Skip to main content

समाज

देणार्‍याचे हात घ्यावे...

लेखक मृण्मयी यांनी रविवार, 01/02/2009 या दिवशी प्रकाशित केले.
"गजाभाऊ, काय हो काय झालं?" गजाभाऊ ४-५ मुलींच्या भेदरलेल्या घोळक्याला घेऊन येताच कारेकर बाईंनी चौकशी केली. "त्यानलाच विचारा! सांगा महालक्ष्म्यांनो, खरं सांगा. लबाड बोलायचं काम न्हाई." पाचातल्या चार महालक्ष्म्या खाली माना घालून उभ्या होत्या. पाचवी नुस्तीच टकामका बघंत उभी राहिली. "बोला गं कुणीतरी पटापटा! बाकी कामं आहेत मला." कारेकर बाई वैतागून म्हणाल्या. "ह्या काय बोलतील बाई? मीच सांगतो. ह्या पोरी मधल्या सुट्टीत फाटकावरून कुदून बाहेर गेल्या बोरंवाल्या म्हातारीकडं! म्हणाल तं एकीजवळ पैसा न्हाई. उधारीचा मामला! आधीची पण उधारी हाए ह्यातल्या दोघींची. म्हातारी सोडेना.

लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी...

लेखक नीलकांत यांनी गुरुवार, 29/01/2009 या दिवशी प्रकाशित केले.
लाभले अम्हांस भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म,पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी
मराठीच्या या अभिमान गितासाठी एक प्रकल्प श्री कौशल श्री. इनामदार हाती घेत आहेत. या प्रकल्पाची माहिती सर्व मराठी लोकांना व्हावी एवढ्या साठी येथे देत आहे. या विषयी सविस्तर माहिती मराठी अस्मीता या संकेतस्थळावर आहे.

सावरकर आणि आपण

लेखक ए. प्रशांत यांनी बुधवार, 28/01/2009 या दिवशी प्रकाशित केले.
लेखक - अभिनय कुलकर्णी सावरकर नाव घेताच 'स्वातंत्र्यवीर' ही पदवी आठवते त्यांची ती प्रसिद्ध गाजलेली उडी आठवते. त्यांची सशस्त्र क्रांती आठवते. मग त्यानंतरची हिंदूत्ववादी भूमिका आठवते. आणि मग फार तर जातीनिर्मुलनासाठी केलेलं काम आठवतं. कधी कधी भाषाशुद्धी चळवळ आठवते. पण समग्र सावरकर आपण समजून घेण्याचा प्रयत्न कधी केलाय? हे सगळं आणि याहूनही बरंच काही करणारी, मांडणारी एकच व्यक्ती होती. तिला वेगवेगळे आयाम होते आणि त्यातले अनेक आपल्याला पटणारे आणि न पटणारेही होते. पण म्हणून ते समजून न घेता त्याकडे दुर्लक्षच बरेच झाले.

(कार्यक्रम) 'आनंदाचे डोही'

लेखक आनंदयात्री यांनी मंगळवार, 27/01/2009 या दिवशी प्रकाशित केले.
स. न. वि. वि. महाराष्ट्रातील वंचित जनतेच्या प्रश्नांबाबत गेली अनेक वर्षे प्रयत्नशील असलेल्या 'वंचित विकास' या संस्थेचे नाव कदाचित आपणास परिचित असेल. १९८५ मध्ये पुण्यात स्थापन झालेल्या या संस्थेचे महाराष्ट्रात सध्या १३ ठिकाणी काम चालु आहे. १९९३ पासुन महाराष्ट्राबाहेर मध्य प्रदेशात छिंदवाडा इथेही संस्थेचा आदिवासी विकास प्रकल्प कार्यरत आहे.

मी "स्थानीक की परप्रांतीय " ??? - आपण सारेच अर्जुन ...

