Skip to main content

संस्कृती

नवे व्यवसाय

Published on गुरुवार, 14/11/2013 प्रकाशित मुखपृष्ठ
शेठ वालचंद हिराचंद ह्यांच्या वडिलोपार्जित बिडी व्यवसायातून, ते वडिलांशी भांडून, निर्धाराने बाहेर पडले आणि साखर उद्योगाची पायाभरणी केली. का? तर समाजविघातक व्यवसायांनी स्वतःचे पोट भरणे त्यांना मंजूर नव्हते. साखरेचा व्यवसाय, त्याकाळी त्यांना समाजोद्धारक वाटला होता. आज; साखर, मीठ, तेल, तूप इत्यादी संहत पदार्थांचा आरोग्यरक्षणातील अपूर्व अडथळा पाहता; साखर व्यवसाय समाजास कितपत हितकर आहे, ह्याविषयीच प्रश्नचिन्ह उभे राहिलेले आहे.

याद्या 5858

मालिका परीक्षण: स्टार प्लसवरचे महाभारत !! ( दर्जा: * * * * )

Published on शनीवार, 09/11/2013 प्रकाशित मुखपृष्ठ
मालिकेचे नाव : महाभारत निर्माते : स्वस्तिक पिक्चर्स वाहिनी : स्टार प्लस (भाषा : हिंदी ) वेळ : सोम शुक्र रात्री 8:30 pm वाहिनी : स्टार प्रवाह (भाषा : मराठी - डब) वेळ : सोम शुक्र संध्या ६:30 pm मालिकेचा दर्जा : उत्तम ( * * * * ) संगीत दर्जा : उत्तम ( * * * * ) पुनर्प्रसारणाबद्दल : सोमवार ते शुक्रवार रात्री 8:30 pm आणि पुनर्प्रसारण दुसऱ्या दिवशी सकाळी 8:00 am. तसेच शनिवारी आठवड्याभराचे एपिसोड संक्षिप्त स्वरूपात सकाळी 8 to 9 am या वेळेत आणि शनिवारी संध्याकाळी 5 to 7:30 pm संपूर्ण आठवड्याभराचे एपिसोडस असतात.
लेखनप्रकार

याद्या 27888

कहे कबीरा (२)

Published on मंगळवार, 05/11/2013 प्रकाशित मुखपृष्ठ
कहे कबीरा (२) कबीराचे विचार कबीरपंथीयांची भारतातील संख्या काही लाखांत आहे. त्यांचे मठ अनेक ठिकाणी असून मठाधिपतींची संपत्ती, त्यांचा जनमानसावरील प्रभाव इ. प्रचंड आहेत. आज सहा सातशे वर्षे परंपरा असलेल्या या पंथाची विचारसरणी काय, त्याचा पाया कोणता त्याचा आज विचार करावयाचा आहे. कबीरानंतर त्याच्या चेल्यांनी बरेच फरक स्वीकारले असले तरी इथे आपण कबीराचाच विचार करणार आहोत.चार भागांत याची विभागणी केली आहे. (१) कबीराच्या काळातील भारतातील विशेषत: उ. भारतातील समाजाची धारणा. याचा दबाव व्यक्तीवर पडतोच, कबीरावरही पडला. (२) संत रामानंदांचा कबीरावरचा प्रभाव (३) कबीराचे मत (४) कबीर व महाराष्ट्रातील संत.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 3373

हरवलेला विद्यर्थ

Published on सोमवार, 04/11/2013 प्रकाशित मुखपृष्ठ
आपण रोज किती व्यक्तींना भेटतो; नव्या, जुन्या, नको, हव्या, अनोळखी, ओळखीच्या. कितींशी बोलतो, हसतो, काही देतो, घेतो. या प्रत्येकाच्या मनावर आपला ठसा, आपली ओळख कोरली जाते ते आपल्या वागण्यातून. त्या व्यक्तीचं आपल्याबद्दलचं मत, त्याच्या मनात आपली प्रतिमा, आपल्याबद्दल त्याचे विचार वर आपल्याशी त्याचं पुढचं प्रत्येक वागणं; हे आपण त्याच्याशी कसे वागलो, वागतो, यावरून ठरत जातं. आणि हे सूत्र व्यक्ती, तिचा सामाजिक दर्जा, तिची आर्थिक पत, जात, कुळ, धर्म, या सगळ्या गोष्टींपासून अबाधित आहे. आम्ही एक दिवस ऑफिसच्या कॅंटीनमधे जेवायला बसलो होतो. ‘मामा प्लेट लाना’, बाजूच्या टेबल वरील एका व्यक्तीने ऑर्डर सोडली.
लेखनप्रकार

याद्या 1992

सांगा, कसे केलेत तुम्ही हे सर्व ? … आणि मिळवा एक चित्र.

Published on रवीवार, 03/11/2013 प्रकाशित मुखपृष्ठ
मंडळी, यंदाच्या मिपाच्या दिवाळी अंकातली एक कथा तुम्ही वाचली असेल, त्यातील कथानायक 'मदनकेतु' याच्यावर श्रीकृष्णाने एक महत्वाची जबाबदारी टाकली होती. ती म्हणजे नरकासुराच्या वधानंतर मुक्त केलेल्या सोळा हजार एकशे आठ स्त्रियांना प्राग्जोतिष्पुराहून द्वारकेपर्यंत सुखरूपपणे घेऊन जाणे. याबद्दल मदनकेतु म्हणतो: "... एवढ्या हजारो स्त्रियांना आणि त्यांच्या मुलांना घेऊन द्वारकेपर्यंतचे शेकडो योजने अंतर कसे पार करणार? एवढा मोठा जथा पायी चालून जाणार म्हणजे किती दिवस लागतील? वाटेत रानटी पशु किंवा रानटी लोकांच्या टोळ्या यांच्यापासून संरक्षण कसे करायचे ?

