Skip to main content

संस्कृती

सुभद्रा: महाभारताची 'हेलन ऑफ ट्रॉय' (भाग १)

Published on रवीवार, 28/07/2013
सुभद्रा: महाभारताची 'हेलन ऑफ ट्रोय' (भाग १) अर्जुनाने केलेल्या ‘सुभद्राहरणा’तून सरतेशेवटी अर्जुनाचा दारूण पराभव आणि यादवांचा सर्वनाश कसा घडून आला, याची ही कथा: ------------------------------------------------------------------------ १. अभिरमन्यु उवाच: सुभद्रेला त्या नराधमापासून झालेल्या बाळाचे नाव ‘अभिमन्यु’ ठेवल्याचे कळले, तेंव्हा मी थोडासा सुखावलो खरा, पण ते क्षणभरच. त्या नराधमाविषयीचा माझा संताप लगेचच उफाळून आला, आणि माझी प्रतिज्ञा आणखीनच बळकट झाली. … माझी प्रिय सुभद्रा. माझी बालसखी.

चूल माझी सखी

लेखक जागु
Published on गुरुवार, 18/07/2013
कळायला लागल्यापासूनच माझ्या भातुकलीचा श्रीगणेशा व्हायचा तो चूल मांडूनच. तीन दगड त्रिकोणी मांडले की झाली चूल. भातुकली खेळताना चुलीसाठी शिंपल्या किंवा खुबड्या वापरायचे. त्या आकाराने सारख्या असल्याने भांडी व्यवस्थित बसायची. मग त्यात छोट्या काड्या लाकडे म्हणून टाकायच्या आणि त्यावर खेळण्यातली भांडी ठेवून खोटे-खोटे जेवण शिजवायचे. लहान असल्यापासून मी आमच्या घरी चूल पाहिली आहे. पूर्वी गावी सगळ्यांच्याच घरी चुली असायच्या. आमच्या घरी गॅस होता तरीपण वेळ लागणारे पदार्थ शिजवण्यासाठी तसेच रोजचे अंघोळीचे पाणी तापविण्यासाठी आई-आजी चूल पेटवायच्या. आधी आमची मातीची चूल होती.

श्रीविठ्ठल : मला उमगलेला

लेखक शरद
Published on गुरुवार, 18/07/2013
श्रीविठ्ठल :मला समजलेला १९७८-७९ साल असावं. डॉ.रा.चिं.ढेरे यांचे "महाराष्ट्राचा देव्हारा" हे पुस्तक हातात पडलं. त्या आधी ५-६ वर्षे त्यांचे "लोकसंस्कृतीची क्षितिजे" हे पुस्तकही घेतले होते. शहरात वाढलो, शिक्षण झाले त्यामुळे लोकसंस्कृतीशी ओळख तोंडदेखलीच. पण मी या पुस्तकाने प्रभावित झालो. त्यांची विद्वत्ता हा काही माझ्या तोकड्या ज्ञानाच्या कक्षेतला भाग नव्हता पण त्यांची शैली, भाषाप्रभुत्व, माहिती गोळा करण्याकरिता घेतलेले श्रम, नित्कर्षाला येईपर्यंत केलेली मांडणी यांनी मी प्रभावित झालो. त्यामुळे "श्रीविठ्ठल:एक महासमन्वय" या लेखाने मी भारावलोच.

"गूढ" (बेडसे लेणी-एक गूढानुभव!)

Published on गुरुवार, 18/07/2013
डोंगरदरिच्या कपारितुनी, हत्ती घोडे कुठून आले? मनी वाटते-चितारताना,अकल्पिता'ही "फुटून" गेले...! https://lh5.googleusercontent.com/-tkEOgsr5S-M/UOmt3DVjXiI/AAAAAAAAV9U/7WHZmVxHVx8/w702-h468-no/IMG_3695.JPG कुण्या देशीचे कोण प्रवासी नुसता हाती छिन्नी हतोडा हातामधुनी कसा अवतरे? मत्त हाती अन निधडा घोडा!?

वारी आणि मी...

लेखक नानबा
Published on बुधवार, 17/07/2013
महाराष्ट्रात जन्माला येऊन आषाढीची वारी माहित नसणारा माणूस विरळाच. त्यातही मराठी माणसाला, विशेषत: माझ्यासारख्या सोलापूरकडे आजोळ असणा-या माणसाला वारीबद्दल आकर्षण नसणं म्हणजे सच्च्या क्रिकेटप्रेमीला सचिनची खेळी लाईव्ह पाहण्याबद्दल आकर्षण नसण्याइतकंच अशक्य. लहानपणी दोन तीनदा गावी वारी पाहिली, तेव्हापासूनच तिचा एक भाग होण्याची इच्छा मनात घर करून होती. ४ वर्षांपूर्वी या इच्छेला मूर्त स्वरूप मिळालं.

