Skip to main content

समाज

ग्वाल्हेरी मराठीचा लहेजा

लेखक भोचक यांनी शुक्रवार, 27/02/2009 11:11 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्याच कार्यालयात काम करणार्‍या ग्वाल्हेरच्या अरूंधती आमडेकर या मराठी मुलीने लिहिलेला हा लेख. दिल्लीला जवळजवळ खेटलेल्या ग्वाल्हेरमध्ये मराठी कोणत्या रूपात नांदतेय ते आपल्याला कळेल. भाषाचा संपूर्ण लहेजा तिथलाच आहे. फक्त वाक्यरचना वाचण्यास सोपी जावी म्हणून तेवढी संपादीत केलीय. बाकी शब्द वगैरे तेच ठेवलेत. 'अरे, यार दादा तूने आज फि‍र मेरा पेन ले लि‍या. आई देख ना इसको. बाबा आपके लि‍ए चाय बनाऊ? माझं एवढं बोलण झालं की बाबांचा चेहरा बघायसारखा असतो. "हुम्म, हे काय चालू ए अरुंधती‍ तुझं. कि‍ती वेळा सांगायचं की‍ घरात तरी मराठीत बोलत जा. आता कॉलेज झालं ना तुझं.

(ह्यापुढे) आंतरजालावर वावरताना...

लेखक देवदत्त यांनी शुक्रवार, 27/02/2009 00:56 या दिवशी प्रकाशित केले.
आपणां सर्वांचा आंतरजालावर वावर खूप वाढला आहे. माहितीचा खजिना, विपत्रे, बँकेची कामे, खरेदी व इतरही फार कामांकरीता आपण आंतरजालाचा पूरेपूर फायदा घेत असतो. भरपूर वेळा आपल्याला सूचना मिळत असतात की आंतरजालावर वावरताना बँकेचे, खरेदी करण्याचे संकेतस्थळ वगैरे ठिकाणी सुरक्षितता का व कशी ठेवावी, इतर सुरक्षितता म्हणजे कोणत्याही संकेतस्थळावर स्वतःची खाजगी माहिती देताना नीट चौकशी करून घ्यावी इत्यादी इत्यादी. ह्यावर भाष्य करण्याचा किंवा सल्ला देण्याचा माझा बिलकुल विचार नाही. माझा रोख आहे तो इतर गोष्टींवर, नुकत्याच वाचनात आलेल्या... १.

उपेक्षित सावरकर

लेखक भोचक यांनी गुरुवार, 26/02/2009 10:53 या दिवशी प्रकाशित केले.
सावरकर नाव घेताच 'स्वातंत्र्यवीर' ही पदवी आठवते त्यांची ती प्रसिद्ध गाजलेली उडी आठवते. त्यांची सशस्त्र क्रांती आठवते. मग त्यानंतरची हिंदूत्ववादी भूमिका आठवते. आणि मग फार तर जातीनिर्मुलनासाठी केलेलं काम आठवतं. कधी कधी भाषाशुद्धी चळवळ आठवते. पण समग्र सावरकर आपण समजून घेण्याचा प्रयत्न कधी केलाय? हे सगळं आणि याहूनही बरंच काही करणारी, मांडणारी एकच व्यक्ती होती. तिला वेगवेगळे आयाम होते आणि त्यातले अनेक आपल्याला पटणारे आणि न पटणारेही होते. पण म्हणून ते समजून न घेता त्याकडे दुर्लक्षच बरेच झाले. सावरकरांना समजून घेण्यात आपण कमी पडलो आणि त्यांचं मोठेपण इतरांपर्यंत पोहचविण्यातही आपल्याला अपयश आलं.

सुपंथ - दुरितांचे तिमीर जावो. एक अनोखा मदतगट

लेखक केदार यांनी मंगळवार, 24/02/2009 09:38 या दिवशी प्रकाशित केले.
'भारतात हे नेहमी असेच असते'! 'भ्रष्टाचार खूपच झालाय!' 'काहीनाही रे, ह्यांना पैसे हवे वर प्रसिध्दीही!'. 'राजकारणी काSSSही करत नाहीत, ही सिस्टीमच बदलायला पाहीजे!' 'गोळ्या घाला साल्यांना!' 'शिका, शिका म्हणावं काही तरी प्रगत देशांकडून ...'अशी वाक्य आपण अनेक ठिकाणी ऐकली आहेत. बरेचदा ते बोलणारेही आपणच असतो, जोशात चार वाक्य फेकली की किती बरं वाटतं. भारत बदललेला सर्वांनाच हवाय, पण कृती करायची म्हटली की होतेच असे नाही. 'करणारे करोत रे, समाजात चार पाच अभय बंग, अवचट,पोद्दार, आमटे, सकपाळ निर्माण होतील आणि जातील आपल्याला काय त्याचे?', अशी आपल्या समाजाची मनोभूमिका झालेय.

