मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पुलवामा CRPF जवानांवर झालेल्या हल्ल्याचा निमित्ताने....

सत्य धर्म · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
पुलवामा CRPF जवानांवर झालेल्या हल्ल्याचा निमित्ताने... काल 14 फेब्रुवारीला काश्मीर मध्ये पुलवामा येथे शहीद झालेल्या भारत मातेच्या सर्व वीर सुपुत्रांना त्रिवार सलाम. या हल्ल्याला येणाऱ्या काळात आपली तिने सैन्यदले कृतीतून योग्य उत्तर देतीलच हे सर्व चालू घडामोडी वरून सांगता येते. या हिंदुस्तानचा एक सजग आणि जबाबदार हिंदू नागरिक म्हणून माझ्या बौद्धिक कुवतीप्रमाणे या भ्याड हल्याचा अन्वयार्थ लावण्याचा एक छोटासा प्रयत्न करतोय यातून कोणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नाही जर कोणाला असे वाटत असेल तर त्यांनी या पुढे वाचू नका. आपल्या अखंड हिंदुस्थानावर परक्यांचे हल्ले होने ही तशी नवीन बाब नाही. हजारो वर्षांपासून आपल्या देशाने कित्येक आक्रमणे पाहिली आणि परतवूनसुद्धा लावली पण हे करत असताना आपल्या संपन्न आणि पवित्र भूमीचे कित्येक तुकडे पडले पाकिस्तान आणि बांगलादेश ही त्याची काही उदाहरणे आहेत. या हल्ल्यामागची विचारधार जाणून घ्यायचा प्रयत्न केला असता हजारो वर्षे पाठीमागे जाऊन इतिहासाची पाने चाळावी लागतील. मुस्लिम धर्माच्या स्थापनेपासूनच ही आक्रमणे आपल्यावर होत आहेत. इतिहासाचा खोलात संदर्भ न घेता फक्त उदाहरण सांगायचे झाले तर गझनीचा मेहमूद, मोहम्मद घोरी, अलाउद्दीन खिलजी,बाबर, औरंगजेब यांनी केलेले हल्ले सर्वश्रुत आहेत हे सर्व हल्ले आणि त्यामागची विचारधारा हि स्फटिकाप्रमाणे साफ आहे हे सर्व हल्ले हिंदुस्तानी लोकांची संपत्ती लुटण्यासाठी आणि धर्म थोपवण्यासाठी झालेले होते त्या त्या काळच्या राजकारण्यांचे यश किंवा अपयश म्हणा पण हे सर्व हल्लेखोर याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर यशस्वी झाले. आताचा पाकिस्तान आणि बांगलादेश ही त्याची निष्पत्ती म्हणावी लागेल. अपवाद फक्त शिवाजी महाराजांचा होता ज्यामुळे हिंदू, हिंदुस्थान आणि हिंदुत्व टिकले आणि तरले जर शिवाजी महाराज नसते तर सद्यस्थितीत हिंदुस्थानाचे चित्र काहीतरी वेगळेच असते थोड्या विषयांतराबद्दल माफी. सदर हल्ल्याचा अन्वयार्थ माझ्यामते तरी वरील विषयास अनुसरून होतो थोड समजवून घ्यायचे झाले तर ते पुढीलप्रमाणे होईल मुद्दा नंबर १ - मुस्लिमांना फक्त मुस्लिमांसाठी स्वतंत्र राष्ट्र हवे होते ते 1947 मध्ये दिले आताचा बांगलादेश (पूर्व पाकिस्तान) आणि पाकिस्तान हा त्यांना धर्मावर आधारित दिला त्यांनी तात्काळ धर्मावर आधारित देश अशी मान्यता बनवून हिंदूंचा मोठ्या प्रमाणावर नरसंहार घडवून आणला. अजून सुद्धा तिथे राहिलेली हिंदूंची मंदिरे तोडणे असले प्रकार चालू आहेत. याच गोष्टी शांतिदुताकडून जगभर चालु आहेत. यामागची विचारधारा काय असेल? मुद्दा नंबर २ - त्यांना हवी ती आर्थिक मदत त्या काळानुसार दिली गेली त्यानंतर पण त्यानि आपल्यासोबत युद्ध केलेच. हे सर्व फक्त आपली जमीन बळकावण्यासाठी नव्हते हे निश्चित. यामागची विचारधारा हा शोधाचा विषय होऊ शकतो. मुद्दा नंबर 3 - पाकिस्तान हे मुस्लिम राष्ट्र असल्यामुळे हिंदूंची मोठ्या प्रमाणात कत्तल आणि नरसंहार त्यांनी घडवून आणला प्रार्थनास्थळे नष्ट केली यामुळे आत्ता पाकिस्थान मध्ये हिंदू धर्मीय नगण्य राहिले आहेत आणि काही भारताच्या आश्रयाला येत आहेत. तिथं असणाऱ्या स्थानिक संघटनांना तिथे असणारे सरकार आणि ISI हे पाठिंबाच देत आले आहेत. यामधून त्याची विचारधारा स्पष्ट होते. मुद्दा नंबर ४ - हिंदुस्तान हे सर्वसमावेशक राष्ट्र असल्यामुळे आपल्या इथे आपण सर्व धर्माना सामावून घेतले परंतु काही लोकांचे लांगुलचालन केल्यामुळे देशसोबत गद्दारी करण्यापर्यंत त्यांची मजल गेली. याचाच नमुना आपण मागील काही वर्षात देशविरोधी घोषनांमधून पहिला आहे. काही राजकारणी लोक याना सपोर्ट करतात त्यामुळे आजची घटना घडण्यापर्यंत मजल गेली. मुद्दा नंबर ५ - राज्यघटनेनुसार प्रत्येकाला आपल्या धर्मानुसार वागण्याचा अधिकार आहे सर्व सोयी सवलती सुविधा या सर्वांना जवळपास सारखेच आहेत असे असताना फक्त मुस्लिमच टोकाचा कट्टरतावाद का जोपासतात हिंदुस्थानातील कित्येक मुस्लिम भारत भूमीला वंदन करणे तिरंग्याला वंदन करणे या गोष्टीला विरोध करतात काश्मिरी पंडितांना हुसकावून लावताना काय घडले हे पूर्ण हिंदुस्थानाला माहित आहे. हिंदू धर्मातील अनिष्ट रूढी परंपरा यांवर वेळोवेळी बदल करण्यात आला, विरोध झाला असला तरी कालांतराने सर्व समाजाने याला मान्यता दिली. मुस्लिम धर्मामध्ये मुस्लीम विचारवंत धर्म संशोधनासाठी प्रयत्न करताना दिसत नाहीत त्याचाच परिपाक म्हणून कुठल्याही संघटनेच्या नादी लागून आतंकवादी तयार होतात आणि हिंदुस्थानच्या सार्वभोमत्वाच्या विरुद्ध युद्ध पुकारण्यात धन्यता मानतात. मुद्दा नंबर ६ - हिंदू दहशतवादाबद्दल बोलले की अल्पसंख्याकांची मते मिळतात यासाठी हे राजकारणी मुस्लिम दहशतवादाकडे सोईस्कर डोळेझाक करतात. कालचा हल्ला हा याचाच परिपाक नसेल? मुस्लिम दहशतवादाकडे सोईस्कर डोळेझाक करतात. कालचा हल्ला हा याचाच परिपाक नसेल? मुस्लिम दहशतवाद जगासाठी सर्वश्रुत असताना यावर बोलताना कोणीही दिसत नाही याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले जाते. माझ्या मते तर हा हिंदुस्थानच्या सर्वभोमत्वावर झालेला हल्ला आहे. या हल्ल्यामध्ये असणारी विचारधारा ही सैन्याला मारण्याच्या पलीकडची आहे कदाचित त्यांना हिंदूंनाच मारायचं आणि हिंदुस्थान ताब्यात घ्यायचा आहे अस ही असू शकत म्हणून तर हे आतंकवादी मृत्यूनंतर जन्नत ची वाट पाहतात आणि मृत्यूला सामोरे जातात. याचा इतिहाससुद्धा खूप मोठा आहे आणि हिंदुस्थानला त्रास देने हा एकच हेतू यामागे असू शकत नाही, यामधून आपण इतिहासाची पार्श्वभूमी अभ्यासन्याची गरज आहे अन्यथा असे कितीतरी हल्ले या मातृभूमीवर होतच राहतील आणि निष्पाप हिंदूंचे आणि आपल्या सैन्याचे बळी जात राहतील. मुस्लिम विचारधारेचा उत्तरे देण्याचा प्रयत्न आपल्यातील विचारवंतांनी वेळोवेळी केला आहे परंतु त्यांचे विचार सर्वसामान्यापर्यंत पोहोचले नाहीत अशा हल्ल्यांपासून आपण वेळीच सावध झालो नाही तर बाहेरील देश आणि देशातील गद्दार आपल्या डोळ्यादेखत या मातृभूमीचे तुकडे पाडतील. याकडे वेळीच लक्ष दिले नाही तर पुढील पिढीला आपण कोणत्या नरक यातनेत सोडू याची कल्पनाही करवत नाही. आपण सर्व सुज्ञ आहात याचा आपण आपल्या परीने अन्वयार्थ लावालआणि शोध घ्याल ही अपेक्षा. आपला सत्य धर्म

वाचने 32613 वाचनखूण प्रतिक्रिया 93
आत्मघातकी हल्ले करणारे जे अतीरेकी तयार केले जातात तिथे त्यांच्या मनावर हे धर्मयुद्ध आहे aasach बिंबवले जाते हे मात्र 100% खर आहे ..आणि स्वर्ग मिळेल आस सांगितलं जातं धर्मासाठी माणूस वेडेपणा करतो . पण आता जे पाकिस्तान कडून होत आहेत ते हिंदुंवर धार्मिक आक्रमण आहे हे मात्र खरे नाही .आणि सर्वच मुस्लिम आसेच वागतात हे पण खरं नाही .जे सूत्रधार आहेत त्यांचा उध्येश भारताला त्रास देणे हा आहे हिंदूंना त्रास देणे हा नाही . ही लढाई दोन देशा मध्ये आहे दोन धर्मा मधली नाही . किती तरी मुस्लिम राष्ट्रांनी वेळोवेळी भारताला काश्मीर प्रश्र्नी भारताला समार्धन दिले आहे आणि अतिरेकी हल्ल्याचा निषेध सुधा वेळोवेळी केला आहे . पाकिस्तान मध्ये निवडणुका जिंकण्यासाठी काश्मीर प्रश्न आणि भारत विरोध हा हुकमी ऐक्का आहे त्यामुळे ते सोडवण्यात त्यांना इंटरेस्ट नाही . भारतात तर वैचारिक खिचडी आहे ऐकमेकावर टीका करणे हा छंद सर्वांना आहे आणि परकीय आक्रमणे होतात तेव्हा सुधा हा छंद आपल्याकडे जोपासला जातो . UAE सारख्या मुस्लिम देशात विविध धार्मिक सुखाने राहत आहेत तिथे कट्टर पणाची कोणतीच लक्षण नाहीत .दुबई मध्ये तर मुस्लिम बरोबर हिंदू पण सुरक्षित आहेत . त्या मुळे पाकिस्तान क्या वेडेपणा ला मुस्लिम धर्माची आक्रमकता हा निकष लावू नये

In reply to by Rajesh188

सत्य धर्म 17/02/2019 - 20:38
तुम्हीच म्हणालात लढाई दोन देशांमध्ये आहे दोन धर्मांमध्ये नाही परंतु फेसबुक आणि इतर सोशल साईट वर आलेल्या प्रतिक्रिया पाहता ही लढाई हिंदुस्थानातल्या हिंदूंवर झालेले अतिक्रमणच वाटते. हिंदुस्थानातले सैनिक मयत पावले याचा आनंद हे साजरे करतातच परंतु ते सर्व काफीर होते आणि लवकरच पूर्ण हिंदुस्थानातले हिंदू मारून इथे मुस्लिमांचे राज्य आणणे हा तर त्यांचा अजेंडा आहे, जर असे नसते तर याआधी झालेल्या हल्ल्यामध्ये पाकिस्थानि सैन्याने आपल्या शाहिद सैनिकांची मुंडकी छाटून नेली नसती या गोष्टी हजारो वर्ष्यापासून होत आहेत कारण एकच त्यांना हे मुस्लिम राष्ट्र बनवायचे आहे. राहिला प्रश्न मुस्लिम राष्ट्रांनी आतंकवादाच्या मुद्द्यावर हिंदुस्थानाला पाठिंबा देण्याचा त्यामागे त्या राष्ट्रांचा स्वार्थच दडलेला आहे कधी मोठा प्रसंग आला तर हे सर्व मुस्लिम राष्ट्र एक होऊन भारतावर हल्ला करू शकणार नाहीत काय? तुम्ही UAE आणि अरब राष्ट्रांचे सांगता ज्यामध्ये हिंदू-मुस्लीम एकत्र राहतात पण तुम्ही हे सोयीस्कर विसरताय कि या राष्ट्रांमध्ये कुराणात सांगितल्याप्रमाणे शरिया कायदा आहे आणि जो माणूस या कायद्याचे पालन करून राहील फक्त त्यांनाच तिथं राहण्याची मुभा आहे, रमझान महिन्यात हिंदूसाठी दिवसा हॉटेल्स चालू नसतात, भारतात आपन असे श्रावण महिन्यात करू शकतो का? उत्तर नाही कारण आपल्यात लोकशाही आहे. आत्ता आपणच सांगावे जग हे लोकशाही मार्गाने चालावे की राजेशाही मार्गाने?

