Skip to main content

समाज

कोहम्

लेखक अबोलघेवडा यांनी सोमवार, 07/05/2018 00:39 या दिवशी प्रकाशित केले.
मी व्यक्तीशः या पृथ्वीवर का आलो? येऊन नक्की काय करायचा प्रयत्न करतोय? मी नसतो आलो इथे तर या पृथ्वीमध्ये म्हणा किंवा कोणाच्याही आयुष्यात म्हणा काय फरक पडला असता? जर आपण निमित्तमात्र आहोत आणि आपली दोरी त्या विधात्याच्या हातात आहे (आठवा तो आनंद सिनेमातला राजेश खन्ना चा प्रसिद्ध डायलॉग!) तर तुम नही तो कोई और सही असं म्हणून परमेश्वराने दुसऱ्या कोणाकडून तरी कामे करवून घेतली असती. म्हणजे थोडक्यात मदाय्राने दोरीने बांधलेल्या माकडासारखी माझी अवस्था आहे तर. असे काही बाही विचार हल्ली माझ्या डोक्यात येत असतात.

कर्मण्येवाधिकारस्ते...

लेखक अबोलघेवडा यांनी रविवार, 06/05/2018 18:31 या दिवशी प्रकाशित केले.
गेली कित्येक वर्ष भगवंतांनी सांगितलेल्या या वाक्याचा अर्थ लावतोय... हो बरोबरच वाचलत. कित्येक वर्ष.... अहो, भगवद्गीता ही गोष्टच अशी आहे की जितके वेळा ती वाचू तितके वेळा वेगवेगळे अर्थ लक्षात यायला लागतात. जितक्या प्रमाणात कर्म करू तितक्या प्रमाणात फळ मिळालं पाहिजे ही अपेक्षा ठेवण्यात काय चुकलं माझं असं माझं मन मला सारखं विचारायचं. या श्लोकात ४ गोष्टी श्रीकृष्णांनी सांगितल्या आहेत. १) फक्त कर्म करण्याचा तुला अधिकार आहे २) कर्माच्या फळांवर तुझा अधिकार नाही. ३) मिळालेल्या फळाला तू कारणीभूत आहेस असे समजू नकोस.

बातमी!

लेखक दिनेश५७ यांनी रविवार, 06/05/2018 10:30 या दिवशी प्रकाशित केले.
मागे एका साहित्यिक चळवळीतील सदगृहस्थांनी गप्पा कट्टा नावाचा उपक्रम सुरू केला. सुरुवातीला त्याच्या सर्व बातम्या आम्ही सातत्याने देत होतो. एकदा मात्र, एक बातमी लागली नाही. तो अक्षरश: तणतणत आला, आणि भरपूर ज्ञान शिकवू लागला. तुम्ही फालतू बातम्यांना जागा देता, आणि साहित्यिक चळवळीतील या वेगळ्या उपक्रमासाठी तुमच्याकडे जागा नसते वगैरे बोलू लागला, म्हणून मी त्याला, एखादी फालतू बातमी दाखव असे म्हणाल्यावर त्याने पिशवीतून त्याच दिवशीचा अंक काढला व एका बातमीवर बोट आपटू लागला. मी बातमी पाहिली.

योग प्रसारासाठी सायकल यात्रा- परभणी- जालना- औरंगाबाद- बुलढाणा जिल्ह्यामध्ये ६०० किमी सायकलिंग

लेखक मार्गी यांनी रविवार, 06/05/2018 04:18 या दिवशी प्रकाशित केले.
सर्वांना नमस्कार! एक नवीन सोलो सायकल मोहीम करणार आहे. त्यासंदर्भात आपल्याशी बोलेन. गेल्या वर्षी सातारा परिसरात योग- ध्यान हा विषय घेऊन एक छोटी मोहीम केली होती. ह्यावेळी सुद्धा 'योग प्रसारासाठी सायकल यात्रा' अशी एक मोहीम करतो आहे. मध्य महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यामध्ये कार्यरत 'निरामय योग प्रसार व संशोधन संस्था' व त्या संस्थेच्या विस्तारलेल्या कार्यासंदर्भात हा प्रवास असेल. परभणी, जालना, औरंगाबाद व बुलढाणा जिल्ह्यांमध्ये काम करणारे योग कार्यकर्ते व योग शिक्षक ह्यांना ह्या प्रवासात भेटेन. परभणीमध्ये गेल्या चार दशकांपासून निरामय संस्था काम करते आहे.

अंतर्मुख!

लेखक दिनेश५७ यांनी शुक्रवार, 04/05/2018 09:40 या दिवशी प्रकाशित केले.
अंधेरी स्टेशनच्या तीन नंबर फलाटावर तीस सेकंद थांबून गाडी पुढे सरकली, आणि दरवाजाशी उभ्या असलेल्या त्या दोघांच्या नजरा सरसावल्या. पलीकडच्या, चार नंबर फलाटावरचं काहीतरी शोधू लागल्या. गाडी जोगेश्वरीच्या दिशेने निघाली. समोरचा फलाट संपला आणि दोघांचे डोळे चमकले. त्यांनी एकमेकांकडे पाहून खुशी व्यक्त केली. म्हणून माझेही लक्ष त्या फलाटाकडे, त्या जागेवर खिळले. फलाटावर टोकाला असलेल्या एका बांधकामाच्या भिंतीवर एक चित्र होते... अगदी साधे. बंदूक हातात धरलेल्या युद्धसज्ज जवानाचे! त्यावर एक वाक्य होते- ‘एक जिम्मेवार नागरिक बनो ताकि हम आपके लिये गर्वसे लड सकें!’ ...

