Skip to main content

समाज

(शीर्षक सुचले नाही )

लेखक कवि मानव यांनी गुरुवार, 03/11/2016 16:24 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या फाटक्या दारिद्र्याला ठिगळ लावीत होतो, ज्यांनी मज बहिष्क्रीत केले, त्यांची थोरवी गाजवत होतो !! त्यांनी माझ्या प्रेमाची बहुत लावली बोली, मी निस्सीम जगाचा प्रियकर, फुकटच वाटत होतो !! इथे प्रत्येकेचा हेतू, प्रत्येकाला अहंकाराने डसले आहे, पांढऱ्या पेशींच्या जगता मध्ये, तो रंग सोडवत सोडवीत होतो !! किती देऊ परीक्षा खरा असण्याची, दर वेळी पराभूत होतो, मी या अजब दुनियेचा विद्यार्थी, कधी ना मोठा होतो !!
काव्यरस

सॉल्विंग द मॅन-कोलोन जिगसॉ : उर्फ एनिमाचे भांडे

लेखक चित्रगुप्त यांनी मंगळवार, 01/11/2016 20:14 या दिवशी प्रकाशित केले.
. डॉ जुलाबचंद एनिमावाला एनिमालॉजिस्ट आहेत. त्यांनी अन्न -विष्ठा संबधांच्या केलेल्या पन्नास वर्षांच्या अभ्यासातून काढलेले निष्कर्श उपलब्ध असल्यास एकाद्या पिडीएफमधे वाचता येतील. त्यात अन्न -विष्ठा संबंधांचे आणि शरीररचनेचे अत्यंत बेसिक विवेचन असल्यामुळे त्यातले उतारे इथे सरळ प्रकाशित करता येत नाहीत. त्यांनी त्यावर शोधलेला उपाय (एनिमाचे भांडे ) इंटरनेटवर इतरत्र ऑनलाईन आणि कमी किंमतीत उपलब्ध आहे.

{मोस्ट एलिजिबल संपादक...२०१७ }

लेखक अभ्या.. यांनी मंगळवार, 01/11/2016 13:00 या दिवशी प्रकाशित केले.
पेर्णा "याड लागलं, याड लागलं" अशा फॉरिन ऑर्केस्ट्रासहीत मोबाइलची रिंग वाजली. नंबर कोणाचा असावा असा विचार करीत असतानाच लक्षात आलं, सुरवातीला‘०७१५२’ आणि शेवटी डबल झीरो… अरे हा तर वर्ध्यावरुन आलेला, म्हणजे विदर्भातील दिसतोय. सोन्याबापू तर आला नाही ना सुट्टीवर? का कुणा विदर्भवासीवर अन्याव झाला आता? ‘हॅलो…’ आता कुणा टिपिकल वर्‍हाडी हेल कानावर पडणार म्हणून आनंद झाला. ‘हॅलो, आभ्या बोलून राह्यला का बे?’ – नावाची एवढी वाट लावली म्हणजे रिलेटिव्हपैकी कोणीच नाही.

प्रो.के एस कृष्णमुर्ती

लेखक उपयोजक यांनी मंगळवार, 01/11/2016 07:17 या दिवशी प्रकाशित केले.
ज्योतिषशास्त्र हा ज्यांचा आवडीचा विषय आहे त्यांना, कृष्णमुर्ती ही ज्योतिषपध्दती नक्कीच परिचयाची किंवा निदान ऐकून तरी नक्की माहिती असेल. कोण होते हे कृष्णमुर्ती? काय योगदान होतं त्यांचं ज्योतिषशास्त्रात? या कृष्णमुर्ती पध्दतीचे जनक प्रोफेसर के.एस.

कोल्हापूरकर आहेत का कुणी?

लेखक मुक्त विहारि यांनी सोमवार, 31/10/2016 22:07 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय मिपाकरांनो, मिरचीच्या लागवडीच्या निमित्ताने, येत्या २-३ दिवसांत, कोल्हापूरला जाण्याचा विचार आहे. ह्या वेळी आमची सौ. पण आमच्या बरोबर असेलच. ह्या निमित्ताने कोल्हापूरकरांना भेटता येईल म्हणून हा धागा प्रपंच. कळावे, लोभ आहेच, तो वाढेल ही खात्री पण आहे. आपलाच, मुवि.

दिवाळी अंक २०१६

लेखक यशोधरा यांनी शुक्रवार, 28/10/2016 21:57 या दिवशी प्रकाशित केले.
फटाके, फराळ, रांगोळ्या, आका़शकंदील, गोडधोड इत्यादिंबरोबरच मराठी घरांमधून दिवाळीचा अजून एक अविभाज्य भाग म्हणजे दिवाळी अंक. कमीत कमी ३-४ दिवाळी अंक घरात आल्याशिवाय दिवाळी पूर्णपणे साजरी झाल्यासारखी वाटत नाही! परदेशात राहणारी मराठी मंडळीही ह्याला अपवाद नाहीत. आता तर नेहमीच्या पारंपारिक दिवाळी अंकांसोबत ऑनलाईन दिवाळी अंकही निघत आहेत. वेगवेगळ्या मराठी संस्थळेही दिवाळी अंक काढतात. उद्या पहाटे ५ (भाप्रवे बहुधा) नंतर मिपाचा दिवाळी अंकही दणक्यात प्रकाशित होईल आणि तो वाचायचीही उत्सुकता आहे. इथे तुम्ही वाचलेल्या दिवाळी अंकांबद्दल, त्यातींल आवडलेल्या साहित्याबद्दल लिहा, ही विनंती.