In reply to by Rajesh188

ट्रेड मार्क 19/02/2019 - 09:27
पण आता जे पाकिस्तान कडून होत आहेत ते हिंदुंवर धार्मिक आक्रमण आहे हे मात्र खरे नाही .आणि सर्वच मुस्लिम आसेच वागतात हे पण खरं नाही .जे सूत्रधार आहेत त्यांचा उध्येश भारताला त्रास देणे हा आहे हिंदूंना त्रास देणे हा नाही . जगातल्या सर्व देशांमध्ये मुसलमान हल्ले/ आक्रमण काय त्या देशांवर करत आहेत काय? जिथे जिथे मुस्लिम लोकसंख्या वाढते तिथे शरिया लावायची मागणी होतेच. हे लोक स्वतः शरिया तर पाळतातच पण त्याचबरोबर इतर सर्वांनी पण पाळावा असा त्यांचा आग्रह असतो. अमेरिका/ कॅनडा/ युरोप मध्ये हलाल फूड मिळावे यासाठी ते मोर्चे काढतात. व्हेज फूड पण हलाल कसे असते हे मला अजून समजले नाहीये. या देशांमध्ये सुद्धा तुम्हाला हलाल नसलेले फूड मिळेल अशी सोय नाहीये. ही लढाई दोन देशा मध्ये आहे दोन धर्मा मधली नाही हे आपण म्हणतोय. पण ते काय म्हणतात? त्यांच्या दृष्टीने आपण काफिर आहोत. मूर्तिपूजक आणि एकापेक्षा जास्त देव मानणारे लोक हे त्यांच्या दृष्टीने मारून टाकण्याच्या लायकीचे आहेत. त्यांच्या बायका या सेक्स स्लेव्ह बनवण्यासाठी आहेत. आपण फक्त देशांमधली लढाई म्हणून काय होणार? दोन उदाहरणं देतो - १. आपल्या इथे शालेय पुस्तकात फक्त शहाजहान, औरंगजेब, टिपू सुलतान ई चे धडे आहेत. शिवाजी महाराजांवर सुद्धा फार काही नाहीये. JNU, AMU या सकट अगदी मुंबई पुण्यामधल्या युनिव्हर्सिटीज मध्ये सुद्धा काही वर्षांपासून हिंदू धर्म/ राजे/ प्रथा कश्या चुकीच्या होत्या हे शिकवले जाते. वर एक ईश्वर असलेला धर्म कसा चांगला, त्यांचे शशांक कसे चांगले हे शिकवले जाते. २. बॉलिवूड: इथे तर कित्येक वर्षांपासून मने कलुषित करणे चालू आहे. जुन्या पिक्चरमध्ये हिंदू असलेलं पात्र हे कायम अनैतिक कामे करणारं किंवा विनोदी दाखवलं जातं. तर रहीम चाचा किंवा तत्सम नाव असलेलं पात्र हे अगदी परोपकारी दाखवलं जातं. अलीकडच्या काळात तर PK सारख्या चित्रपटांमध्ये उघड उघड हिंदू धर्माची चेष्टा केली आहे. गाण्यांमधून तर कधीपासून हे आक्रमण चालू आहे. अस्खलित हिंदी बोलणारं पात्र हे कायम विनोदी दाखवलं जातं तर उर्दू बोलणारं पात्र हे भव्य दिव्य करणारं असतं. हे भाषण ऐका. बहुतेक सगळी "हिंदी" गाणी उर्दू शब्द असलेली मौला किंवा खुदा वगैरे शब्द असलेली आहेत. लुटेरा मधलं सवार लू हे गाणं ऐका मधेच हळूच गरज नसताना हिजाब हा शब्द टाकलेला आहे. काय गरज आहे? हा लेख वाचा, त्यांच्या दृष्टीने A nation in a minimum sense is a group of people who share some cultural affinity and claim a special relationship with a territory over which they demand the right to establish a state. In a loose sense one may describe religious communities or a linguistic nationality as nations, but in a strict, analytical sense unless they campaign and struggle to establish a state they are not a nation. त्यांच्या दृष्टीने मुस्लिम नेशन असू शकतं पण सर्वधर्मीय एकत्र नांदतील असं राष्ट्र नसतं. किती तरी मुस्लिम राष्ट्रांनी वेळोवेळी भारताला काश्मीर प्रश्र्नी भारताला समार्धन दिले आहे आणि अतिरेकी हल्ल्याचा निषेध सुधा वेळोवेळी केला आहे नुसता तोंडदेखला विरोध काय कामाचा? किती अतिरेक्यांना ते पकडतात आणि शिक्षा करतात हे महत्वाचं आहे. UAE सारख्या मुस्लिम देशात विविध धार्मिक सुखाने राहत आहेत तिथे कट्टर पणाची कोणतीच लक्षण नाहीत .दुबई मध्ये तर मुस्लिम बरोबर हिंदू पण सुरक्षित आहेत . खरंच? तुम्ही मुत्तवा हे नाव ऐकलं आहे का? हे धार्मिक पोलीस असतात जे UEA सारख्या देशात रस्त्यांवरून फिरत असतात. रोजे असताना तुम्ही सार्वजनिक ठिकाणी पाणी जरी पिताना आढळला तरी तुम्हाला जागच्या जागी शिक्षा दिली जाते. ही चाबकाचे १०० फटके असू शकते. एखाद्या मुलीकडे बघताना आढळलात किंवा जर बोलण्याचा, जवळ जाण्याचा वगैरे प्रयत्न केलात तर शिरच्छेद पण होऊ शकतो. कुठले धर्मीय सुखाने राहतात असे म्हणताय? फक्त दुबई म्हणत असाल तर ते एकच शहर आहे जिथे जरा लिबरल वातावरण आहे, पण त्याची कारणे वेगळी आहेत.

In reply to by ट्रेड मार्क

आजानुकर्ण 21/02/2019 - 01:51
पुलवामा घटनेनंतर अपेक्षितपणे जातीयवाद्यांनी आता भारतातल्या मुसलमानांवर मोर्चा वळवला आहे. मात्र तुमचे हास्यास्पद प्रतिसाद वाचून तुमच्या आकलनाबाबत मूलभूत प्रश्न निर्माण झाले आहेत. विशेषतः तुमची दोन उदाहरणं कळली नाहीत. १. आपल्या इथे शालेय पुस्तकात फक्त शहाजहान, औरंगजेब, टिपू सुलतान ई चे धडे आहेत. शिवाजी महाराजांवर सुद्धा फार काही नाहीये. JNU, AMU या सकट अगदी मुंबई पुण्यामधल्या युनिव्हर्सिटीज मध्ये सुद्धा काही वर्षांपासून हिंदू धर्म/ राजे/ प्रथा कश्या चुकीच्या होत्या हे शिकवले जाते. वर एक ईश्वर असलेला धर्म कसा चांगला, त्यांचे शशांक कसे चांगले हे शिकवले जाते. काय सांगताः हिंदू धर्मातल्या कुठल्या प्रथा चांगल्या होत्या ज्या चुकीच्या म्हणून शिकवल्या जात आहेत आणि (तुम्ही दुसरीकडे कुठेतरी म्हटल्याप्रमाणे) औरंगजेब आणि तैमूर चांगले होते असे कुठे आणि कसे शिकवले जात आहे याची उदाहरणे सांगाल का, की तुम्हाला तसे केवळ वाटते आहे? अहो भर काँग्रेसी काळात आम्हाला तर इतिहास म्हणजे केवळ शिवाजीमहाराज असे संपूर्ण एक वर्ष शिकवले होते. याउलट आमच्या गळ्यात मडके आणि कमरेला झाडू बांधणाऱ्यांबाबतही इतिहासात चांगलेच शिकवले होते. मात्र औरंगजेब आणि तैमूर चांगले होते असे कुठल्याच शालेय इतिहासाच्या पुस्तकात किमान आम्ही वाचले नाही. इतिहास हा कायमचा आवडता विषय असल्याने एसएससी परीक्षेत समाजशास्त्र विषयात १५० पैकी १४५ च्या आसपास गुण होते त्यामुळे आमचा शालेय इतिहासाचा बऱ्यापैकी अभ्यास आहे असे वाटते.
२. बॉलिवूड: इथे तर कित्येक वर्षांपासून मने कलुषित करणे चालू आहे. जुन्या पिक्चरमध्ये हिंदू असलेलं पात्र हे कायम अनैतिक कामे करणारं किंवा विनोदी दाखवलं जातं. तर रहीम चाचा किंवा तत्सम नाव असलेलं पात्र हे अगदी परोपकारी दाखवलं जातं. अलीकडच्या काळात तर PK सारख्या चित्रपटांमध्ये उघड उघड हिंदू धर्माची चेष्टा केली आहे. गाण्यांमधून तर कधीपासून हे आक्रमण चालू आहे. अस्खलित हिंदी बोलणारं पात्र हे कायम विनोदी दाखवलं जातं तर उर्दू बोलणारं पात्र हे भव्य दिव्य करणारं असतं. हे भाषण ऐका. बहुतेक सगळी "हिंदी" गाणी उर्दू शब्द असलेली मौला किंवा खुदा वगैरे शब्द असलेली आहेत. लुटेरा मधलं सवार लू हे गाणं ऐका मधेच हळूच गरज नसताना हिजाब हा शब्द टाकलेला आहे. काय गरज आहे?
अरे बापरे, अहो हिंदी चित्रपटातील मुसलमान व्हिलन तुम्हाला कधीच दिसले नाहीत काय, की उगीच फक्त रहीमचाचाला चिकटून बसलायत. आम्हालातर बॉलीवूड म्हणजे केवळ पंजाब असंच दिसतंय. आणि हिंदू धर्माची चेष्टा केल्याने नक्की काय बिघडले, नसेल पटत तर पाहू नका. उठल्यासुटल्या भावना दुखवून घ्यायला हिंदू धर्म म्हणजे इस्लाम नाही. बाकी आम्हाला तर चांगला मनोरंजक वाटला होता तो पीके. बाकी मौला, खुदा वगैरे शब्दांमध्ये नक्की काय वाईट आहे बॉ. आम्हाला मंदिरात प्रवेश नव्हता तेव्हा गावातले पीर वगैरे आमची श्रद्धास्थाने झाले होते. हिजाब हा शब्द, पदरासारखाच आहे. या शब्दांत नक्की काय वाईट आहे की इतकी कावीळ झाली आहे की तुम्ही आता आमच्या भारतात जन्मलेल्या उर्दू भाषेलाही तुमच्या संकुचित दृष्टिकोणातून पाहताय.

In reply to by आजानुकर्ण

ट्रेड मार्क 21/02/2019 - 09:28
एक मूलभूत प्रश्न - तुम्ही एसएससी साधारण कोणत्या साली झालात? दुसरं म्हणजे मी काँग्रेस, भाजप मध्ये आणलेच नाहीयेत. मला आठवतंय त्याप्रमाणे ३ दशकांपूर्वी तरी हिंदू आणि मुसलमान राजे यांच्याबद्दल माहिती साधारण सारख्या प्रमाणात असायची. पण त्यातही औरंगजेब इतका साधा होता की तो टोप्या शिवून गुजराण करायचे वगैरे होतंच. ज्या प्रमाणात ताजमहाल, कुतुबमिनार वगैरे वर्णने असायची त्याप्रमाणात आपल्या पुरातन मंदिरांची माहिती मात्र असल्याचं आठवत नाही. पण हे जुनं झालं. आता ८-१० यत्तेतील मुलांना हिंदू राजे, सम्राट यांची किती नवे सांगता येतात हे विचारून बघा. कोण कुठल्या प्रदेशाचा सम्राट वा राजा होता त्यांनी कुठल्या लढाया केल्या जिंकल्या/ हरल्या याची किती माहिती आहे बघा. त्याचबरोबर अकबर, औरंगजेब, टिपू यांच्याबद्दल पण विचारा. मुघल, टिपू, गझनी, खिलजी हे सगळे हिंदुस्थानवर आक्रमण करणारे आणि येथील संपत्ती लुटून नेणारे होते. या सर्व आक्रमकांनी नुसती संपत्तीचं लुटली नाही तर कित्येक स्त्रियांवर बलात्कार केले त्यांना दासी म्हणून ठेवले. हिंदूंची मंदिरे तोडली, ग्रंथ जाळले याची इतिहासात नोंद आहे. का हे पण नाकारणार आहात? दुसरा एक मूलभूत प्रश्न - का बरं असे असतानाही टिपू जयंती उत्साहानी साजरी केली जाते? का मुघल सम्राटांचा उदो उदो केला जातो? अकबर द ग्रेट का म्हणलं जातं? आणि इथे आमच्या संभाजी राजांना कवीच्या नादाला लागले म्हणून हिणवलं जावं आणि बाजीरावाला मात्र फक्त मस्तानी मुळे ओळखलं जावं? बॉलीवूड - अरे बापरे, अहो हिंदी चित्रपटातील मुसलमान व्हिलन तुम्हाला कधीच दिसले नाहीत काय असतील ना, पटकन आठवून सांगा बघू कोणते मुसलमान व्हिलन आहेत. सर्वसाधारणपणे प्रमाण किती आहे यावर ठरायला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे मी फक्त व्हिलन असं म्हणलं नाही, तर विनोदी किंवा गोंधळ घालणारं पात्र पण त्यात येतं. खान मंडळींची चलती, दाऊदचा वरचष्मा हे नाकारता येणार नाही. हिंदू धर्माची चेष्टा केल्याने नक्की काय बिघडले, नसेल पटत तर पाहू नका मी एकवेळ नाही पाहणार हो, पण जे पाहतात त्यांच्यावर हळूहळू परिणाम होणारच. हेच तुम्ही प्रॉफेटची चेष्टा करणारं सोडून द्या पण सत्य सांगणारं एक पोस्ट चेपुवर टाका आणि मग जे तुमच्या अंगावर येतील त्यांना हेच सांगा बघू. आता तुम्ही म्हणणार ते जसे वागतात तसेच आपण वागायचं का? उठल्यासुटल्या भावना दुखवून घ्यायला हिंदू धर्म म्हणजे इस्लाम नाही. हे नक्की चांगलं बोललात. म्हणजे मुसलमानांच्या उठल्यासुटल्या भावना दुखावतात हे तरी मान्य आहे तर. बाकी आम्हाला तर चांगला मनोरंजक वाटला होता तो पीके. बाकी मौला, खुदा वगैरे शब्दांमध्ये नक्की काय वाईट आहे बॉ. हे परत दृष्टिकोनावर आहे. प्रतिसादातील तुमचं पुढचं वाक्यच तुमचा दृष्टिकोन कसा झाला आहे याचा पुरावा आहे. परत एक प्रयोग करून बघा - किती गाण्यांमध्ये हिंदू देवता असलेले शब्द आहेत आणि किती गाण्यांमध्ये मौला, खुदा, रब वगैरे शब्द आहेत. आम्हाला मंदिरात प्रवेश नव्हता तेव्हा गावातले पीर वगैरे आमची श्रद्धास्थाने झाले होते. हेच ते, ज्यामुळे तुमचा दृष्टिकोन जो आहे तो आहे. हिजाब हा शब्द, पदरासारखाच आहे. या शब्दांत नक्की काय वाईट आहे की इतकी कावीळ झाली आहे मग पदर हा शब्द का नाही वापरला नाही? संपूर्ण चित्रपटात एकही मुस्लिम पात्र नाहीये मग हा शब्द वापरायचं कारण काय असेल? आमच्या भारतात जन्मलेल्या उर्दू भाषेलाही तुमच्या संकुचित दृष्टिकोणातून पाहताय ती भाषा आता सीमेपलीकडे दिली ना, तिकडे आमची हिंदी, संस्कृत, मराठी वापरली जाते का? किती पाकिस्तानी चित्रपटात उर्दू सोडून इतर भारतीय भाषा वापरल्या जातात? मनाचा मोठेपणा दाखवायचा मक्ता फक्त भारतीय हिंदूंनीच घेतलाय का? यातून एक गोष्ट अधोरेखित होतेय, सुरुवात अगदी सर्वसाधारण वाटेल अश्याच गोष्टीपासून होते. आणि मग हळू हळू सगळं बदलत जातं. बाकी जे मला खटकतंय ते तुम्हाला खटकेलच असं काही नाही. पण मग मला फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन नाही का? हाच काय तुमचा सेक्युलॅरिझम?

