Skip to main content

संस्कृती

<<<<आज बसावे उद्या बसावे >>>

लेखक सुहास..
शनिवार, 24/12/2011 या दिवशी प्रकाशित केले.
कच्चा माल : http://www.misalpav.com/node/20177 (सोनलताईंची माफी मागुन ) आज बसावे उद्या बसावे दोन थेंब सांडुन देणे डोक्यामध्यल्या शॉटालाही सोडुन द्यावे जमवुन प्यावे दोन पेयपांनांच्या मधले अंतर आहे केवळ झुरत राहणे कसे कळावे खुळ्या जगाला सांजकाळीचे बहकुन येणे ग्लास मद्याचे असेच ताटवे त्यात बुडावे दिसावे काजवे.. ओठांवरचे शब्द गरिबडे श्वासागणती बरळत जाणे सिगारेटीचे वलय खेळावे नको मेंदुशी फाटे फोडणे तंदुरीचे चिकन घेउनी संध्या काळी आपले बसणे
काव्यरस

दर्शनेच्छा बलियसि!

लेखक हरिकथा
शुक्रवार, 23/12/2011 या दिवशी प्रकाशित केले.
वृन्दावनातल्या राधा-मदनमोहन मंदिराजवळच एक आंधळे बाबाजी राहायचे. त्यांचं नाव, गाव कुणालाच माहिती नव्हतं. बहुतांशी दिवसभर त्यांचं वास्तव्य वृन्दावनाजवळच्या 'मदनटेर' या जागी असायचं म्हणून लोकं त्यांना 'मदनटेरवाले बाबा' अशीच हाक मारायचे. हे बाबा काही जन्मान्ध नव्हते. पण त्यांच्या डोळ्यांतून सतत अश्रुपात होत असायचा. दिवसभर ते मदनटेरच्या घनदाट झाडीमध्ये बसून राधा-कृष्णांच्या लीलांचे स्मरण करत रडायचे. राधा-कृष्णाच्या विरहात त्यांचं अविरत अश्रुविसर्जन सुरू असायचं.

सचिनचा मार्ग 'मोकळा'

लेखक आशु जोग
शनिवार, 17/12/2011 या दिवशी प्रकाशित केले.
आता खेळाडूंनाही मिळणार 'भारतरत्न पुरस्कार' 'सचिनचा भारतरत्नचा मार्ग मोकळा' वाचून कुणालाही आनंद होइल अशी बातमी आहे. नीट विचार केला पाहिजे. एका सचिनसाठी ही नियमांची मोडतोड आहे का ! सध्या सरकार कठीण परिस्थितीतून जाते आहे.

रानातल्या फुलांचा

शुक्रवार, 16/12/2011 या दिवशी प्रकाशित केले.
जागु ताईंनी कलादालनात आजवर प्रस्तुत केलेल्या सर्व रानफुलांच्या दर्शनातुन ही कविता जन्माला आली आहे.मला या कवितेतनं ही कविता ''माझी आहे'' असं श्रेय नको आहे,तेंव्हा ही कविता कशी कडु/गोड जमली असेल तशी त्या रान फुलांनाच अर्पण करतो. रानात जाउनी मी होइन या फुलांचा सहवास देवतांच्या बागेतल्या मुलांचा... किती रंगरुप त्यांचे व्हावे मनात गोळा भरगच्च रानराइ वाटे ही सांब भोळा मी एकटाच त्यांची बांधेन देवळेही परि मुळ तत्व त्यांचे आहेच देवळे-ही राना मधेच देव मानायचाच झाला रानामधुन फुलता तो रान रान झाला त्याचीच रूपकेही त्याने प्रतीत केली आंम्ही खुळ्या जनांनी भक्तीत सोय केली सारे अखेर त्याचे त्याचेच फक्त
काव्यरस