लाल करा ओ माझी लाल करा

लेखक खिलजि यांनी गुरुवार, 03/05/2018 13:48 या दिवशी प्रकाशित केले.
लाल करा ओ , माझी लाल करा येता जाता लाल करा पुसा मला तुम्ही येता जाता पुसूनि पुरते हाल करा , लाल करा ओ लाल करा येता जाता लाल करा भजा मज तुम्ही भाई दादा तुमचाच राहीन , हा पक्का वादा गॉड बोलुनी बेहाल करा लाल करा ओ माझी लाल करा येता जाता लाल करा समजू नका मज ऐरागैरा नीट बघून घ्या माझा चेहरा या गोंडस, लोभस मित्रासाठी प्रेमाची पखाल करा लाल करा ओ माझी लाल करा येता जाता लाल करा नका कटू कधी बोलत जाऊ बनेन मग मी शंभू न शाहू च्छाताड पुढे , मग फुगतील बाहू कशाला स्वतःला हलाल करा लाल करा थोडी लाल करा ओ येता जाता लाल करा क्रोध द्वेष जरा लांब राहू दे प्रतिसादान

वाचकांचा पत्रव्यवहार अर्थात जनमानस

लेखक हेमंतकुमार यांनी गुरुवार, 03/05/2018 08:06 या दिवशी प्रकाशित केले.
आपण सर्वजण इथे वाचन आणि लेखन करण्यासाठी जमतो. अनेक विषयांवर चर्चा होतात, रंगतात, वादविवाद अन काथ्याकूटही होतो. या माध्यमाव्यतिरिक्तही आपण इतर वाचन करतो. रोजचे वृत्तपत्र वाचन हा आपल्या दिनक्रमाचा एक भाग असतो. त्यावरून एक नजर फिरवल्याशिवाय आपल्याला चैन पडत नाही. आज जरी इ-माध्यम प्रस्थापित झालेले असले तरी आपल्यातील बहुतेकांना एखादे तरी छापील वृत्तपत्र वाचायला आवडतेच. जेव्हा आपण ते चाळू लागतो तेव्हा त्याच्या पानांमध्ये आपल्याला विविध विषयांची विभागणी केलेली दिसते. मग आपल्या आवडीनुसार आपण हव्या त्या पानावर रेंगाळतो. संपादकीय पान हा वृत्तपत्राचा आत्मा असतो.

(साहेब असेच) ठोकत राहा

लेखक खिलजि यांनी बुधवार, 02/05/2018 13:20 या दिवशी प्रकाशित केले.
ठोकत राहा घडत जाईन बोलत राहा ऐकत जाईन येऊन दे मनातले बाहेर सारे कल्पनेला अनाहूत बळ मिळेल शब्दपंखानी उडत जाईन पोहोचेन सत्वर कवींच्या गावा सुंदर कविता लिहीत जाईन रांगतोय सध्यातरी असं वाटतेय हळूहळू तुमच्या जवळ येत जाईन प्रेमाने प्रेमाला जोडत जाईन ठोकत राहा असेच हळूहळू घडत जाईन शोधत राहा स्वतःमध्ये मला इथेच पुढे असेन तुमच्यासमोर जवळ येता जरा , दूर दूर जात राहीन बनायचंय थंडगार बर्फ़ावानी माया करा मजवर आपुल्या लेकरावानी कल्पनेच्या जगात रमतो मी गाठेन मना " उन्मनी " {{{ सिद्धेश्वर विलास पाटणकर }}}

भारतीय लोकशाही आणि जातजमातींच्या अस्तित्वाचा गुंता

लेखक मन यांनी मंगळवार, 01/05/2018 21:02 या दिवशी प्रकाशित केले.
काल वसंत व्याख्यानमालेत सुहास पळशिकरांच्या भाषणाला गेलो होतो. छोटेखानी भाषण होतं. तासभराचं असेल. विषयही घिसापिटा वाटेल असा होता. "जातजमातींच्या अस्तित्वाचा गुंता आणि भारतीय लोकशाही ". पण मला भाषण आवडलं. भाषणातला जो cosmetic भाग होता, तोसुद्धा आवडला. पळशीकरांचा आवाज, बोलण्याची लय, स्वच्छ,स्पष्ट शब्दोच्चार आणि अचूक शब्द निवड. इंग्लिश पुस्तकांच्या तुलनेत मराठी पुस्तकांमध्ये खूपदा हा दोष आढळतो की त्यांची छपाई तितकीशी भारी नसते. कागद सुमार/सर्वसाधारण असतो. फॉण्टकडे नीट लक्ष दिलेलं नसतं. भाषणाच्या बाबतीत ह्याचे समांतर मुद्दे म्हणजे आवाज, शब्दोच्चार वगैरे.

सत्वर

लेखक शिव कन्या यांनी गुरुवार, 26/04/2018 18:04 या दिवशी प्रकाशित केले.
सत्वर ये तू निघोनी आता निबीड अरण्यी कंटक वाटा हे अंतर आता पाश म्हणू कि नाश जीवाचा करिल ऐसा तुझ्या रुपाचा तीर्थघटाचा जन्मजान्हवी, श्वास मिटावा नकोच आता वियोग असा कि दो तीरांचे वा हिमालयाचे बंध तोडूनी पाश टाकूनी माझे उरले संचित आता तुझ्या रुपाशी मिळून जावे जिथून आले हासत खेळत तिथेच माझे असणे नसणे... इतकेच होवो पुण्यसलीले, तुझ्या तटाशी भंजन व्हावे भस्मचिता अन् बंधमोक्षही उरू नये ते काही काही.... सत्वर ये तू निघोनी आता निबीड अरण्यी कंटक वाटा.... शिवकन्या