In reply to by ट्रेड मार्क

सुबोध खरे 21/02/2019 - 09:41
यांचा प्रतिसाद प्रातिनिधिक / ठराविक (TYPICAL) आहे ज्यात तथाकथित उच्च जातींचा द्वेष करण्याच्या नादात ते इस्लामला दयाळू ठरवत आहेत. दुर्दैवाने डॉ बाबासाहेब आंबेडकर इस्लाम बद्दल काय म्हणतात हे त्यांनी नीट वाचलेलेच नाही. इतिहास तुकारामाच्या ऐवजी मंबाजीचा शिकायचा म्हणत आहेत. आजही ज्ञानेश्वरच पुजले जातात. ज्यांना त्याकाळच्या सनातनी ब्राम्हणांनी त्रास दिला त्यांना लोक विसरले सुद्धा हे सुद्धा ते विसरले आहेत. आपल्या विहिरीत इतर बेडूक त्रास देतात म्हणून बाहेरून सापाला आमंत्रण दिले तर काय स्थिती होईल याचा विचार नाहीच. द्वेष करायला गेले कि बुद्धीभेद होतो हि स्थिती आहे.

In reply to by सुबोध खरे

आजानुकर्ण 22/02/2019 - 01:30
दुर्दैवाने डॉ बाबासाहेब आंबेडकर इस्लाम बद्दल काय म्हणतात हे त्यांनी नीट वाचलेलेच नाही.
आणि आंबेडकर हिंदू धर्माबाबत काय म्हणतात, किंवा तुकाराम ब्राह्मणाबाबत काय म्हणतात ते तुम्हाला एकंदरीत पटलेले दिसते, की फक्त सोयीस्कर निवडायचे? साप कोण आणि बेडूक कोण हे आता तुमच्याकडून शिकायचे दिवस कधीच गेले. त्या भ्रमात आता राहू नका.

In reply to by ट्रेड मार्क

आजानुकर्ण 22/02/2019 - 01:27
टिपू आणि मुघलांनी संपत्ती लुटून कुठे नेली असावी बरे? आणि शाळेत शिकवताहेत म्हटल्यावर तुम्ही लगेच पुस्तकांची पाने स्कॅन करून सज्जड पुरावे देऊन माझे तोंड बंद कराल अशी अपेक्षा होती. पण ही तुमची कुजबूज आघाडी दिसते आहे. तुमच्याकडून ही पुरावे वगैरे अपेक्षा करण्यात माझी चूक झाली हे मी मान्य करतो. बाकी तैमूरचेही गोडवे गातात असे तुम्ही आधी म्हटले होते. तो आता कुठे गेला.
टोप्या शिवून गुजराण करायचे वगैरे
हे एवढचं होतं. हे वाक्य म्हणजे ' इतिहासात औरंगजेबाचे गोडवे गात होते' याचा पुरावा असेल तुमच्या एकंदर क्षमतेच्या मर्यादेनुसार तर तुमच्याबरोबर वाद घालून मी वेळ घालतोय असं वाटायला लागलंय.
ती भाषा आता सीमेपलीकडे दिली ना,
कुणी आणि कधी दिली, का याचाही तुमच्याकडे फक्त कुजबूज पुरावाच आहे?

In reply to by ट्रेड मार्क

आजानुकर्ण 22/02/2019 - 02:10
मंदिरं पाडणं हे 'हिंदूं'वरील अत्याचाराचं उदाहरण होऊ शकत नाही. हिंदूंचा अगदी मानबिंदू मानलं जाणारं काशीविश्वनाथ मंदिर औरंगजेबानं पाडलं. पण हे मंदिर संपूर्ण हिंदू समाजाचं प्रतिनिधित्व करतं का? अगदी अलीकडे एकोणीसाव्या शतकात (१९०४) ह्या मंदिरात संपूर्ण हिंदू असलेल्या पेरियार रामस्वामी यांना ब्राम्हण नसल्यामुळं अपमान करुन हाकलून देण्यात आलं. पुढं द्रमुक वगैरे द्रविडी चळवळीच्या स्थापनेत हा प्रसंग कलाटणी देणारा मानला जातो. थोडक्यात या मंदिराचा हाही एक इतिहास आहे. हे एक उदाहरण झालं. अशा अनेक प्रतिष्ठित मंदिरांमध्ये, हिंदू मानल्या गेलेल्या समाजातील कित्येकांना प्रवेशाचीही परवानगी नव्हती. अगदी स्वातंत्र्यानंतर मंदिर प्रवेशासाठी आंदोलनं करावी लागली आहेत. मग औरंगजेबानं तेव्हा जे केलं त्याला समस्त हिंदू समाजावरील अत्याचार मानून आता ऊर बडवण्यात काहीही अर्थ नाही . दुसरं असं की शेकडो वर्षाच्या मुसलमानी राजवटीनंतरही फुल्यांसारख्या द्रष्ट्या विचारवंताला महंमदाचा पोवाडा लिहून मुसलमानी आक्रमणाचे आभार मानावे वाटले यात, मुसलमानी सत्तेचा त्रास सामान्य जनतेला फारसा होत नव्हता असे मानायला हरकत नाही. बाकी ते उर्दू भाषा कशी दिली याचे पुरावे मिळाले की सांगा मग भारतातील काही राज्यांची अधिकृत भाषा म्हणून काढून टाकण्यासाठी आणि नोटेवरून उर्दू उल्लेख काढून टाकण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करता येतील.

In reply to by आजानुकर्ण

विशुमित 22/02/2019 - 11:36
खरा इतिहास एवढाच.. 1. दादोजी कोंडदेवच गुरू 2. पेशव्यांनी अटकेपार झेंडे गाडले 3. मराठ्यांच पानिपत झाले. बाकी सब धूरोळा...!! === मला इतिहासात फक्त एवढंच समजलं नाही की मराठ्यांनी दिल्ली काबीज करून आपला राजा बसवायचा सोडून बादशाहला प्रोटेक्षण का दिले अणि पुन्हा 1857 ला तात्या टोपे वगैरे लोकांनी बहादूर शहा ला आपला नेता बनवून इंग्रजां बरोबर का लढले?? ===

In reply to by आजानुकर्ण

अर्धवटराव 22/02/2019 - 16:53
सामाजीक क्षेत्रात उत्तुंग कार्य केलं फुल्यांनी. पण महंमदाचा पोवाडा रचणारी त्यांची लेखणी ज्ञानेश्वरांवर केवळ जातीय आकसापायी घसरली हे ही खरं. बहुजन समाजाप्रती ज्ञानेश्वरांचं कार्य फुल्यांपेक्षा कितीतरी मोठं आहे (तत्कालीन सामाजीक संदर्भ बघितले तर). आता फुल्यांसारखे लोकं फक्त जातीय द्वेषातुन लिखाण करतात म्हणुन इग्नोर करायचं, कि त्यांच्या मनात खरच काहि सल आहे का हे बघायचं, हे समाज/धर्म धुरीणांचं काम आहे (असावं). बाकी मुस्लीम आक्रमणाला हिंदु समाज सुधारणेची संधी मानणं हे ही अवलक्षणच. रोगापेक्षा मृत्यु बरा असेल तर जीवनात तसाही काहि अर्थ राहात नाहि.

In reply to by आजानुकर्ण

ट्रेड मार्क 22/02/2019 - 22:02
मंदिरं पाडणं हे 'हिंदूं'वरील अत्याचाराचं उदाहरण होऊ शकत नाही. दुसरीकडे रामजन्मभूमी वर रामाचे असलेले मंदिर पाडून १६व्या शतकात मीर बाकीने बाबरी मशीद बांधली. ही वापरात नसलेली मशीद १९९२ मध्ये पाडली तर तो मात्र मुसलमानांची "मुस्लिम" लोकांवरचाच नव्हे तर धर्मावरच हल्ला ठरवला आणि देशभरात दंगे केले, मुंबई बॉम्बस्फोट केले. अगदी अलीकडे एकोणीसाव्या शतकात (१९०४) ह्या मंदिरात संपूर्ण हिंदू असलेल्या पेरियार रामस्वामी यांना ब्राम्हण नसल्यामुळं अपमान करुन हाकलून देण्यात आलं. आणि पुढचा परिच्छेद हे आमच्या हिंदू धर्मातील अंतर्गत बाब झाली. आमची आम्ही ती निस्तरतोय ना? कोणी हिंदू शिया-सुन्नी वादात पडतो का? तेही एकमेकांच्या मशिदीत जात नाहीत त्याविरोधात कोणी हिंदू आंदोलन करतो का? तीच कथा ख्रिश्चनांची पण आहे. असे असताना शबरीमलाच्या वादात एका मुस्लिम आणि ख्रिश्चन महिलेने मंदिरात घुसायचा प्रयत्न का करावा? मुस्लिम महिलांना कोणती मशीद प्रवेश देते? तिथे का नाही का प्रोटेस्ट करत? मग औरंगजेबानं तेव्हा जे केलं त्याला समस्त हिंदू समाजावरील अत्याचार मानून आता ऊर बडवण्यात काहीही अर्थ नाही . नुसतं तेव्हाच केलं म्हणून ऊर बडवत नाहीये तर अजूनही ते चालूच आहे म्हणून विरोध करायची वेळ येते. एक बाबरी मशीद पाडल्यावर नुसते दंगे आणि बॉम्बस्फोटच नाही झाले तर मंदिरांची पण नासधूस केली गेली. एवढंच कशाला जरा स्वातंत्र्यानंतर किती मंदिरांची नासधूस शांतताप्रिय जमातीने केलीये याचे जरा संशोधन करा. मुस्लिम बहुल भागातून हिंदूंना कसे हुसकून लावले जाते हे माहित असेलच. नसेल तर खरंच तुम्ही झापडं लावून बसला आहात. शेकडो वर्षाच्या मुसलमानी राजवटीनंतरही फुल्यांसारख्या द्रष्ट्या विचारवंताला महंमदाचा पोवाडा लिहून मुसलमानी आक्रमणाचे आभार मानावे वाटले यात, मुसलमानी सत्तेचा त्रास सामान्य जनतेला फारसा होत नव्हता असे मानायला हरकत नाही. खरं की काय? राजपूत स्त्रियांनी जोहार उगाच केले असावेत. औरंगजेब स्वतःहून बिगर मुस्लिमांना जिझिया नावाचा कर देत असावा. टिपू सुलतान तर एवढा चांगला होता की विचारूच नका, त्याने कित्येक देवळे बांधली तसेच अजिबात कोणालाही मुसलमान व्हायचा आग्रह केला नाही. उलट मुसलमानांना त्याने हिंदू धर्म स्वीकारण्यासाठी उद्युक्त केलं. म्हणून तर अजूनही भारतीय लोक त्याची जयंती साजरी करतात. हे फक्त बरेच मूर्ख इतिहासकार होते ज्यांनी मुस्लिम द्वेषातून मुस्लिम राजवटी कश्या क्रूर होत्या याची नोंद करून ठेवली. ते उर्दू भाषा कशी दिली याचे पुरावे मिळाले की सांगा मग भारतातील काही राज्यांची अधिकृत भाषा म्हणून काढून टाकण्यासाठी आणि नोटेवरून उर्दू उल्लेख काढून टाकण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करता येतील. इथे म्हणल्याप्रमाणे - Urdu developed in the 12th century CE from the regional Apabhramsha of northwestern India, serving as a linguistic modus vivendi after the Muslim conquest. म्हणजेच उर्दू ही मुख्यत्वे मुस्लिमांची भाषा आहे. १२ शतकात पाकिस्तान वेगळा नव्हता हे तुम्हाला माहीतच असेल. पण मग जेव्हा वेगळा मुस्लिम देश हवा म्हणून पाकिस्तान बनवला गेला तेव्हा खरं तर लोकांसकट ती भाषाही तिकडे देऊन टाकायला पाहिजे. तुम्हीच सांगा बघू हिरो हिरोईन दोघेही हिंदू असलेल्या चित्रपटात उर्दूची पखरण असलेले शब्द आणि मुस्लिम संस्कृती दाखवणारे सीन का असावेत? एक उदा. देतो १९८५ साली आलेल्या गुलामी या हिंदी चित्रपटाची पार्श्वभूमी राजस्थानात असलेल्या जातीव्यवस्था आणि गरीब श्रीमंत यातला संघर्ष यावर आहे. पात्र सगळी हिंदू आहेत पण यातील खालील गाण्याचा अर्थ किती लोकांना सांगता येईल? Zihaal-e-Miskeen maqun ba-ranjish, bahaal(ba-haal)-e-hijra bechara dil hei आता यावर तुम्ही म्हणाल की सुश्राव्य गीत आहे. असेल ना पण मग हिंदी शब्द वापरून सुश्राव्य गीत बनवता येत नाही? अशी कितीतरी उदाहरणे देता येतील. या उलट शुद्ध हिंदीत असलेली प्रिय प्राणेश्वरी वा एक चतुर नार हे एक कॉमेडी म्हणून आहे. प्रॉब्लेम हाच आहे की वर्षानुवर्षे हळू हळू होत असलेलं हे स्लो पॉयझनिंग लोकांना कळत नाहीये, तोच तर खरा धोका आहे. देशविरोधी घोषणा देणे म्हणजे मतस्वातंत्र्य वाटणे, देवळात जाणे/ पूजा करणे म्हणजे डाऊनमार्केट पण चर्च व कुठल्या तरी दर्ग्यावर जाणे म्हणजे आपण कसे सेक्युलर हे वाटणे ई बरीच मोठी यादी करता येईल जी एकूणच देश आणि धर्म दोन्हीसाठी धोकादायक आहे. असो. आपला दृष्टिकोनच वेगळा आहे. तुम्ही लहानपणापासून पीरबाबाला जात आलात आणि मी देवळात, त्यामुळे फरक असणारच.

