठी काय बरे केले असेल?" म्हणून त्याने डोळे किलकिले केले. "क्राऊ-क्राऊ आऊ, काय-काय खाऊ?" म्हणून त्याने आईला हाक मारली. काहीच उत्तर आले नाही. मग त्याला आठवले. कालच आई त्याला किती रागावली होती - "एवढा मोठ्ठा बगळा झालास, पण तरी आईकडूनच दाणा हवा! उद्या पहाटे उठायचे नि स्वतःच खायचे शोधायला जायचे." रागवल्यामुळे आई उत्तर देत नसेल ना? त्याने डोळे मोठ्ठे करून बघितले. अबब!
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 6247

साने गुरुजी समग्र पुस्तक संच.

Published on शुक्रवार, 21/01/2011 प्रकाशित मुखपृष्ठ
१९५० च्या सुमारास घडलेली ही खरी घटना आहे. साने गुरुजीच्या पुस्तकांनी महाराष्ट्राची तरुण पीढी भारावलेली होती. त्यातच एका १८/१९ वयाच्या युवकाचा समावेश होता. दुर्दवाने त्या युवकाला असाध्य अश्या आजाराने गाठलेले होते. मरण्यापूर्वी साने गुरुजींना भेटावे असे त्याला वाटत होते. त्याच्या पालकांनी साने गुरुजींना तसे कळविळे आणि भेटता येईल का असे विचारले. पत्राची वाट पाहत असतांना प्रत्यक्ष साने गुरुजीच त्यांना भेटायला त्याच्या गावी आले.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 5071

महामानवाचा स्वातंत्र्यलढ्यातील सहभाग

Published on शुक्रवार, 21/01/2011 प्रकाशित मुखपृष्ठ
महामानव डॉ. आंबेडकर यांचे भारत स्वतंत्र होण्यामध्ये काय योगदान होते, त्यांनी स्वातंत्र्यलढ्यामध्ये कोणती कामगिरी बजावली होती, त्यांनी ब्रिटीशांविरुध्द भारत ( अर्थात त्यावेळी हिंन्दुस्थान ) बद्द्ल कोणती निश्चित मते मांडली होती , या संदर्भात काही माहीती मिळेल काय ?

याद्या 6144

प्राप्तीकर वाचवण्यसाठी पैसा कुठे गुतंवावा ?

Published on शुक्रवार, 21/01/2011 प्रकाशित मुखपृष्ठ

याद्या 1657
प्रतिक्रिया 14

In reply to by बिपिन कार्यकर्ते

आपण पैसे भरले नसल्याने आपली आउटगोइंग सेवा तुर्तास बंद करण्यात आलेली आहे. कॉल सुरु करण्यासाठी रिचार्ज करा. अवांतर : प्राप्तिकर वाचुन वाचुन किती वाचतो हो ? भरा की .. - हेयरतेल

In reply to by टारझन

अवांतर : प्राप्तिकर वाचुन वाचुन किती वाचतो हो ? भरा की .. तो वाचवण्याच्या नादात सगळे उत्पन्न कुठेतरी गुंतवून ठेवले तर आपल्यालाही त्याचा उपभोग घेता येत नाही. त्यापेक्षा सरळ कर भरावा आणि उरलेला पैसा मनाजोगता खर्च करावा असे माझे मत आहे.

In reply to by आनंद घारे

>>प्राप्तिकर वाचुन वाचुन किती वाचतो हो ? भरा की .. जास्तीत जास्त ३०००० पर्यंत वाचू शकतो. माझ्यामते ही रक्कम छोटी नाही. >>तो वाचवण्याच्या नादात सगळे उत्पन्न कुठेतरी गुंतवून ठेवले तर आपल्यालाही त्याचा उपभोग घेता येत नाही आत्ता नसेल घेता येत उपभोग, पण नंतर घेता येतो. ही रक्कम परत मिळणार असतेच ना काही वर्षांनी. >>त्यापेक्षा सरळ कर भरावा आणि उरलेला पैसा मनाजोगता खर्च करावा असे माझे मत आहे म्हणजे गुंतवणूक करूच नये की काय? मग निवृत्त झाल्यावर काय करायचे हो?

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

विष्वनाथ जी , कोणी किती टॅक्स वाचवावा / गुंतवणुक करावी हे सांगण्याचा अधिकार मला नाही , मी एक निरिक्षण नोंदवले.

In reply to by टारझन

कर्करोगग्रस्त रुग्णांना मदत करु शकता. a1 बाकी आमची प्राप्तीच नाही म्हनुन कराचे कारण नाही. कर नाही तर डर कशाला?

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

३०००० रुपये कर वाचवण्यासाठी मला आधी आपले उत्पन्न खूप वाढवून ते उच्च पातळीवर न्यायला हवे.(जे कठीण आहे) समजा ते तितके वाढले तर मग मला ३०००० रुपये ही कदाचित फार मोठी रक्कम वाटणार नाही. मी पाच वर्षांपूर्वी निवृत्त झालो आहे. त्यामुळे आता मला भविष्यकाळापेक्षा वर्तमानकाळ अधिक महत्वाचा वाटणे साहजीक आहे. भविष्यकाळासाठी तरतूद करणे ही पूर्णपणे वेगळी गोष्ट आहे. करात बचत होवो वा न होवो, ती करणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्वोत्तम मार्ग निवडतांना कर वाचवण्याचा विचार करायला हरकत नाही. पण कर वाचवणे हा मुख्य उद्देश ठेवून बळजबरीने बचत करणे हे स्वतःवर अन्याय करण्यासारखे आहे.

