Skip to main content

समाज

(विचार)मंथन!

लेखक राघव यांनी शुक्रवार, 23/01/2009 या दिवशी प्रकाशित केले.
काही दिवसांपुर्वी, बंगळूरात मित्रासमवेत राहत असतांना, एका दिवसभरात कमीत कमी ४ ते ५ अशा लोकांशी बोलणं झालं जे आपापल्या आयुष्यातल्या दु:खाला वैतागलेले होतेत. दोघा जणांनी तर जगण्यात काही राम नाही उरला असा निष्कर्षही काढून टाकला! अशावेळी शांतपणे समोरच्या व्यक्तीचे म्हणणे ऐकून घ्यायचे (व उगाच सांत्वन-प्रोत्साहनपर शब्द, त्यांना आलेल्या अडचणींवर उपाय शोधण्याचा प्रयत्न असले काहीही करायचे नाही !!) हे अनुभवाने आलेले शहाणपण वापरले व Be a Good Listener असाच वागलो! पण रात्री झोपण्याच्या प्रयत्नांत असतांना त्या सर्व गोष्टी परत आठवल्या अन् विचारांचे काहूर माजले.

बंडखोर मिपा संपादकीय - मराठी आंतरजाल आणि त्याचा विकास (ऊहापोह)

लेखक शक्तिमान यांनी शुक्रवार, 23/01/2009 या दिवशी प्रकाशित केले.
डिस्क्लेमर ०: (काही प्रतिसाद वाचून या लेखाबद्द्ल खुलासा करण्यासाठी हा डिस्क्लेमर टाकण्यात आलेला आहे) हा लेख विनोदी आहे असे समजून वाचावा. 'बंडखोर मिपा संपादकीय' ही पार्श्वभूमी केवळ विनोदनिर्मीतीसाठी वापरली आहे. डिस्क्लेमर १: येथे सत्य परिस्थिती मांडण्याचा प्रयत्न केला आहे. लेख काल्पनिक वाटल्यास त्यास लेखक जबाबदार नाही. या वेळचे बंडखोर मिपा संपादकीय हे एका गहन परंतु दुर्लक्षित विषयाला समर्पित आहे.

धैर्य धुरंधर आणि दहशतवादी पक्षी

लेखक कपिल काळे यांनी रविवार, 18/01/2009 या दिवशी प्रकाशित केले.
न्यूयॉर्कमधून उड्डाण केलेल्या १५० प्रवाश्यांना घेउन जाणारया यू.एस एअरवेजच्या विमानाला पक्षी धडकल्यामुळे, विमानाची दोन्ही इंजिन बंद पडली. त्यामुळे कप्तान सुलेनबर्गर ह्यांनी विमान हडसन नदीत उतरवले. ह्या त्यांच्या धाडसी निर्णयामुळे मोठी जिवीतहानी वाचली. ११ सप्टेंबरसारखा दुर्दैवी प्रसंग टाळण्यासाठी कप्तानाने लोकवस्तीचा भाग टाळून विमान नदीवर उतरवले. आधुनिक विमाने पाण्यावर बराच काळ तरंगू शकतात. त्यासाठी पाण्यावर विमान उतरवण्याचेही खास कसब लागते. त्यापेक्षाही प्रसंगावधान महत्त्वाचे.

घरटे ३!!! सत्यकथेवर आधारित

लेखक चेतन१२३प यांनी शनिवार, 17/01/2009 या दिवशी प्रकाशित केले.
...... श्रावण महिन्यातली ती एक साधारण सायंकाळ होती. सूर्य अस्ताला जाण्यास अवकाश होता. कदाचित काही कारणास्तव तो थांबला होता. एक्सप्रेस वे वरून गाडी एकशे साठ ते एकशे एंशीच्या वायुवेगाने समोर जात होती. सहालेनच्या त्या चिकण्या रस्त्यावर मावळत्या सूर्याचे लालसर प्रतिबिंब काळ्या शस्त्राने चिरत गाड्या चिं.... चिं... आवाज करत पुढे सरकत होत्या. डिव्हायडरच्या अगदी जवळच्या लेनला नचिकेतची गाडी वाऱ्याशी स्पर्धा करत पुढे जात होती. टोल नाक्यावर गाडी थांबली. ड्रायविंग सीटच्या बाजूला नचिकेतची आयुष्याची सोबतीनं आपल्या इवल्याश्या नेत्रांनी, अनभिज्ञ मनाने सभोवार बघणाऱ्या पाच महिन्याच्या मुलाला घेऊन बसली होती.