In reply to by ट्रेड मार्क

आजानुकर्ण 23/02/2019 - 05:23
दुसरीकडे रामजन्मभूमी वर रामाचे असलेले मंदिर पाडून १६व्या शतकात मीर बाकीने बाबरी मशीद बांधली. ही वापरात नसलेली मशीद १९९२ मध्ये पाडली तर तो मात्र मुसलमानांची "मुस्लिम" लोकांवरचाच नव्हे तर धर्मावरच हल्ला ठरवला आणि देशभरात दंगे केले, मुंबई बॉम्बस्फोट केले.
1992 मध्ये भारतात लोकशाही सरकार, न्यायव्यवस्था आहे. एखाद्या प्रॉपर्टीची नासधूस करण्याचा अधिकार या भगव्या बेरोजगारांना कसा काय मिळतो. मुसलमानांनी हा धर्मावरचा हल्ला ठरवून दंगली करणेही चुकीचे आहे.
खरं की काय? राजपूत स्त्रियांनी जोहार उगाच केले असावेत. औरंगजेब स्वतःहून बिगर मुस्लिमांना जिझिया नावाचा कर देत असावा. टिपू सुलतान तर एवढा चांगला होता की विचारूच नका, त्याने कित्येक देवळे बांधली तसेच अजिबात कोणालाही मुसलमान व्हायचा आग्रह केला नाही. उलट मुसलमानांना त्याने हिंदू धर्म स्वीकारण्यासाठी उद्युक्त केलं. म्हणून तर अजूनही भारतीय लोक त्याची जयंती साजरी करतात. हे फक्त बरेच मूर्ख इतिहासकार होते ज्यांनी मुस्लिम द्वेषातून मुस्लिम राजवटी कश्या क्रूर होत्या याची नोंद करून ठेवली.
काय सांगता! अहो राजपूत आणि मुघल घराण्यांमध्ये नंतर विवाहसंबंध वगैरेही जोडले गेलेत. रामसिंग, जयसिंग वगैरे सरदार - धर्म न बदलता - मुघलांकडे पगारी नोकऱ्या करत असत. जीझिया कर हा अन्यायकारक असला तरी एकांगी होता हे चुकीचं चित्रण आहे. तत्कालीन इस्लाम कायद्यानुसार मूर्तीपूजक आणि अग्नीपूजक यांना मुळात जगण्याचीच परवानगी नव्हती. जीझिया कर हा एकेश्वरवादी नॉन-मुस्लिम ख्रिश्चन-ज्यूंसाठी होता. इतरांनी एकतर मुसलमान व्हावे किंवा मृत्यू पत्करावा असा कायदा होता. भारतातील मुस्लिम राज्यकर्त्यांनी खलिफा वगैरेंशी वाद घालून हिंदूंना जिवंत ठेवण्यासाठी ह्या कराची सवलत मिळवली. शिवाय जीझिया कर दिल्यावर हिंदूंवर राज्यासाठी लढण्याची जबाबदारी येत नाही. त्यादृष्टीने ती सेक्युरिटी फीदेखील होती. कुरुंदकरांनी अकबरावरच्या लेखात असं लिहिलंय की अकबराला - हिंदूंनी राज्यासाठी न लढणे ही - जीझियाची ही बाब पसंद नसल्यानं त्यानं जीझिया संपूर्णपणे रद्द केला आणि हिंदूंना राज्याचा भाग मानून राज्यासाठी लढण्यास प्रवृत्त केले. (औरंगजेबानं पुन्हा तो निर्णय फिरवला यावरुन शिवाजीने अकबराची आठवण करुन देण्यासाठी औरंगजेबाला पत्र लिहिले होते) आता अशी अन्याय्य करआकारणी करणं हे केवळ मुसलमानांचं व्यवच्छेदक लक्षण नाही. उत्तरपेशवाईतल्या करआकारणीबद्दल म.वा.धोंड यांनी 'मराठी लावणीचा इतिहास' सांगणाऱ्या पुस्तकात थोडी टिप्पणी केली आहे. कर्जपट्टी, सरंजामपट्टी, वेतनपट्टी, सावकारपट्टी, उंबरेपट्टी, भाडेपट्टी अशी मनमानी करआकारणी पेशवे करत असत. त्यातही कहर म्हणजे दुसऱ्या बाजीरावाला पेशवाई मिळाल्याबद्दल जनतेस संतोष झाला आहे याखातर 'संतोषपट्टी'ही सुरु केली होती. औरंगजेबानं जीझियासारख्या कराचा वापर साम्राज्यविस्तारासाठी केला. पेशव्यांनी या पट्टयांचा वापर शिंद्यांची देणी चुकवण्यासाठी आणि बावनखणीतले तमाशे आणि घटकंचुकीसारख्या प्रकारांवर पैसे उधळण्यासाठी केला.
तेव्हा खरं तर लोकांसकट ती भाषाही तिकडे देऊन टाकायला पाहिजे.
अच्छा ही तुमची विशलिस्ट आहे होय. आधी तुम्ही थाप मारली की ती देऊन टाकली. आता म्हणताय ती देऊन टाकायला पाहिजे. आम्ही देशभक्त राज्यघटनेला प्रमाण मानतो. त्यात उर्दू ही भाषा एक शेड्युल्ड लँगवेज आहे. तुम्हाला राज्यघटनेचा अपमान करुन स्वतःचे नियम करायचे असतील तर खुशाल करा. मात्र उगीच भाषा तिकडे दिली वगैरे खोटे बोलू नका.
असो. आपला दृष्टिकोनच वेगळा आहे. तुम्ही लहानपणापासून पीरबाबाला जात आलात आणि मी देवळात, त्यामुळे फरक असणारच.
अगदी! आम्ही पीरबाबाला गेलो, देवळात गेलो, चर्चमध्ये गेलो, सिनेगॉगमध्ये गेलो, बिर्याणी खाल्ली, केक खाल्ला, शीरखूर्मा खाल्ला, मोदक खाल्ले, बोकड खाल्ला, कव्वाल्या ऐकल्या, भजने ऐकली, लावण्या ऐकल्या, हिंदी, इंग्रजी, उर्दू, मराठी, तमिळ, संस्कृत, तेलुगू कुठल्याच भाषेचे-पदार्थाचे-धर्माचे-कपड्यांचे आम्हाला वावडे नाही. माणूस म्हणून जन्माला आलो आणि कुठल्याली लेबलचे ओझे न मानता माणूस म्हणूनच मरणार. हाच तुमच्या आणि आमच्या दृष्टीकोनात फरक आहे!

In reply to by आजानुकर्ण

विशुमित 23/02/2019 - 11:01
अगदी! आम्ही पीरबाबाला गेलो, देवळात गेलो, चर्चमध्ये गेलो, सिनेगॉगमध्ये गेलो, बिर्याणी खाल्ली, केक खाल्ला, शीरखूर्मा खाल्ला, मोदक खाल्ले, बोकड खाल्ला, कव्वाल्या ऐकल्या, भजने ऐकली, लावण्या ऐकल्या, हिंदी, इंग्रजी, उर्दू, मराठी, तमिळ, संस्कृत, तेलुगू कुठल्याच भाषेचे-पदार्थाचे-धर्माचे-कपड्यांचे आम्हाला वावडे नाही. माणूस म्हणून जन्माला आलो आणि कुठल्याली लेबलचे ओझे न मानता माणूस म्हणूनच मरणार. हाच तुमच्या आणि आमच्या दृष्टीकोनात फरक आहे! ==>> अप्रतिम प्रतिसाद..!

In reply to by आजानुकर्ण

गब्रिएल 23/02/2019 - 13:39
इतरांनी एकतर मुसलमान व्हावे किंवा मृत्यू पत्करावा असा कायदा होता. भारतातील मुस्लिम राज्यकर्त्यांनी खलिफा वगैरेंशी वाद घालून हिंदूंना जिवंत ठेवण्यासाठी ह्या कराची सवलत मिळवली. माय ग्वाड ! आनी आसल्या शांततावादी धरमाला लोकं नावं ठ्येवत्यात? दुश्ट, दुश्ट, दुश्ट.

In reply to by आजानुकर्ण

ट्रेड मार्क 24/02/2019 - 00:50
1992 मध्ये भारतात लोकशाही सरकार, न्यायव्यवस्था आहे. एखाद्या प्रॉपर्टीची नासधूस करण्याचा अधिकार या भगव्या बेरोजगारांना कसा काय मिळतो. १९४७ पासून भारतात लोकशाही सरकार, न्यायव्यवस्था आहे. हिरव्या धर्मांधांना आमची देवळे तोडण्याचा अधिकार कोणी दिला? एवढेच नव्हे तर अमर जवान ज्योतीची नासधूस करण्याचा अधिकार कोणी दिला? या न्यायव्यवस्था असणाऱ्या लोकशाही देशात शेकडो दंगली करून, बॉम्बस्फोट करून हजारो लोकांना मारण्याचा, जायबंदी करण्याचा अधिकार कोणी दिला? १९९२ ची मुंबई दंगल कोणी सुरु केली? १९९३ चे बॉम्बस्फोट कोणी केले? सगळे पुरोगामी कायम उल्लेख करत असलेले २००२ चे दंगे कसे सुरु झाले? लोकशाहीचे मंदिर असणाऱ्या संसदेवर हल्ला कोणी केला? तत्कालीन इस्लाम कायद्यानुसार मूर्तीपूजक आणि अग्नीपूजक यांना मुळात जगण्याचीच परवानगी नव्हती. जीझिया कर हा एकेश्वरवादी नॉन-मुस्लिम ख्रिश्चन-ज्यूंसाठी होता. इतरांनी एकतर मुसलमान व्हावे किंवा मृत्यू पत्करावा असा कायदा होता. बरं झालं हे मान्य केलंत. आता इस्लाम बदलला आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे का? बदललेल्या कुराणाची आवृत्ती दाखवता का? भारतातील मुस्लिम राज्यकर्त्यांनी खलिफा वगैरेंशी वाद घालून हिंदूंना जिवंत ठेवण्यासाठी ह्या कराची सवलत मिळवली. ओह याचं तुम्हाला भारी कौतुक दिसतंय! कर्जपट्टी, सरंजामपट्टी, वेतनपट्टी, सावकारपट्टी, उंबरेपट्टी, भाडेपट्टी अशी मनमानी करआकारणी पेशवे करत असत. करआकारणी सगळेच राज्यकर्ते करत असत. आता लोकशाही मधेही विविध कर जनतेवर लावले जातातच. वर तुम्हीच म्हणताय की "जीझिया कर हा एकेश्वरवादी नॉन-मुस्लिम ख्रिश्चन-ज्यूंसाठी होता.", त्यामुळे मुद्दा हा आहे की धर्मावरून वा पूजापद्धतीवरून करविभागणी केली जात होती. सर्वांना समान वागणूक दिली जात नव्हती. तसेच नुसती जास्तीची कर आकारणी हाच मुद्दा नसून हिंदूंना ही वागणूक दिली जायची. स्त्रियांना पळवून बलात्कार करणे, दासी बनवून जनानखान्यात भरती करणे हे पण होते. आता याची तुलना करा बघू... कुठल्या हिंदू राजाने अशी धर्माच्या आधारे त्यातील स्त्रियांची विटंबना केली आहे. त्यातही कहर म्हणजे दुसऱ्या बाजीरावाला पेशवाई मिळाल्याबद्दल जनतेस संतोष झाला आहे याखातर 'संतोषपट्टी'ही सुरु केली होती. औरंगजेबानं जीझियासारख्या कराचा वापर साम्राज्यविस्तारासाठी केला. पेशव्यांनी या पट्टयांचा वापर शिंद्यांची देणी चुकवण्यासाठी आणि बावनखणीतले तमाशे आणि घटकंचुकीसारख्या प्रकारांवर पैसे उधळण्यासाठी केला. पुरावे द्या की. एखादे पुस्तक वाचून तुमचे आकलन सांगू नका. पुस्तकाचे नाव, लेखक ई द्या. पुस्तकातले उतारे द्या. जमल्यास लिंक द्या. आम्ही पीरबाबाला गेलो, देवळात गेलो, चर्चमध्ये गेलो, सिनेगॉगमध्ये गेलो, बिर्याणी खाल्ली, केक खाल्ला, शीरखूर्मा खाल्ला, मोदक खाल्ले, बोकड खाल्ला, कव्वाल्या ऐकल्या, भजने ऐकली, लावण्या ऐकल्या, हिंदी, इंग्रजी, उर्दू, मराठी, तमिळ, संस्कृत, तेलुगू कुठल्याच भाषेचे-पदार्थाचे-धर्माचे-कपड्यांचे आम्हाला वावडे नाही. वावडे मलाही नाही आणि कुठल्याही हिंदूला नाही. मी पण बहुतेक सगळ्या प्रार्थनागृहांमध्ये गेलेलो आहे, विविध जाती धर्माच्या लोकांच्या सणासमारंभात मी अगदी कुटुंबासकट सामील झालो आहे आणि या पुढेही होत राहीन. पण हा प्रॉब्लेम मुसलमानांना आहे ना. मुसलमान देवळात येतात का? प्रसाद सुद्धा खात नाहीत. माझ्या मुलींच्या मुसलमान मैत्रिणी आहेत ते बाहेर एकत्र खेळतील पण एकमेकांच्या घरी खेळायला सुद्धा येत नाही किंवा येऊ देत नाहीत. माणूस म्हणून जन्माला आलो आणि कुठल्याली लेबलचे ओझे न मानता माणूस म्हणूनच मरणार. बरोबर आहे. लेबल मी पण लावत नाहीये पण समोरचा जर बळजबरीने मला काफिर हे लेबल लावत असेल तर काय करायचं? बरं नुसतं लेबल लावून थांबत नाही, त्यांच्या धर्मात सांगितले त्याची अंमलबजावणी करतो. मग काय करायचं? हाच तुमच्या आणि आमच्या दृष्टीकोनात फरक आहे! जाताजाता हे नमूद करू इच्छितो की माझ्या प्रतिसादात बरेच मुद्दे मांडले होते ज्यातील फक्त तुम्हाला सोयीचे मुद्दे घेऊन तुम्ही उत्तर देत आहात. अर्थात हे काही नवीन नाही, यापूर्वी पण असे बरेच वेळा झाले आहे. एका प्रतिसादात मी प्रश्न एकत्र करून विचारले आहेत, पण तिकडे तुम्ही फिरकणार नाही याची मला खात्री आहे.

In reply to by गब्रिएल

गब्रिएल 24/02/2019 - 23:09
आनी हा तुमच्या लाडक्या शांततेच्ये नोबेल प्राईस देन्याजोग्या धरमाचा भारतातला च्येहरा अदुगर बगून घ्या मंग कायबी बोला

In reply to by आजानुकर्ण

विजुभाऊ 12/03/2019 - 14:59
औरंगजेबाला सरसकट वाईट का म्हणून ठरवायचे? तो भारतीय इतिहासातील सर्वात मोठ्या भूभागाचा राजा होता. त्याच्या धर्माचा पायीक होता. त्याने जितका भूभाग त्याच्या अमलाखाली आणला तितका भारतीय इतिहासात प्रथमच कोणीतरी आणला असावा. औरंगजेबाच्या सेनेत कित्येक कडवे हिंदू रजपूत राजे होते. पण त्या पैकी कोणालाही त्याने काशी विश्वेश्वर किंवा मथुरेवर केलेले आक्रमण चुकीचे वाटले नसेल? दुसरे हे की एखादी भाषा आणि धर्म यांचा परस्पर संबन्ध कसा लावता येतो हे समजले नाही.