भारतीय इमोश्नल ब्लॅकमेलिंग व चुकीचे आदर्श

लेखक त्रास यांनी गुरुवार, 19/02/2009 17:17 या दिवशी प्रकाशित केले.
एक बातमी- अमके तमके श्री. प्रसिद्ध व्यक्तिमत्व ह्यांना तमक्या वकिलातीने व्हीसा नाकारला. [बातमीत हे देत नाही की त्यांनी कागदपत्रांची पुर्तता केली होती की नाही. पण आमच्या लाडक्या दैवताला तुम्ही व्हिसा देत नाही हा "इमोशनल" मुद्दा लावून धरला जातो व लोकांच्या समोर चुकीचा आदर्श उभा राहतो. व्यक्तिमत्व लाडके असले म्हणजे काय झाले त्यांना कायद्याच्या सवलती नसाव्यात हा मुद्दा त्यात येत नाही.] दुसरी बातमी- श्री. अमुक तमुक ह्यांनी १००० नाटकाचे प्रयोग केल्यानिमित्ताने सत्कार [त्यांचा नाटक हा व्यवसाय आहे. मग त्यात काय विषेश- सत्कार कशाबद्दल? त्यांनी अभिनय हा व्यवसाय पोटापाण्यासाठी निवडला आहे.

असाही एक व्हॅलेंटाइन ...

लेखक विंजिनेर यांनी बुधवार, 18/02/2009 12:07 या दिवशी प्रकाशित केले.
"येत्या शनीवारी मोकळा आहेस ना?" श्री. पार्क श्रीकांतला विचारत होते. "हो, आहे की. का बुवा काही जास्तीचे काम आहे ऑफिसमधे?" श्रीकांतची शंका. "अरे, आपल्या पूर्ण गटाला अर्धा दिवस प्योंगतेकला जायचे आहे विसरलास की काय?" पूर्व आशियातल्या इलेट्रॉनिक्स आणि भ्रमणध्वनि बनविणार्‍या प्रसिद्ध संस्थेच्या एका संशोधन-आणि-नवनिर्मिती विभागात चाललेला हा संवाद. ह्या विभागाने आमच्या संस्थेची आज्ञाप्रणाली वापरायला नुकतीच सुरवात केली आहे. त्यामुळे आज्ञाप्रणाली वापरताना तिथल्या अभियंत्यांना आलेल्या अडचणी सोडवणे, प्रणालीतल्या त्रुटींचे निवारण आदी कामानिमित्त माझे इथे गेले काही महीने दररोज जाणे येणे होते.

तो व मी - लफडा अनलिमिटेड.

लेखक दशानन यांनी मंगळवार, 17/02/2009 07:10 या दिवशी प्रकाशित केले.
तो- अरे बाबा खुप सुखी आहेस रे. मी- कारे असं का वाटलं तुला ? तो- तुझं लग्न झाले नाही ना त्यामुळे. मी- अच्छा.. म्हणजे ज्याचे लग्न नाय झालं तो सुखी ? तो- नाय तर काय.. परवाची गोष्ट तो व्ही-डे काय विसरलो घरात महाभारत चालू आहे, तीने मला धुतला. मी- तु व्ही- डे विसरलास लेका ? चांगले केले धुतला ते. तो- अरे कामाच्या रगाड्यात विसरलो त्यात काय येवढे..३६४ दिवस प्रेम व्यक्त करतोच ना मी काही ना काही तरी करुन. मी- काय झालं व्यवस्थीत सांग. तो- शनिवारी सकाळी तीने मला हसून चहा दिला बेड वरच. मी- मग, तु काय केलं. तो- नेहमी पेक्षा त्यात साखर जास्त होती, म्हणून मी म्हणालो साखरेचे भाव खुप वाढले आहेत..

लागण व्हॅलेंटाईनची!

लेखक रेवती यांनी रविवार, 15/02/2009 19:51 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी, दरवर्षीप्रमाणेच ह्याही वर्षीच्या व्हॅलेंटाईनला पाच वर्षांपूर्वीची एक गोष्ट आठवली. सहाजिकच चेहेर्‍यावर हसू पसरलं. चतुरंग हसण्याचं कारण न विचारते तरच नवल. तर त्याचं असं झालं २००४ सालची गोष्ट. आमच्या धाकट्या बंधूराजांच्या लग्नानिमित्त मी मुलाला घेऊन पुण्याला गेले होते. रंगरावांना कामातून (नेहेमीप्रमाणेच) सुट्टी मिळाली नव्हती त्यामुळे ते अमेरिकेतच होते. आता माझं माहेर हे लग्नघर झालेलं त्यामुळे सहाजिकच गडबड, धावपळ चालू होती. नवर्‍यामुलाला प्रथेप्रमाणे कमितकमी रजा मिळाली होती! मानाची मोठी करवली असल्याने सगळे महत्त्वाचे निर्णय माझ्याकडेच सोपवले होते.

ठकीचा संसार

लेखक प्राची यांनी शनिवार, 14/02/2009 20:51 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मिपाकरांना माझा नमस्कार. मिपावरील हा माझा पहिलाच प्रयत्न आहे,त्यामुळे काही चुकले तर,सांभाळून घ्या,चुकले तर सल्ला द्या ही विनंती. मागच्या आठवड्यात 'पवार पब्लिक स्कूल्,भांडुप' येथे श्री. विलास ना.