लेखक छोटा डॉन यांनी मंगळवार, 27/01/2009 या दिवशी प्रकाशित केले.
हा काही लेख वगैरे नाही, गेल्या काही वर्षातील अनुभवांच्या आधारावर माझ्याच मनात आलेल्या ह्या मुक्त भावना आहेत, ह्याला फारतर मुक्तक किंवा बाष्कळ बडबड असे नाव देता येईल. पुण्यात" स्थानीक" असणारे मराठी मन .... बेंगलोरमध्ये "परप्रांतीय" असणारे मराठी मन .... आज पुण्यात एका नव्या कंपनीत जॉइन झालो, नवे नवे लोक भेटले, बॉसने टीमशी ओळख करुन दिली. अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतके अपवाद सोडले तर सगळे "आपले" लोक आहेत. बाकीचे जे "उपरे" आहेत ते काही जास्त नादी लागत नाही ह्यांच्या असे दिसतेय.

पूर्वेच्या देवा तुझे 'सूर्य'देव नाव

लेखक सर्वसाक्षी यांनी सोमवार, 26/01/2009 या दिवशी प्रकाशित केले.
क्रांतिचे महात्म्य हेच की क्रांतिने रोमांचित झालेला एखादा सामान्य मनुष्य आपल्या ध्येयाने वेडा होऊन असा एखादा बेहोष क्षण जगतो की त्याचे सामान्यत्व त्याच्या नकळत गळुन पडते आणि त्याच्या तेजाने आसमंत दिपुन जातो. आपण कोण, आपले सामर्थ्य किती, आपली झेप कुठवर, आपला शत्रु किती प्रबळ, आपले ध्येय किती असाध्य याच यत्किंचितही विचार न करता ’मला माझ्या ध्येयाखातर काहीही दिव्य करावे लागले तरी मी ते साध्य करणारच’ हा ध्यास जे घेतात तेच लौकिकार्थाने अमर होतात.

तेथे कर माझे जुळती !

लेखक यांनी सोमवार, 26/01/2009 या दिवशी प्रकाशित केले.
मूळचे केरळचे रहिवासी असलेले रेनिल्सन आणि निशा आपल्या तीन वर्षे वयाच्या मुलीबरोबर घरी परत जात होते.प्रवासात त्यांच्या गाडीला अपघात झाला त्यात निशा जागीच ठार झाल्या. रेनिल्सन यांना अनेक फ्रॅक्चर्स झाली. छोट्या तमन्नाला जबर दुखापत झाली. डॉक्टरांनी तमन्नाला ब्रेन डेड घोषित केले. ही घटना 20 जानेवारीची. पत्नी अपघातात गेलेली, स्वत: मणिपाल येथील हॉस्पिटल मधे जखमी अवस्थेत अशा परिस्थितीत देखील रेनिल्सन यांनी अपूर्व मनोधैर्य दाखवत स्वत:चे दु:ख बाजूला ठेवून तमन्नाचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला.

जय जय भारत ! जय जय भारत !

लेखक आचरट कार्टा यांनी रविवार, 25/01/2009 या दिवशी प्रकाशित केले.
धवलगिरीच्या हिमशिखरांतुन सह्याद्रीच्या उंच कड्यांतुन गंगा-यमुना-गोदावरीच्या शुभ्र स्फटिकसम शीत जलातुन घोष एक हा घुमू लागला जय जय भारत ! जय जय भारत ! भेदातीत गर्जना होतसे जय जय भारत ! जय जय भारत ! सूप्त अग्नि तो फुलून उठला क्रांतीच्या कुंडात प्रकटला पाश तोडण्या परदास्याचा तृतिय नेत्र शंकरे उघडिला पितृभूमी ही मुक्त कराया सुपुत्र रणसागर हा आला कोटिकंठरव कानी येई जय जय भारत ! जय जय भारत ! स्वप्राणांच्या असंख्य ज्योती स्वयें अर्पिल्या या देशाप्रति निर्भय योद्धे रणात पडले देउनि निज प्राणांच्या आहुति क्रांतिवीर ते अमर जाहले विसरुनि घर अन्‌ विसरुनि नाती तख़्तावरही गर्जुन गेले जय जय भारत !
Taxonomy upgrade extras