In reply to by विजुभाऊ

भंकस बाबा 12/03/2019 - 18:25
ओरंगयाच्या पदरी असणारे रजपूत हे स्वतंत्र राजे नव्हते तर मांडलिक होते, सर्वधर्मसमभाव ह्या नीतिचा पुरस्कार करणारा दारा शिकोह हा खरा शहाजाननंतरचा मुघल वारस, त्याला ओरंगयाने कपटाने अल्लाघरी पाठवले. संभाजी राजाचा अतोनात छळ करून जीव घेणारा हाच तो हरामखोर ! हिंदुवर झिजिया कर बसवणारा हाच तो रां... चा

In reply to by विजुभाऊ

ट्रेड मार्क 13/03/2019 - 00:42
सरसकट वाईट कधीच कोणीच नसतो. अगदी हिटलरला सुद्धा सरसकट वाईट म्हणता येणार नाही. त्यावेळेला जर्मन जनतेचा त्याला मोठ्या संख्येने पाठिंबा दिला होता. पण तो ज्यूंसाठी वाईट होता. अर्थात निदान जर्मन लोकांनी नंतर त्याचे नावही टाकले, आता जर्मनीत हिटलरचे नाव चांगल्या अर्थाने उच्चारणे सुद्धा निषिद्ध मानले जाते. दाऊद, टायगर मेमन, ओसामा बिन लादेन, कसाब, बुर्हाण वाणी पासून ते मसूद अझर पर्यंत सगळे कोणा ना कोणाच्या दृष्टीने चांगलेच असणार उदा. पाकिस्तानसाठी हे लोक चांगलेच आहेत. प्रश्न हा आहे की फक्त आपण स्वतः कुठल्या बाजूला आहोत आणि कुठल्या दृष्टीने बघतोय. तसाच औरंगजेब मुसलमानांसाठी चांगला पण हिंदूंसाठी वाईट होता. दुर्दैवाने बरेच हिंदू अजूनही औरंगजेबाला चांगला मानतात. त्याहून दुर्दैवाची गोष्ट म्हणजे ज्या देशात त्याने तिथल्या स्थानिक लोकांची धर्मावरून कत्तल केली, त्यांच्या घरातील स्त्रिया व पोरीबाळींना आपल्या जनानखान्यात दासी म्हणून ठेवले, देवळे पाडली, ग्रंथ जाळले, सक्तीचे धर्मांतरण केले त्याच देशात त्याच्या नावाचे रस्ते आहेत. कदाचित अजून काही वर्षांनी, भारतात फक्त ५०-५५% हिंदू उरले, तर औरंगजेब हिंदूंच्या भल्यासाठी इतक्या गोष्टी करत असताना शिवाजी नावाचा एक छोटा मराठी राजा (राजा पण म्हणणार नाहीत, कदाचित चोर व लुटारू?) त्याला उगाच त्रास देत होता असा प्रचार झाला तरी आश्चर्य वाटायला नको. फक्त तो दिवस मला बघायला मिळू नये एवढीच देवाकडे प्रार्थना!

In reply to by ट्रेड मार्क

भंकस बाबा 13/03/2019 - 08:17
राणा प्रतापचे ज्वलंत उदाहरण आहेच की, हिंदुराष्ट्र संकल्पना मांडणारे सावरकर मुस्लिम तुष्टिकरण करताना अश्पृश्य होतात ते यासाठी, मुस्लिम बाबासाहेब आम्बेडकराना किती मानतात हा कळीचा मुद्दा असला तरी धार्मिक स्वातंत्र या मुद्द्यावर मुस्लिम बाबासाहेबांना झुकते माप देतील , तेच जर त्यांनी समान नागरी कायदा रेटला असता तर क़ाय केले असते याचा विचार देखील करवत नाही

In reply to by ट्रेड मार्क

प्रमोद देर्देकर 13/03/2019 - 08:28
अजुन काही वर्षांनी कशाला सांगताय आजही शिवाजी महाराजांना कर्नाटकातले सगळे लोक लुटारु चोर समजतात आणि टिपुला ते लोक पुजतात. हे मी स्वतःच्या कानांनी दहा वेळा ऐकलंय.

In reply to by प्रमोद देर्देकर

ट्रेड मार्क 13/03/2019 - 22:39
अजुन काही वर्षांनी कशाला सांगताय आजही शिवाजी महाराजांना कर्नाटकातले सगळे लोक लुटारु चोर समजतात आणि टिपुला ते लोक पुजतात. दुर्दैव आहे. त्याहूनही मोठं दुर्दैव म्हणजे बऱ्याच लोकांना हे समजत नाही किंवा समजलं तरी उमजत नाही. तिकडे या धाग्यावर आजानुकर्ण यांचे प्रतिसाद बघा. त्यांना अजूनही पटत नाहीये की भारतात मुस्लिम आक्रमकांचे कौतुक होते आणि वर मलाच देशद्रोही म्हणत आहेत...

Chandu 17/02/2019 - 12:29
खालील वस्तुस्थिती लक्षात घेणे. 1.हा हल्ला पूर्णपणे सुनियोजित होता.हे रागाच्या भरात केलेले कृत्य नाही. 2.याचा अर्थ या हल्ल्याच्या आफ्टर इफेक्ट ची पूर्ण कल्पना या संघटनेला आहे. 3.काही विशीष्ट तत्वा साठी प्राण पणाला लावणारे कार्यकर्ते या संघटनेकड आहेत. 4.या हल्ल्याचा उद्देश काश्मीर मधील सर्व सामान्य मुस्लिमां मधे या संघटने विषयी ममत्व वाढवणे हा असुन त्याना भारता पासून emotionaly वेगळे करणे हा आहे. 5.ही संघटना सर्व जगभर याच प्रकारच्या कारवाया करण्याबद्दल प्रसीद्ध आहे 6. साठी प्रत्ततरा दाखल करावयाची कारवाई ही थंड डोक्याने,एकाच वेळी अनेक स्तरावर करावी लागेल , 7.त्यादृष्टीने योग्य पातळीवर काम सुरु झालेही असेल. 8.या घटनेचा फायदा घेउन मीडिया,विविध राजकीयपक्ष ,गट,आपापला ऐजेंडा पुढे रेटत आहेत हे उघड उघड दिसते आहे आपण फक्तबघतरहायचे.

In reply to by Chandu

सत्य धर्म 17/02/2019 - 20:44
थोडक्यात काय मी म्हणल्याप्रमाणे या देशाचे हळू हळू विभाजन करून पूर्ण हिंदुस्थानला संपवणे हाच त्यांचा इतिहास काळापासून अजेंडा राहिला आहे, काळ जरी बदलला असला तरी त्यांची या ध्येयाच्या दिशेने हळू हळू वाटचाल चालूच आहे आणि हळू हळू ते यात यशस्वी पण होत आहेत म्हणून तर आपल्या देशाची शकले होत असताना सुद्धा आपण इतिहासाचे अवलोकन करण्यात कमी पडतोय यासाठी आपन इस्राईल पासून प्रेरणा घेतली पाहिजे. काश्मीर, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश ची अवस्था बघा मग या गोष्टीची दाहकता लक्षात येईल.

माईसाहेब कुरसूंदीकर 17/02/2019 - 14:39
"मुस्लिम दहशतवादाकडे सोईस्कर डोळेझाक करतात." गेले २ महिने सी.आर.पी.एफ.वर हल्ले चालूच होते. डिसेंबर मध्ये अनंतनाग्,जानेवारीत श्रीनगर, त्यानंतर आणखी एके ठिकाणी ग्रेनेड फेकून हल्ला..मात्र ह्या सर्व बातम्या तेव्हा पाच्व्या किंवा १० व्या पानावर असायच्या.

अर्धवटराव 18/02/2019 - 05:02
आपला सर्वात घातक छुपा शत्रु आहे डॉलर. त्यानंतर नंबर येतो ड्रॅगनचा. पकिस्तान हा चीनने पाळलेले कुत्रा आहे. आतंकी संघटना फार तर या कुत्र्याची नखे, दात वगैरे. आपली शक्ती आणि वेळ योग्य नियोजन करुन खर्च करण्यातच शहाणपण आहे. हिंदुंनी उगाच इतर धर्मीयांच्या नावे कांगावा करु नये. ८० कोटी लोकसंख्या असुनही जर शांती राखुन आपली प्रगती साधता येत नसेल तर आपलं कर्मदारिद्र्य स्विकारण्याचा मोकळेपणा तरी दाखवावा.

In reply to by अर्धवटराव

एमी 19/02/2019 - 11:22
> हिंदुंनी उगाच इतर धर्मीयांच्या नावे कांगावा करु नये. ८० कोटी लोकसंख्या असुनही जर शांती राखुन आपली प्रगती साधता येत नसेल तर आपलं कर्मदारिद्र्य स्विकारण्याचा मोकळेपणा तरी दाखवावा. > +१

In reply to by एमी

सत्य धर्म 19/02/2019 - 22:00
हिंदू शांतच आहेत याचा गैरफायदा हे लोक घेतात शेवटी तुकाराम महाराज म्हणलेच आहेत " भले तर देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे माथी हनु काठी"

In reply to by अर्धवटराव

सत्य धर्म 19/02/2019 - 22:07
सर्व मान्य पण आपल्या शांतीचा कोणी गैरअर्थ घेत असेल तर? इतिहासापासून आपण शिकलोच नाही तर येणाऱ्या पिढ्या आपल्याला कधीच माफ नाही करणार.

In reply to by सत्य धर्म

अर्धवटराव 22/02/2019 - 01:55
हेच ते कर्मदारिद्य्र. इतीहासापासुन शिकायचं नाहि. वर्तमानाचं भान ठेवायचं नाहि. भविष्याचं नियोजन करायचं नाहि. मग आपल्या परिस्थितीबद्दल इतरांना दोष का द्यायचा? आपल्या दारुण स्थितीला जबाबदार कोण? शत्रु तर शत्रुसारखाच वागेल. पण आपल्याला आपलं मैत्रं जपायला कुणी आडकाठी केली आहे?

In reply to by अर्धवटराव

ट्रेड मार्क 19/02/2019 - 23:09
८० कोटी लोकसंख्या असुनही जर शांती राखुन आपली प्रगती साधता येत नसेल तर आपलं कर्मदारिद्र्य स्विकारण्याचा मोकळेपणा तरी दाखवावा. आपण प्रगती केली नाहीये हे वाचून जरा नवलच वाटलं. नुसता एक हिंदुबहुल देश म्हणूनच नव्हे तर एक समाज म्हणूनही हिंदूंनी प्रगती केली आहे. पण शांतताप्रिय धर्माचे लोक मात्र अजूनही १४०० वर्षांपूर्वीचे नियम तंतोतंत पाळण्याच्या मागे लागले आहेत. बरं त्यांचे त्यांना पाळायचे असतील तर पाळावेत ना पण इतर धर्मियांना नावे ठेवायचे किंवा बाटवायचे कशाला? हिंदूंनी कोणाला पूजावे, आम्ही एका देवाला का ३३ कोटी देवांना मानू, त्यांना काय करायचंय? त्यांच्यातले जे काही थोडेफार लोक चांगले शिकून सावरून प्रगती करतात त्यावर हे इतर लोक माती टाकतात. जगातले कित्येक देश साक्षीदार आहेत की हे लोक जिथे जातात तिथे ते लोढणं म्हणून रहातात. युरोपात फुकट मेडिकल वापरतात ढीगभर पोरं काढतात आणि नंतर child support चे पैसे वापरून निर्वाह चालवतात. वर तिथल्या स्थानिकांना लक्ष्य करतात. असो. तुम्हाला पटेल का नाही माहित नाही. पण हिंदू कर्मदरिद्री एकाच गोष्टीत आहेत - त्यांच्यातलेच बरेच परधार्जिणे असतात. फितुरी आणि एकमेकांचे पाय ओढणे हे पण पूर्वापार चालू आहे.

In reply to by ट्रेड मार्क

सुबोध खरे 21/02/2019 - 09:48
८० कोटी लोकसंख्या असुनही जर शांती राखुन आपली प्रगती साधता येत नसेल तर आपलं कर्मदारिद्र्य स्विकारण्याचा मोकळेपणा तरी दाखवावा. जाऊ द्या हो हिंदू द्वेष करणे हि सेक्युलर पुरोगामीपणाची पहिली पायरी आहे. ज्या एकाच भुमीतून तीन राष्ट्रे तयार झाली ज्यांचा इतिहास भौगोलिक परिस्थिती सारखीच असून ( भारत पाकिस्तान बांगला देश) त्यात सर्वात जास्त प्रगती कुणाची आणि का झाली हे समजावून घ्यायचे असेल तर डोळे उघडे ठेवून वाचन करावे लागेल. एवढे कष्ट घेण्यापेक्षा हिंदू द्वेष करुन पटकन सेक्युलर पुरोगामी होता येते. जसे आधुनिक(मॉडर्न) होण्यासाठी आपल्या बायकोला मुलीला सामान अधिकार द्यावा लागतो त्यापेक्षा हातात सिंगल माल्ट व्हिस्कीचा ग्लास धरून पटकन मॉडर्न होता येते. त्याला त्यांचा काही इलाज नाही. म्हणुन म्हणतो सोडून द्या

In reply to by ट्रेड मार्क

अर्धवटराव 22/02/2019 - 02:11
बरं त्यांचे त्यांना पाळायचे असतील तर पाळावेत ना पण इतर धर्मियांना नावे ठेवायचे किंवा बाटवायचे कशाला?
आक्रमणाची हि हि फार पुरातन स्ट्रॅटजी आहे. अनेक शतकं जर हिच स्टॅटजी हिंदुना मात देत असेल, आणि त्यापासुन हिंदु काहि शिकायला तयारच नसेल तर दोष कुणाचा?
जगातले कित्येक देश साक्षीदार आहेत की हे लोक जिथे जातात तिथे ते लोढणं म्हणून रहातात.
ज्या परिस्थीतीतुन हे लोक युरोपात जातात, तशाच परिस्थीतीतुन भारतातले हिंदु लोक इतरत्र गेले तर काय वेगळं करतील?
पण हिंदू कर्मदरिद्री एकाच गोष्टीत आहेत - त्यांच्यातलेच बरेच परधार्जिणे असतात
मग हा दोष परधर्मीयांचा कि हिंदुंचा? का परधार्जीणे होतात लोक? आपल्या धर्मातलं काय बोचतं त्यांना? इतराचं काय आवडतं? हि जर अनेक शतकांची समस्या आहे तर त्यावर कुठले उपाय केले धर्म सांभाळणार्‍यांनी? असो. इतरांना दोष देऊन समस्या सुटली असती तर आज जगात कुठलीच समस्या उरली नसती.

In reply to by अर्धवटराव

विशुमित 22/02/2019 - 11:41
पण हिंदू कर्मदरिद्री एकाच गोष्टीत आहेत - त्यांच्यातलेच बरेच परधार्जिणे असतात ==)) जाता जाता यांनी पण हिंदूंना नावे ठेवून गेले.

In reply to by ट्रेड मार्क

शांती राखुन प्रगती साधायला कसरत करायला लागणे आणि प्रगती न करणे यात खरच फरक करता येत नाहि तुम्हाला? मिपावर बरीच मांजरं आहेत. तुम्ही देखील त्यांच्याच पंगतीला जाऊन बसणार काय?

In reply to by विजुभाऊ

अर्धवटराव 22/02/2019 - 02:21
अनेक मुस्लीम सत्ता / संस्था हा अजेंडा डोक्यात ठेऊन असाव्यात. दुर्बळ देशांची ( किंवा त्यांना दुर्बळ करुन) भूमी/संपत्ती हस्तगत करणे, संसकृती नष्ट करणे, गुलामी लादणे, इह-परलोकांतल्या कल्याणाच्या मार्गावर चालताना काय वाटेल ते तुडवणे.... हि समस्या नवीन आहे काय? आपल्या धर्मात याचं भान ठेवायला स्कोपच नसेल तर दोष कुणाचा ?