सासर-पण-माहेर

लेखक Bhagwanta Wayal
Published on मंगळवार, 16/07/2013
आहे ग आई मी सुखी समाधानी नको आणू आता तु़झ्या डोळ्यांमध्ये पाणी पितॄतुल्य सासरे माझे मातृतुल्य सासू येतील ग कसे माझ्या डोळ्यांमध्ये आसूं प्रेमळ पती मला जपे फुलावाणी नको आणू आता तु़झ्या डोळ्यांमध्ये पाणी नणंद माझी बहिणीसारखी भावासम दीर आठवेल कसे आता मला ग माहेर जाऊबाईची ती तिंगी आहे फार गुणी नको आणू आता तु़झ्या डोळ्यांमध्ये पाणी बाहेरची कामे मला नाही ग सांगत स्वंयपाकपाणी करते मी घरात्ल्याघरात जीव लावतात मला सर्व मुलीवाणी नको आणू आता तु़झ्या डोळ्यांमध्ये पाणी नाही म्ह्टले तरी रोज आठवण येते तेंव्हा मात्र मन माझे कासाविस होते आठवत बसते तेंव्हा जुन्या आठवणी नको आणू आता तु़झ्या डोळ्यांमध्ये पाणी

माया ही पात्तळ-१"बेशर्त स्वीकृती"

Published on शनीवार, 13/07/2013
ढीश्श....क्लेमर!!! >>> आंम्हास तसे सर्व काही साधे सरळ रुचते,आणी पचतेही! वेळच आली तर,वेडे/वाकडेही पचवू कदाचित.,,, पण... सरळ होणारे पदार्थ मुद्दाम कोणी जड करून खावयास दिले,आणी वरून मी सांगतो तितके वेळाच चाव,आणी मी म्हणतो तसेच गिळ! असे म्हटले तर ते आमच्या लेखी(इथे लिहायच्या नव्हे! ;) ) गिळगिळीतच होइल. म्हणून आंम्हास "त्यानी" जे सुचविले,ते यांना बोधप्रद होवो,अशी "जड" प्रस्तावना करून ही जिल्बी तळायला-सोडत आहे.

दिंड्या, पताका..

लेखक यशोधरा
Published on शुक्रवार, 12/07/2013
आमच्याकडे पालखीचा काही खास नेम नाही, कोणतीही दिंडी येत नाही, पालखी, वारकरी, माळकरी कोणासाठीच आम्ही काही करत नाही. वेळ कोणाला हो? आम्ही लय बिझी माणसं बघा. मध्यमवर्गीय आम्ही. आमच्या नोकर्‍या, शिक्षणं, रोजच्या आयुष्यातले लहान मोठे प्रश्न.. काय कमी व्याप आहेत आमच्या मागे? ते सोडवायलाच आयुष्य पुरत नाही हो आम्हांला, कुठे पालखीच्या फंदात पडतोय ! आम्ही भले, आमची टिचभर वितीची आयुष्यं भली, त्यातले प्रश्न भले आणि उत्तरं, आणखीनच भले, भले! असो, असो. खरं सांगायचं तर ही पालखीच आम्हांला सोडत नाही बघा! काय सांगायचं... अगदी लहानपणापासून हो.

चारधामच्या निमित्ताने

लेखक तिमा
Published on रवीवार, 23/06/2013
चारधाम यात्रा करावी का नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. सध्या भयानक आपत्तीमुळे चारधाम, विशेषतः केदारनाथ गाजते आहे. पण या लेखाचा विषय तो नाही. मी जेंव्हा चारधामांना भेट दिली त्याचे सचित्र प्रवासवर्णन करण्याचाही या लेखाचा हेतू नाही. तर एकंदरीतच, जे अनुभव आले त्यातून आपल्याला काही बोध घेता येतो का, याविषयी हा लेख आहे. चारधामला मी जाणार, हे कळल्याबरोबर माझ्या समविचारी मित्रांनी थट्टा केली. 'अरे,तू इथे कधी कुठल्या देवळात जात नाहीस, कुठल्याही दिवशी तुझा उपास नसतो, ३६५ दिवस तू सामिष आहार करु शकतोस, तर तिथे जाऊन काय करणार आहेस?' अशा प्रकारच्या कॉमेंटस ऐकल्या.

(जंगलातला) आजोबा !!

Published on रवीवार, 16/06/2013
'सुजय डहाके' हा एक मराठी चित्रपटसृष्टीतला प्रयोगशील दिर्दर्शक ! सुरवातीचा चा पिच्चर 'शाळा' काढून त्याने सगळ्यांना 'इचीभना' म्हणायला लावला. त्याचा नवीन येणारा चित्रपट म्हणजे 'आजोबा'! आजोबा नावाच्या एका बिबट्याची गोष्ट त्याने सुंदर चित्रबद्धीत केली आहे. आजोबाला बघा आणि अनुभवा ! 'आजोबा' हे कसले बिबट्याचे नाव..पण हाच बिबट्या वाघ महाराष्ट्राच्या जंगलचा राजा होता. जसा राजा आपल्या प्रजेपासून अंतर ठेवून राहतो तसा तो ऐटीत जंगलात राज्य करायचा पण नंतर हीच प्रजा मारुतीच्या शेपटी सारखी वाढत गेली आणि राजाचे राज्य कमी होऊ लागले.