ही जिवाला आस आहे

लेखक विजुभाऊ
बुधवार, 14/12/2011 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा http://misalpav.com/node/20071 , http://misalpav.com/user/7236 आणि http://misalpav.com/user/707 जेवणाच्या पंगतीला , मोदकाचा घास आहे आणखी तो मठ्ठ्या संगे , मसालेदार भात आहे भजी होत , कांद्याची ती, श्रीखंड वाटी सवे गं केळीच्या पानात या , आणि जिल्बीची रास आहे मीठ,चटणी ,लोणचे, कुरडया ,कोशिंबीरी डाळ वांगे नी फोडणीची , ही तर्रीही खास आहे. चवीचवीने जेव जरा , बेत आज खास आहे पाहिले नसे कधी असा ;आतिथ्याचा स्वर्ग आहे चंदनाचा मोगर्‍याचा , केवड्या

प्राचीन भारतः पाताळेश्वर लेणी

लेखक प्रचेतस
सोमवार, 12/12/2011 या दिवशी प्रकाशित केले.
पाताळेश्वर-पुण्यात भर गर्दीतल्या जंगली महाराज रोडवर असलेला हा कातळकोरीव ठेवा फारश्या कुणाच्या खिजगणीत नसलेला. हा वसलेला आहे जंगली महाराज मंदिराच्या अगदी शेजारीच. पाताळेश्वराला याधीही भरपूर वेळा चकरा झालेल्या होत्या पण यावेळी काही मिपाकरांना बरोबर घेऊन जायचे ठरले, खरडाखरडी, फोनाफोनी झाल्यावर धनाजीराव वाकडे, अत्रुप्त आत्मा, ५० फक्त आणि त्यांचे एक स्नेही श्री. सुहास फडके हे ठरलेल्या वेळेवर बरोबर ४.३० वाजता जंगली महाराज रोडवर पोचते झाले. प्रवेशद्वारापाशीच व्यालप्रतिमा आणि कळसाचे काही अवशेष ठेवलेले आहेत.

गाणारं वायोलिन!!

लेखक चतुरंग
सोमवार, 12/12/2011 या दिवशी प्रकाशित केले.
एखाद्या वाद्यातून जर तुम्हाला मराठी भावगीताचे बोल जसेच्या तसे, हो जसेच्या तसेच, म्हणजे अगदी काव्यातल्या जोडाक्षरांसकट आणि गायकाच्या/गायिकेच्या आवाजातली मींड, ताना, आलाप या बारकाव्यांसकट ऐकू आले तर तुम्हाला काय वाटेल? तुम्ही अचंबित व्हाल, इतकेच नव्हे तर या माणसाच्या प्रेमातच पडाल! माझंही अगदी असंच झालंय. प्रभाकर जोग नावाच्या एका अवलियाचे काही यूट्यूब वीडिओज मध्यंतरी बघितले त्याचवेळी मी वेडा झालो होतो. आज मी ते वीडिओ पुन्हा बघितले आणि मग मला राहवेना म्हंटलं आता मात्र या चमत्काराची ओळख मिपाकरांना करुन द्यायलाच हवी. मराठी संगीत क्षेत्रातले हे अतिशय नाणावलेले व्यक्तिमत्त्व आहे.

"पारंबी" एक वेगळा चित्रपट

शुक्रवार, 09/12/2011 या दिवशी प्रकाशित केले.
आज माझा मित्र सतिश सलागरे यांनी दिग्दर्शित केलेल्या " पारंबी" या चित्रपटाचा प्रिमिअर शो पाहाण्याचा योग आला.. अंधेरीच्या फन रिपब्लिक मध्ये या चित्रपटाचा प्रिमिअर शो होता..अतिशय साधे पण तितकेच विचारप्रवणीय कथानक..खेडेगावातील एक गरिब तरूण शिक्षण घेउन आल्यावर , गावाची परिस्थीती बघून आपलच गाव सुधारण्या प्रयत्न सुरू करतो.. हे करत असतांना त्याला काय अडचणी येतात, त्यातून तो नायक कसा मार्ग काढतो.. अशी साधी कथा.. भूषण प्रधान.