In reply to by अर्धवटराव

आजानुकर्ण 22/02/2019 - 02:31
नाही तर काय! तिकडे उत्तर - दक्षिण अमेरिकेत स्थानिक संस्कृती आणि मूलनिवासींची संपूर्ण कत्तल करणार्‍या युरोपियनांबद्दल कळवळा येऊन हे ढसाढसा रडताहेत. दादाभाई नौरोजी, आंबेडकरांपासून अगदी शशी थरूर पर्यंत लोकांनी पुरावे देऊन भारताला कुणी सुटलंय हे सिद्ध करुनही आता वीसेक पिढ्या भारतात जन्मून तिथेच मेलेल्या टिपू, औरंगजेबादी मंडळींनी 'हिंदुस्तानावर हल्ले करुन संपत्ती लुटून नेली' असे हास्यास्पद आक्षेप घेताहेत.

In reply to by आजानुकर्ण

ट्रेड मार्क 22/02/2019 - 23:02
इथे मात्र तुम्ही म्हणताय "मग औरंगजेबानं तेव्हा जे केलं त्याला समस्त हिंदू समाजावरील अत्याचार मानून आता ऊर बडवण्यात काहीही अर्थ नाही ." आणि या प्रतिसादात मात्र "तिकडे उत्तर - दक्षिण अमेरिकेत स्थानिक संस्कृती आणि मूलनिवासींची संपूर्ण कत्तल करणार्‍या युरोपियनांबद्दल कळवळा येऊन हे ढसाढसा रडताहेत." दोन्हीकडे सामान न्याय का नको? बरं काही शतकांपूर्वी मुस्लिम आक्रमकांनी हिंदुस्थानवर केलेल्या अत्याचाराचं तुम्ही समर्थन करताय मग त्याच न्यायाने युरोपियनांनी उत्तर - दक्षिण अमेरिकेत स्थानिक लोकांवर केले. उत्तर - दक्षिण अमेरिकेत स्थानिक मुसलमान नव्हते. दुसरी गोष्ट म्हणजे, युरोपियनांनी काही शतकापूर्वी जे केलं ते केलं पण आताचे युरोपियन असं काही करत आहेत का? मुसलमानांची काही शतकांपूर्वी असेच अत्याचार जिथे गेले तिथे केले. पण आताही ते थांबत नाहीयेत ना, हा मुद्दा आहे. तुमच्या लक्षात येईल असे काही वाटत नाही, पण इतर वाचकांना कदाचित फायदा झाला तर... वीसेक पिढ्या भारतात जन्मून तिथेच मेलेल्या टिपू, औरंगजेबादी मंडळींनी 'हिंदुस्तानावर हल्ले करुन संपत्ती लुटून नेली' असे हास्यास्पद आक्षेप घेताहेत. वीसेक पिढ्या? टिपू, औरंगजेबादी कोणाच्या वीसेक पिढ्या भारतात होत्या? जरा आमच्या ज्ञानात भर पडेल. माझं मत विचारलं तर बाहेरून आक्रमण करून लुटणाऱ्यांपेक्षाही जिथे जन्मलो तिथल्याच लोकांवर अत्याचार करणारे जास्त दोषी आहेत. संपत्ती लुटून नेली म्हणजे तुमच्या पुढच्या गल्लीत राहणाऱ्या चोरांनी तुम्हाला लुटून संपत्ती त्यांच्या घरात नेली तर तुम्ही काय म्हणणार? बाकी सोयीस्कर नावे घेतलीत हे नमूद करतो. कारण घोरी, गझनी वगैरेंचा उल्लेख नाही केलात. तसेच टिपूबद्दल बोलताय तर तुम्हाला विजयनगर साम्राज्य, वाडियार वगैरे माहिती आहेत का हो? बादवे, तुम्हाला टिपू जयंती साजऱ्या करणाऱ्या कर्नाटकात विजयनगर व वाडियार साम्राज्यातील कोणत्या राजाची जयंती अथवा त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ काही सण साजरा करतात असं आठवतंय का हो?

In reply to by ट्रेड मार्क

आजानुकर्ण 23/02/2019 - 05:06
दोन्हीकडे सामान न्याय का नको?
क्लिष्ट वाक्यरचनेमुळे तुम्हाला समजायला अडचण येत आहे त्यामुळे सोप्या भाषेत लिहितो. औरंगजेबाने ज्या मंदिरांवर हल्ले केले त्या मंदिरांमध्ये बहुसंख्य (हिंदू मानल्या गेलेल्या) लोकांना प्रवेशच नव्हता. त्यामुळं तो हल्ला हिंदूंवर आहे असे मानता येत नाही. याउलट उत्तर-दक्षिण अमेरिकेत युरोपियनांनी संपूर्ण मूलनिवासींची कत्तल केली आहे. केवळ 200 वर्षाच्या युरोपीय राजवटीनंतर उत्तर-दक्षिण अमेरिकेत आता तोंडी लावण्यापुरते मूलनिवासी आढळतात, याउलट भारतीय उपखंडात 700 वर्षे मुस्लीम राज्य असूनही हिंदू बहुसंख्य आहेत. ज्या औरंगजेब-टिपूंनी 'भारतावर हल्ले करुन भारताला लुटले' त्यांनी ती लुटलेली संपत्ती त्याच देशात इन्वेस्ट केली, याउलट तुम्हाला पुळका असलेल्या युरोपियनांनी भारताला संपूर्ण धुवून नेल्याचे सविस्तर पुरावे आता उपलब्ध आहेत.
बरं काही शतकांपूर्वी मुस्लिम आक्रमकांनी हिंदुस्थानवर केलेल्या अत्याचाराचं तुम्ही समर्थन करताय मग त्याच न्यायाने युरोपियनांनी उत्तर - दक्षिण अमेरिकेत स्थानिक लोकांवर केले. उत्तर - दक्षिण अमेरिकेत स्थानिक मुसलमान नव्हते.
समर्थन? काहीही थापा मारु नका. मी अत्याचाराचं कुठं समर्थन करतोय. किती खोटं बोलाल. तुम्ही जी अत्याचाराची उदाहरणं देताय, आणि मुद्दाम थापा मारताय ते फक्त कसं चुकीचं आहे हे फक्त मी दाखवतोय.
वीसेक पिढ्या? टिपू, औरंगजेबादी कोणाच्या वीसेक पिढ्या भारतात होत्या? जरा आमच्या ज्ञानात भर पडेल. माझं मत विचारलं तर बाहेरून आक्रमण करून लुटणाऱ्यांपेक्षाही जिथे जन्मलो तिथल्याच लोकांवर अत्याचार करणारे जास्त दोषी आहेत. संपत्ती लुटून नेली म्हणजे तुमच्या पुढच्या गल्लीत राहणाऱ्या चोरांनी तुम्हाला लुटून संपत्ती त्यांच्या घरात नेली तर तुम्ही काय म्हणणार? बाकी सोयीस्कर नावे घेतलीत हे नमूद करतो. कारण घोरी, गझनी वगैरेंचा उल्लेख नाही केलात. तसेच टिपूबद्दल बोलताय तर तुम्हाला विजयनगर साम्राज्य, वाडियार वगैरे माहिती आहेत का हो? बादवे, तुम्हाला टिपू जयंती साजऱ्या करणाऱ्या कर्नाटकात विजयनगर व वाडियार साम्राज्यातील कोणत्या राजाची जयंती अथवा त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ काही सण साजरा करतात असं आठवतंय का हो?
अहो ह्या सगळ्या मुस्लीम राज्यकर्त्यांच्या आता वीसेक पिढ्या भारतात आहेत, तरीही त्यांना बाहेरुन आलेत अशा थापा लोकं अजूनही मारतात. याउलट अमेरिकेत जाऊन अगदी पहिल्या दुसऱ्या पिढीतच स्वतःला अमेरिकन म्हणवून घेण्यात ही कुजबूज आघाडी पुढे असते, त्यादृष्टीने म्हटले मी! तुम्ही घोरी, गझनी, अकबर, टिपू सगळ्यांना एकाच माळेत ओवताय यातच तुमचं इतिहासाचं आकलन दिसतंय.

In reply to by आजानुकर्ण

कार्तिकस्वामी मंदिरात विशिष्ट वयातील बायकांना प्रवेश नव्हता.. म्हणजे तो त्यांचा देव नव्हता का? वर्णव्यवस्था आणि देव या वेगवेगळ्या गोष्टी आहेत.. पंढरीला देवळात दर्शन नसलेले अनेक संत होऊन गेले.. जर योगायोगाने कोणी पंढरीचे मंदिर फोडले असते तर ते पण मला प्रवेश नाही, मग भंगू दे मंदिर असे म्हणत राहिले असते का? आपला एक विचार मांडला. पटला तर ठीक आहे, नाहीतर आहेच जकात आणि जिझिया.

In reply to by आनन्दा

आजानुकर्ण 23/02/2019 - 10:57
वर्णव्यवस्था आणि देव या वेगवेगळ्या गोष्टी आहेत.
मीही तेच म्हणतोय. हल्ले मंदिरांवर झाले होते. हिंदू धर्मावर नाही. मंदिरांवर हल्ले होण्याची वेगवेगळी कारणे असू शकतात. पूर्वीच्या काळी मंदिरांमध्ये संपत्ती साठवून ठेवली जायची.

In reply to by आजानुकर्ण

आनन्दा 23/02/2019 - 11:32
मंदिरे हे हिंदूचे श्रद्धास्थान होते, काही हिंदूची अजूनही आहेत.. पण तेव्हा सर्वसामान्य हिंदू मग तो अस्पृश्य जातीचा जरी असेल तरी त्यांची त्या देवावर श्रद्धा होती. अश्या परिस्थितीत मंदिरावर हल्ला म्हणजे श्रद्धेवर हल्ला. त्यामुळे मंदिरांवर हल्ला म्हणजे हिंदू धर्मावर हल्ला नव्हता असे म्हणणे चूक आहे.. जाता जाता 1. मला स्वतःला एक मुसलमानाने कसले तुम्ही मूर्ख, किती देवांची पूजा करता, तुम्ही नरकात जाणार असे डिवचले आहे, आणि अन्य काही उच्चशिक्षित मुस्लिम मुले देखील या मेंदूधुणी ला बळी पडलेली मी बघितली आहेत. मला धोका अल्लापासून नाही, पण अल्लाच्या बंद्या पासून नक्कीच आहे असे मी तेव्हापासून मानतो.. 2. मी वर शेअर केलेली लिंक कोणत्याही फेक आयडीची नाही. त्या असत्य असतील तर तसे सिद्ध करा. 3. जाता जाता एक प्रयोग करून बघायला सुचवतो तुमचे मुसलमान मित्र असतील त्यांना त्यांना एक एकट्याला गाठून एक साधा प्रश्न विचारा. समजा आपल्या शहरात सगळे मुसलमान झाले, आणि मुसलमानांनी जिहाद पुकारला, परंतु मी मुसलमान होऊ शकत नाही, आणि आश्रयाला तुझ्या घाईने येऊन लपून बसलो. दरवाज्याबाहेर जिहादी तुला माझा पत्ता विचारत आहेत. माझा पत्ता दिला तर तुला स्वर्ग मिळणार, नाही दिलास तर नरक. तू कोणाची निवड करशील - स्वर्गाची की दोस्ताची? 100 मुसलमान लोकांना हा प्रश्न विचारा, आणि शंभर हिंदू लोकांना हा प्रश्न विचारा. उत्तर तुम्हाला मिळून जाईल. तुमच्या मनाने उत्तर ठरवू नका, आणि समोरचा तुम्हाला तोंडदेखले हो म्हणत नाहीये ना याचा पण अंदाज घ्या. मी वर दिलेल्या लिंकामध्ये नेमका याचाच उल्लेख आहे, आणि माझे अनुभव पण मला तसाच विचार दर्शवतात. अजून एक, बूत शिकान आणि गाझी म्हणजे काय ते थोडे मला समजावून सांगा आणि तीन, मध्ययुगीन व्यवस्थेचे मोजमाप आजच्या काळाच्या कसोटीवर करू नका... आम्ही मुलासमानाना यासाठी नावे ठेवत नाही की त्यांनी मंदिरे फोडली, पण आम्हाला याची भीती आहे की ते अजून मध्ययुगीन मानसिकता आणि झापडबंद धर्म यातून बाहेरच पडायला तयार नाहीत.. अश्या परिस्थितीत त्यांच्या हातातील आधुनिक तंत्रज्ञान इतर खऱ्या शांतताप्रिय समाजाच्या मुळावर उठू लागले आहे... आम्ही फक्त मुसलमान लोकांनाच शिव्या घालतो का, तर नाही. परंतु तलवारीच्या किंवा पैश्याच्या बळावर धर्मांतरण करू इच्छिणाऱ्या सगळ्या लोकांचा मला राग आहे. त्यातल्या त्यात पैसेवाले बरे, कारण त्यांच्यामुळे कोणाचे तरी राहणीमान "थोडेसे" सुधारते, पण नंतर ते लोक देखील तशीच अस्पृश्यता वगैरे पाळतात, त्यामुळे भारतात जातीव्यवस्था देखील धर्मातीत आहे, त्यामुळे नावे कोणाला ठेवणार? ठेवायची असेल तर भारतीय संस्कृतीला ठेवा.. फक्त हिंदूना का?

In reply to by आजानुकर्ण

आनन्दा 23/02/2019 - 09:48
जाता जाता 20 पिढ्या इथे राहिलेले लोक 50 पिढ्या इथे राहिलेल्या लोकांशी स्वतंत्र भारतात कसे वागले ते पण एकदा बघा.. https://m.facebook.com/story.php?story_fbid=10156427533747326&id=652482325 नाहीतर हे सगळं खोटं आहे असे म्हणून टाका, म्हणजे मी तरी काय ते समजून जाईन. एकच सांगू इच्छितो. हिंदू आज जे वागतायत ती प्रतिक्रिया आहे. मी स्वतः radical मुसलमानांचे काही अनुभव घेतले आहेत. तोपर्यंत मी पण तुमच्या सारखाच उदारमतवादी वगैरे होतो. पण प्रत्येक जण अनुभव घेईपर्यंत थांबायला आता वेळ नाही.. दुर्दैवाने

In reply to by आनन्दा

आजानुकर्ण 23/02/2019 - 10:58
फेसबुकमधल्या रँडम फेक आयडीच्या पोस्ट ह्या पुरावे म्हणून ग्राह्य धरायच्या का आता?

