Skip to main content

समाज

ग्राम"पंचायत" लागली..!! - 10

लेखक विशुमित यांनी शनिवार, 27/01/2018 17:33 या दिवशी प्रकाशित केले.
https://www.misalpav.com/node/41800 मन्या चिंगाट घराकडे सुटला. काही तासच उरले होते. त्याची अस्मिता सकाळी सकाळी पदवीची शेवटच्या वर्षाच्या परीक्षेची तयारी करण्यासाठी तिच्या माहेराला जाणार होती. ती परत दीड महिन्यांनीच येणार होती. मोठा ग्याप पडणार होता. पदवीचा विषय आहे भूगोल. भूगोलसाठी दीड महिना? मी तर आयुष्यात (म्हणजे शाळेत, १० वी पर्यंत) २ तासाच्या वर कधीच अभ्यास केला नाही भोगल्याचा. मला हर्षा भोगले आवडायचा पण भूगोल... ह्या. ती भूगोल घेऊन पुढे काय करणार आहे तो मन्याचं जाणे.

मोनालिसाच्या गूढ स्मिताची विलक्षण रहस्यकथा (भाग २)

लेखक चित्रगुप्त यांनी शुक्रवार, 26/01/2018 16:06 या दिवशी प्रकाशित केले.
यापूर्वीचे कथानक (मोनालिसाच्या गूढ स्मिताची विलक्षण रहस्यकथा भाग १): https://www.misalpav.com/node/41194 पॅरिस मध्ये ‘मोनालिसा’ चे चित्र बघताना मला ती तिथून सोडवण्याची विनंती करत असल्याचा भास झाला.

गीताई माऊली माझी...

लेखक विकास यांनी सोमवार, 22/01/2018 01:20 या दिवशी प्रकाशित केले.
​आचार्य विनोबा भाव्यांनी त्यांच्या आईला गीता ऐकण्याची इच्छा होती पण संस्कृत येत नव्हते म्हणुन, श्रीमद्भगवद्गीतेचे "गीताई"च्या रुपाने मराठीकरण केले. ते करताना, मूळ श्लोक आणि त्यांचे छंद वगैरे जसेच्या तसे ठेवण्याचा त्यांनी यशस्वी प्रयत्न केला.

प्रवास

लेखक शिव कन्या यांनी शुक्रवार, 19/01/2018 07:48 या दिवशी प्रकाशित केले.
प्रवास तो म्हणाला, ‘मोना, प्लान चेंज! अब हम रेलसे नहीं, driving करके जायेंगे!’ त्याने गाडी बाहेर काढली, तेव्हा ती तिच्या कोषातून बाहेर पडली . गाडी शहरातील धूळधूर अंगावर घेत, गर्दीतून वाट काढू लागली. गाडी शहराबाहेर आली, त्याला तरतरीत वाटू लागले.....

आठवणीतला घरचा मेवा -२

लेखक जेडी यांनी शुक्रवार, 19/01/2018 00:43 या दिवशी प्रकाशित केले.
आठवणीतला घरचा मेवा -१ पावसाळ्यातल्या पदार्थ तसे फारसे नसत पण आषाढ लागला कि आषाढ तळणे हे एक काम असे . त्यात मग मुख्यतः तिखट आणि तळणाचे पदार्थ असत . चकली, खाऱ्या शंकरपाळ्या, तिखटाच्या पुऱ्या असे ते पदार्थ असत . आमच्या कोल्हापुरी भागात कर्नाटकी बेंदूर असतो तर तोही असाच जून जुलै महिन्यात येतो तर त्यासाठी खडूगळी (कडबोळी ) केली जात . बोली भाषेत खडूगळीच म्हणतात . हे म्हणजे तेच बेंदराला मातीच्या बैलांच्या शिंगात गोल जे वळे घातलेले असत तेच . त्यात हरबरा डाळीचे पीठ, कणिक आणि गूळ असे भिजवून त्याची गोल गोल वळी बनवायची आणि नंतर तळायची .

कुणी घरटं देतं का घरटं !

लेखक शब्दानुज यांनी गुरुवार, 18/01/2018 23:02 या दिवशी प्रकाशित केले.
(लेखातील माहिती जालावरून संकलित केलेली आहे.) आपले लहानपण 'एक घास चिऊचा , एक घास काऊचा' असे ऐकण्यात गेले. 'चिऊताई चिऊताई दार उघड असे विनवणारा कावळा आणि त्याला न जुमानणारी चिमणीही असायची. माणसाला हा नखरेलपणा बहुधा आवडला नसावा. अक्षरक्षः रस्त्यावर आणले हो त्याने दोघांना. कावळ्यालाही पिंडापुरते ठेवून त्याचाच पराचा कावळ केला. आज ते दोघे 'कुणी घरटं देतं का घरट' असा चिवचिवाट करत असतील असं उगीचच वाटत राहत. पण मला खात्री आहे की पक्ष्यांची ही भाषा माणसाला कधी कळणारच नाही.

ग्राम"पंचायत" लागली..!! - 9

लेखक विशुमित यांनी शनिवार, 13/01/2018 19:50 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.misalpav.com/node/41789 "माउली जय हरी ", विजूबापूनी कोपऱ्याला कोपरा जोडून लांबून नानांना हात जोडले. नानांनी पण ओठांपर्यंत हात उंचावत 'राजनीती' मधल्या मनोज बाजपेयी सारखा प्रति-नमस्कार केला. आज प्रचाराचा शेवटचा दिवस होता आणि फायनल टच देण्याकरिता विरोधी गटाने कंबर कसली होती. संग्राम गट मात्र कमालीचा सुस्त झालेला दिसत होता. विजूबापू ग्रेट माणूस. विरोधी पक्षातला असला म्हणून काय झाले पण कर्तृत्वान व्यक्तिमत्व . घरातल्या एका खोलीत चालू केलेल्या पतपिढीचा आता वटवृक्ष झाला होता.

संस्कार आणि संस्कृती

लेखक GRavindra यांनी मंगळवार, 09/01/2018 12:35 या दिवशी प्रकाशित केले.
पर्वती पुण्यातील ऐतिहासिक वारसा असलेलं मध्यवर्ती ठिकाण. मी बऱ्याचदा सकाळी तिथे फिरायला जातो. त्यावेळी योगा करणारी, फिरणारी बरीचशी लोकं तिथं असतात. पण त्यादिवशी मी जरा उशिरा म्हणजे ९-१० च्या वेळेस गेलो. तर तिथे शाळकरी गणवेशातली काही मुलं मुली अगदी प्रेमीयुगलांसारखी बिनधास्त बसली होती. त्यांच्याकडं बघून प्रश्न पडला ह्या वयातल्या मुलांना प्रेम खरच कळतं ? ते समाजातील वास्तव अंतर्मुख करायला लावणार होत. पण आजकालच जर एकंदरीत वातावरण बघितलं तर मोबाईल आणि इंटरनेट चा वाढता वापर आणि ज्या थाटणीचे चित्रपट येतायत हे सगळं प्रामुख्याने जबाबदार आहे.