Skip to main content

संस्कृती

केल्याने देशाटन, पंडित-मैत्री, 'सभेत संचार'............

लेखक सर्वसाक्षी यांनी बुधवार, 07/12/2011 00:07 या दिवशी प्रकाशित केले.
आजकाल स्पर्धा कोण वाढली आहे. वर जाण्यासाठी जो तो धडपडतोय. आता जे हुषार आहेत त्यांच ठिक आहे पण आमच्या सारख्यांच काय? आणि आजकाल वर चढायला हुषारी पुरतेच असही नाही. मग मोठ्ठ व्हायचं असेल तर काय करावं बर? आहेत, त्यालाही उपाय आहेत. एक उपाय मागे मी इथे सांगितला होता. आता दुसरा सांगतो. चारचौघात आपल वजन वाढवायच असलं, महत्व प्रस्थापित करायच असल तर मग काहीतरी वेगळं कराव लागतं. थोडक्यात आपणच आपल्याला मोठ कराव लागतं. ते कस? अहो हे कलियुग आहे, बोलणाऱ्याचे दगड खपतात आणि न बोलणाऱ्याच सोनही खपत नाही म्हणे. कस खपणार?

भाषण

लेखक जयंत कुलकर्णी यांनी मंगळवार, 06/12/2011 12:20 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांनो, मिश्रेया यांच्या धाग्यावरून याची आठवण झाली. भाषण कसे असावे, भावना कशा व्यक्त कराव्यात, विनोद कसा हलका फुलका असावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे हे पु.लंचे भाषण...ऐकले नसेल तर - येथे जरूर ऐका...

येळकोट येळकोट जय मल्हार!!

लेखक यकु यांनी मंगळवार, 06/12/2011 00:26 या दिवशी प्रकाशित केले.
गावाकडच्या बाजारात कांदे वांगे दिसायला सुरुवात होऊन दोन-चार आठवडे झाले तरी घरात मात्र ते आणले जात नसत. कारण सट (चंपाशष्‍ठी) अजून झालेली नसे ना. खंडोबा ज्यांचं कुलदैवत आहे किंवा ज्यांच्या देवघरात खंडोबाचे टाक आहेत त्या सगळ्यांच्याच घरात हा रिवाज पाळला जात असावा. आमच्या घरात आजी लग्न होऊन येत असताना तिच्यासोबत तिचं कुलदैवत असलेला खंडोबाही (टाक) आला होता. तेव्हापासून आमच्याकडेही सट पाळली जाऊ लागली असावी; निश्चित माहिती नाही कारण विचारायला सध्‍या जवळ वडीलधारं कुणीच नाहीय. खंडोबा हे तसं धनगरांचं कुलदैवत. पण श्रद्धेला बंधन नसतं.

दिग्गजांची ओळख :- छत्रपती शिवाजी

लेखक मन यांनी रविवार, 04/12/2011 02:03 या दिवशी प्रकाशित केले.
दुसर्‍या एका स्थळावर एका चर्चेत शिवाजी महाराजांबद्द्ल काही बोलणे सुरु असताना एका प्रतिसादात शिवाजी महाराजांचा एक प्रोफाइलच तयार झाला. त्यांच्या बद्दल लघुनिबंध म्हणता येइलसा किंवा संक्षिप्त परिचय म्हणता येइल असा तो आहे.

आई, असं का ग केलंस?

लेखक विजुभाऊ यांनी शुक्रवार, 02/12/2011 15:30 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रानो हे एका अतीशय संवेदनशील विषयावरचे काही मला वाचायला मिळाले. एखाद्या जिव्हाळाच्या विषयावरचे हे लिखाण वाचताना डोळ्यात नकळत पाणी येते. ज्यानी हे मनोगत लिहिले त्याच्या भावना एखाद्या आईच्या/बापाच्या/सासू सासर्‍यांच्या पर्यन्त आपल्याला पोहोचवता आल्या तरी खूप काही मिळवले खरेतर काही अपरीहार्य वैद्यकीय कारणामुळे होणारी भ्रूण हत्या सोडता सरसकट होणारी स्त्री भ्रूण हत्या हा चिंतेचा विषय आहे. काहीही अपराध नसताना केवळ स्त्री आहे म्हणून जन्माअगोदरच हत्या होते आणि हजारो निष्पाप कळ्या उमलण्या अगोदरच खुडल्या जातात. हा आपल्या समाजाला काळीमा आहे.

महाराष्ट्र धर्म :- महोत्सव मराठी साहित्याचा

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी गुरुवार, 01/12/2011 15:53 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, सर्व मिपाकरांना सस्नेह निमंत्रण. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री. राज ठाकरे यांच्या 'ही राजभाषा आहे' या पुस्तकाचे प्रकाशन शनिवारी ठाण्यात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते होत आहे. पानिपतकार विश्वास पाटीलही या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.

सिंदबाद...

लेखक मन यांनी बुधवार, 30/11/2011 15:14 या दिवशी प्रकाशित केले.
सिंदबाद... एक वेडा खलाशी.समुद्रावर जातो म्हणून खलाशी म्हणायचं. वृत्ती तीच, भटक्याची,प्रवाशाची. अमुक ठिकाणी "पोचणं" हे त्याचं उद्दिष्टच नसतं. त्याला फक्त तिथं "जाण्यात" मजा असते म्हणून जायचं असतं. हरेक सफरीत काहितरी वेगळं सापडेल म्हणून थेट नौका अथांग समुद्रात फेकणारा तो सिंदबाद. इतर खलाशी "बाप रे वादळ येतय" असं म्हणताना हा "अरे व्वा! वादळ येतय " शिडांच्या जुळजुळवीला अफाट उत्साहाने लागणारा पठ्ठया. वादळातून नाव काढल्यावर "वाचलो", "सुटलो" असे म्हणण्यापेक्षा "कस्ला थरार होता हा." असे म्हणून रोमांचित होणारा व रूढ जगाच्या दृष्टीने गाढव.

त्रिकोण - एक हजार वर्षाच्या इतिहासाचा.. - (द्वारसमुद्र) भाग -१

लेखक दशानन यांनी मंगळवार, 29/11/2011 19:41 या दिवशी प्रकाशित केले.
  • # हाच लेख मीमराठी.नेट येथे प्रकाशित झालेला आहे.
  • # हा लेख लिहताना शास्त्रीय माहिती अथवा त्याचे ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न न करता माझ्या नजरेतून जे मी पाहिले ते लिहले आहे.
प्रस्तावना : एखाद्या गोष्टीचे वेड जर मनात घेतलं तर ते पुर्ण केल्या शिवाय माझा आत्मा शांत राहत नाही, असेच एक वेडं मला मागच्या सोमवारी/मंगळवारी टिम गोवा यांनी गोवाच्या इतिहासावर लेखन करण्यास सुरूवात केली व पहिल्या भागामध्ये, विचार करावे व शोध घ्यावे असे काहीतरी सापडल