In reply to by आजानुकर्ण

भंकस बाबा 23/02/2019 - 10:01
तुम्ही एका फटक्यात शिवाजी महाराज, राणा प्रताप , बाजीराव पेशवे यांना गारद केलेत. ओरंग्याने (इथे कुत्रा, गाढव, डूक्कर ऐसे लिहिन्याची इच्छा होती पण ह्या जनावराचा अपमान होतो म्हणून है टाळतो) मंदिरे तोडली यात त्याचा काही उपेक्षित समाजाला न्याय मिळवून द्यायची नीति नव्हती, तर धर्मप्रसार करणे है उद्दिष्ट होते. मग त्यासाठी खून , बलात्कार , आक्रमण हे प्रकार आम होते. त्याने मंदिरे पाडुन बहुजनसमाजासाठी खुली केली नाही तर त्यांना दहशत देण्यासाठी हे दाखवून दिले की तुमच्या देवाच्या मूर्तित स्वसंरक्षण करण्याची ताकत नाही. अगदी आपल्या पहिल्या पंतप्रधान नेहरुचि मानसिकता देखील अशीच होती म्हणून त्यानी डिसकवरी ऑफ इंडिया मधे शिवाजी महाराजांचा उल्लेख अपमानास्पद केला , आणि आमची सहिष्णुता इतकी की आम्ही नेहरुना माफ देखील केले, महाराष्ट्र राज्याने जर तेव्हाच मराठी बाणा दाखवला असता तर है लांगुलचालन आज तरी कमी प्रमाणात असते. राहिली गोष्ट दक्षिण अमेरिकेतील स्थानिक लोंकाची तर हे लोक पूर्ण संघटित नव्हते , त्यांना राणा प्रताप , शिवाजी महाराजासारखे नेते लाभले नाहीत , आणि मुख्य कारण म्हणजे त्यांच्यात असलेल्या चालिरिति अत्यंत अघोरी होत्या. साहेब तुम्ही तर इतिहास बदलायला चालला आहात, ओरंगया जर क्रूर होता तर त्याची नाव असलेले सर्व सार्वजनीक वास्तु वा पथांची नावे बदलली पाहिजेत , पण तसे होत नाही कारण तुमच्यासारखे लोक त्याचे उद्दात्तिकरण करतात

In reply to by भंकस बाबा

आजानुकर्ण 23/02/2019 - 10:52
भंकस बाबा, भंकसगिरी कशाला करता. झापडं लावली की जे लिहिलं नाही तेही दिसू लागतं की काय? मी शिवाजी महाराज, बाजीराव (पहिला), किंवा राणा प्रताप यांना कसं गारद केलंय? शिवाजीराजांचं कार्य अतुलनीय आहे. पहिला बाजीरावही व्हिजनरी योद्धा होता. त्यांना कुठं कमी दाखवलंय. की उगीच स्वतःच्या डोक्यातली घाण दुसऱ्याच्या नावावर भंकसगिरी करुन खपवायची? औरंगजेबाने न्याय मिळवून देण्यासाठी मंदिरांवर हल्ले केलेत हा जावईशोध तुम्ही कुठून लावला? आणि इथं मी औरंगजेबाचं उदात्तीकरण करतोय असं तुम्हाला का बरं वाटलं. तुम्हाला वाचनाचे प्राथमिक धडे घेण्याची नितांत गरज आहे.

In reply to by आजानुकर्ण

भंकस बाबा 23/02/2019 - 17:19
मी कुठे लिहिले आहे की सामाजिक न्याय मिळण्यासाठी ओरंगयाने मंदिरे तोडली. वर तुम्हीच लिहित आहात की मंदिरातील संपत्ति लुटन्यासाठी मंदिरे फोड़ली असावीत, धन्य आहे तुमची! म्हणजे तुम्ही शांतिप्रिय धर्माचे धर्मवेड पण ह्या सेक्युलर विधानाखाली दाबून टाकत आहात, जियो मेरे लाल बादवे रागाला भेटला होतात क़ाय?

In reply to by आजानुकर्ण

अर्धवटराव 24/02/2019 - 00:53
औरंगजेबाने मंदीर नावाच्या वास्तुवर हातोडा नाहि चालवला, तर त्याने त्याच्या दृष्टीने धर्मकृत्यच केलं. आणि तो हिंदु धर्मावरच आघात होता. मुस्लीम राज्यकर्त्यांच्या कृत्याचं जस्टीफीकेशन हिंदुंच्या जातीव्यवस्थेतल्या विषमतेच्या आधारे देता येत नाहि.

In reply to by आजानुकर्ण

ट्रेड मार्क 25/02/2019 - 05:15
औरंगजेबाने ज्या मंदिरांवर हल्ले केले त्या मंदिरांमध्ये बहुसंख्य (हिंदू मानल्या गेलेल्या) लोकांना प्रवेशच नव्हता. त्यामुळं तो हल्ला हिंदूंवर आहे असे मानता येत नाही. उदाहरणासहित स्पष्ट करा. काही प्रश्न आहेत, त्या सगळ्यांची पुराव्यासहित उत्तरे द्या. १. कोणती मंदिरे औरंगझेबाने पाडली आणि त्यातील कोणत्या कोणत्या मंदिरांमध्ये कोणत्या हिंदूंना प्रवेश नव्हता? २. ज्या हिंदू गटाला ज्या मंदिरांमध्ये प्रवेश होता असं तुम्ही म्हणताय, ते मंदिर पडणे त्या "हिंदू" गटाच्या धर्मावर हल्ला का मानू नये? ३. त्याने कुठल्या एकाच हिंदू गटाची मंदिरे तोडली का? ४. ही मंदिरे तोडण्यामागचा उद्देश समस्त हिंदूंना प्रवेश मिळवून द्यावा असा होता का? ५. मंदिरांमधील संपत्ती लुटण्यासाठी मंदिरे, विशेषतः देवांच्या मुर्त्या, तोडण्याची काय गरज होती? याउलट भारतीय उपखंडात 700 वर्षे मुस्लीम राज्य असूनही हिंदू बहुसंख्य आहेत. भारतीय उपखंडात काही शतके विविध युरोपियन राज्यकर्ते येऊनही हिंदूंची संख्या बहुसंख्य आहेच. वर त्यांना हुसकून लावण्यात हिंदू यशस्वीसुद्धा झाले. ज्या औरंगजेब-टिपूंनी 'भारतावर हल्ले करुन भारताला लुटले' त्यांनी ती लुटलेली संपत्ती त्याच देशात इन्वेस्ट केली माझा रोख संपत्ती (पैसे, सोने, जवाहीर) यांच्या पेक्षा मनुष्यसंपत्तीवर आहे. पहिल्यापासून मी फक्त या लोकांनी हिंदू स्त्रियांवर केलेले अत्याचार आणि तरुण पुरुषांची कत्तल यावरच बोलत आहे. संपत्तीचे कारण तुम्ही मध्ये घुसडलेत. तुम्ही जी अत्याचाराची उदाहरणं देताय, आणि मुद्दाम थापा मारताय ते फक्त कसं चुकीचं आहे हे फक्त मी दाखवतोय. म्हणजे मुस्लिम शासकांनी अत्याचार केले नाहीत असं तुम्हाला म्हणायचंय? किंवा केले तरी फक्त पैसे लुटण्यासाठी केले? अहो ह्या सगळ्या मुस्लीम राज्यकर्त्यांच्या आता वीसेक पिढ्या भारतात आहेत, तरीही त्यांना बाहेरुन आलेत अशा थापा लोकं अजूनही मारतात. तुम्हाला खरंच आकलनाचा प्रॉब्लेम आहे किंवा विस्मरण होतं किंवा तुमच्या डोक्यात प्रचंड गोंधळ आहे. मुस्लिम हे हिंदुस्थानातले मूलनिवासी नाहीत हे तर तुम्हाला मान्य आहे? हे लोक बाहेरून आले आणि आक्रमण केले. केवळ राज्य/ साम्राज्य विस्तार करण्यासाठी हे पूर्वी चालत होतेच. पण मुस्लिमांचे आक्रमण हे नुसते साम्राज्य विस्तारासाठी नसून इस्लामिक राज्य निर्माण करण्यासाठी होते. जरी ते भारतातच राहिले तरी त्यांचा उद्देश हिंदूंना धर्मांतरित करणे हाच होता. त्यासाठी त्यांनी अवलंबलेले मार्ग हे फार क्रूर होते हे तुम्ही नाकारू शकाल का? घोरी, गझनी, अकबर, टिपू सगळ्यांना एकाच माळेत ओवताय यातच तुमचं इतिहासाचं आकलन दिसतंय. संदर्भासहित स्पष्टीकरण द्यावे. सांगा बघू हे सगळे कसे वेगवेगळे होते? यातल्या कोणी हिंदूंवर अत्याचार केले नाहीत? कोणी देवळे तोडली नाहीत? कोणी हिंदू स्त्रियांवर बलात्कार केले नाहीत? चला तुमचा इतिहासाच्या अभ्यासावर तुम्हाला एवढा गर्व आहे ना, तर स्वीकार हे आव्हान आणि एक मस्त लेखमाला येऊ द्या प्रत्येक मुस्लिम आक्रमक, राजा, सम्राट या सगळ्यांबद्दल लिहा.

In reply to by आजानुकर्ण

भारत सोडून इतर राष्ट्रे पण बघा. हा लेख वाचा. आफ्रिका: साधारण 7th century CE मध्ये आफ्रिकेत इस्लामिक आक्रमण झाले. आज आफ्रिका खंडात जवळपास ५०% मुस्लिम लोकसंख्या आहे. तिथे काय होतंय हे माहित असेलच. पर्शिया: तुम्हाला पर्शिया माहित असेलच, तिथे झोराष्ट्रीयन धर्म होता. तिथे मुस्लिम आक्रमण जवळपास सन ६३३ ला झाले, तेथील स्थानिकांना इस्लाम स्वीकारा म्हणून सांगितले गेलं. ज्यांनी स्वीकारला ते शाबूत राहिले आणि ज्यांनी नाही म्हणले त्यांना बळजबरीने धर्मांतरित करण्याचा प्रयत्न झाला आणि झोराष्ट्रीयन धर्म पर्शियामधून अस्तंगत झाला. साधारण १००० वर्षांमध्ये पर्शिया मुस्लिम नेशन झाला. याआधीच पारशी काही लोक निसटून भारतात पळून आले आणि स्थायिक झाले. हे इतके भारतीय संस्कृतीत मिसळून गेले की पारशी लोकांचे आपल्या देशाच्या प्रगतीत खूप मोठे योगदान दिले. या पारशी लोकांनी कधी कोणाला धर्मांतरित करण्याचा प्रयत्न केला का? अलीकडेच इराकमध्ये यझदी लोकांवर कसे अत्याचार झाले हे ऐकले असेलच. युरोप: युरोपातील आक्रमण हे बऱ्याच अलीकडच्या काळातील आहे. पण आता तिथे काय चालू आहे हे डोळे आणि कान उघडे ठेऊन बघा/ एक म्हणजे समजेल. उत्तर अमेरिका: यात अमेरिका आणि कॅनडा दोन्ही आलं. दोन्ही देशांत वेगाने मुस्लिम लोकसंख्या वाढत आहे. बहुतेक सर्व दुकानांत हलाल फूड मिळते. यात फक्त नॉन-व्हेज नसून, व्हेज हलाल पण आहे (कसं काय हे कोणीतरी समजावेल का?). बीफ मिळण्याचं प्रमाण प्रचंड आहे पण त्याप्रमाणात पोर्क बऱ्यापैकी कमी झालं आहे. यावरून काय निष्कर्ष काढता येतो? तर पूर्वी जिथे इस्लामिक आक्रमण व्हायचे तेव्हा ते तलवारीच्या बळावर तिथल्या स्थानिक लोकांवर अत्याचार करून तिथल्या धार्मिक खुणा पुसून होत होते. आता आधुनिक काळात परिस्थिती पण बदलली, आता हे लोक जमेल त्या मार्गाने एखाद्या देशात जातात, मग यात रेफ्युजी म्हणून, वैधअवैध मार्गाने, मानवतावादाला वेठीला धरून कसेही जातात. हळूहळू तिथली त्यांची लोकसंख्या वाढायला लागल्यावर मग शरिया लागू करण्याचा आग्रह धरतात. मधल्या काळात छुपे सांस्कृतिक आक्रमण चालूच असते. तरुण मुलींना नादाला लावणे, तरुण मुलांचे ब्रेनवॉश करणे, स्थानिक राजकारणात व प्रशासनात वर्चस्व निर्माण करणे हे चालूच असते. थोडक्यात सांगायचं म्हणजे आक्रमणाची पद्धत बदलली पण उद्देश मात्र तोच आहे. दुर्दैव हे आहे की युरोपात पण स्थानिक लोक अजून खोट्या सेक्युलॅरिझमच्या प्रभावात आहेत. तसेच भारतात सुद्धा आहेतच. येणार काळच सांगेल आपले भवितव्य काय आहे. उद्या आपल्याच पोरीबाळींना एखाद्याने नादाला लावून जबरदस्तीने निकाह करायला लावला आणि नंतर धर्मात सांगितले म्हणून ३ सवती आणून ठेवल्या अथवा ३ वेळा तलाक म्हणून सोडून दिले आणि नंतर परत स्वीकारण्यासाठी निकाह हलाला करायला भाग पाडले असे होऊ नये म्हणून एवढे प्रतिसाद लिहिले. प्रकाश पडला तर ठीक नाहीतर जो तो आपल्या कर्माने जे होईल ते भोगेलच.

In reply to by अर्धवटराव

ट्रेड मार्क 22/02/2019 - 23:23
तुमच्या विखुरलेल्या प्रतिसादांना एकच प्रतिसाद देतो. दोष कुणाचा? हा तुमचा प्रश्न आहे. दोष हिंदूंचाच आहे, हिंदूंमध्ये असलेल्या सहिष्णुतेचा आहे, घरभेद्यांचा व फितुरांचा आहे, डोळ्यावर आणि बुद्धीवर लावलेल्या झापडांचा आहे. पण आता काही हिंदू जागे होत आहेत, ज्यांना जाणवतंय की आपल्याला सावत्र वागणूक मिळतेय आणि आपल्या सहिष्णुतेचा इतर धर्मीय फायदा उठवत आहेत. सगळ्यात मोठा दोष या हिंदूंविरुद्ध खोटे रान उठवणाऱ्या सेक्युलर हिंदूंचा आहे. भगवा आतंकवाद म्हणणारे कोणत्या धर्माचे होते? ही भाकडकथा खरी आहे हे सिद्ध करण्यासाठी झटणारे, खोटे पुरावे तयार करणारे कुठल्या धर्माचे होते? मूठभर हिंदू देवळांमध्ये पूर्वापार चालत आलेली प्रथा म्हणून स्त्रियांना प्रवेश नाही याविरुद्ध आरडाओरडा करणारे कुठल्या धर्माचे होते/ आहेत? हिंदूं संस्कृतीची, देवदेवतांची चेष्टा करणाऱ्या सिनेमांना शेकडो कोटींचे उत्पन्न मिळवून देणारे कोण आहेत? अशी चेष्टा करणाऱ्या सिनेमांना/ सीन्स ना विरोध करणाऱ्यांना असहिष्णू म्हणून त्यांच्याशीच भांडणारे कोण आहेत? भारत तेरे तुकडे होंगे म्हणून घोषणा देणारे कोण आहेत? त्यांचे समर्थन करणारे कोण आहेत? अतिरेक्यांच्या फाशीला स्थगिती मिळावी म्हणून जीवाचे रान करणारे, रात्री १२ वाजता कोर्ट उघडायला लावणारे कोण आहेत? माझ्या मते हे सगळे जास्त दोषी आहेत. घरभेदी नेहमीच जास्त धोकादायक असतात. आणि असे घरभेदी तयार करण्यासाठी ब्रेनवॉशिंग बऱ्याच काळापासून चालू आहे. (आता आजानुकर्ण आणि इतर काही पुरावे मागतील. पण स्वतः मात्र एकही मुद्देसूद उत्तर देणार नाहीत, सुसूत्र विचार मांडणार नाहीत आणि पुरावे देण्याची गोष्ट तर लांबच राहिली). अनेक मुस्लीम सत्ता / संस्था हा अजेंडा डोक्यात ठेऊन असाव्यात. असाव्यात नाही आहेतच. हा अजेंडाच तर लक्षात यायला आणि घ्यायला हवा. पण याच मुस्लिम सत्ता जे अत्याचार करतात ते बरोबर मानून त्यांना विरोध करणारे दोषी हे आपले नावाने (का नावापुरते) "हिंदू" लोक आहेत, त्यांचं काय करायचं? मिपावरच्याच काही धाग्यांमध्ये याचे पुरावे काही प्रतिसादांमध्ये मिळतील.