डॉ. आनंद यादव यांचे अभिनंदन !!!

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी शनिवार, 17/01/2009 या दिवशी प्रकाशित केले.
आनंद यादव
डॉ.आनंद यादव
आमच्या औरंगाबाद शहरात काल, महाबळेश्वर येथे होणार्‍या ८२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्याक्षाची निवड होणार होती. आम्ही धावत-पळत मसापच्या (मराठवाडा साहित्य परिषद) कार्यालयात पोहचलो. गर्दी दिसली की डोकावून पाहण्याची सवय, त्यामुळे गर्दी झालेली होती. एकाला विचारले कोण ? तर तो म्हणाला डॉ.आनंद यादव ! डॉ.

"नात॑......!!!!"

लेखक डोम्बिवली फास्ट यांनी शनिवार, 17/01/2009 या दिवशी प्रकाशित केले.
:D ;;) नात॑......!!! एक नात॑ जन्माच॑, ते फक्त असत॑ आईच॑, अस्तित्व असत॑ ममतेच॑, वात्सल्याच॑, येथे स्वार्थाला मात्र स्थान नसत॑.... !! एक नात॑ रक्ताच॑, जे फक्त असत॑ भाऊ-बहिणीच॑, ज्यात फक्त राज्य असत॑ मायेच॑, आपुलकीच॑.... !! एक नात॑ कर्माच॑, ज्यात असते कसोटी साठी निष्ठा, जेथे कामाला येते धैर्य, विरता.... !! एक नात॑ प्रेमाच॑, जिथे असतो एक विश्वास, दोन शरीर॑ अन् एक श्वास....!! एक नात॑ मैत्रीच॑, महत्त्व यात आहे वेळेच॑, पड्त्या वेळेला लागणारया आधाराच॑....!!

मनाच्या कुपितले-तुकयाची आवली

लेखक विनायक पाचलग यांनी गुरुवार, 15/01/2009 या दिवशी प्रकाशित केले.
माझा मनाच्या कुपितले या सदरातला हा तिसरा लेख
'' तुकयाची आवली एक अनोखी जीवनयात्रा''
'' तुकयाची आवली'' ही सौ. मंजुश्री गोखले यांची कांदबरी. तुकारामांची दुसरी पत्नी आवली हीच भावविश्व सांगणारी एका वाक्यात सांगायचे तर ''कल्पनेतला चंद्र हातात घरण्याची मनिषा बाळगून तो चंद्र प्रत्यक्षात प्राप्त करणं'' असंच या कादंबरी बाबतीत म्हणावं लागेल.

संक्रांत कशासाठी

लेखक भास्कर केन्डे यांनी बुधवार, 14/01/2009 या दिवशी प्रकाशित केले.
संक्रांत म्हटलं की तीळ-गुळ, तिळाचे लाडू, तीळ लावलेल्या भाकरी, वाला-वांगी-पेरु-बोर वगैरे भाज्यांच्या रसरशीत व खमंग गावराण जेवणाचा अस्वाद, सुवासिनिंचे हळद-कुंकवाला एकमेकींकडे जाणे येणे, आवा लुटणे, नवीन सुगड्यात बोरे, चिंचा, उसाची कांडे भरुन त्यांची पुजा करणे, चिल्या-पिल्यांचे बोर न्हाण, पतंगांच्या भरार्‍या... ही सगळी लगबग डोळ्यासमोर येते. मला मात्र एक गोष्टीची गंमत वाटते. आजकालच्या संक्रांतीची भेटकार्डे व शुभेच्छापंत्रांत तिळ-गुळाचा भरपूर उधो-उधो होतो. पण त्यासारख्याच किंबहुना त्याही पेक्षा महत्वाच्या सांस्कृतीक गोष्टींकडे मात्र आपण पाहिजे तेवढे लक्ष देत नाही.