Skip to main content

समाज

वृद्धाश्रम

तृप्ति २३ यांनी या दिवशी प्रकाशित केले.
लेखनविषय:
वृद्धाश्रम आज एका आजीला मी वृद्धाश्रमात पाहिलं तीच्या डोळ्यातील दुःख मी जवळून अनुभवलं ती निराश होती हतबल होती दाराकडे नजर रोखून वाट बघत होती काय चुकलं तिचं की वृद्धाश्रमात तिला राहावं लागतंय सार काही मुलाला देऊन तिला मात्र अस जगावं लागतंय डोळ्यातले अश्रु ही तिचे काही वेळाने थांबून गेले पुण्य केलं की पाप हे तिला ही कळेनासे झाले म्हणुनच म्हणते की …….. नका रे मुलांनो वागु असे आई वडिलांपेक्षा श्रेष्ठ ह्या जगात कोणी नसे त्यांना फक्त एक हक्काचं घर द्या उर्वरित आयुष्य त्यांना आनंदाने घालवु द्या ….. Trupti Sameer Tilloo Vrud

" तेथे कर माझे जुळती ! ! "

जयन्त बा शिम्पि यांनी या दिवशी प्रकाशित केले.
लेखनविषय:
लेखनप्रकार
मित्रांनो, नुकतेच वर्तमानपत्रातून वाचनात आले की, सर्व माजी खासदार वा आमदार यांना तह-हयात पेन्शन कां म्हणून दिले जाते याचे स्पष्टीकरण न्यायालयाने, केन्द्र सरकारकडे मागितले आहे. आता यातील काही खासदार/आमदार वा पूर्वी कधीतरी मंत्री म्हणून काम केलेले,काहीजण सक्रिय राजकारणात असतील वा नसतीलही. पण असे कितीजण खरोखरच्या सामाजिक कार्यासाठी स्वतःला वाहून घेत असतील हा संशोधनाचा विषय असू शकतो. हा प्रश्न पडण्याचे कारण :- या संदर्भात नुकताच " TIME " ( २४ सप्टेंबर २०१८ चा ) या प्रसिध्द मासिकात आलेला एक लेख माझ्या वाचनात आला. अमेरिकेचे ३९ वे प्रेसिडेंट म्हणून ज्यांची निवड झाली होती, ते माननीय श्री.

मदत / माहिती हवी आहे: पुणे परिसरातील प्लॉट विक्री बद्दल

चित्रगुप्त यांनी या दिवशी प्रकाशित केले.
मदत / माहिती हवी आहे: पुणे परिसरातील प्लॉट विक्री बद्दल पुणे-नगर रोडवरील (राज्य महामार्ग क्र. २७) लोणीकंद भागात 'पुष्पानगरी' नामक कालोनीत माझा एक प्लॉट आहे (क्षेत्रफळ ३००० वर्गफूट, ५० गुणिले ६० फूट ). वाघोली पासून अंतर सहा किलोमीटर आहे. हा प्लॉट विकायची माझी इच्छा आहे. तरी याबाबतीत मार्गदर्शन हवे आहे.

डिजीटल डिजीटल

शिव कन्या यांनी या दिवशी प्रकाशित केले.
जी माणसे कुठल्याच डिजीटल प्रोफाईल मध्ये नसतात, त्यांचे जगणे कसे असेल, हा प्रश्न मला छळू लागला, आणि मला माझ्या डिजीटल विचारांची भिती वाटू लागली... जी माणसे ऑफलाईन असतात त्यांचे लाईफ कसे असेल या प्रश्नाने मला परेशान केले आणि मला माझ्या डिजीटल चिंतेची काळजी वाटू लागली... मग, या डिजीटल तुरुंगातून सुटका होण्याची वाट पाहताना मी विंडोजमध्ये डोकावून पाहते... तर, खऱ्या जगण्यातून सुटका म्हणून डिजीटल तुरुंगात येणारे लाखो, करोडो लोक समग्र पृथ्वीला वेढा घालून, प्रकाश डोळ्यांवर घेत 24/7 काल डिजीटल दोरीवर चालत असतात... मी ते डिजीटल जगाचे सत्यरूप पाहून हादरून जाते, आणि परत विंडोजमधून आत येऊन माझ्या

गणपती बाप्पा मोरया,थोडे व्रत समजून घेऊ या!

अत्रुप्त आत्मा यांनी या दिवशी प्रकाशित केले.
लेखनप्रकार
पार्थिवगणेश म्हणजे पृथ्वीपासून-मातीपासून केलेला गणपती. हा तात्त्विक अर्थाने त्यांनाच आवश्यक ठरेल जे पार्थिव गणेश(हे पुरुषांनि करावयाचे) व्रत करतील..जे फक्त दिड दिवसाचेच असते. सध्या घरोघरी ते गणपती मंडळात चालतो तो गणेशोत्सव! टिळकांनी त्याकाळची गरज म्हणून चालू केलेला! ती वर्तमानकाळचीही गरज असली तर असू दे . आमची तक्रार नाहीच.फक्त गणपती मातीचा असावा की नाही? ही चर्चा या तात्त्विकतेमुळे गैरलागू होऊन बसते, हे ध्यानात घ्यावे. म्हणजेच ज्याला जो हवा तो गणपती हवे तितके दिवस बसवू द्यावा. किती दिवस बसवावा ? असा विचार केला तर धर्मशास्त्रानुसार ते पार्थिवगणेश व्रत असल्याने त्याची मुदत दीड दिवसच आहे.