In reply to by ट्रेड मार्क

अर्धवटराव 23/02/2019 - 00:09
दोष हिंदूंचाच आहे, हिंदूंमध्ये असलेल्या सहिष्णुतेचा आहे, घरभेद्यांचा व फितुरांचा आहे, डोळ्यावर आणि बुद्धीवर लावलेल्या झापडांचा आहे.
सहिष्णुता दोष नसुन बावळाटपणा हा दोष आहे. घरभेदी, फितुर वगैरे सेकंडरी इश्यु आहेत. आपल्या समस्येकरता इतरांना जबाबदार धरण्याची झापडं काढली तरी मॅक्झीमम प्रॉब्लेम दूर होतील.

In reply to by अर्धवटराव

ट्रेड मार्क 24/02/2019 - 01:08
सहिष्णुता दोष नसुन बावळाटपणा हा दोष आहे. सहिष्णू लोक बावळट आहेत असं म्हणायचंय? सगळे लोक बावळट नाहीत ना? ज्यांना परिस्थिती कुठे चाललीये हे समजतंय ते लोक प्रतिकार करत आहेत, त्यांना करू दे की. घरभेदी, फितुर वगैरे सेकंडरी इश्यु आहेत. हा समज अजून एक मोठा प्रॉब्लेम आहे. आपल्या समस्येकरता इतरांना जबाबदार धरण्याची झापडं काढली तरी मॅक्झीमम प्रॉब्लेम दूर होतील. आपली कुठली समस्या? सहिष्णुता का फितुरी का आपल्याला परिस्थितीची जाणीव नाही ही?

In reply to by ट्रेड मार्क

पण स्वतः मात्र एकही मुद्देसूद उत्तर देणार नाहीत
मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देतो पण त्यापूर्वी हिंदूंच्या कुठल्या चांगल्या प्रथा आता वाईट म्हणून शिकवत आहेत, आणि औरंगजेब-तैमूर यांचे गोडवे गात इतिहास शिकवला जातोय याचे पुरावे तुम्ही कधी देणार ते सांगा. की खोटे बोलणे आणि थापा मारणे हा तुमचा ट्रेड मार्क झालाय!

In reply to by आजानुकर्ण

ट्रेड मार्क 24/02/2019 - 01:01
मी सांगतोय त्यावर तुमचा विश्वास बसणार नाही म्हणून मी तुम्हाला एक प्रयोग करायला सांगितला होता. तुमच्या आसपासच्या शाळकरी मुलांना हिंदू सम्राट, राजे यांची किती माहिती आहे ते बघा आणि मुस्लिम राज्यकर्त्यांची किती माहिती आहे ते बघा. बाकी माझ्या लहानपणी घरात रोज देवांची पूजा व्हायची, संध्याकाळी देवासमोर दिवा लावून शुभंकरोती म्हणाली जायची. त्यातून काही झालं तरी सुटका नसायची. आता किती घरात हे सगळे किंवा एक तरी होतं? परत एक प्रयोग करा, किती शाळकरी मुलांना शुभंकरोती म्हणता येतं, देवाची कुठली कुठली स्तोत्र पाठ आहेत हे विचारा. किती घरांमध्ये रोज पूजा होते हे विचारा. कॉलेजमधली किती मुलं नेमाने देवळात जातात ते विचारा. तुमचे तुम्हालाच कळेल.

In reply to by ट्रेड मार्क

भंकस बाबा 24/02/2019 - 20:16
आणि आमच्या शांतता प्रिय धर्माचे 95% टक्के मुले मदर्शात जातात, अरबी शिकवण्यासाठी घरी शिक्षक ठेवतात, कारण विचारले तर सांगतात की जन्नतमधे फक्त अरबी बोलली जाते . आता आजानुकर्ण याना खुमखुमी येईल की 95% आकड़ा कुठून काढला, तर तुमच्या माहितिसाठी सांगतो मी ज्या भागात रहातो तो मुस्लिमबहुल भाग आहे, तिथे 100 टक्के लोक आपल्या मुलाना मदर्शात पाठवतात वा घरी मौलानाला बोलवतात, 5% मी माझ्या मनाचेच कमी केले हो!

In reply to by आजानुकर्ण

ट्रेड मार्क 24/02/2019 - 01:03
मी विचारलेल्या प्रश्नांची मुद्देसूद उत्तरे दिलीत आणि तुम्ही जे दावे करताय त्याचे पुरावे दिलेत की मी पण पुरावे देतो.

In reply to by आजानुकर्ण

डँबिस००७ 24/02/2019 - 17:53
कर्नाटकात २०१५ साली काँग्रेस सरकारने टीपु जयंती सुरु केली !! देशाच्या राजधानी दिल्लीत औरंगजेब रोड काल पर्यंत होता !! एका विद्वान कॅनडीयन ( मुळचा पाकिस्तानी ) असलेल्या माणसाने ( श्री ताहेर फतेह )नी विचारल की एका क्रुर हुकुमशहा ज्याने लाखो हिंदुं ची कत्तल केली, मंदिरे तोडली, आया बहीणींवर अत्याचार केले त्याच्या नावाने हिंदु बहुल देशात रस्ता कसा काय असु शकतो? त्यावर कोणाकडेही उत्तर नव्हते ! म्हणुन त्यांनी रस्त्याच नाव बदलण्याचा प्रस्ताव दिला ! देशात मुसलमानांचा प्रॉब्लेम हा आहे की काँग्रेसवाले त्यांना शिकवतात आणी आपल हि त कश्यात आहे ह्याचा विचार न करता मुसलमान लोक त्या ट्रॅप मध्ये फसतात. टिपुमुसलमान असला तरी त्याची जयंती साजरी करणे हे मुसलमान रिवाजाच्या विरुद्ध आहे ! पण लाखो हिंदुंची कत्तल करणार्या टिपुच्या जयंतीमुळे हिंदु बिथरतात त्यांच्या जखमावरची खपली परत काढली जाईल हे माहीत असुन काँग्रेसवाल्यांनी हे असे प्रकार सुरु केले व मुसलमानांना त्यात सहभागी करुन घेतल. टिपु जयंती साजरी करण्यात ह्यांना काहीही प्रॉब्लेम नाही ? काँग्रेसच्या ह्याच नितीमुळे लोक हळुहळु काँग्रेसपासुन दुर झाले आहेत.

In reply to by डँबिस००७

अभ्या.. 24/02/2019 - 20:14
टिपुच्या जयंतीमुळे हिंदु बिथरतात त्यांच्या जखमावरची खपली परत काढली जाईल हे माहीत असुन काँग्रेसवाल्यांनी हे असे प्रकार सुरु केले व मुसलमानांना त्यात सहभागी करुन घेतल. काँग्रेसमधे असलेले हिंदू बिथरत नाहीत का?
कर्नाटकात २०१५ साली काँग्रेस सरकारने टीपु जयंती सुरु केली !!
मग २०१८ ला येडी आले तेंव्हा बंद करायची. त्यात काय येवढं.

In reply to by अभ्या..

भंकस बाबा 24/02/2019 - 20:21
2018 मधे येडी कुठे आले हो ? नाय आजकाल अतिरिक्त वाचन होतच नाही , तुमच्यासारखे काही मौलिक माहिती देतील तर आमचे भलेच होईल

In reply to by भंकस बाबा

अभ्या.. 24/02/2019 - 20:37
१७ मे २०१८ ला नाय का सिंगल लार्जेस्ट पार्टि म्हनून शपथ घेतली. १९ मे पर्यंत अडीच दिवस नव्हते का सीएम? नाय आजकाल अतिरिक्त वाचन होतच नाही मग पेस्टवता त्या लिंकाबाजारातला माल काय वरुन येतो काय तुमच्या सीएनएफला?

In reply to by भंकस बाबा

अभ्या.. 25/02/2019 - 00:50
व्हय, त्यातली आमरिषपूरी आणि सौरभ शुक्लाची जोडगोळी लै भारी. ते कल्लूमामा तर खत्रा. त्याला पक्षध्यक्षचा रोल द्यायला पाहिजे होता.

In reply to by अभ्या..

डँबिस००७ 24/02/2019 - 22:16
काँग्रेसमधे असलेले हिंदू बिथरत नाहीत का? म्हणजे कॉंग्रेस मधले न बिथरणारे हिंदु सोडले तर बाकीच्या हिंदुच काय तुम्हाला काही घेण देण नाही अस तुमच म्हणण आहे हे स्पष्ट झाल !! कॉंग्रेस पक्षातील हिंदु नेत्यांनीच जाणुन बुजुन सरसकट हिंदु लोकांना, हिंदु धर्माला अतिरेकी घोषित केल कारण तेंव्हा पर्यंत टेररिस्ट म्हणजे ईस्लाम आणि ईस्लाम म्हणजे टेररिस्ट हे मानल जायच ! कॉंग्रेस सारखा निच पक्ष नाही !! हिंदु लोकांचा अंत पाहिला आहे !! ह्याच हिंदु नेत्यांनी "ओसामा जी","अफझल गुरु जी" सारख्या कुख्यात अतिरेक्यांना आदराने "जी" लावुन संबोधल होत !!

In reply to by डँबिस००७

भंकस बाबा 24/02/2019 - 23:58
ते कोर्टातले शपथपत्र विसरलात! राम आणि रामसेतु काल्पनिक आहेत म्हणून आपले अभ्या भाऊ प्रकाश घालतीलच या मुद्द्यावर काहीतरी मजबूरी असेल ना या इटालियन पक्षाची?

In reply to by अभ्या..

भंकस बाबा 24/02/2019 - 23:50
2018 मधे येडी कुठे आले हो ? नाय आजकाल अतिरिक्त वाचन होतच नाही , तुमच्यासारखे काही मौलिक माहिती देतील तर आमचे भलेच होईल

In reply to by अभ्या..

भंकस बाबा 25/02/2019 - 00:05
युरोपात व अमेरिकेत देखील भरपूर आहेत, तिथे काही शिख धर्मियावर मुस्लिम समजून हल्ले झाले , पण तिथल्या एकाही राजकीय पक्षाने ख्रिस्ती आंतकी म्हणून बोंबा नाही मारल्या . अशी पवित्र कामे कोंग्रेसच करू जाणे

NiluMP 19/02/2019 - 22:32
The official policy of Japan is not to give citizenship to Muslims who come to Japan, and even permits for permanent residency are given sparingly to Muslims.

In reply to by NiluMP

अर्धवटराव 22/02/2019 - 02:24
जपानचा आदर्श घेऊन आपलं राष्ट्र सुव्यवस्थीत करावं आणि सर्वांगाने प्रोटेक्ट करावं. कुणी रोखलय भारताला? भारत जर तसं करु शकत नसेल तर दोष कोणाचा?

गामा पैलवान 22/02/2019 - 19:06
आजानुकर्ण, तुमचा इथला प्रतिसाद वाचला. माझी मतं सांगतो. १.
मंदिरं पाडणं हे 'हिंदूं'वरील अत्याचाराचं उदाहरण होऊ शकत नाही.
देवदेवतांना आम्ही हिंदू आईबाप मानतो. कळविण्यास अत्यंत आनंद होतो की आम्ही मेल्या आईचं दूध प्यालेलो नाही. भारताला कोण्या नेत्याबित्याने एकसंध ठेवलं नसून आमच्या देवांमुळे भारत एक आहे. मंदिर पाडणे हा भारतीय एकात्मतेवरचा आघात आहेच. भले कोणी नास्तिक भारतीय असला तरीही त्याने मंदिरांचं संरक्षण केलंच पाहिजे. २.
पण हे मंदिर संपूर्ण हिंदू समाजाचं प्रतिनिधित्व करतं का?
हो. निदान औरंग्या तरी तसंच मानतो. ३.
अगदी स्वातंत्र्यानंतर मंदिर प्रवेशासाठी आंदोलनं करावी लागली आहेत.
त्या आंदोलनांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला ना? कायद्याने अस्पृश्यता नष्ट झालेली आहे. ४.
मग औरंगजेबानं तेव्हा जे केलं त्याला समस्त हिंदू समाजावरील अत्याचार मानून आता ऊर बडवण्यात काहीही अर्थ नाही .
मग काय घराला आग लागल्यावर विहीर खणायला घ्यायची म्हणता? धन्य आहे! ५.
दुसरं असं की शेकडो वर्षाच्या मुसलमानी राजवटीनंतरही फुल्यांसारख्या द्रष्ट्या विचारवंताला महंमदाचा पोवाडा लिहून मुसलमानी आक्रमणाचे आभार मानावे वाटले यात, मुसलमानी सत्तेचा त्रास सामान्य जनतेला फारसा होत नव्हता असे मानायला हरकत नाही.
कम्युनिस्ट क्रांतीचे पोवाडे तर रशियातही गायले जायचे. मग अचानक ७० वर्षांनी स्टालिन व लेनिनचे पुतळे पाडण्यात आलेच ना तथाकथित सोव्हियेत साम्राज्यात? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

जग सोडा पण भारतात जरी bagital तरी खूप महापुरुषांनी ह्या भूमीवर जन्म घेतला आणि स्वतचं पूर्ण आयुष्य लोक कल्याणासाठी कुर्बान केले . ह्या सर्व महापुरुषंच्या विचाराची सर्वात जास्त वाट कोण्ही लावली आसेल तर त्यांच्याच बेगडी अनुयानी .आसच दिसेल समाजात
चर्चेचं गुऱ्हाळ विषारी रस निर्माण करताय . ऐकाच ध्येय पाकिस्तान शत्रू राष्ट्र आहे आणि पाकिस्तानच आडमार्गाने samardhan करणारे हिंदुस्थानी हिताची भूमिका घेवू शकणार नाहीत . तेव्हा निर्णय प्रक्रिये मध्ये त्यांचा सहभाग आसता काना नये हीच काळजी घेणे