In reply to by आनंद घारे

>>३०००० रुपये कर वाचवण्यासाठी मला आधी आपले उत्पन्न खूप वाढवून ते उच्च पातळीवर न्यायला हवे.(जे कठीण आहे) समजा ते तितके वाढले तर मग मला ३०००० रुपये ही कदाचित फार मोठी रक्कम वाटणार नाही हा मुद्दा बरोबर आहे. मी अजून जुन्या tax slab च्या काळात आहे बहुतेक :-) काही वर्षांपूर्वी पर्यंत २.५ लाखाच्या पुढे ३०% लागत असे. ते आता एकदम १० लाख केले आहे. हे पटकन लक्षात नाही आले. तरीही, एखाद्याचे उत्पन्न ६ लाख असेल तर त्याचे २०००० वाचू शकतात. >>मी पाच वर्षांपूर्वी निवृत्त झालो आहे. त्यामुळे आता मला भविष्यकाळापेक्षा वर्तमानकाळ अधिक महत्वाचा वाटणे साहजीक आहे. बरोबर आहे. पण जे आत्ता तरुण आहेत त्यांनी कमीतकमी आत्ताच्या मौजमजे इतकेच महत्त्व योग्य गुंतवणुकीला दिले पाहिजे (खरे तर जास्त दिले पाहिजे). >>कर वाचवणे हा मुख्य उद्देश ठेवून बळजबरीने बचत करणे हे स्वतःवर अन्याय करण्यासारखे आहे होय. करबचत होते म्हणून अयोग्य ठिकाणी गुंतवणूक करणे ठीक नाही. माझ्या बाबतीत बोलायचे झाले तर, PF आणि विमा यामुळे जी रक्कम करमुक्त होते ती वगळता उरलेली मी सरळ ELSS मध्ये टाकतो. २००५ ते २००७ या काळात केलेल्या गुंतवणुकीमुळे चांगला परतावा मिळाला आहे. २०१२ साली DTC लागू झाला की ELSS मध्ये गुंतवणूक करता येणार नाही. तेव्हा कदाचित कर भरेन सरळ :-)

या आर्थिक वर्षा मधे ईंफ्रास्ट्र्क्च्र बाँड (मराठी प्रतिशब्द?) मधे गुंतवणुक केल्यास कलम ८० सी खाली रु. २०,००० अधिक वजावट मीळु शकते. सध्या आय.डी. एफ. सी. बाँड बाजारात उपलब्ध आहेत. बाकी प्राप्तीकर वाचवण्या साठी PPF किंवा NSC हा सर्वात लोकप्रिय पर्याय आहे.

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

या आर्थिक वर्षा मधे ईंफ्रास्ट्र्क्च्र बाँड (मराठी प्रतिशब्द?) मधे गुंतवणुक केल्यास कलम ८० सी खाली रु. २०,००० अधिक वजावट मीळु शकते. सध्या आय.डी. एफ. सी. बाँड बाजारात उपलब्ध आहेत.
८० सी नव्हे ८० सी सी एफ :) तसेच हे बॉंड एकूण १० वर्षासाठी असतात पण विकत घेताना ५ किवा ७ वर्षानी बाय-बॅक करता येतात. तसेक व्याज हे दरवर्षी मिळायला पाहिजे के चक्रवाढ हेही ठरवता येत

इथं काही मदत मिळु शकेल, http://rupeshkanabar-personal-finance.blogspot.com/ अर्थात आपापल्या जबाबदारीवर हं !

नवी दिशा...

Published on शुक्रवार, 21/01/2011 प्रकाशित मुखपृष्ठ
`येस... आय अ‍ॅम लुकिंग फॊर अ जॉब चेंज'... ट्रेनमध्ये समोरच्या बाकड्यावर बसलेला तो, एव्हढ्या जोरात ओरडला, म्हणून माझं लक्ष त्याच्याकडे गेलं... एका कंपनीचा लोगो शर्टच्या खिशावर मिरवणारे ते दोघं बाकड्यावर बसल्यापासून एकमेकांशी मस्त गप्पा मारत होते. सहकारी असावेत. कंपनीतल्या कामाला बहुधा दोघंही कंटाळले असावेत. म्हणूनच, अचानक त्याचं हे वाक्य ऐकून माझं लक्ष त्याच्याकडे गेलं. त्याला तेवढ्यात फोन आला होता. अलीकडे, प्लेसमेंट कंपन्यांमध्ये नाव नोंदवणार्‍यांच्या मागे नोकर्‍या धावून येत नसल्या, तरी कंपनीचून येणारा फोन कॊल्सचा ससेमिरा मात्र मागे लागलेला असतो.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 2391

आपण ह्यांना पाहिलत का?

Published on शुक्रवार, 21/01/2011 प्रकाशित मुखपृष्ठ
गेल्या कित्येक दिवसांपासुन आमचे परममित्र श्री नितीन थत्ते हे दिसत नाहित. आंतरजालावरुन ते गायब झाले आहेत. नितीनराव , तुम्ही गेल्यापासुन आम्हाला करमत नाही. आम्हा हिंदूचे चुकते काय हे कोण सांगणार? तुम्ही गेल्यापासून कुणी काश्मीरचा धागा वर काढलेला नाही. मदनबाण आणि सहजरावांनी व्हिडो प्रतिक्रीया देणे बंद केले आहे, आजकाल वहिदाने वाद घालणे सोडले आहे, मिपावर हिंदू-मुस्लिम धागे येत नाहीत, संपादक संपादन करत नाहीत. परा फक्त खरडीतुन स्त्री सदस्यांशीच बोलतो. चुचुने शीबै म्हणणे सोडून दिले. डान्राव रिकाम्या मंगल कार्यालयात आसु ढाळतात. टारोबा भावनांशी मी खेळणार नाही म्हणतात.

याद्या 12062