याद्या 21295

पहीली आंगोळ

Published on शनीवार, 02/11/2013 प्रकाशित मुखपृष्ठ
आज दीवाळी. दीपावली म्हणल की स्रवात आदी लक्षात येते ती पहीली आंगोळ. काय थाट आसतो तीचा, बगा ना इतर वेळी आंगोळ करण्यात आणी दीवाळींच्या पहील्या आंगोळीत कीतीफरक असतो. इतर वेळी लोक करतात म्हणुन आपल आंगोळ करायची, साला तोच रेगुलर साबण घासघास घासायच पाणी ओतायच की झाली आंगोळ. पण दीवाळींची पहीली आंगोळ म्हणजे... सारवलेल आंगण, त्यात रांगोळी वर पाट ठेवलेल असत. पहाटेच मस्त वातावरण, आंगाळा सुहासीक ऊटण लावल जात. खास दीवाळी साठीच नवीन साबन काडलेला आसतो, मग तेे लाउन आंगोळ करायची, त्या नंतर आई कींव्हा बहीण ओवाळते तो क्षण सारच तअत सोहला आसतो.त्यानंतर देवा पुढे नमस्कार करुन फराळांवर ताव मारणे सार काही अद्भुत.
लेखनविषय:

याद्या 4439

दिवाळीचे विष्णूपूजन !

Published on शुक्रवार, 01/11/2013 प्रकाशित मुखपृष्ठ
आली दिवाळी ! आपण नेहेमीप्रमाणेच लक्ष्मीपूजन करणार. तसेही आपण एरवी लक्ष्मीचीच पूजा-अर्चना करत असतोच. लहानपणापासून ह्या ना त्या स्वरूपात आपलं लक्ष्मीपूजन सुरूच असतं. बालपणी आपण परीक्षेतल्या मार्क्सरूपी लक्ष्मीच्या मागे धावतो. मग चांगल्या कॉलेजच्या, मग नोकरी, प्रमोशन, चांगला जोडीदार, चारचाकी गाडी, ३ बीएचके फ्लॅट, मुलांसाठी प्रतिष्ठित शाळा, सेकंड होम... ही यादी न संपणारीच असते. पण म्हणतात ना... लक्ष्मी चंचल असते. तिच्या मागे लागणार्‍याच्या हातात ती कधीच सापडत नाही. मग लक्ष्मी असते कुठे? लक्ष्मी असते भगवान विष्णूच्या चरणांशी.

याद्या 8920

आली दिवाळी

Published on बुधवार, 30/10/2013 प्रकाशित मुखपृष्ठ
माझे बालपण एका गावात बागडण्यात गेले. गावात तसे सगळेच सण पूर्वी उत्साहाचे वाटायचे. त्यात दिवाळी म्हणजे सगळ्यात मोठा सण इतका मोठा की पूर्वी दिवाळीच्या स्वागताला प्रत्येक घर जवळजवळ महिनाभर आधी पासून तरी सज्ज असायचं. त्यातून गावातील घरांच्या दिवाळीसाठी शहराच्या तुलनेने जास्तच तयारी असायची. घराची रंगरंगोटी डागडूगी करून रंगरंगोटी करायची. घरासमोर अंगण असायचं. ते अंगण कुदळीने उखळायचे. पाणी शिंपडून चोपणीने चोपायचे. येणारे बारीक-सारीक दगडही काढून टाकायचे. अंगणाची पातळी एकसमान करावी लागत असे.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 5340

मंतरलेले ते दिवस आता फिरून परत येतील का ?

Published on बुधवार, 30/10/2013 प्रकाशित मुखपृष्ठ
दूरचित्रवाणीवर मोती साबणाची जाहिरात पाहीली ? तीच ती "उठा उठा दिवाळी आली मोती साबणाची वेळ झाली… " म्हणत पळणाऱ्या मुलाची ! किती छान ना ? जाहिरात फक्त १५ ते २० सेकंदाची मात्र संस्कृतीची आठवण देणारी… आजची दिवाळी बदललेची जाणीव करून देणारी ! किती छान वाटतं नाही सोनेरी इतिहासात पहाण्याला ? आता ते दिवस नाही म्हणून दुःख व्यक्त करत रडत नाही कारण आताचे आधुनिकतेने नटलेले, विज्ञानाचा साज चढवलेले हे दिवस ही वाईट नाहीत मात्र या दिवसांचे एकेक क्षण पकडताना होणारी दमछाक आणि येणारा थकवा मनाला आनंद देण्याकामी एकदम तोकडा पडतो.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 2997

देवी शारदेचे स्वरूप

Published on शनीवार, 12/10/2013 प्रकाशित मुखपृष्ठ
गणेशोत्सवाची धामधूम संपली. आता नवरात्रीची सुरु झाली. नवरात्रीचा संदर्भ प्रभू रामचंद्राच्या चरित्रातील रावणवध व लंकाविजयाशी जोडला जातो, पण तो प्रामुख्याने जोडला जातो तो देवीमहात्म्याशी. ब्रह्मा-विष्णू-महेश या तीन देवांप्रमाणे दुर्गा-लक्ष्मी-सरस्वती या तीन देवतांकडे आपल्या जीवनातील महत्त्वाच्या क्षेत्रांचे कारकत्व जोडले गेले आहे. देवी दुर्गेची उमा, सती, पार्वती, काली, चंडी अशी अनेक रूपे, त्या त्या वेळी तिने केलेले मोठया, बलाढय राक्षसांचे निर्दालन किंवा घोर कठोर तपश्चर्या यांच्या कित्येक कथा-पुराणांतून वर्णन केल्या आहेत.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 7641