किती भाग्यवान आम्ही!
किती भाग्यवान आम्ही,
आमचे देश आम्ही स्वखुशीने सोडले!
किती गंडलो आम्ही!
मायभूमीच्या आठवांचे गाणे आम्ही,
'चिट्ठी आयी है वतनसे' मध्ये ऐकले!
उमाळे, उसासे विमानतळावरच विरतात बहुतेक!
नव्या जगातल्या शांतसमृद्ध किनार्याचा मोह नसतोच,
छातीठोकपणे सांगावेच कुणी!
आठवणी तर येणारच...... अथपासून इतिपर्यंत सगळ्या...
नव्या मातीवर मृगजळामागे धावले नाहीत,
असे पाय दाखवावेतच कुणी!
प्रेमामायेचे पाश कुणाला चुकलेत?
'सुटलो एकदाचा जंजाळातून' म्हणत
अनोळख्या टापटिपीत स्वच्छंद शीळ घातलीच नाही
असा त्रिशंकू भेटावाच कधी!
किती भाग्यवान आम्ही,
आमचे देश आम्ही स्वखुशीने सोडले!
मिसळपाव
लागणारे साहित्य:
चिकन - अर्धा किलो,
तेल - पाऊण मोठी वाटी,
कांदा - १ मोठा चिरून (चमचाभर तेलावर भाजून बारीक पेस्ट केलेली),
लसूण - १ मध्यम आकाराचा गड्डा,
हिरव्या मिरच्या - २,
आलं - बोटाच्या १ पेराइतका तुकडा,
(आलं, लसूण आणि हिरव्या मिरच्यांची पेस्ट)
सुक्या खोबऱ्याचा तुकडा - अर्ध्यापेक्षा थोडा कमी छोटे तुकडे भाजून बारीक केलेले,
जिरे - १ चमचा,
दालचीनी- अर्ध्या बोटा एवढा १ तुकडा ,
मिरे - ७ ते ८,
लवंग - ४ ते ५,
मसाला वेल्दोड़े- २,
धने - एक चहाचा चमचा तेलात भाजून (+ मिरे
"आयजीच्या जीवावर बायजी कशी उदार झालीय बघितलेत का?”, भुजबळकाका हसत चावडीवर प्रवेश करत.
“अहो बहुजनहृदयसम्राट, कोण आयजी कोण बायजी, काही स्पष्ट बोलाल का?”, नारुतात्या प्रश्नार्थक सुरात.
“अहो नारूतात्या, पेपर वाचायला घेता की सुरनळ्या करायला?”, बारामतीकर खोचकपणे.
"बारामातीकर आणि भुजबळकाका, तुम्ही नुसते टीकाच करा”, चिंतोपंत हताशपणे.
"अहो तो राज आणि त्याची मनसे काही करते आहे तर ते कोणालाही बघवत नाहीयेय!”, घारुअण्णा