शेती कामासाठी मजूर हवे आहेत....

लेखक मुक्त विहारि यांनी शुक्रवार, 28/10/2016 11:44 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय मिपाकरांनो, होणार, होणार म्हणता-म्हणता आम्ही शेतकरी झालो. पण सध्या आम्हाला शेती कामासाठी मजूर हवे आहेत. सध्या आम्ही मिरचीची लागवड करत असल्याने आणि येत्या पावसाळ्यापासून वृक्ष लागवड (आवळा, रिठा , शेवगा इ.) करणार असल्याने. ज्यांना ह्या शेतीविषयी ज्ञान असेल त्यांना प्राधान्य. १. वेळच्या वेळी पगार दिल्या जाईल. २. राहण्याची सोय केल्या जाईल. ३. २-३ गुंठे जागा त्यांच्या भाजी-पाल्यासाठी दिल्या जाईल. ४. दरवर्षी एका महिन्याच्या पगारा इतपत बोनस दिल्या जाईल. ५. मुलांच्या दहावी पर्यंतच्या शिक्षणाची सोय जिल्हा परीषदेच्या शाळेत केल्या जाईल. ६. २-३ पिढ्या पुरतील इतपत काम आहे.

शिक्रेट (शतशब्दकथा)

लेखक खेडूत यांनी गुरुवार, 27/10/2016 18:05 या दिवशी प्रकाशित केले.
म्हराटी शाळंची घंटी वाजली. . . . मजी येक वाजला! लगी म्या भांडं घिउन काकुंच्या घरला जाते. ''काकू जरा मुरवण देता का?'' ''बस बाळा दोन मिन्ट, होतंय.'' काकू. मलाबी बरं वाटतं जरा- रेडिवो आयकायला भेटतो. लई छान मराठी गाणी लावत्यात काकू. काकू चांगल्या हायत. रोज मुर्वान मागितलं तरी नाय म्हणीत नैत. पन तेंची तायडी?. ती घरात नसल्यालीच बरी. नायतर मग चवकशा सुरूच- ''सुमी रोज कशाला येती?'' ''आन मुरवान यवड्या मोट्ट्या भांड्यात कशाला?'' उरलं तर काकू कालवनच देत्यात. मग काय दिपवाळीच! मुरवान मिळलं तर चटनी टाकून म्या, पिंटी आन नकुशी- भाकरीला खातो- दिवस निगतो.

'संघ' टन - एक प्रवास

लेखक नर्मदेतला गोटा यांनी गुरुवार, 27/10/2016 14:04 या दिवशी प्रकाशित केले.
मनुष्य संघटना का स्थापन करतो याचे कारण साधे आहे. त्याला त्याच्या किंवा आपल्या समाजाच्या कमकुवतपणाची जाणीव होते म्हणून. चार लोक जोडल्यानंतर एक शक्ती निर्माण होइल अशी त्याची अपेक्षा असते. हे संघटन समाज लगेच स्वीकारेल अशी स्थिती नसते. त्याला स्वतःसाठी लोकांच्या हृदयात जागा निर्माण करावी लागते. प्रसंगी इतरांना "थोडे सरकून घ्या" असे सांगावे लागते. तरच जागा निर्माण होते. सुरुवातीच्या काळातली आव्हाने वेगळी आणि नंतरच्या काळातली आव्हाने वेगळी असतात. सुरुवातीला संघर्ष इतरांबरोबर असतो. प्रतिकूलतेबरोबर असतो. निधी आणि साधनांचा अभाव असतो.

शेतकरी राया..

लेखक सोहम कामत यांनी शुक्रवार, 21/10/2016 19:38 या दिवशी प्रकाशित केले.
शेतकरी राया... अपुला शेतकरी राया, शेती प्रेमाची करतो.. अवघ्या भुकेल्या जनांची, ओंजळ प्रितीने भरतो.. अपुला शेतकरी राया, नांगर ओढतो जोमानं.. पिक हलते डुलते, शेती खुलते प्रेमानं.. अपुला शेतकरी राया, धनधान्य खुलवितो.. सार्या जगाचा तो बाप, जगी प्रेम फुलवितो.. अपुला शेतकरी राया, कर्जाखालीच राबतो.. पर्जन्याच्या वाटेवर, तोच एकला थांबतो.. अपुला शेतकरी राया, रोज जगतो मरतो.. जगा धान्य पुरवूनी, पोटी भाकरी भरतो.. अपुला शेतकरी राया, संसाराचे सोने करतो.. जगा सुखी करवूनी, स्वत: गरिबीमधे झुरतो.. अपुला शेतकरी राया, शेवटी आत्महत्या करी.. जगा फुलवूनी सार्या, दैवत्वाचा रस्ता धरी.. प्रिय शेतकरी राया, आत्महत