विक्रमादित्याची दिनचर्या

तिमा यांनी या दिवशी प्रकाशित केले.
लेखनविषय:
लेखनप्रकार
बरीच वर्षे, रसायन कंपन्यांच्या 'शोध आणि विस्तार' (कसला बोडक्याचा शोध! भारतांत तरी बहुतांशी विस्तारच) विभागात नोकरीची उमेदवारी केल्यावर, नोकरीच गेल्यामुळे, 'गोष्टी सांगेन युक्तीच्या चार', अर्थात कन्सल्टन्सी करायला लागलो. मूळचा स्वभाव भिडस्त असल्यामुळे, सुरवातीला अनेकांनी फसवलेच. पण तरीही नेटाने काम करत राहिलो. कामे बहुतेक लहान रासायनिक उद्योगातीलच असायची. त्यासाठी, लांबलांबच्या उद्योगसमूहात प्रवास करुन जावे लागे. अशा ठिकाणी, अनेक वेळा, काही वल्ली भेटत. अशाच एका व्यक्तिमत्वाची ही ओळख! यशाची धुंदी वगैरे, आपण कथा-कादंबऱ्या, नाटके, चित्रपट अशा माध्यमातून पहातो.

संडास.

खटपट्या यांनी या दिवशी प्रकाशित केले.
लेखनप्रकार
संडास नमस्कार मंडळी, बऱ्याच दिवसांनी मिपावर लेखन करतोय. आणि पुनरागमनासाठी विषय आहे संडास. काहीलोक लेखाचं नाव वाचूनच नाकं मुरडतील. मला एक कळत नाही संडास सारख्या जिव्हाळ्याच्या विषयावर बोलायला लोक लाजतात किंवा घाबरतात का? तसं पाहायला गेल्यास संडास ही आपल्या रोजच्या जीवनातील अतिशय महत्वाची क्रिया पण त्यावर किंवा संडासच्या समस्यांवर बोलायला लोक तयार नसतात. शी!!! संडास वर मेलं काय बोलायचं!!! एकवेळ माणूस दोन दिवस उपाशी राहील पण संडासला गेल्याशिवाय राहणार आहे का? अर्धा जीव होईल त्याचा. शौचाचा त्रास असणारे कितीतरी लोक मी चिडचिड करताना पहिले आहेत.

निघताना....

शिव कन्या यांनी या दिवशी प्रकाशित केले.
मी हळूहळू पण निश्चितपणे पार दिसेनाशी होईन तेव्हा तू चौकट ओलांड, आणि निघताना..... आपल्या हसल्याबोलल्या आवाजांची फूले घेऊन ये आपल्यातल्या गहिवरांचे कढ, न हिंदकळता आण मी न ओलांडलेली अंतरे तू सहजच पार करुन ये माझे न उच्चारलेले नाव चारचौघांत सरळच घे सगळे उठून जातील तेव्हा आपल्यातल्या शब्दांची आरास मांड त्यानंतर आपोआप दिवा लागेल तुझ्या डोळ्यांतले पाणी विझेल मग मी मुक्त होऊन रेषा होईन तुझ्या तळहातांवर खोल रुतेन.. तू हळूहळू पण निश्चितपणे पार दिसेनासा होऊन माझ्याजवळ पोहचेपर्यंत... Shivkanya

शतशब्द कथा: हडताल

विवेकपटाईत यांनी या दिवशी प्रकाशित केले.
लेखनविषय:
लेखनप्रकार
शर्माजी एका फैक्टरीत २० वर्षांपासून सुपरवायझर. "शर्माजी, मुलाला नौकरी पाहिजे असेल तर आमचा साथ द्यावा लागेल. उद्या हडताल" - नेताजी. फैक्टरीच्या बाहेर "जिंदाबाद मुर्दाबाद, नेताजी जिंदाबाद". पोलिसांनी शर्माजीसह ४०-५० कर्मचार्यांना बस मध्ये कोंबले. थोड्यादूर नेल्यावर सर्वांना सोडून हि दिले. आपण नेताजींना साथ दिला, उद्या मुलाला हि याच फैक्टरीत नेताजी निश्चित नौकरी लाऊन देतील. दुसर्या दिवशी सकाळी, फैक्टरीच्या गेटवर गार्डने एक लिफाफा शर्माजींचा हाती दिला. "फैक्टरीत तोडफोड, दंगा"....शर्माजी बरखास्त. "तोडफोड करणारे आमचे लोक नव्हतेच"- नेताजी.

सबका साथ सबका विकासाचे आद्य पुरुष - स्वर्गीय अटलजी

विवेकपटाईत यांनी या दिवशी प्रकाशित केले.
लेखनविषय:
लेखनप्रकार
मी भाग्यशाली होतो, १९९७ मध्ये प्रधानमंत्री कार्यालयात पोस्टिंग झाली. अटलजी प्रधानमंत्री झाले आणि कार्यालयात एक वेगळीच चेतना आली. कामाचा बोझा एकदम वाढलला. सरकारी दफ्तरात नूतन कल्पना साकारताना, भरपूर कागदी कार्य करावे लागतेच. सकाळी ९ ते रात्री ९ वाजायचे कधी कळायचे नाही. पण देशासाठी आपण काही ठोस कार्य करत आहोत या जाणीवेने त्या कामातहि आनंदच मिळत होता. सबका साथ, सबका विकास याचा अर्थ काय. स्व. अटलजींनी अनेक राजनीतिक दलांना आपल्या सोबत घेऊन सरकार चालवली म्हणजे विकास होतो. नाही. देशात विभिन्न राजनीतिक आणि धार्मिक समूहांना आरक्षण दिल्याने सर्वांचा विकास होतो. नाही.