पहिलं पाऊल
क्षणात क्षण विरत गेला
काळ ही पुढे चालत गेला
अबाल राहिलो आजही तसेच
कर्तव्य ना दिसले कुठेच
उद्या करीन म्हणता म्हणता
उद्या कधी आलाच नाही
दाभोळकर, कुलबूर्गी गेले
तरी आम्हाला जाण नाही
हो, मस्त चाललंय आमचं
पण पोट मात्र भरत नाही
शोधून शोधून थकलो, पण
समाधान कुठे मिळत नाही
इराक, सिरीया साक्ष आहे
भविष्य फार स्पष्ट आहे
सावरा लवकर स्वतःला
ऐका तळमळीच्या साद ला
कुठून येतात कन्हैया, उमर
पुरे आता यांचा कहर
का नाही पुरस्कारांचा मान
हेच का सामाजिक भान
बदललं पाहिजे वाटतं
बलिदान, निस्वार्थ जाचतं
शक्य आहे तुम्हा आम्हालाच
फक्त पहिलं पाऊल लागतं.....
लेखनविषय:
याद्या
942
मिसळपाव